Text
स्त्री जन्मा तुझी कहाणी..
स्त्री जन्मा तुझी कहाणी आता ही जन्म घेते जिजाऊ, भीमाई...
स्वप्न पाहिलं ते प्रत्येक्षात उतरवल
पोटच पोरग तीन देशाला वाहल
केला अर्पण आपलाही प्राण
शतकोटी नमन त्याना ज्या जाहल्या जहाल
स्त्री जन्मा तुझी कहाणी आजही जन्म घेते जिजाऊ भीमाई
आजही आहेत अशा माता
ज्यांच्या आहेत यशो गाथा
ज्यांच्या चरणी टेकतो माथा
झाली सिंधू अनाथाची माता
स्त्री जन्मा तुझी कहाणी आजही जन्म घेते जिजाऊ भीमाई..
सर्वं गोष्टी चा विरोध होऊन
नाही कधी डगमगनार
ती सत्या साठी लढणार
ती नाही कुणाला भिनार
स्त्री जन्मा तुझी कहाणी आजही जन्म घेते जिजाऊ भीमाई..
मोठी शिकली पायलट झाली
तर कधी इस्रो ची वैज्ञानिक झाली
कधी डॉक्टर तर राष्ट्रपती झाली
एवढं त काय वीर रत्नाची माता झाली
स्त्री जन्मा तुझी कहाणी आजही जन्म घेते जिजाऊ भीमाई..
कोणी म्हणती स्त्री कोमल
कोणी म्हणती स्त्री नाजूक
कोणी म्हणती झांसी ची राणी
कोणी म्हणती रंणचंडीका आपसूक
स्त्री जन्मा तुझी कहाणी आजही जन्म घेते जिजाऊ भीमाई..
स्त्री मुळे उद्धार दोन्ही कुळाचा
स्त्री मुळे जन्म आहे सर्वांचा
म्हणून तिचा जन्म मोलाचा
ती सन्मान आहे मानव जातीचा
स्त्री जन्मा तुझी कहाणी आजही जन्म घेते जिजाऊ भीमाई..
-गोपाल मुकुंदे

0 notes
Text
*लकब*
आमची पोलीसांची 24 तास ड्युटी असते, दिवसरात्र मग ते काहीही असो ड्युटी म्हणजे ड्युटी,तसा मी एक दिवस ड्युटीवर होतो,ट्राफिक पोलीसाची ड्युटी म्हणजे पोलीस खात्यातील त्याले आरसा मानला जाते, पांढरे फटक कपडे, आणि ते डोक्यावरची टोपी,अन शिट्टी,वाजवत भर चौकात गाड्या ची रेलचेल, रॅल्या ,बंदोबस्त, वाहतूक सांभाळणे ,म्हणजे नीरा कसरत च त्यात पोलीसां सोबत हुज्जत घालणारे, गाड्या चालवणारे लोक,रस्त्यावरच्या ट्रक च धुपट, वरतून ऊन,सावलीत उभं रावाव कुटी, नीरा बुराट गोट असते,अशा ही ताण तणावात पोलीस आपली ड्युटी करत असते,असाच एक दिवस अशोक वाटिका जवळ माई ड्युटी सुरू होती, कोणतीही घटना घडो रस्त्यावर होणारे गाड्या च��या ठोसा, असो मारामारी,भांडणअसो,रस्त्यावर कुटीही काहीही झालं तरी लोक ट्राफिक पोलीसांले येऊन सांगणात ,आणि त्या ही दिवसी तस च होत पण कारण अलगच होत,गाडीवाला आला मले म्हणे साहेब पेट्रोलपंपा जवळ एक येळा(पागल )लोकाईले गोटे मारून रायला म्हणे !वाहनावर,काय रस्त्यावर च्या लोकांईले काय, काहीतरी करा म्हणे,म्या म्हटलं आता हेच रायला होत.वाहतूक ट्राफिक सांभाळू की पागल बुआ ले,म्हटलं सांगितल त जा त लागलीच,100 लोक जमा झालेले यांनी त्या पागल माणसाले उलट चीडऊन देत होते, अन तो गडी मंग कायले अटपटे,कोणाले गोटे हान,कोणच्या अंगावर जाय, नीरा अकात चालू होता,मी जाऊन पायल आणि त्या पागल गाड्या च्या इकडे पाहल आणि मले त्याची जुनी गोस्ट आठवली.
