Tumgik
#विलक्षण आपण
siddharthdthservice · 20 days
Text
Tumblr media
मिळवा फ्री टाटा प्ले कनेक्शन धमाका ऑफरमध्ये ₹2702 भरा तुमच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 परत मिळवा.
धमाका 3K ऑफरमधून, टाटा प्ले साठी जे नवीन कस्टमर ₹2702 भरतील त्यांच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 क्रेडिट केले जातील.आणि त्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता एक टाटा प्ले HD कनेक्शन
देखील मिळेल | ही ऑफर भारतभरातील नवीन कस्टमसाठी लागू आहे.अधिक तपशीलासाठी कृपया आम्हाला -9823472226 ह्या नंबर वर कॉल करू शकता.
टाटाप्ले सह अंतिम मनोरंजन अनुभव अनलॉक करा!
टाटा प्ले एचडी कनेक्शन ऑफरसह तुमचे आवडते चॅनेल
आणि कार्यक्रम निवडण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
आता, नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी सज्ज व्हा कारण आम्ही तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक डील आणत आहोत: तुम्ही फक्त पे करा 2702 ₹ आणि मिळवा 3000 ₹ रिचार्ज बॅलन्स आणि त्यासोबत मिळवा टाटा प्ले एचडी कनेक्शन मोफत.
3000₹ बॅलन्स मधून तुमचा आवडीचा पॅकेज निवडा आणि 3000₹ बॅलन्स वापरा आणि जोपर्यंत 3000₹ बॅलन्स संपत नाही तोपर्यंत रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही.
ही ऑफर मर्यादित काळासाठी कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्याची तुमची संधी आहे. फक्त पे करा 2702₹ आणि मिळवा 3000₹ तुमच्या टाटा प्ले अकाउंट मध्ये सोबत मिळवा Tata Play HD कनेक्शन अगदी मोफत हा अविश्वसनीय करार चुकवू नका! त्वरा करा आणि
तुमचा मनोरंजन गेम पूर्णपणे नवीन स्तरावर
नेण्यासाठी आजच ऑफरचा लाभ घ्या! या विलक्षण ऑफरसह, तुम्हाला केवळ Tata Play HD Connection मिळत नाही तर तुमचे पसंतीचे चॅनेल निवडण्यासाठी आणि अखंड मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी 3000 रुपये शिल्लक देखील मिळत आहे. आमची रिचार्ज प्रक्रिया त्रासमुक्त आहे आणि एकदा तुम्ही रिचार्ज केल्यानंतर, तुमच्या आवडीनुसार तुमचे मनोरंजन पॅकेज कस्टमाइझ करण्याची लवचिकता तुमच्याकडे असेल.
( उदाहरणार्थ : 269₹ पॅकेज. तयार केलं तर 11 महिने 15 दिवस किंवा 335₹ पॅकेज. तयार केलं तर 9 महिने चालेल..)
👉फायदे:-
👉कस्टमर ला मिळणार 3000/- रिचार्ज बॅलन्स
👉नविन HD कनेक्शन सोबत फ्री इन्स्टॉलेशन
👉पॅकेज / चॅनल मनाप्रमाणे निवडण्याची संधी
👉रिचार्ज Pause करण्याची सुविधा
👉 जेव्हा वाटेल तेव्हा चॅनल टाकू शकता किंवा काढू
शकता.
👉Tata Play कंपनी per day चार्ज करते
👉सोबत 2 मोबाईल वर कनेक्शन फ्री..
👉 रिचार्ज करण्यास विलंब झाल्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही.
👉1 वर्षाची ऑनसाइट वॉरंटी
👉फ्री इंस्टॉलेशन अंड डिलिव्हरी
👉 त्याच दिवशी डिलिव्हरी
👉 युनिव्हर्सल रिमोट. HDMI केबल. या उत्पादनामध्ये डिश समाविष्ट केली जाईल.
👉डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड
👉५× तीव्र प्रतिमा
👉१६.९ गुणोत्तर
👉१०८०i रिझोल्यूशन
👉मोफत इन्स्टॉलेशन-१० मीटर केबल फ्री नंतर १२ प्रति मीटर शुल्क आकारले जाईल.
👉२४×७ सेवा आणि सर्विस
👉कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.
👉टीप :-हे कनेक्शन संपूर्ण भारतात उपलब्ध आहे
टाटा प्ले डीटीएच तुम्हाला एक खास अनुभव देईल, जो तुम्हाला इतर कोठेही मिळणार नाही. सर्व नवीनतम तंत्रज्ञान प्रदान करणार्‍या सर्वोत्तम DTH कनेक्शनसह तुमचे सर्व आवडते शो आणि चित्रपट तुमच्या घरच्या आरामात पहा. आता संपूर्ण कुटुंब एकत्र बसून क्रिकेट सामन्यांपासून ते डेली सोपपर्यंत टीव्ही पाहू शकते, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. नव्याने लॉन्च केलेल्या कॉम्बो पॅकसह, तुम्हाला एकाच वेळी Netflix + 25 OTT aap + टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेश मिळेल. म्हणूनच आपण आता म्हणतो, "एंटरटेनमेंट आणखीनच झिंगालाला..
टाटा प्ले बद्दल:👇
टाटा प्ले हे एकाच टाटा प्ले सबस्क्रिप्शनसह Pay TV आणि OTT सेवा प्रदान करणारे भारतातील अग्रगण्य सामग्री वितरण प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर सध्या 600 हून अधिक चॅनेल आणि सेवा (HD, SD, परस्परसंवादी सेवा आणि मूव्ही शोकेस) आणि 25 प्रीमियम मनोरंजन Aap आहेत, ज्यामध्ये Netflix अलीकडेच मिक्समध्ये जोडले गेले आहे. याव्यतिरिक्त, टाटा प्ले भारतीय बाजारपेठेसाठी सानुकूलित केलेल्या सेवा ऑफर करते. टाटा प्ले विदेशी कहानियां, टाटा प्ले रोमान्स, टाटा प्ले क्लासिक टीव्ही, टाटा प्ले कॉमेडी, टाटा प्ले म्युझिक, टाटा प्ले फिटनेस, टाटा प्ले डान्स स्टुडिओ आणि बरेच काही.
टाटा प्लेच्या विस्तृत ऑफर आणि योजनांसह तुमचा टीव्ही पाहण्याची क्षमता वाढवण्यासाठी सज्ज व्हा, तुम्ही सर्वोत्तम टेलिव्हिजन प्रोग्रामिंगचा अनुभव घेऊ शकता. गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमतीबद्दलची आमची वचनबद्धता तुम्हाला तुमच्या मनोरंजन गुंतवणुकीसाठी अपवादात्मक मूल्य मिळेल याची खात्री देते. तुम्ही तुमचा टाटा प्ले DTH कनेक्शन घेण्यासाठी तयार आहात का? पुढील स्तरावर अनुभव घेऊन? टाटा प्ले टीव्ही आमच्या सर्वसमावेशक टाटा प्ले पॅकेजेससह मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करून देते
टाटा प्ले DTH मनोरंजनाचे जग येथे आहे. ताज्या नवीन टाटा प्ले ऑफर आणि योजनांसाठी आम्ही तुमचा विश्वासार्ह स्रोत आहोत ज्यामुळे तुम्हाला अप्रतिम किमतीत टॉप नॉच प्रोग्रामिंगमध्ये प्रवेश मिळेल. Tata Play विविध सेवा प्राधान्ये देत चॅनेल आणि शोची विस्तृत श्रेणी एक्सप्लोर करा. Tata Play वर, आम्ही तुमच्या टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला गुणवत्ता आणि मूल्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत टाटा प्लेसह आमची पॅकेजेसची विस्तृत श्रेणी तुम्हाला तुमच्या मनोरंजनाच्य�� गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम सबस्क्रिप्शन मिळेल याची खात्री करते.
#siddharthdthservice
#tataplaychristmasoffer
#tataplaychristmasspecialoffer2024
#tataplaychristmaspecialoffer
#tataplaychristmasnewyearspecialoffer
#tataplaynewyearoffer
#tataplay
#tataplaynewconnectionoffer
#tataplaydhamaakaoffer
#tataplay3000cashbackoffer
#tataplayhd
#tataplay3000offer
#tataplaynewconnectinoffer
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
प्रेम आणि प्रपोज यांचा फार जवळचा संबंध नाही तरीही आज तो जरा जास्तच येतो...! 
चला हरकत नाही, नक्की प्रपोज करा पणं प्रपोज च्या पलीकडे असलेले जगणे सुंदर कसा करता येईल याचाही विचार नक्की करा...
या सात दिवसांचा आठवडा विलक्षण आकर्षण असतो प्रेमी युगलासाठी नक्की तो असावाही...! पण एक सांगेल माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सातव्या अस्मनात वावरत असताना वास्तवात नात कुठ पर्यंत पोहचले याची काळजी नक्की घ्या..! 
प्रेम करा प्रपोज करा पणं एक हात जोडून विनंती असेल बाळांनो...
तुम्हाला कोणी प्रपोज केला असेल किंवा तुम्ही कुणाला केला असेल उत्तर होकार असो की नकार असो स्टेबल रहा..! सुखात शांत आणि दुःखात ही शांत रहा... कुठलाही नकार हा कायम नकार नसतो म्हणून संयम बाळगा...! तुम्ही असाल नसेल योग्य तर स्वतः मधे असलेल्या उणिवा शोधा कारण तसा नकार मिळतच नाही... किंवा या उलट तिला नाते नको असेल तिला तीच त्याच आयुष्य जगायचे असेल तर ते आनंदाने तो निर्णय स्वीकार करा...
तुम्ही प्रेम घेऊन प्रपोज केला असेल, करणार असेल तर एक नक्की, नकार आला असेल तर तुमच्या त्या प्रेमाची भावना द्वेष होणार नाही तिरस्कार होणार नाही याची काळजी घ्या..! कारण होकार देण्यासाठी जेवढी हिम्मत लागत नाही तेव्हढी नकार देण्यासाठी लागते म्हणून नकार सुद्धा पचवता आले पाहिजे...
प्रेम अलवार पवित्र भावना आहे ती नक्की जपा पणं त्यातून तुमच्या आई वडिलांच्या तुमच्या आयुष्यावर डाग लागेल अस काही त्यातून निष्पन्न करू नका..! प्रेम करा तो आपला अधिकार आहे पणं प्रेम कुणावर किती व कसे करावे हे फार समजून करा..
