Chapter 45 “ COMFORT ZONE ” #journeyofdirectorismailumarkhan जैसे ही “सपनो से भरे नैना “ से फ़्री हुआ, इमैजिन टीवी का शो “बाबा ऐसा वर ढूंढो” से बुलावा आया, बहुत ही यूनिक स्टोरी थी, एक बौनी लड़की की कहानी, जितनी दमदार स्टोरी थी। उतनी ही दमदार कास्ट, विक्रांत मेस्सेय, दर्शन कुमार, अशिता धवन, दर्पण, जूही असलम, नपुर अलंकार, तब्रेज, शलिनी साहुता, राज सिंग और अदिति तैलंग, मुझे लीप से शूट शुरू करना था, लेकिन किसी वजह से मैं, लीप से पहली वाली कहानी के प्री क्लाइमैक्स से जुड़ गया, सौरभ तिवारी साहब का पहला शो बतौर निर्माता था, बैनर का नाम “नौटंकी फ़िल्मस“ क्या ग़ज़ब नरेशन देते है सौरभ जी, मैंने आज तक ऐसा नरेशन नहीं सुना, विशाल भारद्वाज साहब की किसी फ़िल्म से कम ना था, बहुत ही मज़ा आया वो सारे सीन शूट करते हुए, सौरभ साहब चाहते थे, जिमी ज़िप का इस्तेमाल हो क्लाइमैक्स में, लेकिन ज़िप को जब तक ३६० डिग्री ना ऑपरेट करो,शॉट्स बहुत अच्छे नहीं बन पाते,, एक दो शॉट के लिए हाथी मँगाने का कोई मतलब नहीं था, क्योंकि यहाँ तो, १० में से पाँच ऐक्टर तो डूप्लिकेट थे, जो अवेलबल थे, उनका भी आउट टाइम था, टोटल केआस था। क्लाइमैक्स का एंड रिज़ल्ट मुझे बहुत अच्छा लगा, लीप शुरू हुआ, महीने भर में क्रीएटिव चेंज हुआ, वो अपना डिरेक्टर ले आए।यह कहे कर “ प्रोड्यूसर ऐसा डायरेक्टर ढूंढ़ो “ जिसके साथ मैं कंफर्टेबल हूँ । मैं नए रास्तों पर नयी मंज़िलों की ऑर चल पड़ा .. क्या हुआ बताते हैं ... बताते हैं ... #filmindustrybychoice #safaranama #directorsjourney #storytellingbymasterrs #rewind #imaginetv #babaaisavardhoondho https://www.instagram.com/p/BsWGgg9HrQi/?utm_source=ig_tumblr_share&igshid=d6mjwivrf2zv
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित; दोन्ही सदनात चर्चेविना विधेयकं मंजूर
** टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पी व्ही सिंधू बॅटमिंटनच्या तर दीपिकाकुमारी तीरंदाजीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत दाखल
** हिंगोली जिल्ह्याच्या मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या दहा हजारावर मतदारांची नावं बाद
आणि
** अंबाजोगाई इथं स्वाराती रुग्णालयाच्या कोविड लसीकरण विभागात १५ मिनिटं आरोग्य मार्गदर्शन उपक्रमाला प्रारंभ
****
पेगासस हेरगिरी आणि कृषी कायद्यांना विरोधाच्या मुद्यावर विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू होताच, विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला. गदारोळ घालणाऱ्या काही सदस्यांनी विधेयकाच्या प्रती फाडून अध्यक्षांच्या आसनाकडे भिरकावल्या, त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी सदनाचं कामकाज आधी साडे बारा वाजेपर्यंत, आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुरवणी मागण्या सदनासमोर ठेवल्या, सदनानं त्यांना मंजुरी दिली. दिवाळखोरी सुधारणा विधेयकही सदनानं चर्चेविना मंजूर केलं, त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं, सदनाचं कामकाज चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.
राज्यसभेतही पहिल्या तहकुबीनंतर सदनाचं कामकाज दुपारी बारा वाजता सुरू झाल्यावर उपसभापती हरिवंश यांनी गदारोळातच प्रश्नकाळ पूर्ण करून सदनाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं, कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर बाल न्याय सुधारणा विधेयक चर्चेविना संमत झालं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं, सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
गेल्या सहा वर्षांत देशात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत वाढ झाल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोमप्रकाश यांनी दिली. २०२०-२१ या वर्षांत एकूण विदेशी गुंतवणूक ८१ अब्ज ९७ कोटी ३० लाख अमेरिकी डॉलर असल्याची माहिती सोमप्रकाश यांनी दिली.
