Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 08 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
येत्या पाच वर्षात देशाला नव्या उंचीवर नेण्याचा तसंच मध्यम आणि गरीब वर्गाला अधिक सशक्त करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प
शरद पवार यांच्या गटाला, ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी
राज्यात किलकारी या मोबाइल हेल्थ सेवा उपक्रमाचं आणि मोबाइल अकादमीचं उद्घाटन
आणि
लातूर इथं आजपासून तीन दिवसीय कृषी महोत्सव
****
येत्या पाच वर्षात देशाला नव्या उंचीवर नेण्याचा तसंच मध्यम आणि गरीब वर्गाला अधिक सशक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतांना बोलत होते. आगामी पाच वर्षांत प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन देश आत्मनिर्भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताची युवाशक्ती जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सरकारच्या धाडसी आणि धोरणात्मक निर्णयांमुळे भारत आज देशातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. काँग्रेससह विरोधी पक्षांवर विविध मुद्यांवरून त्यांनी कडाडून टीका केली.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या गटाला, ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शरद पवार यांना हे नाव वापरता येईल. आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार यांना दिलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी शरद पवार गटानं केली असून, याच प्रकरणी अजित पवार यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे.
****
राज्यसभेच्या राज्यातल्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. सहा सदस्यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपत आहे. या जागा भरण्यासाठी येत्या १५ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
****
राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचं विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. या आवाहनाला प्रतिसाद देऊन निवासी डॉक्टरांच्या मार्ड या मध्यवर्ती संघटनेनं आपला प्रस्तावित संप मागे घेतला. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने हाती घ्यावी, विविध जिल्ह्यांत मंजूर वसतिगृहांच्या बांधकामांना गती द्यावी, असे निर्देशही पवार यांनी दिले.
****
पुणे जिल्ह्यात सासवड इथं प्रात्यक्षिकासाठी आणलेलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र-ईव्हीएम चोरीप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, चोरीस गेलेले ईव्हीएम परत मिळवले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
****
राज्यातल्या गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी या नव्या योजनेचा आणि आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा, राज्यात कालपासून शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री डॉ. एस. पी. सिंग बघेल यांच्या उपस्थितीत काल दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून या योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्रात सुमारे २८ लाख नोंदणी केलेल्या गर्भवतींना याचा लाभ होईल. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेनं आपल्या गावातल्या आशा सेविकेकडे नाव नोंदवणं आवश्यक आहे. 'प्रसूतीआधी आणि प्रसूतीनंतर, किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत', हे या योजनेचं ब्रीदवाक्य आहे. या मोबाईल अकादमीच्या माध्यमातून राज्यातल्या ८५ हजार आशा सेविकांना कामकाजासंबंधी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले, तसंच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. धाराशिव तालुक्यात ढोकी इथं शिवसंकल्प अभियानात कार्यकर्ता मेळाव्याला काल ते संबोधित करत होते. मराठा समाजातल्या पाच हजार युवकांना तातडीने नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या, तसंच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठा आरक्षणाचा कायदा या अधिवेशनात पारित करण्यासाठी नागरिकांनी आपल्या मतदार संघातल्या आमदारांना निवेदन द्यावं, असं आवाहन, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते काल नवी मुंबईत नेरुळ इथं एका कार्याक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी १० तारखेपासून पुन्हा उपोषणाचा इशारा जरांगे यांनी कालही दिला.
****
विकसित भारत संकल्प यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ८५६ नियोजित गावांपैकी, ७७८ गावांमध्ये पोहचली आहे. केंद्रीय महिला बालकल्याण विभागाचे सचिव राय महिपत रे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित ७८ ग्रामपंचायतींमध्ये येत्या आठवड्यात यात्रा नेण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा काल नांदेड शहरात देगलूर नाका इथल्या उर्दू घर तसंच चौफाळा भागात राखेवार मैदान इथं पोहोचली. नागरिकांनी मोठ्या उत्साहात यात्रेचं स्वागत केलं. या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत मयुरी पूर्णेकर आणि भागाराम मचेवार यांनी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती दिली.
****
लातूर इथं आजपासून तीन दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवात सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, पशुपालन, कृषी यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती अशा विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहे. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानही या महोत्सवात केला जाणार आहे.
