Raghuram Rajan : राहुल गांधींना अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची साथ, भारत जोडो यात्रेत घेतला सहभाग
Raghuram Rajan : राहुल गांधींना अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची साथ, भारत जोडो यात्रेत घेतला सहभाग
Raghuram Rajan : राहुल गांधींना अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची साथ, भारत जोडो यात्रेत घेतला सहभाग
Raghuram Rajan in Bharat Jodo Yatra : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.
Raghuram Rajan in Bharat Jodo Yatra : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद…
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सायंकाळी नवी दिल्लीत शपथविधी
जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर-मुंबईची द्विजा पटेल मुलींमध्ये पहिली
जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांकडून पाठलाग करून अटक
आणि
नैर्ऋत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच मुंबईत दाखल
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी होणाऱ्या या समारोहात भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानपदाची शपथ देतील. सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे देशाचे आतापर्यंतचे दुसरेच पंतप्रधान आहेत. या समारंभासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख नेते राजधानी दिल्लीत दाखल होत असून, सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव, पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रीती साहू, गोंदियाचे लोको पायलट स्नेहसिंह बघेल, नाशिकचे स्वच्छता दूत चंद्रकिशोर पाटील यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी पावणे ७ वाजल्यापासून केलं जाणार आहे, त्यामुळे संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी साडे ६ वाजता प्रसारित केलं जाईल
दरम्यान, मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींना आणि सदैव अटल स्मृतिस्थळावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन मोदींनी हुतात्मा सैनिकांनाही अभिवादन केलं.
मोदी यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या निवडक मान्यवरांसाठी चहापानाचा कार्यक्रम ठेवला, त्यात अमित शहा, जे. पी. नड्डा, एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, रामदास आठवले, ज्योतिरादित्य शिंदे, चिराग पासवान यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.
****
संसदेत काँग्रेसच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज काँग्रेसच्या संसदीय पक्षांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळून तो अधिक सशक्त झाला असल्याचं सोनिया गांधी यांनी सांगितलं.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल आज सकाळी जाहीर झाला आहे. दिल्लीच्या वेद लाहोटीनं ३६० पैकी ३५५ गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावलं. मुंबईच्या द्विजा धर्मेशकुमार पटेल या विद्यार्थिनीनं ३३२ गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. ही परीक्षा २६ मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेत ४८ हजार २४८ उमेदवार पात्र ठरले असून, त्यात सात हजार ९६४ महिला उमेदवार आहेत. विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात येत असलेला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून, अंतिम टप्प्यातील कामं देखील वेगानं पूर्ण केली जात आहेत. या प्रकल्पातील मरीन ड्राइव्हपासून सुरु होणारा दुसरा भूमिगत बोगदा, उत्तर दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीनं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री उद्या या मार्गावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस हा मार्ग सुरु राहील. तर उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील दोन दिवस हा मार्ग बंद राहणार आहे.
****
राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं देण्यात येणारा डॉ. हेलन केलर पुरस्कार अहमदनगर इथल्या सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांना आळंदी इथं प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या आणि यशोगानच्या संचालिका प्राची गुरजर यांच्या उपस्थितीत जागृती अंध मुलींच्या शाळेत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. मानपत्र, सन्मान चिन्ह आणि अकरा हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
परभणी जिल्ह्यासह इतर सहा जिल्ह्यात जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं सहा जिल्ह्यातील २५ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या गुन्हात वापरण्यात येणारी हत्यारं, मोबाईल आणि वाहन असे एकूण सुमारे साडेपाच लाखांच्यावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गजानन वाघमारे, जाकेर मंसार कुरेशी, सुरेश खिल्लारे अशी आरोपींची नावं असून त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी स्थानिक १० साथीदारांच्या मदतीनं अनेक गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक रविंद्रसिह परदेशी यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपात करणाऱ्या मोठ्या टोळीचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातल्या सोनोग्राफी तसंच गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पाच तारखेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ३४ सोनोग्राफी केंद्रं तसंच १५ गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेत महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. महापौर दालनातल्या त्यांच्या प्रतिमेला उपआयुक्त प्रशांत सपकाळे यांनी आज पुष्पहार अर्पण केला. नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, यांच्यासह मान्यवरांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली बलस्थाने ओळखून आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि व्यवसायाभिमुख कौशल्य युक्त शिक्षणाची गुणवत्तेला जोड देऊन आयुष्यात यशस्वी व्हावं, असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी केलं आहे. ते आज धाराशिव इथं ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
****
बीड जिल्ह्यात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी चौकशी करावी या प्रमुख मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलिस अधिक्षकांना देण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सातारा-देवळाई परिसरात महापालिकेच्या वतीने गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नाविरोधात आज नागरिकांनी दुचाकी फेरी काढून निदर्शनं केली. सातारा-देवळाई परिसरात मधील नागरिकांनी तत्कालीन ग्रामपंचायतींकडून बांधकाम परवानग्या घेतलेल्या असल्याने, त्यांना गुंठेवारी लागू करू नये, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. या मागणीचं एक निवेदनही त्यांनी महापालिकेला सादर केलं आहे. या मागणीचा विचार न झाल्यास, न्यायालयात दाद मागण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात एका ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. माधव कारलेवाड आणि शिवाजी तीनलवाड अशी मृतांची नावं आहे. किनवट तालुक्यातील धानोरा गावाजवळील सावरीघाटात आज सकाळी ही घटना घडली. या अपघातात ट्रकही जळाला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