देशातली काही छोटी रेल्वे स्थानकं सोडून इतर सर्व रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं, रेल्वे तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं. सध्या ६ हजार ४५ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
कोविड बिप या उपकरणाबद्दल पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जीतेंद्र प्रसाद यांनी लोकसभेला माहिती दिली. ECIL आणि ESIC यांनी विकसित केलेल्या या उपकरणामुळे रुग्णाचं तापमान, हृदय गती तसंच प्राणवायूचं प्रमाण यावर देखरेख ठेवता येते. या उपकरणाचा रुग्णालयांसह घरगुती वापरही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं, सिंग यांनी सांगितलं. श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडे या दहा हजार उपकरणांची मागणी आली असल्याची माहिती सिंग यांनी दिली.
पुढच्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत चंद्रयानाचं प्रक्षेपण होण्याची शक्यता असल्याचं, अंतराळ राज्य मंत्री डॉ जीतेंद्र सिंग यांनी लोकसभेत सांगितलं. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी मंजूर रिक्त पदं भरण्यासाठी संबंधित विभागांनी १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससीकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ही पदं भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन, कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.
****
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी वी सिंधूनं उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात तीने हाँगकाँगच्या नगन यी चेऊंगचा २१-नऊ, २१-१६ असा पराभव केला.
तीरंदाजीमध्ये महिलांच्या एकेरी सामन्यात दीपिका कुमारी हिनं भूतानच्या कारमा हिला ६ - शून्य अशा फरकाने हरवत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर पुरुषांच्या एकेरीच्या उप - उपान्त्यपूर्व फेरीत भारताच्या तरुणदीप राय आणि प्रविण जाधवचा पराभव झाला. हॅाकी मध्ये भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनकडून एक-चार असा पराभव पत्करावा लागला. रोईंग मध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल प्रकारात अंतिम फेरीत पोहोचू शकले नाही.
****
औरंगाबाद इथं प्रस्तावित क्रीडा विद्यापीठ पुणे इथं स्थापन करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारविरोधात एमआयएम पक्ष आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं सर्व सोयीसुविधा देवून विद्यापीठासाठी जागाही निश्चित केली होती. मात्र, हे विद्यापीठ पुणे इथं स्थापन करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा औरंगाबादसह मराठवाड्यातल्या गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी अन्यायकारक असल्याचं आंदोलन कर्त्यांनी यावेळी म्हटलं. यामागणीचं निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सादर करण्यात आलं.
****
मतदार याद्यांमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांना विहीत मुदतीत छायाचित्र जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु हिंगोली जिल्ह्यात या मुदतीनंतरही छायाचित्र न देणाऱ्या १० हजार ८४३ मतदारांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे. अशा मतदारांनी पुन्हा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सहा क्रमांकाचा अर्ज भरून द्यावा, असं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात गांजाची लागवड करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत, गांजाची झाडं तसंच गांजाचा साठा जप्त केला. आव्हई गाव परिसरात ही कारवाई करण्यात आली.
****
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातल्या कोविड लसीकरण विभागात १५ मिनिटं आरोग्य मार्गदर्शन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विभागात दररोज सुमारे एक हजार नागरिकांना कोविड लस देण्यात येते. लस घेतल्यानंतर सुमारे अर्धा तास प्रत्येकाला देखरेखीखाली थांबावं लागतं. या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या उद्देशानं आरोग्य मार्गदर्शन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या वेळेत योगाभ्यास तसंच आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन ��ेलं होतं. या आवाहनास प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा-लोहारा इथून शिवसेनेच्यावतीनं रायगड जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, किराणा आणि संसारोपयोगी साहित्य पाठवण्यात आलं.
****
आठवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू करण्यासाठी गाव पातळीवर समितीने निर्णय घेऊन शाळा सुरू करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत फक्त ५३ शाळाच सुरू झाल्या आहेत. यापूर्वी फक्त आठ शाळांनी नियमित तासिका सुरू केल्या होत्या. तर काल मंगळवारपासून आणखी ४५ शाळा सुरू झाल्या आहेत.
****
प्रत्येक माणसाने वर्षाला किमान दहा झाडे लावावीत, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे. जिंतूर इथल्या डीएसएम महाविद्यालय परिसरात महसूल विभागाच्या ४० एकर गायरान जमिनीत हरित ज्ञानगिरी या संकल्पनेतून ३० हजार वृक्ष लागवडीचं उद्घाटन दीपक मुगळीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते.