****
परभणी इथं आजपासून ११ फेब्रुवारी पर्यंत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त काल शहरातून राजगोपालचारी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते विष्णू जिनींग मिल या मार्गानं शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर मसोड पाटी या ठिकाणी काल पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या ईसापूर धरणातून जलवाहिनेद्वारे नांदेड जिल्ह्याला जाणारं पाणी रोखण्यात यावं, शेनोडी - रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्यावी, कयाधू नदीवर छोटे बंधारे स्वयंचलित दरवाजे बसवून तयार करावेत, नियोजित खरबी प्रकल्प रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास येत्या २१ फेब्रुवारीला शेनोडी इथं जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
****
छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या मच्छीमारांनी काल पैठण इथल्या जायकवाडी धरणावर जलसमाधी आंदोलन केलं. जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवत हे आंदोलन करण्यात आलं.
****
अवैध वाळू वाहतूक प्रकरणी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून १५ हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल ताब्यात घेतलं. मुकेश गुंजाळ असं त्याचं नाव असून, गेवराई तालुक्यात संगम जळगाव इथं हायवा चालकास अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा वित्त आणि लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला सहा लाख रुपये लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. प्रलंबित देयक मंजुरी आणि अतिरिक्त सुरक्षित रक्कम मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या कोष्ठवाडी इथं जवळपास दोन हजार नागरीकांना प्रसादातून विषबाधा झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नांदेड इथं शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. परवा सहा तारखेला कोष्ठवाडी इथं संत बाळूमामा यांच्या सप्ताहानिमित्त भरवण्यात आलेल्या यात्रेत ही विषबाधा झाली होती. या घटनेची शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी दिले आहेत.
****
0 notes
भारती सिंहच्या मुलाने जन्मताच 'हुक्का' पिण्यास सुरुवात केली, कॉमेडियन ट्रोल्सच्या भोवऱ्यात
भारती सिंहच्या मुलाने जन्मताच ‘हुक्का’ पिण्यास सुरुवात केली, कॉमेडियन ट्रोल्सच्या भोवऱ्यात
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया ट्रोल झाले: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आई झाल्यापासून चर्चेत आहे. भारती सिंह वेळोवेळी तिच्या मुलाचे फोटो शेअर करत असते. यापूर्वी, भारती सिंहने तिच्या मुलाचे अनेक उत्कृष्ट फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. काही वेळापूर्वी भारती सिंग यांचा मुलगा लक्ष हॅरी पॉटरच्या लूकमध्ये दिसली. दरम्यान, भारती सिंगला ट्रोल करणाऱ्यांनी वेठीस धरले आहे. भारती सिंग मुळे त्यांचा मुलगा…
View On WordPress
0 notes
द कपिल शर्मा शोमध्ये बॉलीवूडच्या गायकांचा प्रतिध्वनी, शानने सांगितले की यामुळे त्याला स्वतःचे चॅनल उघडावे लागले!
द कपिल शर्मा शोमध्ये बॉलीवूडच्या गायकांचा प्रतिध्वनी, शानने सांगितले की यामुळे त्याला स्वतःचे चॅनल उघडावे लागले!
द कपिल शर्मा शोमध्ये प्रत्येक वीकेंडला स्टार्सचा मेळावा असतो. या वीकेंड स्पेशलमध्ये, एकीकडे भोजपुरी स्टार्सचा मेळा तयार झाला असताना, दुसरीकडे, हा शो बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट गायक कपिल शर्माने गुंजणार आहे. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये बॉलिवूड गायक शान, पलाश सेन आणि केके पोहोचले आहेत.
कपिल शर्माच्या शोमध्ये शानने खुलासा केला आहे की त्याला त्याचे चॅनल उघडण्याची गरज का पडली. वास्तविक, द कपिल शर्मा…
View On WordPress
0 notes
भारती सिंग पापाराझींना म्हणाली,’माझा मुलगा बदला घेईल.’
भारती सिंग पापाराझींना म्हणाली,’माझा मुलगा बदला घेईल.’
भारती सिंग पापाराझींना म्हणाली,’माझा मुलगा बदला घेईल.’
मुंबई – कॉमेडियन भारती सिंगचा पापाराझींसोबत चांगलाच बॉण्ड आहे. पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि भारतीचे त्यांच्यासोबतचे संभाषण खूप मजेदार असते. आता भारतीचा एक नवीन पापाराझी व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारती तिचा मुलगा लक्ष्य याच्याशी पापाराझीची ओळख करून देत आहे. View this post on…
View On WordPress
0 notes
द कपिल शर्मा शोचा पहिला प्रोमो.....