मुंबईत आज नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं. साधारणपणे ११ जूनला हा पाऊस मुंबईत येतो. त्यातुलनेत २ दिवस आधीच पावसाचं आगमन झालं आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसांसाठी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला.
मराठवाड्यातही अनेक भागात आज पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर परिसरात साडे चार वाजल्यापासून पाऊस सुरू आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दुपारनंतर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून, दमटपणा वाढला आहे.
बीड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून वार्षिक सरासरीच्या १० पूर्णांक सहा टक्के इतक्या पावसाची नोंद झाली असून, गेवराई तालुक्यात सर्वाधिक ८८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री आठ वाजता प्रारंभ होईल.
स्पर्धेत आज पहाटे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं युगांडाचा १३४ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकांत पाच बाद १७३ धावा केल्या. उत्तरादाखल युगांडाचा संघ १२ षटकांत अवघ्या ३९ धावांत बाद झाला.
Rahul Gandhi | राहुल गांधींना न्यायालयाचा मोठा झटका
सुरत | 23 मार्च रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 24 मार्च रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना खासदारांना देण्यात येत असलेला बंगला खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती.
मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 3 एप्रिल रोजी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली होती. मात्र कोर्टाने राहुल गांधी यांना मोठा झटका दिला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार आहेत.
2019च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी मोदी सरनेमवरून टीका केली होती. सर्वच चोरांची आडनावे मोदीच का असतात? असा सवाल त्यांनी केला होता.
राहुल गांधी यांच्या विधानाने मोदी समाजाचा अपमान झाल्याचं पूर्णेश मोदी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. तर मी एक राजकारणी आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतो. मी हे वक्तव्य हेतूपूर्वक केलेलं नाही. कोणत्याही समाजाला उद्देशून केलेलं नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
Read the full article
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ' ही ' मागणी
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ‘ ही ‘ मागणी
भारत जोडो यात्रा काढल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राहुल गांधी यांनी बेरोजगारी महागाई आणि देशातील वाढत चाललेला द्वेष याच्या विरोधात ही यात्रा काढलेली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा पायी चालणार असून अनेक नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांना समर्थन वाढत आहे. भाजपकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कितीही…
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ' ही ' मागणी
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ‘ ही ‘ मागणी
भारत जोडो यात्रा काढल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राहुल गांधी यांनी बेरोजगारी महागाई आणि देशातील वाढत चाललेला द्वेष याच्या विरोधात ही यात्रा काढलेली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा पायी चालणार असून अनेक नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांना समर्थन वाढत आहे. भाजपकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कितीही…
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ' ही ' मागणी
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ‘ ही ‘ मागणी
भारत जोडो यात्रा काढल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राहुल गांधी यांनी बेरोजगारी महागाई आणि देशातील वाढत चाललेला द्वेष याच्या विरोधात ही यात्रा काढलेली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा पायी चालणार असून अनेक नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांना समर्थन वाढत आहे. भाजपकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कितीही…
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ' ही ' मागणी
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ‘ ही ‘ मागणी
भारत जोडो यात्रा काढल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राहुल गांधी यांनी बेरोजगारी महागाई आणि देशातील वाढत चाललेला द्वेष याच्या विरोधात ही यात्रा काढलेली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा पायी चालणार असून अनेक नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांना समर्थन वाढत आहे. भाजपकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कितीही…
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ' ही ' मागणी
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ‘ ही ‘ मागणी
भारत जोडो यात्रा काढल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राहुल गांधी यांनी बेरोजगारी महागाई आणि देशातील वाढत चाललेला द्वेष याच्या विरोधात ही यात्रा काढलेली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा पायी चालणार असून अनेक नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांना समर्थन वाढत आहे. भाजपकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कितीही…
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ' ही ' मागणी
काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ‘ ही ‘ मागणी
भारत जोडो यात्रा काढल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राहुल गांधी यांनी बेरोजगारी महागाई आणि देशातील वाढत चाललेला द्वेष याच्या विरोधात ही यात्रा काढलेली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा पायी चालणार असून अनेक नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांना समर्थन वाढत आहे. भाजपकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कितीही…
स्वच्छता अभियानातून राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे स्वच्छता अभियान बनलं मोठी लोक चळवळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
राज्यातील साडेतीनशे किल्ल्यांच्या स्वच्छता अभियानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतरही नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांचे लिलाव बंद आंदोलन सुरुच.