****
हरित लातूरचं स्वप्न साकार करण्यासाठी कीर्ती उद्योग समुहानं महानगरपालिकेला साडेपाच हजार झाडांची रोपं दिली आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने मनपा या झाडांची लागवड आणि संवर्धन करणार आहे, शहरात प्रत्येक नागरिकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या सोनगीर इथले वीरमरण आलेले सैनिक निलेश महाजन यांच्या पार्थिव देहावर आज धुळे जिल्ह्यातल्या सोनगीर इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
//********//
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ जून २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· गावांतल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं, भीती न बाळगता आणि कोणत्याही अफवांना बळी न पडता लस टोचून घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन.
· डेल्टा प्लस कोरोना विषाणू संसर्ग आणि तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध.
· माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी, उद्या सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहण्याचं पुन्हा समन्स.
· प्राध्यापकांच्या तीन हजार रिक्त जागेची भरती प्रकिय�� लवकरच सुरु करण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचं आश्वासन.
· राज्यात नऊ हजार ९३४ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १४ जणांचा मृत्यू तर ३३१ बाधित.
आणि
· मराठवाड्यातल्या अनेक भागात पाऊस; शेतकऱ्यांमध्ये समाधान.
****
गावांतल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीविषयी भीती न बाळगता आणि कोणत्याही अफवांना बळी न पडता लस टोचून घेण्याचं, तसंच इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करण्याचं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधानांनी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी काल संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा अठ्ठ्यात्तरावा भाग होता.
भारतानं एकाच दिवसात ८६ लाखापेक्षा अधिक जणांचं लसीकरण केल्याच्या कामगिरीचा उल्लेख करत, आपण एका दिवसात लाखो लोकांना भारतात बनवलेली लस विनामूल्य देत आहोत, हे नव्या भारताचं सामर्थ्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातही गावांमधले लोक तसंच आदिवासी बांधवांनी दाखवलेला समंजसपणा आणि सामर्थ्य, हा जगासाठी भविष्यात अभ्यासाचा विषय ठरेल असं ते म्हणाले.
कोविडमुळे निधन झालेले भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या आठवणी आणि कार्यालाही त्यांनी उजाळा दिला. यावेळी पंतप्रधानांनी आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या काही खेळाडूंच्या संघर्षगाथा श्रोत्यांना सांगितल्या. यात तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या साताऱ्यातल्या प्रवीण जाधव, या खेळाडूचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
येत्या १५ ऑगस्टपासून देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष सुरु होणार आहे, हा अमृत-महोत्सव आपल्या सगळ्यांसाठी मोठी प्रेरणा असेल असं सांगताना पंतप्रधान म्हणाले –
आजादी के ७५ वर्ष का अमृत महोत्सव हमारे लिये बहोत बडी प्रेरणा है। हम देश के लिये जीना सिखे। आजादी की जंग देश के लिये मरने वालों की कथा है। आजादी के बाद के समय को हमे देश के लिय जीने वालों की कथा बनाना है। हमारा मंत्र होना चाहिये इंडिया फर्स्ट। हमारे हर फैसले, हर निर्णय का आधार होना चाहिये इंडिया फर्स्ट।
****
राज्यात डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा, या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेले निर्बंध आजपासून पुन्हा कडक करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तरावरचे निर्बंध आजपासून लागू झाले आहेत. यानुसार आठवड्यातील शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. राज्यातील शाळा, महाविद्यालयं तसंच कोचिंग क्लासेस बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिकवणीला पर��ानगी असेल. राज्यात धरणं, आंदोलनं, मोर्चे, उपोषण यांना पूर्ण बंदी असेल. सर्व धार्मिक स्थळंही बंदच राहणार आहेत.