द कपिल शर्मा शोचा पहिला प्रोमो…..
द कपिल शर्मा शो हा लवकरच पुनरागमन करणार आहे. द कपिल शर्मा शो प्रचंड गाजला होता. त्यामुळे या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार असणार तसेच कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
या कार्यक्रमाचा आता पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस…
View On WordPress
0 notes
नाफेडने गुरुग्राम नाफेड बाजारमध्ये प्रथम किराणा दुकान सुरू केले
नाफेडने गुरुग्राम नाफेड बाजारमध्ये प्रथम किराणा दुकान सुरू केले
नाफेड बाजार
राष्ट्रीय कृषी सहकारी मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) ही केंद्र सरकारची विविध संस्था खरेदी, प्रक्रिया, वितरण, निर्यात व आयात या उद्योगात गुंतलेली आहे. त्याने हरियाणाच्या गुरुग्राममध्ये तिरुपती सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नाफेड बाजारचे पहिले किराणा दुकान सुरू केले.
नाफेडचे अध्यक्ष डॉ. बिजेंदर सिंग यांनी नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चड्ढा व कृषक भारती लिमिटेडचे…
View On WordPress
0 notes
भारती सिंग ड्रग्स अटकेवर राखी सावंत - मंत्रीच्या मुलाला का पकडले नाही ? https://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%85%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0/?feed_id=26464&_unique_id=5fc1e40304b22
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 24 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारतीय क्रीडा मंत्रालयानं नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केलं आहे. काही खेळाडूंच्या विरोधामुळं मंत्रालयानं आज हा निर्णय घेतला. कुस्तीसंघाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग विजयी झाल्यानंतर बजरंग पुनिया, वीरेंद्र सिंग यांच्यासह काही कुस्तीपटू या नियुक्तीला विरोध करत होते.
ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनंतर बजरंग पुनिया यांनी पद्मश्री पुरस्कार परत केला.
****
केंद्रसरकारनं देशभरातल्या १ लाख ५३ हजार इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन म्हणून यावर्षी पाच हजार २२८ कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. केंद्रानं देशात ७ हजार ४३२ जलद चार्जिंग केंद्र स्थापित करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना ८०० कोटी रुपये देण्यासही मान्यता दिली आहे. जड उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत देशात एकूण १४८ सार्वजनिक इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग केंद्र कार्यरत आहेत. जीवाश्म इंधनांवरचं अवलंबन कमी करणं, वाहनांमुळं होणाऱ्या प्रदूषण समस्येवर मात करुन इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढवणं पर्यायानं इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठीच्या फेम इंडियाच्या दुसऱ्या टप्प्याकडं सरकार मार्गक्रमण करत आहे.
****
काँग्रेसमध्ये काल मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. पक्षानं १२ सरचिटणीस आणि ११ राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत. प्रियंका गांधी यांच्या ऐवजी अविनाश पांडेंकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली असून पांडे यांना उत्तरप्रदेशचे पक्ष प्रभारी बनवण्यात आलं आहे, तर सचिन पायलट यांच्याकडं छत्तीसगडची धुरा सोपवण्यात आली आहे.
रमेश चेनिथल्ला महाराष्ट्राचे तर मोहन प्रकाश बिहारचे प्रभारी असतील. केसी वेणुगोपाल संघटनेचे सरचिटणीस असतील. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक गुजरातचे प्रभारी असतील तर रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडं कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
भारतीय रेल्वेनं, एल्स्टम कंपनीच्या सहकार्यानं डब्लूएजी १२ बी इलेक्ट्रिक इंजिन यशस्वीरित्या विकसित करत वापरात आणलं आहे. हे भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिन असून देशाच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळं देशातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे.
या इंजिनची निर्मिती आणि रचना अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूक नेटवर्कमध्ये योगदान देत समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद, सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्हावी या दृष्टीनं करण्यात आली आहे.