प्रेमाच्या तळ्यात जर उतरणार असाल तर तळाचा ठाव नक्की घ्या पणं काठावर उभा राहून प्रेम करू नका..! एकतर्फी असेल तर व्यक्त करा पणं अव्यक्त मनात ठेऊन आतल्या मनाला मारू नका...! कारण अव्यक्त मनातले प्रेम द्वेष होण्यास वेळ लागत नाही..! 
पण तुम्ही प्रेम केले असेल आणि त्याने तिने त्याला नकार दिला असेल किंवा अर्ध्यावर थांबले असाल तरीही तुम्हाला तिरस्कार करण्याचा कुठलही अधिकार नाही कारण तुम्ही प्रेम केले होते हे विसरून चालणार नाही...!
याच प्रेमाची दुसरी बाजू जळ जळीत वास्तव आहे हे पणं समजून घ्या...!
प्रेम स्वस्त ही नाही आणि महाग ही नाही ! कारण तुम्ही स्वतःच अस्तित्व सिद्ध केले असेल या दुनियादारीत तर नक्कीच तुमच्या साठी स्वस्त असेल प्रेम भावनेने..! आणि तुम्ही फक्त सौंदर्याच्या बळावर मिळवण्याचा प्रयत्न करत असाल मग तुम्ही ती असो की तो नक्कीच चुकता आहे.. सौंदर्याला कोमजण्याचा शाप असतो आणि प्रेमाला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बहर येत असतो..! म्हणून मनातून जिंकता आले तर तुम्ही प्रेम यशस्वी करू शकता...! वर वर असणारा दिखावा प्रेमाला सुरावत लवकर करेलही आणि लवकर शेवटही ! पण आतून प्रेम येण्यास वेळ लागतोच तो वेळ आज उद्या किंवा कधी कोणी मागितला तर तो वेळ घेऊदा कारण उशिरा घेतलेला निर्णय कदाचित आयुष्यभर सोबत असेल..! 
होकार असो की नकार तो समजून घ्या ! त्या मागच्या पवित्र भावनेला कायम न्याय द्या..! आयुष्य खूप सुंदर आहे ते सजवा..! होईल तेवढे नात्यात विश्वास प्रेम काळजी स्नेह स्वतंत्र स्वातंत्र्य द्या..! तुमचे नाते तुमचं आयुष्य सुंदर करेल..! तुमचे प्रेम तुम्ही आयुष्यभर काही कारणास्तव जपू शकत नसलं तर ते स्पष्टपणे सांगण्याचे धाडस ठेवा.! नंतर होणार त्रास कदाचित आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो..! 
बाकी ब्रेकअप वैगरे याबद्दल मी बोलणार नाही तो आपणच आपल्यातलं अनेक छोट्या मोठ्या क��रणातून मिळवलेला कलंक आहे...! 
प्रेम करा ते जगा ते जपा आणि वाढवा..! तुम्हाला ते आयुष्यभर पुरेल एवढे सुंदर आहे..! बाकी प्रेम सात्विक असेल सुंदर असेल तर तुमच्या प्रेमाचा विजय नक्कीच होईल...! 
बाकी काही करा पणं कधीच कुणाचा द्वेष करू नका मग तो किंवा ती सोबत असो या नसो कारण आपल्याला प्रेमानंतर द्वेष करण्याचा कुठलाच अधिकार नाही..! कारण आपण प्रेम केले होते व्यवहार नाही..! आणि जर प्रेमात असताना आणि नसतांना तुम्ही जर द्वेष करत असाल तर तुम्ही प्रेमच केले नाही मग त्या द्वेषाचे कारण काही असो चुकी कुणाचीही आणि कितीही टोकाची असो द्वेष करू नका. 
करा फक्त प्रेम तुमचा द्वेष करणाऱ्या माणसाचाही आणि आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचाही...! 
प्रेम कधी संपत नाही ते फक्त जागा बदलते ती जागा छेडू नका ती अबाधित रहुद्या तुम्ही जगा दुसऱ्याला ही जगू द्या..🤍❤️
-वैभव वैद्य....
0 notes
loksutra · 2 years
Text
वॉचो अॅपवर पैसे न देता कोरियन ड्रामा पहा, वेलकम 2 लाइफ देखील यादीत समाविष्ट आहे
वॉचो अॅपवर पैसे न देता कोरियन ड्रामा पहा, वेलकम 2 लाइफ देखील यादीत समाविष्ट आहे
पैसे न देता Watcho अॅपवर कोरियन नाटक पहा, वेलकम 2 लाइफ देखील यादीत समाविष्ट आहे ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
dineshk00-blog · 3 years
Photo
Tumblr media
http://omgbooksofrecords.com/ OMG Book of World Records... OMG बुक ऑफ रेकॉर्ड ही वार्षिक संदर्भ पुस्तक असून ती मानवी व नैसर्गिक जागतिक नोंदींचे दस्तऐवजीकरण करीत आहे. मानवांनी मिळवलेल्या जागतिक रेकॉर्डला कला, नृत्य कला, शिक्षण, साहित्य, शेती, वैद्यकीय विज्ञान, व्यवसाय, खेळ, निसर्ग, साहस, रेडिओ आणि सिनेमामध्ये ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड नियमांसह आणखी वर्गीकृत केले गेले आहे. रिकॉर्ड कसे निवड़ावे ? रिकॉर्ड ब्रेक करण्यासाठी, रेकॉर्ड निवडा किंवा नवीन रेकॉर्ड सेट करा. आपल्यातील विलक्षण कौशल्य शोधण्यासाठी आपल्या सर्जनशीलतेचा वापर करा, सर्जनशील व्हा, जितकी विलक्षण कामगिरी होईल तितकीच OMG बुक ऑफ रेकॉर्ड्स पुस्तकात वैशिष्ट्यीकृत होण्याची शक्यता आहे. पुस्तकात आधीपासून काय आहे यावर स्वत: ला मर्यादित ठेवून, काहीतरी नवीन करणारी पहिली व्यक्ती म्हणून आपण देखील पुस्तकात वैशिष्ट्यीकृत होऊ शकता. नवीन एडिशन पीपल ऑफ दी ईयर आणि एक अनोखी दुनिया असणार.... तर... बनवता न नवीन रिकॉर्ड्स... OMG BOOK OF RECORDS TEAM 8007179747 https://www.instagram.com/p/CSMgnIEKdNc/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८��� ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** जनतेचे शेकडो प्रश्न प्रलंबित असल्यामुळे राज्य सरकार कोविडच्या आडून कमी कालावधीत अधिवेशनाचा सोपस्कार आटोपत असल्याचा भाजपचा आरोप
** औरंगाबाद इथले व्यासंगी पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
** मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सोलापूर इथं आक्रोश मोर्चा तर ओबीसी आरक्षणासाठी रासपचं परभणी तसंच जालन्यात आंदोलन
आणि
** वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीसोबत कृषी शिक्षण आणि संशोधनाविषयी सामंजस्य करार
****
राज्यात जनतेचे शेकडो प्रश्न प्रलंबित असल्यामुळे राज्य सरकार कोविडच्या आडून कमी कालावधीत अधिवेशनाचा सोपस्कार आटोपत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे, या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तसंच भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी, महाविकास आघाडीत एकमत नसल्याने अपयश झाकण्यासाठी अधिवेशन कमी कालावधीत आटोपण्याचा घाट रचल्याचा आरोप केला. कोविड काळात मंत्र्यांच्या कार्यक्रमांना तसंच मोर्चे आंदोलनांना होणारी गर्दी शासनाला दिसत नसावी, अशी उपरोधिक टीकाही महाजन यांनी केली. फक्त सोपस्कार म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन घेतलं जात असलं तरीही, जनतेच्या प्रश्नांवर अधिवेशनात सरकारला धारेवर धरु, असा इशाराही महाजन यांनी दिला.
 दरम्यान, उद्यापासून सुरू होत असलेल्या या अधिवेशनासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी विधिमंडळाच्या प्रांगणात आमदारांसह, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी दिवसभरात २ हजार २०० जणांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी चार जण कोविडबाधित आढळले आहेत. यात एक लिपिक, एक अग्निशमन कर्मचारी आणि दोन शिपायांचा समावेश आहे. आजही या ठिकाणी चाचण्या सुरू आहेत, त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत उपलब्ध होणार आहेत.
****
इयत्ता दहावीच्या सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थी-निहाय गुणांची नोंद करताना काही शाळांकडून काही त्रुटी आणि चुका झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ज्या शाळांना संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना काही अडचणी आल्या असतील त्यांनी पाच ते नऊ जुलै दरम्यान संबंधित विभागीय मंडळांशी निश्चित केलेल्या नियोजनानुसार संपर्क साधावा, असं आवाहन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आलं आहे. या संगणक प्रणालीमध्ये निश्चित केलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे गुण न भरले जाणं, भरलेले गुण निश्चित न करणं, निश्चित केलेल्या गुणातही काही त्रुटी राहणं, आदी चुकांची पडताळणी करून कार्यवाही करण्यासंदर्भात विभागीय मंडळांनाही राज्य मंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद इथले व्यासंगी आणि परखड पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर यांचं आज पहाटे औरंगाबाद इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. १९६९ मध्ये नाशिकच्या दैनिक गावकरीमधून पत्रकारितेला सुरवात केलेले वाघोलीकर, १९७९ मध्ये औरंगाबाद इथल्या दैनिक ��राठवाडा या वैचारीक वृत्तपत्रात रुजू झाले. जवळपास १२ वर्षांनंतर मराठवाडा दैनिेकातून बाहेर पडून त्यांनी काही काळ मुक्त पत्रकारिता केली. १९९४ मध्ये दैनिक लोकमतमध्ये रुजू झाले. उपवृत्तसंपादक, वृत्तसंपादक, निवासी संपादक आणि शेवटी २०११ मध्ये ते दैनिेक लोकमतच्या संपादक पदावरून निवृत्त झाले. जवळपास चार दशकांच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली. अनेक सामाजिक आंदोलनातही त्यांचा सहभाग राहिला. औरंगाबादच्या पत्रसृष्टीत एक बुद्धिमान पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय सखोल अभ्यास, शोध, विलक्षण निरीक्षणशक्ती. मानवी मन आणि समाजातील घटनांचा वेध घेणारी एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. वाघोलीकर यांच्या निधनानं समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.
****
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज सोलापूर इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात काढलेल्या या मोर्चात मराठा समाजातील अनेक नेते मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी झाली. यावेळी या समाजाच्या विविध मागण्याचं एक निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आलं. दरम्यान, हा आक्रोश मोर्चा शासनानं पोलिसांच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी नरेंद्र पाटील यांनी केला.