आम्ही ट्रेनिंग ले असतांना आमची जे ड्रिल,पिटी चालते, हा नमुना(हा वेडा )दूर ग्राउंड च्या बाहेर दूर उभा राहे.आणि आम्ही जसे ड��रिल करो,तसा तो शिट्टी च्या जोरावर आमच्या सर्व पोलीसाची कवायत तो करे हे मले आठवलं!आणि मी शक्कल लढवत,गोटे मारणारा त्या गड्या जवळ थोडं पुढे जाऊन एक शिट्टी मारली,त गडी सावधान झाला,मग त्याच ते गोटेमारी बंद गडी सावधान, दोन शिट्टी मारल्या त गडी विश्राम,आणि आमची साईड जंप ची शिटी मारली त गड्याची साईड जंप सुरू,सर्व लोक पायत बसले हे होऊन काय रायल,मग काय मी त्याले आमचे सगळे पिटी चे हात त्याचे कडून करून घेतले,दौड कदम ताल मध्ये गडी एवढा बेदम झाला की गडी तिथून पयत सुटला नीरा जिंगाट,असही कधी कधी ड्युटीत करा लागते,काय कसा वेळ येईल सांगता येत नाही,समयाशी सादर व्हावे,हे महत्त्वाच असते,समस्या कोणतीही असो,माणसात ती सोडवण्याची लकब असली तर समस्या सोडू शकतो हे मी त्या दिवशी शिकलो....
-गोपाल मुकुंदे
0 notes
Text
*मनातील घर..*
सध्या आपण म्हणतो की कलीयुग आहे. या युगात खऱ्याच खोटं आणि खोट्याचं खरं होते आणि ते अनुभव आपल्याला नेहमी येतात, चोरी, वाहन चोरी, घरफोडी, ऑनलाईन फसवणुक खून, दरोडा, मारामारी, अत्याचार, अशा अनेक घटना आपण नेहमी पाहत असतो. आणि वातावरण पाहून असे वाटते देवा काय होईल या जगाचे असे वाटते आणि खरच कलीयुग आहे असा भास होतो. परंतु हे सर्वं होत असताना नकरात्मक गर्द छायेत आपण जणू काही रस्ता भटकलो आहोत असे वाटते, परंतु ज्या प्रमाणे चिखलातुन कमळ वर येते, त्या प्रमाणे या दुनियेत अजुन भरपूर लोक आहेत जे सत्याचे पाईक आहेत, बालसंस्कार ज्यांचे वर घडले आहेत ते काहीही असो आपला मार्ग सोडत नाहीत असे लोक नेहमी मनातं घर करून जातात.
तसेच आज काहीतरी घडले आपल्या नेहमीच्या धावपळी तुन थोडा वेळ काढून मुलीला डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो, गर्दी जवळ जवळ संपली होती, आम्ही पोहचलो लवकरच नंबर लागला, दवाखान्यात टेबल वर वयस्क नाव नोंदणी साठी होते डॉक्टर ची फी देण्यासाठी मी त्याना ५०० रु ची नोट दिली, त्यानंतर डॉक्टर साहेबांनी डोळे तपासले आणि ड्रॉप लिहून दिला आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी गडबडीत निघालो आणि गाडीजवळ आलो तेवड्यात नाव नोंदणी वाले काकांनी मला आवाज दिला मी वापस गेलो काकाजी मला म्हणाले तुम्ही फी दिली, मी म्हटलं हॊ, मला २५० रुपये तुम्हाला देणे आहेत ना, मला काही समजलं नाही कारण मी ५०० ची नोट दिली होती २५० रुपये वापस घेणे विसरलो होतो, पण ती गोष्ट ते काकाजी विसरले नाहीत त्यानी आवर्जुन हाक देऊन पैसे परत केले गोष्ट साधी होती, पण काकाजी ची ही गोष्ट मनात घर करून गेली, जगात वर सांगितल्या प्रमाणे वाईट वृतीचे लोक आहेत, पण अंधः���ारातून उजेडाकडे आपल्या सकरात्मक स्वभावातून जाणारे लोक सुध्दा आहेत.
आकाशातील पाऊस जमिनीवर कोसळतो, कोणता पाण्याचा थेंब गटारी मध्ये पडतो त्याचे रूपांतर गटारीत होते, फुलांच्या वर पडला त्याचा दवबिंदु तयार होतो आणि तोच थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो, असे मोत्यासारखे लोक या पृथ्वीतलावर आहेत म्हणूनच आपल सर्वांच अस्तित्व आहे.