****
विज्ञान भारती, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि शिक्षण विभाग यांच्या वतीनं अकोला जिल्ह्यात आजपासून येत्या चार जानेवारीपर्यंत इस्रोचं विज्ञान आणि तंत्रज्ञान असलेली फिरती बस विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशानं इस्रोनं स्पेस ऑन व्हील्स ही अनोखी फिरती बस तयार केली आहे. बसमध्ये चंद्रयान मोहीम, मंगळयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसंच इस्रोचा आतापर्यंतचा अंतराळ प्रवास अकोला जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला इथं आज सकाळी दहशतवाद्यांनी बारामुल्लाच्या जेंटमुल्ला मशिदीवर गोळीबार केला. यावेळी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिक्षक मोहम्मद शफी यांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी ठार केलं.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांतलं हे तिसरं मोठं दहशतवादी कृत्य आहे. यापूर्वी २३ डिसेंबर रोजी अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, तर २१ डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये पाच जवान शहीद झाले होते.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं आस्ट्रेलियाविरोधातला कसोटी सामना आठ गडी राखून जिकंला. हा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडीयमवर खेळवला गेला. चौथ्या आणि अंतिम दिवशी आज आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ७५ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत��तरात भारतीय संघानं आपल्या दुसऱ्या डावात दोन गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ आणि दुसरा डाव २६१ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात भारताकडे १८७ धावांची आघाडी होती.
****
0 notes
कपिल शर्मा शो टीव्हीवर परत येण्यासाठी सज्ज आहे कारण कपिल शर्माच्या शोला लॉन्चची तारीख मिळाली टीव्ही ताज्या बातम्या
कपिल शर्मा शो टीव्हीवर परत येण्यासाठी सज्ज आहे कारण कपिल शर्माच्या शोला लॉन्चची तारीख मिळाली टीव्ही ताज्या बातम्या
कपिल शर्मा शो: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या धमाकेदार शो ‘द कपिल शर्मा शो’ने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो सातत्याने लोकांची मने जिंकत असल्याचे दिसत आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’चे सर्वसामान्यांसोबतच अनेक बॉलिवूड स्टार्सही चाहते आहेत. पण काही दिवसांपूर्वी कपिल शर्मासह इतर कलाकारांच्या दौर्यामुळे हा शो बंद करण्यात आला आणि त्याची जागा…
View On WordPress
0 notes
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित सोबत मिथुन चक्रवर्ती ऑफ कॅमेरा कसा होता
#Madhuri Dixit : माधुरी दीक्षित सोबत मिथुन चक्रवर्ती ऑफ कॅमेरा कसा होता #Bollywood #MithunChakraworty
Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यावेळी दोघांची जोडी खूप आवडली होती. पडद्यावर तुम्ही दोघांमधली केमिस्ट्री अनेकदा पाहिली असेल, पण मिथुन ऑफ कॅमेरा कसा होता आणि तो माधुरीशी कसा वागायचा हे तुम्हाला माहीत आहे का? अलीकडे, हुनरबाजच्या मंचावर, अभिनेत्री माधुरीने एक किस्सा सां���ितला ज्यामध्ये तिने सांगितले की मिथुन खूप…
View On WordPress
0 notes
भारती सिंग जुळ्या मुलांची आई? पाहा काय म्हणाली कॉमेडियन
भारती सिंग जुळ्या मुलांची आई? पाहा काय म्हणाली कॉमेडियन
गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांतही भारती जिद्दीने काम करत आहे
गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांतही भारती जिद्दीने काम करत आहे
Go to Source
View On WordPress
0 notes
28 June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/yxdae5uh
चालू घडामोडी (28 जून 2019) सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये हजर रहा, अन्यथा कारवाईला तयार व्हा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व अधिकाऱ्यांना सकाळी 9 वाजता आपल्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. यासोबत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तात्काळपणे या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितलं असून, नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून विरोधक राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन योगी आदित्यनाथ सरकारला टार्गेट करत आहेत. याच पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तर यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक आदेश जारी केला आहे. यानुसार, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधिक्षकांना सकाळी 9 वाजता आपल्या कार्यालयात पोहोचण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाची तात्काळपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. झुंडबळी रोखण्यासाठी ‘हे’ राज्य करणार कायदा : गोरक्षणाच्या नावाखाली झुंडीकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असून यामध्ये 5 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाठी शिक्षेची तरतूद असणार आहे. तर या कायद्यामुळे स्वतःला गोरक्षक म्हणवून घेत हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कमलनाथ सरकारला राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मंजुर करून घ्यावे लागणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात घडणाऱ्या झुंडबळींच्या घटनांसाठी स्वतंत्र कायदा तयार होणार आहे. तसेच मध्य प्रदेशात सध्याच्या कायद्यानुसार, जनावरांच्या कत्तलींना, गोमांस बाळगण्यास आणि त्याची वाहतूक करण्यात पूर्णपणे बंदी आहे. मात्र, यामध्ये गोहत्येच्या नावाखाली होत असलेला हिंसाचार आणि मारहाणीच्या घटनांविरोधात शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे या कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. सुधारित कायद्यानुसार, जर कोणत्याही व्यक्तीने कत्तलखान्यांची तोडफोड केली, गोमांस आणि गुरांच्या वाहतुकीदरम्यान हिंसाचार केला तर अशा व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मराठा आरक्षणावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब : मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला. मात्र, 16 टक्के कोटा रद्द केला. हा कोटा गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण क्षेत��रात 13 व सरकारी नोकऱ्यांत 12 टक्के इतका असण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग कायदा 2018’ हा कायदा मंजूर करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. तर राज्यघटनेच्या 102 व्या दुरुस्तीचा परिणाम सरकारच्या अधिकारांवर होत नाही, असे न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांनी राज्यात मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करताना स्पष्ट केले. विराट कोहलीने मोडला अझरुद्दीनचा 27 वर्षांपूर्वीचा विक्रम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शतक झळकावेल, असे वाटत होते. पण कोहलीला यावेळी 72 धावांवर समाधान मानावे लागले. पण या अर्धशतकासह कोहलीने भारताचा माजी कर्णधार मोहम्मदअझरुद्दीनचा 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. तर कोहलीचे या विश्वचषकातील हे सलग चौथे अर्धशतक ठरले. या खेळीसह कोहली भारताचा सलग चार अर्धशतके लगावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अझरच्या नावावर होता. अझरने 1992 साली झालेल्याविश्वचषकात सलग तीन अर्धशतके लगावली होती. आता हा विक्रम कोहलीच्या नावावर असेल. तसेच विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावत कोहलीने भारताच्या सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी बरोबरी केली आहे. सिद्धूने 1987 साली झालेल्या विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावली होती. सचिनने तर दोन विश्वचषकांमध्ये सलग चार अर्धशतके लगावली होती. सचिनने 1992 आणि 2003 साली झालेल्या विश्वचषकात सलग चार शतके लगावली आहेत. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. कारण बाद झालेल्या भारताच्या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे याअर्धशतकाबरोबर कोहलीने नवा विश्वविक्रम रचला आहे. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर आणि राहुल द्रविडयांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. दिनविशेष : भारताचे 9वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये झाला. 28 जून 1937 मध्ये साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक ‘डॉ. गंगाधर पानतावणे’ यांचा जन्म झाला. अमेरिकेतील सर्वोच्व न्यायालयाने सन 1978 मध्ये महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला 28 जून 1998 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
फेमस कोमेडी स्टार भारती सिंग को पति हर्ष से मिलेगी दोगुनी फ़ीस
फेमस कोमेडी स्टार भारती सिंग को पति हर्ष से मिलेगी दोगुनी फ़ीस
कॉमेडियन भारती सिंह अपने पति हर्ष लिम्बाचिया के साथ बिग बॉस 12 के पहले सेलेब्रिटी कपल होंगे। इसका खुलासा मंगलवार को सलमान खान ने गोवा में बिग बॉस 12 के लॉन्च इवेंट में किया। वेबसाइट बॉलीवुड लाइफ की रिपोर्ट के मुताबिक बिग बॉस के घर में रहने के लिए दोनों को हर हफ्ते 45 लाख रुपए मिलेंगे। पैसों के लिए बिग बॉस का हिस्सा बन रही है भारती…
बिग बॉस 12 में एंट्री करने को लेकर भारती सिंह ने कहा, ‘ हर्ष बाहर…
View On WordPress
0 notes
‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात चालणार श्रीसंतची खेळी
‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात चालणार श्रीसंतची खेळी
टेलिव्हिजन विश्वातील जोडी, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हेसुद्धा या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून येणार असल्याचं कळत आहे.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2M6ONd9
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 24 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारतीय क्रीडा मंत्रालयानं नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केलं आहे. काही खेळाडूंच्या विरोधामुळं मंत्रालयानं आज हा निर्णय घेतला. कुस्तीसंघाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग विजयी झाल्यानंतर बजरंग पुनिया, वीरेंद्र सिंग यांच्यासह काही कुस्तीपटू या नियुक्तीला विरोध करत होते.
ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनंतर बजरंग पुनिया यांनी पद्मश्री पुरस्कार परत केला.