****
ओबीसींना त्यांच्या हक्काचे राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजालाही आरक्षण मिळावं, असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केलं आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात आज राज्यभर रास्तारोको करत जेलभरो आंदोलन करण्यात आलं, परभणी इथं झालेल्या आंदोलनप्रसंगी आमदार गुट्टे बोलत होते. परभणी इथं झालेल्या जेलभरो आंदोलनानंतर पक्षाच्या मागणीचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
जालना इथंही राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आगामी तीन महिन्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण पूर्ववत करावं, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. पक्षाचे जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे अंबड चौफुलीवरील वाहतुक काही वेळ विस्कळीत झाली होती.
****
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत दीड कोटीपर्यंतची कामे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता. सद्यस्थितीत सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतची कामं मिळत होती.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातला राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प आणि अमेरिकेतली नामांकित वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यात कृषी शिक्षण आणि संशोधन याविषयी सामंजस्य करार करण्यात आला. ऑनलाईन पध्दतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ.अशोक ढवण आणि वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय सहयोग विभागाचे उपाध्यक्ष डॉ.असीफ चौधरी, यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित यंत्रे आदीबाबत एकत्र संशोधन होणार आहे. अत्याधुनिक कृषि विषयक शिक्षण आणि संशोधनाची देवाण घेवाण होणार आहे. दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यात देखील माहिती आणि ज्ञानाची देवाण घेवाण होणार आहे.
****
औरंगाबाद शहरात खाजगी जलद टपाल सेवा- कुरीअरद्��ारे घातक शस्त्र मागवणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे. इरफान खान उर्फ दानिश खान असं या आरोपीचं नाव आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली असता एकूण ४१ तलवारी, सहा कुकरी आणि दोन गुप्ती असे घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. त्यानं ही शस्त्रं का आणि कोणासाठी मागवली याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना दिली.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार १६८ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ११ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार २४८ झाली आहे
****
बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे १५९ रुग्ण आढळले. यामध्ये पाटोदा तालुक्यात सर्वाधिक ४१ रुग्ण आढळले. त्या खालोखाल बीड तालुक्यात २८ रुग्ण, आष्टी तालुक्यात २४, धारूर २१, गेवराई १४, शिरूर तसंच वडवणी तालुक्यात प्रत्येकी ८, केज ७, माजलगाव ४, तर अंबाजोगाई तसंच परळी तालुक्यात प्रत्येकी २ नवे कोविडग्रस्त आढळले.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील डॉक्टर हेडगेवार या विशेषांकाचं प्रकाशन आज उस्मानाबाद इथं झालं. यावेळी बोलतांना विद्या भारती चे पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री शेषाद्री डांगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक यांनी संघ शाखेच्या माध्यमातून दिलेल्या संघटन सूत्राच्या आधारे देशात परिवर्तन होताना दिसत असल्याचं मत व्यक्त केलं. डॉक्टर हेडगेवार यांनी दिलेल संघटन सूत्र हे समाजाला आत्मभान देण्यासाठी आवश्यक असल्याचं, डांगे यांनी नमूद केलं.
//********//
0 notes
abadhafoundation · 4 years
Photo
Tumblr media
#AbadhaFoundation #AbadhaAbhyas #AbadhaEvents #FreeEducation #Narendramodi #MyGovIndia #unicef #unitednations #millindagates #maharashtra #bhandaracity #gondiacity #tumsar #tiroda ३१ ऑक्टोबर हा दिवस लोह पुरुष "सरदार वल्लभभाई पटेल" यांच्या जयंती निमित्त "राष्ट्रीय एकता दिन" म्हणून साजरा केला जातो. ते धार्मिक व परंपरागत विचारसरणीचे होते आणि वृत्तीने अत्यंत कणखर होते. ते स्वतःला एक सामान्य शेतकरी म्हणत. शेतकऱ्यांत स्वाभिमान निर्माण झाला, यात आपण कृतार्थ झालो असे ते मानीत.स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्ठी घडवून आणणारी चाणाक्ष बुद्धी, कठोर शिस्त व परिस्थितीचे विलक्षण आकलन हे राजकारणी मुत्सद्याला आवश्यक असणारे गुण त्यांच्यात होते. कोणत्याही प्रश्नाकडे ते फलप्रमाण्यवादी दृष्टिकोनातून पाहत. म्हणूनच त्यांना श्रद्धाजली वाहताना द टाइम्सने (लंडन) त्यांचा गौरव बिस्मार्कपेक्षा श्रेष्ठ राजकरणपटू म्हणून केला आहे.एकतेमधून जग जिंकता येतो असे त्यांचे विचार होते, अश्या विचारांतून त्यांनी देश घडविला. अशा थोर पुरुषांना विनम्र अभिवादन. (at Abadha Foundation) https://www.instagram.com/p/CG_7tQen46a/?igshid=b046yblv5sv9
0 notes
marathicorner · 4 years
Text
🍰Birthday🎁Wishes Marathi | Birthday Wishes for Friends👫, Kavita,Thanks🙏
Birthday wishes Marathi If you like Birthday wishes in Marathi, Birthday wishes for best friend in Marathi we providing Thank you for birthday wishes in Marathi then Happy birthday wishes in Marathi language text | Birthday wishes Marathi Kavita and Birthday poem in Marathi, Birthday wishes thanks in Marathi | Birthday thanks in Marathi.
आपण सर्वाना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये देत असतो जर आपणास Birthday wishes Marathi मध्ये तुमच्या मित्रांना द्यायच्या असतील तर मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही खाली काही दिल्या आहेत तसेच best friend साठी सुद्धा खाली wishes व वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आणि वाढदिवस कविता मराठीत, Birthday wishes thanks in Marathi | मराठी मध्ये वाढदिवसाचे आभार.  हे सुद्धा खाली दिले आहे तुम्हाला आवडले तर नक्की इतरांना share करायला विसरू नका चला अतर आपण आता पाहूयात.
या लेख मध्ये काय आहे?
Best Happy Birthday wishes Marathi 
All about 'Birthday Wishes Marathi' -: तुम्ही मराठी birthday wishes शोधत आहात? आपण योग्य ठिकाणी आलात. वाढदिवस साजरा करणे म्हणजे एक स्पेशल आहे. हा दिवस म्हणजेच जो एका वर्षातून एकदाच येतो येतो आणि तो अविस्मरणीय असावा असे प्रत्येकाला वाटते. 
मला आशा आहे की तुमचा वाढदिवस तुम्हाला भरपूर आनंद आणि प्रेम देईल. आनंद घ्या!
कधीही बदलू नकोस मित्रा! , तू जसा आहेस तसा बेस्ट रहा.
चला मेणबत्त्या पेटवू आणि तुझ्या जीवनाचा हा खास दिवस साजरा करू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या जवळच्या गोड आणि प्रेमळ व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या सर्वात बेस्ट मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ज्याची मी सर्वात जास्त काळजी घेतो!
तुझे पाय जिथे ही जातील तिथे तू जे प्रयत्न करशील ते प्रयत्न करत राहा. नेहमीच यशस्वी होशील. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हा खास दिवस तुम्हाला सतत आनंद आणि अनेक मौल्यवान आठवणी आणो!
आपण खूप खास आहात आणि म्हणूनच आपल्या सुंदर चेहऱ्यावर smile असणे आवश्यक तुम्ही प्रत्येक वर्ष एक व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यात सुधारणा करता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज त्या व्यक्तीचा वाढदिवस आहे जो व्यक्ती आनंदात राहतो आणि दुसर्यांना सुद्धा आनंद देतो. आपला वाढदिवस आणि आपले जीवन तुझ्यासारखे बेस्ट असेल!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! एक उज्ज्वल, निरोगी आणि रोमांचक भविष्यासाठी!
आनंद हवेत आहे कारण आपला खास दिवस आहे!
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी तुमचा सर्वात चांगला मित्र आहे हे तुम्हाला मोठ्याने बोलण्याची गरज नाही. भावा तुझ्यावर तेवढ प्रेम आहे आपल.
माझ्यासाठी एक बेस्ट मुलगा असल्याबद्दल thank you. तुझ्यासारख्या एवढा चांगला मित्र मला भेटला मी भाग्यवान आहे.
छोटा असताना आपण एकत्र घालवलेली कित्तेक वर्षे माझ्यासाठी संपत्ती आहे. मला खुशीचा प्रत्येक क्षण आठवतो. माझ्या प्रिय मित्रा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमचा वाढदिवस वर्षातून एकदाच येतो, म्हणून लक्षात ठेवा की आज चा सर्वात अविस्मरणीय दिवस आहे आणि तुमचा रंगीबेरंगी दिवस सुद्धा आहे.
मला तुझ्यासाठी काय वाटते ते सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्हाला भेटणे ही माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली गोष्ट आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज मी तुझ्यासाठी माझा वेळ, आपल्या सोबत share करून आनंदाची इच्छा व्यक्त करतो!
मला तुझ्यासारखा एक महान मित्र व्हावे अशी नेहमी इच्छा असते. परंतु जगात तुझ्या पेक्षा चांगला मित्र होण्याचा कोणताही मार्ग नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज आपला बिग डे आहे आणि तुला एक बेस्ट दिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday Wishes For Best Friends in Marathi 
Here is all "Happy Birthday Wishes For best friend in Marathi" -:  वाढदिवस एक नवीन सुरुवात दर्शवितो नवीन ध्येये आणि नवीन प्रेरणा घेण्याची वेगवेगळी कारणे या वाढदिवसाला असतात जे एक उज्ज्वल आणि ठळक नवीन अध्याय ठरवते.
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहित आहे, मला तुझ्याविषयी सर्व माहिती आहे. आपण सर्वात चांगले मित्र आहोत, आम्ही एकमेकांचे विचार सुद्धा वाचू शकतो. 
आयुष्य खडतर आहे पण वाढदिवस गुळगुळीत आहेत कारण शेवटी मला तुझ्याकडे हसण्याची संधी मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझा वाढदिवस खूप दिवस आठवणीत राहण्यासाठी काही तास आणि क्षणांनी परिपूर्ण होऊ दे! 
Tumblr media
Birthday Wishes For Best Friends in Marathi 
लवकरच आपण आपल्या जीवनाचे नवीन वर्ष सुरू करणार आहात आणि मला आशा आहे की हे आगामी वर्षात यश मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुला एक अविस्मरणीय दिवस आणि साहसी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
Tumblr media
Birthday Wishes Marathi
मला आशा आहे की तुझा वाढदिवस विलक्षण आहे.
तू तुझ्या विशेष दिवसाचा आनंद घ्यावा, आराम कर आणि स्वताला सांभाळ, तुम्ही जीवनात खूप काही करू शकता!