आणि
आशियाई क्रीडा स्पर्धेत आठव्या दिवशी भारतानं दोन सुवर्ण पदकासह दोन रौप्य पदकं पटकावली.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज स्वच्छता हीच सेवा हे अभियान सकाळी दहा वाजेपासून राज्यासह देशभरात ठिकठिकाणी राबवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या या अभियानामध्ये देशभरात नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहानं सहभागी होत आपला परिसर स्वच्छ केला.
****
संपूर्ण भारतामध्ये स्वच्छतेची मोहीम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे एक मोठी लोक चळवळ झाली आहे. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनवण्यासाठी आपण टाकलेलं हे एक मोठ पाऊल आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंबईत गिरगाव चौपाटी इथं “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेची त्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली. त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं साडेतीनशे किल्ल्यावर आजपासून सफाई करण्याचं काम सुरू झालं आहे. या उपक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गड, किल्ले हे आपलं वैभव असून ते स्वच्छ राहावं हा आमचा प्रयत्न आहे. केवळ एक दिवस नव्हे तर भविष्यात आपलं शहर, गाव स्वच्छ राहावं हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत सरकारचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, नेहरू युवा केंद्र, तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आदीच्या सहकार्यानं बुद्धलेणी परिसरात आज सकाळी "स्वच्छता ही सेवा" उपक्रमा अंतर्गत "एक दिवस एक तास श्रमदान" ही मोहीम राबवण्यात आली. या अभियानाला केवळ एका दिवसापुरतं मर्यादीत न ठेवता जनआंदोलनाचं स्वरूप देऊन दररोज आपला परिसर स्वच्छ करण्याचं आवाहन केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी केलं. ते म्हणाले...
गांधी जयंत्ती निमित्त स्वच्छता अभियान सर्व ठिकाणी केलं आहे. नक्कीच हे अभियान आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. आज स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आहे, संपुर्ण शहरामध्ये अत्यंत चांगल्या तर्हेने कार्यक्रम होत आहे. स्वच्छता मोहिमे अंतर्गत घर, आपला परिसर, आपली संस्था, आपला एरिया स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावा.
..या महास्वच्छता अभियानाला राज्याच्या पर्यटन प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा शर्मा, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
****
जालना शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील एकूण ३० वॉर्डांमध्ये ६० ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या सर्व ठिकाणी स्वच्छतेबाबत श्रमदान, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक कचरा संकलन, स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली तसंच मोती तलावाजवळील संपूर्ण कचरा संकलन करून मोती तलाव स्वच्छ करण्यात आला.
****
याच उपक्रमात धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर, धाराशिवचे तहसीलदार शिवानंद बिडवे, यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसरात स्वच्छता केली.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग इथल्या किल्ला परिसरात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय प्रचार कार्यालय सोलापूर आणि पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव, तसंच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या स्वच्छता अभियानात आमदार राणाजगजितसिंह पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण तसंच अन्य संस्था संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
****
बीड शहरातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये एक तास स्वच्छता मोहीम उपक्रम राबवण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. बीड जिल्हा रुग्णालय, बस स्थानक हा परिसरही स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात राष्ट्रीय महामार्गाचे विविध अभियंता आणि अधिकारी कर्मचारी, एसटीचे वाहक, चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांनी पालिका परिसरात शहरांमध्ये विविध ठिकाणी नगरसेवकांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम यशस्वी केली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव इथंही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आमदार माधवराव पाटील जवळगावकर, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, अमित राठोड, गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
या उपक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीतर्फे श्रमदान करण्यात आलं. नरसी नामदेव इथं कयाधू नदीच्या घाटावर स्वच्छता करण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी रुद्राजी क्षीरसागर तसंच ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकरी यावेळी उपस्थित होते.