याशिवाय सोमवार ते शुक्रवार दरम्यान सर्व प्रकारची दुकानं, सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच खुली राहणार असून, अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता, इतर सर्वांसाठी सायंकाळी पाच ते सकाळी सात यावेळेत, संपूर्ण संचारबंदी असेल. खासगी कार्यालयं दुपारी चार पर्यंतच ५० टक्के क्षमतेनं, तर सरकारी कार्यालयं अत्यावश्यक सेवा वगळता ५० टक्के क्षमतेनं सुरु राहतील. मॉल्स तसंच चित्रपटगृहे पूर्णपणे बंद असतील, तर सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेत दुपारी चार पर्यंत परवानगी असेल. उपाहारगृहे दुपारी चार पर्यंत ५० टक्के क्षमतेनं, त्यानंतर घरपोच सेवा अशाप्रकारे सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १०० टक्के आसनक्षमतेनं सुरु राहील, मात्र उभे राहून प्रवासास मनाई असेल. सकाळी पाच ते नऊ यावेळेत सार्वजनिक ठिकाणं, मोकळ्या जागांमध्ये व्यायाम, चालणं किंवा सायकल चालविण्यास परवानगी असेल, तर केशकर्तनालयं, ब्युटीपार्लर दुपारी चार पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. विवाह समारंभांना ५०, तर अंत्यसंस्काराला २० लोकांनाच उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. सर्व उद्योग तसंच बांधकामं कोविडविषयक नियमांचं पालन करुन सुरु राहतील, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीनं आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी, उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचं समन्स बजावलं आहे. याआधी शनिवारी देशमुख यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी वकिलांमार्फत वेळ मागून घेतला होता.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरूद्ध शंभर कोटीं रुपयांच्या खंडणीची तक्रार केली होती. या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये चौकशी सुरू आहे. देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना ईडीनं अटक केली असून, न्यायालयानं त्यांना एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
प्राध्यापकांच्या तीन हजार ६४ रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार असल्याचं आश्वासन, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. पुण्यात गेल्या २१ तारखेपासून नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीनं, आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, काल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या निर्णयाचं स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीनं आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राध्यापक भरती प्रकियेबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभागांनी आपली कार्यवाही पूर्ण केली असू्न, वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मान्यता घेतल्यानंतर, भरती संदर्भात लवकरच शासन निर्णय काढला जाईल, असं सामंत यांनी सांगितलं. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने, ४८ मिनिटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
****
राज्यात काल नऊ हजार ९३४ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख ३६ हजार ८२१ झाली आहे. काल १४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २१ हजार २८६ झाली असून, मृत्यूदर दोन टक्के झाला आहे. काल आठ हजार ५६२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ९० हजार ११३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ९१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख २२ हजार २५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३३१ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, जालना दोन, तर उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात १३१ रुग्ण आढळले. औरंगाबाद ५९, लातूर ४८, परभणी ३६, उस्मानाबाद ३१, जालना १६, नांदेड सहा, तर हिंगोली जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळून आले.
****
नांदेड जिल्ह्यातला लेंडी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं, ३०० कोटी रूपये अतिरिक्त देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. ते काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असं ते म्हणाले. पैनगंगा नदीवरील नवीन सहा उच्च पातळी बंधारे, तसंच माहूर शहरास पाणी पुरवठा करावयाच्यादृष्टीनं, धनोडा उच्च पातळी बंधाऱ्यांचा समावेश उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या सहाव्या सुधारित अंदाजपत्रकात करण्यात येऊन, त्यास मान्यता देण्याचा निर्णयही घेतला असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचं राज्याच्या सिंचन विकासात मोलाचं योगदान असून, त्यांच्या नावानं ‘जलभूषण पुरस्कार’ देण्यात येणार असल्याचंही, पाटील यांनी काल जाहीर केलं. ते म्हणाले –
स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांचं विष्णुपरीला स्मारक करण्याचा सरकारनं यापूर्वीच निर्णय घेतलाय. येणाऱ्या १४ जुलैला त्यांच्या नावानं जलभूषण पुरस्कार राज्य सरकारकडून वितरीत करण्यात येईल आणि दरवर्षी हे जलभूषण पुरस्कार डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नावाने दिला जाईल. त्यांनी जे काम मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या जलसंपदा विभागांसाठी केलं त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून आमच्या विभागानं हा निर्णय घेतलेला आहे.
****
औरंगाबादमध्ये उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलातून उच्च दर्जाचे गुणवंत खेळाडू निर्माण होतील, यासाठी प्रशासनानं कालबध्दरित्या, वेगानं क्रीडा संकुलाची निर्मिती करावी, अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीनं चिकलठाणा इथं नियोजित जिल्हा क्रीडा संकुलाचं भूमीपूजन, काल देसाई यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासन क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर अधिक भर देत असून, या क्रीडा संकुल निर्मितीसाठी भरीव प्रमाणात निधी देखील देण्यात येईल, असंही देसाई यांनी सांगितलं.