तुम्ही तुमच्या वाढदिवसाचा संपूर्ण आनंद घ्या अशी माझी इच्छा आहे! 
Tumblr media
Birthday Wishes Marathi
या जगात मला कधीही भेटला नसलेल्या चांगल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
Tumblr media
Birthday Wishes Marathi
तुला मिठी मारण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही परंतु, जर काही कारण असेल तर एकापेक्षा जास्त मिठी मारेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या आठवणींसाठी धन्यवाद. तुझ्याशिवाय जग माझं रंगहीन झालं नसत.
तुमच्या आयुष्यात तुम्हाला आवडत असलेल्या सर्व गोष्टी स्वत करा, आपला बिग डे आनंदी राहील!
तुला भरपूर मजा आणि वैभव मिळू दे वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हा दिवस इतका आनंदी होऊ दे की तुझ्या चेहर्यावर हास्य कायम राहूदे. 
Tumblr media
Birthday Wishes For Best Friends in Marathi 
तुम्हीच एकटे आहात ज्याने मला खूप मदत केली, मला खूप मार्गदर्शन केले आणि मला विश्वास नसतानाही कधीही हार मानला नाही. माझ्याबरोबर सर्वत्र राहिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा मी तुला माझी बहिण म्हणतो तेव्हा मला अभिमान वाटतो. मला प्रत्येक वेळा हे अनुभवायचे आहे.
तुमचे सर्वात अर्थपूर्ण स्वप्न, यावर्षी पूर्ण व्हावी हीच इच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
Tumblr media
Birthday Wishes For Best Friends in Marathi 
मित्र, तू तुझ्या दिवसाचा संपूर्ण प्रमाणात आनंद घेऊ शकता!
माझ्या आई-वडिलांच्या दुसर्‍या एका खूप प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाला तुझ्या आयुष्यातील नवीन काळाची सुरूवात होऊ दे!
माझ्या प्रिय मित्रा, तुझा दिवस सुंदर, जादूगार आणि अविस्मरणीय क्षणांनी परिपूर्ण होईल! 
Tumblr media
Birthday Wishes For Best Friends in Marathi 
एक लहान पक्षी काय म्हणाला? अरे! तो म्हणाला तुझा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सकाळी डोळे उघडल्यापासून आणि रात्री झोपण्यापर्यंत प्रेम आणि आनंदाने भरलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
 FB Marathi Comments For Girl Pic
Thank You for Birthday Wishes in Marathi 
Tumblr media
Birthday Wishes Thanks in Marathi 
Thank You So much For Birthday Wishes Marathi -: आपण वाढदिवस हा अनेक विशेष प्रसंग आणि आठवणीने साजरा करतो. काही लोकांना वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टी करणे केक फेकणे आवडते, तर काही मित्रां एक सोपा आणि एकत्र येऊन वाढदिवस साजरा करण्यास पसंत करतात. पण हे सगळे ठीक आहे तुम्ही सगळ करा पण या मध्ये कोणाला दुख देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचे केक चा वापर फेकण्यासाठी करण्यापेक्षा ज्यांना या जगात खायला मिळत नाही त्यांना द्या कारण तुम्ही या जगात राहून काय कमवले हे सगळ यातून समजते.
माझ्या वाढदिवसा बद्दल शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद. नेहमी हा दिवस लक्षात ठेवील. thank you 
Tumblr media
Birthday Wishes in Marathi 
माझ्या वाढदिवसाला तुम्ही मनापासून, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो.thank you  
Tumblr media
Thank You for Birthday Wishes in Marathi 
प्रथम, मी माझ्या देवाचे आभार मानू इच्छितो कारण मला तुम्च्यारखे मित्र मैत्रीणे दिल्या! ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचे आभार. thank you 
Thank you very much वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा दिल्याबद्दल.
Tumblr media
Thank You for Birthday Wishes in Marathi 
Thank you, everyone, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल! एक चांगला दिवस गेला ज्यामध्ये, माझ्या संपूर्ण कुटुंब आणि माझ्या आयुष्यात अशा महान लोकांना मिळवून दिल्याबद्दल मला खूप आनंद झाला.
Thank you काल आणि आज माझ्या वाढदिवशी मला अभिवादन केलेल्या सर्व लोकांचे आभार.
Tumblr media
Thank You for Birthday Wishes in Marathi 
Birthday Wishes Marathi Kavita 
Here is some "Best Birthday Wishes Marathi Kavita" -: वाढदिवस साजरा करण्याचा निवडलेला मार्ग नेहमीच महत्वाचा नसतो, याचा अर्थ आणि वाढदिवस साजरा करण्याच्या या मार्गांमुळे एखाद्या व्यक्तीला कसे वाटते याची जाणीव होते. आपल्या खास दिवशी कौतुक केल्याबद्दल किंवा आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला त्याचा किंवा तिचा वाढदिवस साजरा करणे, महत्वाचे, सुंदर आणि कौतुक वाटणे यासारखेच आहे. म्हणून वाढदिवस साजरा केलाच पाहिजे.
वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा...! तुला भेट द्यावं अस काहीच नाही माझ्याकडे... पण तुझ्या सुखाची मागणी नक्कीच करेन देवाकडे... वाढदिवस हा तुझा, घडवा असा जणू एक सोहळा... सदैव मिळत राहो तुला, आपल्या माणसांचा जिव्हाळा... सुख चांदण्यांचे सडे, आज तुझ्या अंगणी पडो... आजच नव्हे, असे सदैव घडो... आयुष्याचा प्रवास तुझा सुखाचा घडावा, दु:खाची झळ त्याला कधी न मिळो... -आशिष ढिकले ☺
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
 FB Marathi Comments For Girl Pic
Birthday Poem in Marathi
चंदनाची छाया तुझी...... सांजेचा रंग.... तुझ्या वाढदिवशी.. चंद्र पण दंग.... चांदण्याची चमकी तुझ्या केसांवर बरसली.. तुझ्या बर्थडेचा केक खाण्यास.... फुलपाखरं हि तरसली.... मेणबत्त्या पण लाजून विजल्या.. तुझे रूप पाहताच.. आणि केक हि वितळला तुझा स्पर्श होताच बर्थडेचा  केक आता चार दिवस खा.. आणि प्रत्येक बर्थडेला.. अशीच हसत रहा.. - ronydemelo
आई, ताई, बाबा, यांच्या नंतरही एक नात असत त्याचं नाव असत दादा ... शरीराने भारीभक्कम मनाने हळवा सगळ्यांच्या  जीवनातला आधार असतो त्याचं नाव असत दादा वडिलांनंतर वडील होणारा स्वतःचा मन मारून वडिलांची जागा घेणारा तो दादा असतो... स्वतःच्या इच्छा मारून अक्ख घर मोठ्या जिद्दीने सावरतो तो दादा असतो बहिणीसाठी एक आधार असतो जीवनाचा एक अहम हिस्सा असतो अशा माझा प्रिय भाग्यरक्षकाला माझ्या दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुय्झा वाध्दिवासी मी तुला एकाच सांगेन किमी तुला विसारणा कधीही शक्य नाही LOVE U SOO MUCH MY DEAREST BRO....... - SONALI KARANDE
Birthday Wishes Thanks in Marathi 
"Here is a some Best Wishes Thank You So Much in Marathi" -: तुमच्या वाढदिवसादिवशी मित्र आणि मैत्रीणीना तुमच्याकडून त्यांना thank you बोलायलाच हवे. तुम्ही जेव्हा तुमच्या जवळच्या वैक्तीला thank you बोलता तेव्हा न तुमच्या बद्दल  काहीतरी वेगेळे  वाटत असते.
वाढदिवसाला तुम्ही शुभेच्छा पाठविण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढला त्या सर्वांचा मी आभारी आहे. thank you 
Tumblr media
Birthday Wishes Thanks in Marathi 
तुमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या चेहऱ्यावर एक smile ठेवण्यासाठी खूप झाले. खूप खूप धन्यवाद!
Tumblr media
Birthday Wishes Thanks in Marathi 
तुम्ही माझ्या वाढदिवसाला ज्या शुभेच्छा मला पाठविल्या त्या माझ्यासाठी आपल्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या असतात. आणि त्या साठी, thank you so मच.
Tumblr media
Birthday Wishes Thanks in Marathi 
Birthday Thanks in Marathi.
Note: आपल्या जवळ Birthday wishes Marathi चे अधिक Wishes असतील किंवा दिलेल्या wishes मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची Birthday wishes for best friend in Marathi आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.
✥ आमचे फेसबुक पेज लाइक करा - मराठी कॉर्नेर ✥
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही ��िलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
 FB Marathi Comments For Girl Pic
mbtTOC();
via Blogger https://ift.tt/2x59Mve
0 notes
skrafikhsir · 5 years
Photo
Tumblr media
मी एक मानसशास्त्र प्रेमी आणि अभ्यासक, आजतागायत *'मनात'* ह्या पुस्तकाच्या सखोल विवेचनानंतर भावलेलं दुसरं पुस्तक आणि महत्त्वाच पुस्तक मानसशास्त्र क्षेत्रात अजरामर नाव असलेले डॉ. अल्बर्ट एलिस यांचे डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेले हे चरित्रात्मक पुस्तक. त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेताना त्यांच्या मानसिक प्रतिक्रिया, मानसिक घडामोडींचाही मागोवा लेखिकेने घेतलं आहे. विवेकनिष्ठ मानसोपचाराचे तत्व त्यांनी रुजविले, विवेकी व मानवतावादी जीवन तत्वावर आधारित मानसोपचारामुळे कोणतीही व्यक्ती आनंदी व सर्जनशील जीवन जगु शकते. असे त्यांनी सांगितले होते. *'माझे जीवन हाच माझा संदेश आहे'* असे ते म्हणत. त्यांच्या चरित्रातून ते प्रत्ययाला येते. डॉ. एलिस यांचा मानसोपचारतज्ञ म्हणून वेध घेताना त्यांचे भावविश्वही टिपले आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वातील माणूसपण शोधले आहे. त्यांचे त्यांचे क्रांतिकारी विचार पोहोचविले आहेत. *आप�� जर मानसशास्त्र प्रेमी असाल तर हे पुस्तक आपणांस जीवनोपयोगी पडेल ह्याची मला खात्री आहे, नुकताच ह्या पुस्तकाची समीक्षा सुरू केली आहे, वाचतांना एक विलक्षण आनंद होत आहे..* 📗 *-आपलाच पुस्तक प्रेमी मित्र* विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख, 🎓 *डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.* (at SK Coaching Classes Parbhani) https://www.instagram.com/p/B9CZP_QHFzK/?igshid=r7u1ebwvlhlt
0 notes
kalpayshrane · 6 years
Text
Tumblr media
TR 8 - *कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस*
*गुरुप्रसाद जाधव*
कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे.