-गोपाल मुकुंदे
0 notes
Text
*सायबर साक्षर होने काळाची गरज…*
या भारतात बंधू भाव नित्य वसू दे दे वरची असा दे, सर्वं पंथ सांप्रदाय एक दिसू दे मतभेत नसू दे,-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
या भजनाच्या माध्यमातून सर्वं भारतीया साठी देवाकडे मागणे मागतात, व्यापक दृष्टी ही संतांची असते त्यामध्ये कोण आपला कोण परका असा दुजाभाव नसतो, जो कोणी आहे तो पहिले माणूस आहे, एवढच त्यांना दिसते, म्हणून विश्वाच्या कल्याना संतांच्या विभूती, देह झीजवती परोपकारे, म्हणून सर्वं महापुरुषांनी आपल्या अखंड भारता साठी पुर्ण आयुष्य खर्ची घातल, अनेक जाती, धर्माच्या लोकां साठी व्यासपीठ खुलं करून दिल,
सबके लिये खुला हैं मंदिर यह हमारा,
आओ कोई भी, धर्मी, आओ कोई भी पंथी,
देशी विदेशी ओ को, मंदिर यह हमारा,
असा विचार करणारे हे महापुरुष होऊन गेले परंतु त्याचे विचार आपण आत्मसाथ केले पाहिजे हे सर्वा कडून अपेक्षित आहे.
परंतु आपण शिकलो सुशिक्षित झालो असे आपण म्हणतो,परंतु शिकला आणि डिग्री मिळाली म्हणजे तो स्वयंपुर्ण झाला असे नाही, आता च्या काळात तर आपण माहिती व तंत्रज्ञाना च्या आभासी जगात वावरात आहो, आपल्या मेंदूवर आपले कंट्रोल पाहिजे, पण तसे दिसत नाही, जणू काही या मोबाईचे आपण गुलाम झालो आहोत, सकाळी उठल्यापासून तर झोपी जाई पर्यंत आपण मोबाईल च्या माया जाळात असतो, कोण काय गुड मॉर्निग, ज्ञानबाजी, पोस्टर, शुभेच्छा, लाईक, कॉमेंट्स,जणू काही हेच जीवन आहे, त्यात जर कोणी लाईक केले नाही, तर राग, भांडण सुद्धा, अशा अनेक घटना या मोबाईल मुळे घडत आहेत, कोणताही मेसेज आला की क्षणाचाही विचार न करता आपण फारवर्ड करतो, आणि परंतु आपण जे माहिती इतरांना देत आहो, ती कोणी लिहली त्याचा उद्देश काय आहे, या पासुन समाजात चांगला संदेश जाईल की वाईट, याची शहानिशा करणे गरजेचे आहे, समाज हिताचे मेसेज असतील तर आपण जरूर शेअर करावे परंतु, आक्षेपार्ह मेसेज, दोन धर्मात तेढ निर्माण करणारे, सामाजिक अशांतता प्रस्तापित करणारे मेसेज, जर असले तर थोडा विचार करणे गरजेचे आहे, असे मेसेज तयार करणारे लोकांचा उद्देश हा वाईट असतो, करणारा एक असतो परंतु त्याचे परिणाम गंभीर होतात, काहीही कारण नसताना सर्वसामान्य जनतेचे त्यामध्ये हाल होतात, वयक्तिक भांडण कोणाचेच नाहीत, हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारशी, हे एकत्र राहतात, सण उत्सव साजरे करतात,एकमेकांच्या प्रति बंधूभाव दाखवतात, परंतु बोटावर मोजन्या इतक्या लोकां मुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो, ते आता आपल्याला ओळखता आले पाहिजे, या असामाजिक तत्व पसरविणाऱ्या लोकांपासून आपण सावधान राहील पाहिजे, व त्यावर निर्बंध लावता आला पाहिजे, या साठी आपण सर्वं सायबर साक्षर होणे गरजेचे आहे, असे कोणतेही मेसेज फारवर्ड करताना जरा विचार करा,गुन्हेगार हा गुन्हेगार चं असतो त्याला नां कोणती जात असते नां कोणता धर्म,
मजहब नहीं सिखाता आपस मे बैर करणा
हिंदी हैं हम वतन हैं हिंदोसीता हमारा…..
-
1 note
·
View note