या क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदानं, स्केटिंग, बास्केट बॉल, बहुउद्देशीय सभागृह, जिम्नॅशियम, योगा, जिम, टेबल टेनिस, बॉक्सिंग, शूटिंग रेंज, धनुर्विद्या, भारोत्तोलन, कुस्ती, बॅडमिंटन हॉल, सौरऊर्जा प्रकल्प, विद्युतीकरण, मुलांमुलींसाठी वसतीगृह, अशा सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात शाळा बंद असल्यानं ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू झालं. मात्र, आदिवासी पाड्यांवरच्या, गरीब कुटुंबातल्या मुलांकडे त्यासाठी आवश्यक मोबाईल उपकरण नसल्यानं, अडचण निर्माण झाली. अशा वेळी नाशिकच्या लायन्स क्लबनं ३६ मोबाईल, सुरगाणा तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांना दिले. याविषयी लायन्स क्लबचे, वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितलं –
जे पाडे आहेत ज्याच्यामधे छोटे मोबाईल वापरले जात होते आणि त्या ठिकाणी कुठलंही शिक्षण होणार नव्हतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की मुलींच्या शिक्षणासाठी विशेष करून प्राधान्य द्यावं आणि याच प्राधान्यातून आमच्याजवळ ३६ मोबाईलची बँक तयार झाली. आणि हे ३६ मोबाईल त्याच वेळेला जिल्हा परिषदेच्या सी ई ओ लीना बनसोड यांनी मोबाईल डोनेशन हा उपक्रम बाहेर काढला. त्यांच्यामार्फत आम्ही पाड्यांपर्यंत पोहोचण्यास यशस्वी झालो. ज्या गरीब मुला नाशिक शहरामधे होत्या नाशिक जिल्ह्यामधे होत्या त्यांनासुद्धा आम्ही हे मोबाईल दिले.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या पेठवडज इथं काल कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषीतज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी, कापूस पिका विषयी पिकांची वाढ, खतांच्या मात्रा, किटकनाशक फवारणी, पिक संगोपन आणि संरक्षण याच्या नियोजनाविषयी माहिती दिली.
****
मराठवाड्यातल्या अनेक भागात काल पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल सायंकाळी विजेच्या कडकडटासह जोरदार पाऊस झाला. पैठण तालुक्यातल्या बोकुड जळगाव इथं वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात पावसानं हजेरी लावली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. औरंगाबाद शहरातही काल सायंकाळी सुमारे दीड तास जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळे रस्ते जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रात्रभर पावसाची संततधार सुरु होती.
बीड जिल्ह्यात काल माजलगाव, वडवणी, बीड या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. माजलगाव तालुक्यातली सिंदफना नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील रोषणपुरी बंधारा ९० टक्के भरला आहे. बीड शहरासह धारूर तालुक्यातील लोणगाव, उमरी, वाघोरा परिसरात जोरदार पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात नांदेड, अर्धापूर, मुखेड, धर्माबाद, उमरी, हदगाव, हिमायतनगर या भागात पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या अंबड, घनसावंगी, भोकरदन, बदनापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यात सेलू, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा तालुक्यात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागातही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला.
****
मराठवाड्यात आज काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
0 notes
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २५ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या यास चक्रीवादळानं आता तीव्र स्वरूप धारण केलं असून, ते उद्या पहाटे पारदीप आणि सागर बेटांदरम्यान ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा देईल. दरम्यान २१ तारखेलाच अंदमानच्या परिसरात दाखल होऊन २२ तारखेपर्यंत श्रीलंकेच्या दक्षिण किनार्यापर्यंत मजल मारणारे मोसमी वारे या वादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरच उत्तरेकडे खेचले गेले आहेत.
****
देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींच्या १९ कोटी ८५ लाख ३८ हजार ९९९ मात्रा देण्यात आल्या आहेत. यात १५ कोटी ५२ लाख ३५ हजार ३७४ जणांना पहिली, तर चार कोटी ३३ लाख तीन हजार ६२५ जणांना दुसरी मात्रा मिळाली आहे.
****
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मार्ग काढण्यासाठी आपण राज्यभर दौरा करून तज्ज्ञांची मते जाणून घेत आहोत छत्रपती संभाजीराजे यांनी काल सोला��ुरात सांगितलं. राज्य सरकारच्या हातातील लाभ सरकारनं मराठा समाजाला द्यावेत, यासाठी 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना नऊ जूनपर्यंत ॲट्रॉसिटी प्रकरणात अटक केली जाणार नाही, असं आश्वासन, राज्य सरकारच्या वतीनं काल मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आलं. या कालावधीत परमबीर सिंग यांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती राज्य सरकारनं न्यायालयाकडे केली आहे.
****
बीड जिल्ह्यात आज रात्री १२ वाजेपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत, कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. औषधी दुकानं, आरोग्यसेवा, तसंच इतर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व आस्थापना या काळात बंद राहणार आहेत.
****
लातूर महानगरपालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर आज कोव्हीशिल्ड लसीची पहिली मात्रा, तसंच पहिली मात्रा घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरी मात्रा दिली जाणार आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट दिसत असली, तरी नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
परभणी शहरात टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत काल २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
****
0 notes