आज कादर खान गेले. खरंच गेले. गेल्या चार वर्षांत बऱ्याचदा त्यांच्या निधनाच्या वायरल अफवा उठल्या. ब्रेकिंग न्यूजच्या हव्यासापायी गेल्या दोन तीन दिवसांतही पुन्हा तेच घडलं. पण आज ते खरंच गेले. सिनेमातल्या कारकीर्दीच्या शेवटी शेवटीपर्यंत आपल्या विनोदी भूमिकांनी लोकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याच्या मृत्यूचंही असं अनेकदा हसं झालं. हे दुर्दैवच म्हणावं लागेल.
स्ट्रगल कुणाला चुकला नाही
कादर खान यांच्या निधनानंतर अनेकांनी एक हरहुन्नरी अभिनेता, लेखक हरपल्याची प्रतिक्रिया दिली. पण या पलिकडेही आयुष्याला थेट भिडणारा कादर खान हा माणूस म्हणून अधिक भावतो. अधिक समजून घ्यावासा वाटतो. त्याच्याकडून संघर्षाची प्रेरणा घ्यावीशी वाटते.
स्ट्रगल कुणाला चुकला नाही. प्रत्येक जण स्ट्रगल करतोच. किंबहुना आपण करतोय, तो स्ट्रगलच आहे, असं अनेकांना वाटत राहतं. समुद्रकिनारी मोकळ्या आकाशात स्वप्न रंगवणाऱ्या, आवाज नाकारल्याने हताश झालेल्या, रस्त्यावर झोपलेल्या, सुलभ शौचालयात आंघोळ केलेल्या, वडापाव खाल्लेल्या सेलब्रिटींच्या 'स्ट्रगल स्टोऱ्या' आपण आजवर ऐकलेल्या आहेत. पण कादर खान या माणसाच्या आयुष्याची गोष्टच पार वेगळी आहे. या माणसाचा स्ट्रगल सुरु झाला तो अगदी त्याच्या जन्मापासूनच. हा स्ट्रगल होता, जगण्यासाठीचा.
खानच पण कामाठीपुऱ्यात घडलेला
कादर खान यांचे आई, वडील अफगाणिस्तानात काबूलजवळ राहायचे. कादर यांच्या आधीची तीनही मुलं एकापाठोपाठ एक वयाच्या आठव्या वर्षीच वारली. त्यामुळे कादर खान यांच्या जन्मानंतर त्यांच्या आईला मुलाची विलक्षण काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांच्या आईने छोट्या कादरला मुंबईत घेऊन येण्याचा निर्णय घेतला.
कामाठीपुरातील वस्तीत संसार थाटला. मात्र, गरिबी इतकी होती की जगण्याच्या संघर्षाने कादर यांच्या आई वडिलांमध्ये तलाक झाला. या संघर्षपुत्राच्या आयुष्यात बसलेला हा पहिला धक्का. आईचं बळजबरी दुसरं लग्न लावून देण्यात आलं. एक आई आणि दोन बाप अशा त्रिकोणी पालकत्वाच्या छायेत हा लहानगा जीव अक्षरशः घुसमटला.
आईने दिला गरिबी दूर करण्याचा मंत्र
आईच्या दुसऱ्या लग्नानंतरही घरातून गरिबी आणि दारिद्र्य काही गेलं नाही. आजूबाजूची पोरं पत्र्याच्या कारखान्यात तीन रुपये रोजंदारीवर काम करायला जायची. छोट्या कादरपुढेही त्यावेळी हाच पर्याय होता. नोकरी करुन घर खर्चाला हातभार लावायचा निर्धार त्यांनी केला. पण नियतीचा डाव काही वेगळा होता. कादर तीन मजली इमारतीच्या जिन्यावरून सरसर जिने उतरु लागले, तोच एक हात त्यांच्या खांद्यावर पडला. हा हात होता, त्यांच्या वालिदाचा म्हणजेच आईचा.
आई म्हणाली, मला माहितेय तू कुठे चाललायस. या पोरांसोबत आज तूही अडीच तीन रुपयांच्या मागे चाललायस. पण लक्षात ठेव ही कमाई आयुष्यभर तितकीच राहील. या घराची गरिबी तुला कायमची घालवायची असेल, तर त्यासाठी एकच मार्ग आहे. शिक. पढ. आईने 'पढ' हा इवलासा शब्द इतका काही जीव ओतून उच्चारला, की तो छोट्या कादरच्या डोक्यापासून पायापर्यंत भिनला. आणि तेव्हापासून कादर यांनी शिक्षणाची कास धरली.
जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजमधे शिकले. पुढे इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. प्रोफेसरही झाले. हा प्रसंग कादर यांनी त्यांच्या बऱ्याच मुलाखतींमधून अगदी रडत रडत सांगितलाय. आजही अनेकजण या प्रसंगात स्वतःची स्टोरी शोधताना दिसतात. 
नाटकातली एंट्रीही तितकीच संघर्षाची
कादर खान यांच्या रंगभूमीवरील पदार्पणाची गोष्टही मोठी रंजक आहे. आईच्या नकळत ते घराजवळच्या एका कब्रस्तानात जाऊन नकला करत बसायचे. एकदा एका नाटक कंपनीच्या माणसाने त्यांना बघितलं. आणि त्याने कादर खान यांना आपल्या नाटकात घेतलं. कुठलाही अनुभव गाठीशी नसताना कादर खान रंगभूमीवर आले.
घरात भयंकर दारिद्र्य अनुभवणाऱ्या या मुलाने 'मामक अजरा' नावाच्या या नाटकात राजपुत्राची भूमिका साकारली. आपल्या पहिल्या-वहिल्या नाटकात कादर खान यांनी अशी काही छाप पाडली, की नाटक बघायला आलेल्या एका माणसाने तर कादर यांना शंभराच्या दोन नोटा दिल्या. या नोटा खर्च करु नकोस. याच नोटा भविष्यात कितीतरी पटीने वाढणार आहेत, असंही बजावले. कादर यांनीही अनेक महिने त्या नोटा जीवापाड जपून ठेवल्या. मात्र, गरिबीचे फास काही केल्या सैल्य होत नव्हते. त्यामुळे बक्षिसाचे दोनशे रुपयेही ते फार काळ सांभाळून ठेऊ शकले नाहीत.
आईच्या जाण्याची चटका लावणारी कहाणी
कादर खान यांच्या आयुष्यात आईचं स्थान मोठं होतं. त्यांनी सिनेमाच्या अनेक पटकथांमधून आई विषयीचं दु:ख मांडलं. या दु:खालाही स्वतःच्या आयुष्यात आलेल्या कटू अनुभवाची जोड होती. ज्या दिवशी, आई गेली हे सांगायला त्यांनी नातलगांना फोन केला, तेव्हाही त्यांच्या पदरी निराशाच आली.
फोनवर नातलगांनी सांगितलं, ‘हवं त्या गोष्टीची मजामस्करी कर पण आईच्या मृत्यूची मस्करी करु नकोस.’ आईच्या निधनाची तारीख १ एप्रिल असल्याने कुणीच विनोदी स्वभावाच्या कादरवर विश्वासच ठेवेना. पण याच्याआधी या पोराने काय पाहिलं होतं, याची पुसटशी कल्पनाही फोनच्या पलिकडच्या माणसाला नसावी.
कादर खान कुठल्याशा राज्यस्तरीय नाटकाच्या स्पर्धेहून घरी परतले होते. घरी येऊन बघतात, तर घर रक्ताच्या उलट्यांनी भरलं होतं. आई त्यातच पडलेली होती. कादर खान यांनी धावत जाऊन डॉक्टरांना गाठलं. घरी येण्याची विनंती केली. डॉक्टरांनी घरी येण्यास नकार दिला. तेव्हा सिनेमातल्या अँग्री यंग मॅन सारखं त्यांनी डॉक्टरला स्वतःच्या खांद्यावर टाकून घरी आणलं आणि निपचित पडलेल्या आईसमोर ठेवलं. तोवर आईचा मृत्यू झाला होता. हा एखाद्या सिनेमाचा सीन आहे, असं कुणालाही वाटेल. पण पडद्यावर अशा अनेक प्रसंगांना लिलया साकारणाऱ्या या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात हे सगळं भोगलं होतं.
हातात पहिल्यांदाच आले पंधराशे रुपये
कादर खान यांनी पुष्कळ 'स्टारडम' अनुभवलं. अगदी बॉलिवूडमध्ये येण्याआधीपासून त्यांनी ते स्टारडम जगलं. कॉलेजात शिकताना आणि शिकवतानादेखील त्यांची लोकप्रियता अफाट होती. जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजात ते शिकले. तर भायखळाच्या साबू सिद्दीकी कॉलेजात त्यांनी शिकवलं. नाटकातल्या दमदार कामगिरीमुळे ते दोन्ही भूमिकांमध्ये लोकप्रियच राहिले.
कादर खान यांनी लिहिलेली अनेक नाटकं मुंबईतील कॉलेजांत गाजली. त्या काळात कादर खान यांची प्रसिद्धी इतकी होती, की पोरं कॉलेजबाहेर केवळ कादर खान यांना बघायला गर्दी करायचे. त्यांची सही मागायचे. याच काळातला एक प्रसंग आहे.
एका राष्ट्रीय स्तरावरच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत कादर खान यांचं 'लोकल ट्रेन' नावाचं नाटक सादर झालं. त्या स्पर्धेतली जवळपास सगळी बक्षिसं कादर खान यांच्या झोळीत गेली. लेखकापासून अभिनेत्यापर्यंत सगळीच. यामुळे एका दिवसात कादर खान यांनी रोख रक्कम म्हणून १५०० रुपये कमावले. कामाठीपुरातल्या दारिद्र्याने वेढलेल्या चाळीतल्या त्या पोराने त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा पंधराशे रुपये बघितले.
आणि सुरू झालं कादर खान पर्व
त्यावेळी प्राध्यापकी करुन त्यांना दरमहा ३०० रुपये पगार मिळायचा. म्हणजेच पाच महिन्यांचा पगार एकाचवेळी हातात आल्याचा तो आनंद. इथूनच कादर खान यांची गाडी सिनेमाकडे वळली. नरेंद्र बेदी यांनी कादर खान यांना सिनेमासाठी संवाद लेखनाची ऑफर दिली. कादर खान यांनी या संधीचं सोनं केलं आणि बॉलिवूडमध्ये एक नवं पर्व सुरु झालं. कादर खान पर्व.