****
केंद्रसरकारनं देशभरातल्या १ लाख ५३ हजार इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन म्हणून यावर्षी पाच हजार २२८ कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. केंद्रानं देशात ७ हजार ४३२ जलद चार्जिंग केंद्र स्थापित करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना ८०० कोटी रुपये देण्यासही मान्यता दिली आहे. जड उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत देशात एकूण १४८ सार्वजनिक इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग केंद्र कार्यरत आहेत. जीवाश्म इंधनांवरचं अवलंबन कमी करणं, वाहनांमुळं होणाऱ्या प्रदूषण समस्येवर मात करुन इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढवणं पर्यायानं इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठीच्या फेम इंडियाच्या दुसऱ्या टप्प्याकडं सरकार मार्गक्रमण करत आहे.
****
काँग्रेसमध्ये काल मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. पक्षानं १२ सरचिटणीस आणि ११ राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत. प्रियंका गांधी यांच्या ऐवजी अविनाश पांडेंकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली असून पांडे यांना उत्तरप्रदेशचे पक्ष प्रभारी बनवण्यात आलं आहे, तर सचिन पायलट यांच्याकडं छत्तीसगडची धुरा सोपवण्यात आली आहे.
रमेश चेनिथल्ला महाराष्ट्राचे तर मोहन प्रकाश बिहारचे प्रभारी असतील. केसी वेणुगोपाल संघटनेचे सरचिटणीस असतील. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक गुजरातचे प्रभारी असतील तर रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडं कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
भारतीय रेल्वेनं, एल्स्टम कंपनीच्या सहकार्यानं डब्लूएजी १२ बी इलेक्ट्रिक इंजिन यशस्वीरित्या विकसित करत वापरात आणलं आहे. हे भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिन असून देशाच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळं देशातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे.
या इंजिनची निर्मिती आणि रचना अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूक नेटवर्कमध्ये योगदान देत समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद, सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्हावी या दृष्टीनं करण्यात आली आहे.
****
विज्ञान भारती, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि शिक्षण विभाग यांच्या वतीनं अकोला जिल्ह्यात आजपासून येत्या चार जानेवारीपर्यंत इस्रोचं विज्ञान आणि तंत्रज्ञान असलेली फिरती बस विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशानं इस्रोनं स्पेस ऑन व्हील्स ही अनोखी फिरती बस तयार केली आहे. बसमध्ये चंद्रयान मोहीम, मंगळयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसंच इस्रोचा आतापर्यंतचा अंतराळ प्रवास अकोला जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला इथं आज सकाळी दहशतवाद्यांनी बारामुल्लाच्या जेंटमुल्ला मशिदीवर गोळीबार केला. यावेळी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिक्षक मोहम्मद शफी यांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी ठार केलं.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांतलं हे तिसरं मोठं दहशतवादी कृत्य आहे. यापूर्वी २३ डिसेंबर रोजी अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, तर २१ डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये पाच जवान शहीद झाले होते.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं आस्ट्रेलियाविरोधातला कसोटी सामना आठ गडी राखून जिकंला. हा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडीयमवर खेळवला गेला. चौथ्या आणि अंतिम दिवशी आज आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ७५ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं आपल्या दुसऱ्या डावात दोन गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ आणि दुसरा डाव २६१ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात भारताकडे १८७ धावांची आघाडी होती.
****
0 notes
पहा: 'हुनरबाज मेगा ऑडिशन्समध्ये रोहित शेट्टीची धमाकेदार एन्ट्री'
पहा: ‘हुनरबाज मेगा ऑडिशन्समध्ये रोहित शेट्टीची धमाकेदार एन्ट्री’
कलर्स टीव्हीवर दाखवला जाणारा टॅलेंट रिअॅलिटी शो हुनरबाज आजकाल सतत चर्चेत असतो. लवकरच या शोचे मेगा ऑडिशन होणार असून या मेगा ऑडिशन स्पेशल एपिसोडमध्ये प्रसिद्ध सिनेनिर्माता रोहित शेट्टी धमाका घेणार आहे. या स्पेशल एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. त्याचवेळी, स्पर्धकांचे अनोखे स्टंट पाहून शोचे सर्व जजही थक्क होणार आहेत.
वास्तविक, हुनरबाजच्या या मेगा ऑडिशन स्पेशल एपिसोडच्या…
View On WordPress
0 notes