****
उप���ुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या मध्यस्थी नंतरही नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी लिलाव बंद आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने वाढवलेलं ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावं, कृषी विपणन केंद्र नाबार्ड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकार महासंघाने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकू नये यासह विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.
****
चीनच्या हँगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारतानं दोन सुवर्ण पदकासह दोन रौप्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजीत कॅन डाउरीस चेनाई, झोरावर सिंग संधु आणि पृथ्वीराज तौंडाईमन या खेळाडूंचा यात समावेश असलेल्या संघानं सुवर्ण पदक, तर याच खेळ प्रकारात मनिषा कीर, प्रिती रजक आणि राजेश्वरी कुमारी या महिलांच्या संघानं रौप्य पदक मिळवलं. अविनाश साबळे याने तीन हजार मीटर स्टीपलचेंज स्पर्धा प्रकारात आज सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. तसंच अदिती अशोक हिनं वैयक्तीक गोल्फ प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत बारा सुवर्ण, सोळा रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह एकूण ४२ पदकांची कमाई केली आहे.
****
चंद्रपूरच्या प्रसिद्ध ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची सुरुवात आज करण्यात आली. विधीवत पूजन करून पर्यटकांना या व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. गेले तीन महिने पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद होते. प्रकल्प व्यवस्थापनाने आता ऑनलाईन नोंदणी देखील सुरू केली आहे.
****
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज आदिवासी समाजाने गडचिरोली येथे चक्काजाम आंदोलन केले. यामुळे तब्बल अडीच तास वाहतूक ठप्प होती. गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालयापासून शेकडो आदिवासींनी इंदिरा गांधी चौकापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर चक्काजाम आंदोलन केले.
राहुल गांधींना अटक होणार?; वाद आणखी चिघळण्याची शक्यता
Photo Courtesy- Facebook/@rahulgandh
मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत एक वक्तव्य केलं आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सावरकरांचे नातू रजणीत सावकर संतापले आहेत. तसेच त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात तक्रार केली आहे.
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पोलिसांना पत्र लिहून राहुल गांधींना सावरकरांचा अवमान केल्या प्रकरणी अटक करावी अशी मागणी केली आहे.यामुळे राहुल गांधींना अटक होण्याची शक्यता आहे.
वीर सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार भारताविरुद्ध काम करीत होते अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी केलीये.
राहुल गांधींच्या विरोधात भाजप, मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेते तसेच शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहेत.
Read the full article
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने मंजूर केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत ठेवला होता. त्याला सर्व काँग्रेसच्या प्रतिनिधींनी मंजूरी दिली. तसेच, काँग्रेस अध्यक्षाला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कोषाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सदस्य निवडण्याचा अधिकार देणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस…
उद्धव झाले 'सामना'चे नवे संपादक, पहिल्याच संपादकीयमध्ये राष्ट्रवादी आणि ममता यांच्यावर निशाणा
उद्धव झाले ‘सामना’चे नवे संपादक, पहिल्याच संपादकीयमध्ये राष्ट्रवादी आणि ममता यांच्यावर निशाणा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “पोलिसांनी राहुल गांधींना धक्काबुक्की केली. प्रियंका गांधींना पोलिसांनी ओढून नेले. तुम्ही कोणतीही कारवाई करा, मी तुमच्या ईडीला घाबरत नाही, असे राहुल गांधी बेधडकपणे म्हणाले.”
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क
महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र…
देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात काँग्रेसने आज ‘ ब्लॅक फ्रायडे ‘ आंदोलन केले असून दिल्ली येथील या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक करण्यात आलेली आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना अटक केल्यानंतर राहुल गांधींनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट करून माहिती दिलेली आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या दडपशाहीला आपण घाबरत नाही. लोकांच्या प्रश्नावर आपण आवाज उठवत राहणार, असे…