मनमोहन देसाई 'रोटी' सिनेमावर काम करत होते. मात्र संवाद लेखकाचा शोध काही संपत नव्हता. निर्माते हबीब नाडियाडवाला कादर खान यांना मनमोहन देसाईंकडे घेऊन गेले. मात्र आधीच वैतागलेल्या मनमोहन देसाईंनी, कादर यांचं काम न पाहताच आम्हाला दुसरा लेखक सापडलाय, असं सांगून त्यांना टाळलं.
मगर कम्बख्त पेट मत दे
अखेर त्यांनी कादर खान यांना थेट तोंडावर सांगितलं, ‘हे बघ मला जर तू लिहिलेले संवाद आवडले, तरच मी ते घेईन, नाहीतर फाडून फेकून देईन.’ इतकं ऐकल्यानंतरही, कादर खान यांनी प्रतिप्रश्न केला. ‘तुम्ही आवडलं नाही, तर फाडून फेकून द्याल हे ठीक आहे, पण आवडलं तर काय कराल?’ यावर देसाई म्हणाले, ‘तुला डोक्यावर घेऊन नाचेन.’
देसाईंनी कादर खान यांना 'रोटी' सिनेमाच्या अखेरच्या सीनचे डायलॉग लिहिण्यास सांगितले आणि पुढे जे काही कादर खान यांनी लिहिलं, तो इतिहास झाला. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या मंगलच्या म्हणजेच राजेश खन्नाच्या तोंडून आलेल्या, ‘इन्सान को दिल दे, दिमाग दे, जिस्म दे, मगर कम्बख्त पेट मत दे. उसे पेट देता है. तो उसे भूख मत दे. उसे भूख देता है, तो दो वख्त के रोटी का इंतजाम कर के भेज. वरना तुझे इंसान को पैदा करने का कोई हक नही है.' या डायलॉगने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला.
आजही बॉलिवूडच्या सर्वोत्तम डायलॉग्सची यादी काढण्यासाठी तुम्ही गुगल बाबाकडे गेलात तर तो तुमचा शोध या डायलॉगपाशी आणून ठेवेल. ही ताकद कादर खान यांच्यातल्या लेखकाची आहे. जी केवळ पुस्तकी नाही, तिला वास्तवातल्या अनुभवाची जोड आहे.
कादर यांच्या आईचं बळजबरीने दुसरं लग्न लावून दिलं गेलं. मात्र सावत्र वडील काही कमवत नव्हते. ते छोट्या कादरला आपल्या सख्ख्या बापाकडे पैसे आणायला पाठवत. कामाठीपुरापासून खडकपर्यंत पायपीठ करत कादर वडिलांकडे पैसे मागायला जायचे. दोन रुपये घेऊन पुन्हा घरी येत. त्या दोन रुपयांत अख्खं कुटुंब जेवत असे. आठवड्याला केवळ तीन दिवस जेऊ शकणारा हा पोरगा पुढे लेखक झाला, तेव्हा भूक विसरला नाही. विसरु शकला नाही. म्हणूनच त्याच्या संवादांमध्ये ती जिवंत राहिली आणि कामातही.
मरता मरता जगलेला माणूस
आठव्या वर्षी जो पोरगा मरेल अशी भीती वाटत होती, तो ८१ वर्ष जगला. नुसता जगला नाही, जगण्याचं सोनं केलं. आपल्या जाण्याने अनेकांच्या मनात हळहळ राहील, असं आनंददायी काम केलं. पोकळी निर्माण होईल, असं भरीव योगदान दिलं. ३०० हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका, अडीचशेहून अधिक सिनेमांसाठी त्यांनी केलेलं संवाद लेखन, हे सगळं खरंतर कादर खान किती मोठे होते, हे सांगायला पुरेसं आहे.
कुणाला कुठल्या भूमिकेसाठी ते आठवतील, हे सांगणंही कठीण आहे. कारण एकाहून एक सरस भूमिका त्यांनी पाडद्यावर साकारल्या. त्यांची प्रतिभा इतकी विशाल आहे, की जगण्यातला हा स्ट्रगल त्यातून वजा केला तरीही ती किंचितही कमी होणार नाही. पण, कादर खान या माणसाने ज्या शून्यातून हे सगळं उभं केलं. तो शून्य त्यांच्या पश्चात महत्वाचा आहे. त्या शून्याला लाख मोलाची किंमत आहे. ती समजून घ्यायला हवी.
0 notes
agrojayyworld · 4 years
Text
वनस्पती विज्ञान
वनस्पती विज्ञान
जास्तीत जास्त उत���पादन घेण्याकरिता वनस्पतींच्या वनस्पती-उत्पादक अवस्थेत कसे समायोजित करावे हे आपल्याला लक्षात आले पाहिजे. जर वनस्पतींनी आपल्या उर्जेचा एक मोठा भाग पीक निर्मितीमध्ये वापरला तर सर्वात उन्नत कल्पनीय उत्पन्नाची मूल्य गोळा करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हवामान असो, मातीतील ओलसरपणाचे तसेच पौष्टिक घटकांचे समायोजन किंवा इतर काही घटक संभाव्य उत्पन्नाला कमी करते कारण जेव्हा वनस्पतींनी त्यांना चैतन्य वापरावे लागणार्‍या विलक्षण परिस्थितीचा नकारात्मक परिणाम होतो, त्यांच्याकडे फक्त मर्यादित मूल्य आहे.
वनस्पति-उत्पादक संतुलन राखण्याचे आमचे ध्येय आहे
आपण ते कसे साध्य करू शकतो?
उदाहरणार्थ उबदारपणाशिवाय विकासात्मक सुविधा घेऊ (उदाहरणार्थ अल्मेरिया, स्पेन मध्ये). जर अशी घटना उद्भवली असेल तर हवामान नियंत्रित करू शकत नाही किंवा अर्ध्या मार्गाने कोणालाही शक्य नाही म्हणून या गॅझेटसह अशा प्रकारच्या ग्रीनहाऊसमध्ये असलेल्या वनस्पतींच्या समतेचे वागणे कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. दिवसा व संध्याकाळच्या तपमानात अति-उत्सर्जन आणि ग्रीनहाऊसच्या परिस्थितीत आर्द्रता असल्यामुळे वातावरण ज्या प्रकारे वनस्पती उत्पादक मथळ्याकडे जाते त्या मार्गाने आपल्याला माहित असले पाहिजे.
याचा विल्हेवाट लावण्यासाठी आमच्या इतर दोन गॅझेटचा वापर आवश्यक आहे.
पर्णसंभारातील वस्तुमानाने व्यवहार करणे - जर या पद्धतीचा उपयोग केला तेथे रोपांची घटना उद्भवली असेल तर उदाहरणार्थ, टोमॅटो, क्रमिकपणे केंद्रित डे-ली एनजी मूलभूत आहे (एकाच वेळी अधिक पाने काढून टाकत आहे).
पाण्याची व्यवस्था, वनस्पतींच्या पौष्टिक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते - विकसनशील माध्यम ओले ठेवावे, उच्च-गर्भाशयापासून दूर रहावे, हे नियमितपणे आणि कल्पनीयरित्या एका खालच्या भागात पाण्यासाठी दिले जाते.
कोरडे केल्यामुळे झाडे दोन मार्गांनी उत्पादक दिशेने वाटचाल करतात.
एकीकडे, जेव्हा पाणी निघते (विकसनशील माध्यमातून गायब झाल्याने) पूरक घटकांचा एक तुकडा शिल्लक राहतो, विकसनशील माध्यमात मीठ एकाग्रता (ईसी) वाढवितो. जर आदर्शातून विचलित होण्यापासून दूर जाणे आवश्यक असेल तर वनस्पतींमध्ये तणाव निर्माण होतो आणि यामुळे वनस्पती त्यांचे चैतन्य त्यांच्या संसाधनावर, पिढीवर, त्यांच्या वंशजांच्या विकासावर, पीक निर्मितीवर वापरतील. हे कृतज्ञ असल्याचे मानले जाऊ शकते, कारण प्रत्येकाला सभ्य कापणी करणे आवश्यक आहे, परंतु विलापनीयपणे सांगायचे तर तेथे उत्पादनाच्या मार्गावर एक उंच वास असला तर झाडे कमी पिकाची निर्मिती करतात जेणेकरून 'काळजी घ्यावी'. त्यांचे बियाणे (ऑफस्प्रिंग्ज), ज्यात पिकाच्या आकारात घट होण्याचे सूचित होते जसे गोळा केलेल्या कापणीच्या सर्व वजन कमी होते.
नंतर, रूट केस, जे रूट फ्रेमवर्कचा एक प्रमुख पैलू म्हणून पाण्याचे आणि पोषक तत्वांमध्ये सक्रिय घटक असतात, विकसनशील माध्यमामध्ये (जेच्या आसपास आहे) पाण्याचे वायूचे आदर्श प्रमाण सतत वाढवतात. 30%). यामध्ये विकासाचाही समावेश आहे कारण सध्या मूळ असलेल्या केसांचा विकास होतो. अतिरीक्त सिंचन प्रणालीमुळे दिलेली जागा कोरडे पडते आणि पाण्याचे प्रमाण कमी होते किंवा हवेचे प्रमाण कमी होत असताना, आदर्श बदलांचे स्पॉट पाहिजे असल्यास, आदर्श स्थिती शोधण्यासाठी मुळे पुढे ढकलतात.
प्लांट फिजिओलॉजीवरील माहिती अशी सुचविते की जर एखाद्या वनस्पतीमध्ये उर्जा (सूक्ष्म) ऊर्जेची कमतरता भासली गेली असेल तर ती त्याची उपलब्ध उर्जा मुळांमध्ये, उत्पन्नाच्या वेळी आणि शेवटी झाडाच्या झाडामध्ये समन्वय साधते. अशा प्रकारे, जर मुळांच्या विकासास सातत्यपूर्ण चैतन्य आवश्यक असेल तर पीक तयार करण्यासाठी कमी चैतन्य उपलब्ध आहे, जे कमी उपलब्ध उत्पादनास सूचित करते.
मातीहीन विकास ही लागवड करणार्‍यांना पुढील अडचणी दाखवते, ज्यात प्रभावी सृष्टीची निकड असलेल्या जलप्रणालीच्या तंत्राचा समावेश आहे. विशिष्ट विकसनशील माध्यमांमध्ये पाण्याची साठवण आणि रीव्हीट करण्याची क्षमता वेगवेगळी आहे कारण त्यांची जाडी, त्यांचे अद्वितीय कंपाऊंड, साहित्य आणि आकार.
तज्ज्ञांचे मत आहे की अविश्वसनीय वंशपरंपरागत संभाव्यतेसह वर्गीकरण कायदेशीर पाणी प्रणालीच्या प्रक्रियेशिवाय चांगला परतावा तयार करू शकत नाही. ते वनस्पती बोर्ड फ्रेमवर्कमध्ये निराशेचे अगदी कमी सुस्त आहेत. जलप्रणालीच्या पाण्याचा सर्वोत्तम उपयोग आणि त्याचा वापर अविश्वसनीय आर्थिक आणि नैसर्गिक महत्त्व देखील आहे.
विकसनशील माध्यमांमध्ये सूक्ष्म ऑक्सिजनच्या प्रमाणानुसार वनस्पतींना निरोगी आणि सतत टिकाव देणारी मूळ फ्रेमवर्क आवश्यक आहे. शिवाय विकासाच्या आदर्श पदवीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना वेळेनुसार विकसनशील माध्यमाच्या जल पदार्थात नियंत्रित बदल आवश्यक आहे. विकसनशील माध्यमामधील पाण्याचे प्रमाणातील फरक वनस्पतीमध्ये वनस्पतिवत् होणारी बाह्यवृद्धी किंवा उत्पादक प्रेरणा निर्माण करतो. म्हणून वनस्पतींमध्ये समानता ठेवण्यासाठी विशिष्ट परिस्थितीत विलक्षण गुणांची आवश्यकता असू शकते आणि हे अचूक आणि विश्वासार्ह नियंत्रणाशिवाय अव्यवहार्य आहे.
आम्हाला कधी सिंचन करणे आवश्यक आहे?
पहिल्यांदा पाण्याची पाण्याची योजना पहिल्यांदाच रोपांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करते. आदल्या दिवशीच्या शेवटच्या पाण्याच्या दरम्यान पाण्याच्या प्रमाणातील अत्यंत भारदस्त अनुमान आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पहिल्या पाण्याची पाण्याची सामग्रीच्या अंदाजाच्या दरम्यानच्या विरोधाभासामुळे वनस्पतींवर पाण्याच्या व्यवस्थेचा प्रभाव मूलभूतपणे नियंत्रित केला जातो.
हे सर्वत्र मान्य केले जाते की विकासाच्या दराचे समानता कायम ठेवण्यासाठी हे मूल्य कुठेतरी आणि १२% च्या प्रमाणात ग्रीनहाउसमध्ये केंद्रित केले जावे.
हे गुणधर्म रोपट्यांच्या लहरीपणाच्या स्थितीनुसार, स्थलाकृतिक आणि हवामानविषयक परिस्थितीवर अवलंबून असलेल्या दोन शीर्षकामध्ये भिन्न असू शकतात.
वनस्पतींना वनस्पतिवत् होणारी किंवा निर्मितीक्षम ड्रायव्हिंग फोर्सची आवश्यकता आहे की नाही यावर अवलंबून, आम्ही या भिन्नतेच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करू शकतो. आम्ही वनस्पती वनस्पतिवत् होणारी मार्गाने हलविण्याची अपेक्षा करतो तेव्हा, हे मूल्य 6% जवळजवळ खाली आणले जाऊ शकते.
रोपांना उत्पादक मार्गाने हलविण्याचा मुद्दा असल्यास, फरकांच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करणे जास्त, जवळपास 12% असावे.
दिवसाचा-संध्याकाळचा एक अद्भुत वेळ तपमानातील उत्तेजन देणे म्हणजे विकासात्मक कार्यालये असल्यास तापमान (वनस्पती तापमान) आणि ओलसरपणा निर्णायकपणे नियंत्रित केला जाऊ शकत नाही, विशेषत: तेजस्वी काळात. रोपासाठी हा एक त्रासदायक परिस्थिती आहे, ज्यामुळे त्यांना उत्पादक पात्र प्राप्त होते.
अशाप्रकारे, अशा स्थितीत, उद्दीष्ट गुणांमधील उत्तेजन 2% -4% दरम्यान कमी ठेवले पाहिजे. येथे, जसे ते शक्य असेल त्याप्रमाणे, अचूक अंदाजावर एक ठोस उच्चारण आहे कारण वनस्पती आधीपासून 0,5% इतका अल्प फरक दर्शवू शकतात.
जर वातावरणात ढगाळ वातावरणाची घटना उद्भवली असेल तर तापमानातील फरक तेच चिन्ह नाही. अशा परिस्थितीत, उच्च किमतीची अंदाजे किंमत असावी.
जसे चरण-दर-चरण वेगवेगळ्या नैसर्गिक परिणामांकडे वनस्पती सादर केल्या जातात, त्यांचे संध्याकाळी पाण्याचा उपग्रह देखील तितकाच बदलू शकतो, ज्यामुळे सिंचन प्रणालीची वेळ-संवेदनशील सुरुवात अपवादात्मक असुरक्षित बनते.
ट्रुटिनाच्या टचपॅडवर अलार्मचे कार्य या समस्येचे उत्तर देते. दरानुसार या भिन्नतेचा अंदाज आम्ही सेट करू शकतो, ज्या आधारावर आपल्याला पाणी प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता आहे. अशा क्षणी जेव्हा विकसनशील माध्यमातील पाण्याचे पदार्थ या किमतीपर्यंत पोहोचतात किंवा त्यास मागे टाकतात तेव्हा फ्रेमवर्क एक सावधगिरीचा संदेश पाठवतात आणि आपल्या पहिल्या पाण्याच्या व्यवस्थेच्या सुरूवातीला अचूक नियोजन देतात.
पहाटेच्या पहिल्या पाण्याची व्यवस्था सुरू करुन प्रथम पाऊल पुढे टाकल्यामुळे, पुढचा मुद्दा म्हणजे आधीच्या दिवसाच्या अत्यंत पाण्याचे द्रव्याचे अनुमान काढणे आणि दिवसाला या उत्तेजनाभोवती थर ओलसरपणा ठेवणे. दिवसाची शेवटची पाण्याची व्यवस्था होईपर्यंत. दररोजच्या पाण्याचे प्रमाण द्रुतगतीने पोहोचण्यासाठी पाण्याचा विस्तारित भाग सामान्यतः निवडला जातो.
आदर्श सर्वात महत्वाच्या किंमतीवर पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या जलप्रणालीच्या तिसर्‍या वेळी दर्शविले आहे जिथे विविध दरम्यान विकसनशील माध्यमाच्या पाण्याचे प्रमाण योग्यरित्या 1-3% उत्स्फूर्ततेद्वारे ही अत्यंत प्रोत्साहन मिळवून देण्याचा आपला हेतू आहे. पाणी पिण्याची प्रसंगी. वाहिनीची गरज विचारात घेतली पाहिजे.
रोपाच्या क्षणिक अवस्थेप्रमाणेच जमीन आणि हवामानविषयक परिस्थिती यावर अवलंबून असलेल्या दोन मथळ्यांमध्ये आदर्श गुण भिन्न असू शकतात.
महत्त्वपूर्ण! पाण्याच्या प्रत्येक भागामध्ये किंवा पाण्याच्या प्रत्येक कालावधीच्या कालावधीत अयोग्य निर्णय घेतल्यास अवांछित वाढ आणि पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सूचित होते.
उपरोक्त परिस्थितीपासून सामरिक अंतर राखण्यासाठी, ट्रुटिनाच्या टचपॅडवर दिलेल्या श्रेणीच्या ��ाहेरील गुणांवर ध्वजांकन करण्याची खबरदारी घेतली जाऊ शकते, ज्यामुळे परिस्थितीत होणा-या समायोजनांना प्रतिसाद देणे सहज शक्य होईल.
0 notes
niteesham · 5 years
Video
🔵 "स्वाक्षरी" 🔵 म्हणजेच सहीबद्दल थोडी माहिती : १) जी व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काढते ती विलक्षण प्रतिभावंत असते. असे लोक हाती घेतलेले कार्य विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात. पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख-सुविधा प्राप्त होतात. २) जी व्यक्ती किचकट, अधिक गुंतागुतीची स्वाक्षरी करतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या लोकांना सुखी जीवन मिळणे कठीण असते. परिस्थितीमुळे हे लोक काही जणांना फसवतात देखील. अशा व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते, मात्र त्यासाठी प्रयत्न करण्यास या व्यक्ती कमी पडतात. मात्र या व्यक्तींना कुणी दगा देऊ शकत नाही कारण हे चतुर असतात. ३) काही लोकं आपल्या सहीला अर्धवट किंवा तोडून तोडून लिहीतात. हस्ताक्षराचे शब्द हे छोटे असून ते अस्पष्ट देखील असतात. त्यामुळे असे हस्ताक्षर ओळखणे थोडे कठीण होते. असे लोक सहसा धुर्त असतात. हे लोक आपल्या कामाचं सिक्रेट कुणा समोर बोलत नाहीत.कधी कधी हे लोक चुकीच्या रस्त्यांवर जाऊन कुणाचंही नुकसान करु शकतात. ४) जे लोक कलात्मक आणि आकर्षक सही करतात ते रचनात्मक स्वभावाचे असतात. कोणतेही काम कलात्मक स्वरूपात करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशी सही करणाऱ्या व्यक्ती बहुदा कलाकार असतात. ५) काही लोक सहीच्या खाली दोन रेषा ओढतात. अशी सही करणाऱ्या लोकां मध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते. असे लोक कोणतेही काम करताना अयशस्वी होण्यावरून चिंतेत असतात. खर्च करण्यामध्ये या लोकांचा हात आकडता असतो. अर्थात या लोकांना आपण कंजूस म्हणू शकतो. ६) जे लोक सहीतील पहिले अक्षर मोठे आणि त्यानंतर आपले शेवटचे नाव म्हणजे आडनाव पूर्ण लिहीतात ते खूप यशस्वी होऊन जीवनात सुख सुविधा प्राप्त करतात. ईश्वरावर विश्वास ठेवणारे आणि धार्मिक कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो. ७) ज्या व्यक्तींच्या सहीमध्ये लयबद्धता आढळत नाही त्याव्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात. ८) ज्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या मध्येच कापल्या सारख्या दिसतात त्या व्यक्ती नकारात्मक विचारांच्या असल्याचे स्पष्ट होते. यांना कोणत्याही कार्यात सर्वात प्रथम असफलता दिसते. ९) काही व्यक्तींचे अक्षर आणि त्यांची स्वाक्षरी हे एक सारखेच असते अशा व्यक्ती त्यांची सगळी कामं चांगल्या प्रकारे करतात. अशा व्यक्ती संतुलित असतात. समोर एक स्वभाव आणि प्रत्यक्षात वेगळा अशा स्वरूपाचे नसतात. ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचेच ते कायम राहतात. १०) जी व्यक्ती स https://www.instagram.com/p/BwAcu77nvEo/?utm_source=ig_tumblr_share&igshid=xikdywqi9ana
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 January 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा. ****
देशात बनवलेली कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस आज देशाच्या आत्मनिर्भरतेची प्रतिक आहे तसंच देशाच्या आत्मसन्मानाचंही प्रतिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाच्या ७३व्या भागामध्ये देशवासियांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातल्या आपल्या लढ्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झालं असून ज्याप्रमाणं, आपली ही लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली, तसंच, आता आपला लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे. आपण सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आपल्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. केवळ १५ दिवसांमध्ये, देशानं आपल्या ३० लाखांहून अधिक, ‘कोरोना योद्ध्यांचं’ लसीकरण केलं असून अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी १८ दिवस लागले होते, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. कोरोना विषाणू संसर्गानं जी परिस्थिती निर्माण केली त्याचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अशी विलक्षण कामं झाली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना पंतप्रधानांनी यावेळी विविध उदाहरणं दिली. कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे विविध प्रयोग सुरू आहेत. हे प्रयोग नवोन्मेषाची उर्मी तर दर्शवतातच, पण त्याच बरोबर हे ही दाखवतात की आपल्या देशातलं कृषिक्षेत्र कसा नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत आहे. शेतीला आधुनिक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि अनेक पावलं उचलत आहे. सरकारचे प्रयत्न यापुढेही असेच सुरू राहतील, असं पंतप्रधान म्हणाले. ‘माय गोव्ह’ या संकेतस्थळावर जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री यांनी रस्ते सुरक्षे विषयी चर्चा करण्याचा आग्रह केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या महिन्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा महिना साजरा केला जात असल्याचं आणि देशात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला जीव वाचवण्यासाठी असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपल्याला सर्वांनाच आपलं सक्रिय योगदान दिलं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ‘फास्टॅग’ च्या उपयुक्ततेची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा समारंभ- अमृतमहोत्सव आपण सुरू करत आहोत. अशातच, आपल्या त्या महानायकांशी संबंधित स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा उत्कृष्ट काळ असल्याचं त्यांनी नमूद केलं. खासकरून युवक मित्रांनी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल, स्वातंत्र्याशी संबंधित घटनांबद्दल लिहावं. आपल्या भागातल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातल्या वीरगाथांबद्दल पुस्तक लिहावं, असं पंतप्रधानांनी सुचवलं. या महिन्यात, क्रिकेटच्या मैदानातूनही खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आपल्या खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी असल्याची प्रशंसा पंतप्रधानांनी केली. हे सर्व घडत असताना, दिल्लीत, २६ जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून, देश, अत्यंत व्यथित झाल्याचं ते म्हणाले. आपल्याला आगामी काळ हा नवीन आशा आणि नाविन्यानं भरून टाकायचा आहे. गेल्या वर्षी आपण असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं होतं. यावर्षीही आपल्याला कठोर मेहनत करून आपल्या संकल्पांची पूर्तता करायची आहे. आपल्या देशाला आणखी वेगानं पुढं न्यायचं असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
****
देशभरातली चित्रपटगृहं फेब्रुवारी महिन्यापासून पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून चित्रपटांच्या तिकिटांच्या ‘ऑनलाईन’ नोंदणीस प्रोत्साहन द्यावं असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. चित्रपटात दोन मध्यांतर असावेत, तसंच कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या निकषांचं पालन करणं आवश्यक असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
नाशिक इथं होणाऱ्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि घोषवाक्याचं प्रकाशन आज नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी ५६ जणांनी पाठवलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्यातून कोल्हापूर इथल्या अनंत गोपाळ खासबारदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड करण्यात आली.
****
देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. सोलापूर, रायगड, वाशिम, नाशिक, जिल्ह्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना पोलिओचे डोस दिले जात आहेत.  
****
0 notes
blogkatta · 6 years
Text
अण्णाभाऊ साठे (१ ऑगस्ट जयंतीविशेष )
नवीन लेख- आजवर आपण भरपूर कादंबऱ्या वाचल्या असतील. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या?  कारण, कादंबऱ्यातच लेखकाची सर्व शक्ती पणाला लागते ! कादंबरीतच लेखकाच्या पूर्ण विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीची जाण होते. लेखकाला हे सर्व कथात्मक कसे  सुचत असावे, स्वतःस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही! लेखकाचीच विचारशक्ती पडद्याबिगर आपल्या डोळ्यासमोर कादंबरीतील घटनाचीत्र दाखवत असते. कथेतील चुरस जाणून घेण्यात आपण कादंबरी वाचनाच्या ओढीला लागतो. हे लेखकाला सुचलेल्या कथेमुळे, प्रसंगामुळे, पात्रांमुळे शक्य होते. यात आज आम्हाला आण्णाभाऊ साठेंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, त्या काळात जातीवादामुळे आण्णाभाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले. त्यावेळी मातंग समाजातील मुलगा म्हणून मास्तरांनी अण्णाभाऊ साठेंना शाळेतून बाहेर काढले. परंतु आज आण्णाभाऊ साठेंची लौकिकता सांगावी लागत नाही. दीड दिवस शाळेत गेलेले आण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' नावाची कादंबरी काही विद्यापीठांच्या M. A.च्या अभ्यासक्रमात आहे. आण्णाभाऊ साठेंनी तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज,  कवड्याचे कणीस, पाझर, वैर, डोळे मोडीत राधा चाले, गुलाम, चित्रा, धुंद रानफुलाचा, रानगंगा, मास्तर, मंगला, जीवंत काडतूस, तास, संघर्ष, रूपा, रानबोका, फुलपाखरू अशा त्यांच्या काही कादंबऱ्या. 'फकिरा'सारख्या  काही सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. ३५ पैकी ७ कादंबऱ्यावर चित्रपट बनवण्यात आले.       अण्णाभाऊ साठेंचा कथासंग्रह खूप मोठा होता. बरबाद्या कंजारी, फरारी, लाडी, भानामती, पिसाळलेला माणूस, चिरानगरची भुतं, निखारा, नवती, आबी, गजाआड, क्रुष्णा काठच्या कथा, खुळंवाडी अशी तब्बल तेरा नाटकं आण्णाभाउंनी प्रसिद्ध केली. सुलतान , पेंग्याच लगीन, इनामदार यांचाही या यादीत समावेश आहे. याबरोबर साठेंनी शिवरायांचा स्वराज्य संदेश ही पोवाड्यातून लोकांपर्यंत पोहचवला, म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. याचबरोबर यांनी नेसरीच्या खिंडीत मृत पावलेल्या प्रतापराव गुजर अशा पराक्रमी मावळ्यांवर 'अग्निशिखा' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली.  अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर,  कलंत्री, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक्, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा असे अनेक तमाशेही साठेंनी प्रसिद्ध केले. 'माझा रशियातील प्रवास' हे साठेंचे प्रवास वर्णन ही रशियात प्रसिद्ध झाले. याच बरोबर नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्याबाजाराचा पोवाडा असे त्यांचे सु-प्रसिद्ध पोवाडे. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही मुंबई मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.      सांगली जिल्ह्यातील खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे फक्त साहित्य सम्राटच नव्हे तर समाजसुधारकही होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे. अण्णाभाऊ लावण्या, शाहिरी, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. यातून अण्णाभाऊ साठेंची कारकीर्द आजही चालू आहे. आपल्यासारख्या नवख्यांना याच्यामुळेच प्रेरणा मिळते म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना स्मरूनच लेखणी उचलतो! ३६५ दिवसापैकी १ दिवस मराठी दिन साजरा केला जातो, उरलेले ३६४ दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावे मराठी दिन साजरा करूयात.   - गणेश बाळकृष्ण आटकळे.पंढरपूर http://feedproxy.google.com/~r/GaneshAtkale/~3/yY77PgVTdXA/blog-post.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ गणेश अत्कले
0 notes
veeritesblog · 7 years
Text
Shridharpant Tilak , a real Lokmanya , comments on my blogs
*श्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’!* - डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर ‘दुनिया‘ या मामा वरेरकर ( who translared another great Bengali writer Sharashhchandra into Marathi and adapted Galsworthy’s play Strife as सत्तेचे गुलाम ) यांच्या साप्ताहिकाने खास ‘ टिळक अंक ‘ प्रसिद्ध केला होता. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक अप्रतिम लेख लिहिला होता. दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांमधील अकृत्रीम स्नेहाचा धागा येथे देत आहे. *—*—-*—-*
मी , ता. २६ मेला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेला गेलो होतो. आदल्या दिवशी जेव्हा मुंबईहून निघालो त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्यात आत्महत्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे असा ध्वनी उमटण्यासारखा काहीच मजकूर नव्हता.
दुपारी फार उून असल्यामुळे रा. लखाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली. या सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे सभेचे कामकाज फार उत्साहाने चालले होते. हिंदुमहासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे , या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली यामुळे मला थोडा धक्का बसला.
वाचून पाहातो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र रा. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी! मी अगदी गांगरून गेलो, आधी हे खरेच वाटेना. परंतु तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो.
गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपण आरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला हे जाणून माझे मन फार उद्विग्न झाले. श्रीधरपंतांना कोणीतरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा असा माझा प्रबळ तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे कारण हेच की दुसरे कोणते, हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. ‘ टाइम्स’ हातात धरतो तोच श्रीधरपंतांचे हातचे मरणापूर्वी तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा ‘ टाईम्स ‘ टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आत्महत्त्या हेच मरणाचे कारण होय, हे अगदी स्पष्ट झाले.
मग तर अगदीच कष्टी झालो. श्रीधरपंतांना मी थोडासा दोषही दिला. आत्महत्या हा मरणाचा भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्या घडली ती कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंतांची आ���्महत्या मोठी हृदयद्रावक होती असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य ‘ केसरी ‘ कंपूशी भांडण्यात जाणार , आपल्याला विधायक काम करण्यास अवसर रहाणार नाही , यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्या करणे बरे, असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतांवर (या एका ठिकाणी मला मूळ आदरार्थी उल्लेख मिळाल्याने मी इतर ठिकाणी देखील तसा बदल केला ) यावी यासारखी दुसरी अनिष्ट गोष्ट ती कोणती ?
माझ्या मते श्रीधरपंतांना ‘ केसरी ‘ त जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. ‘ केसरी ‘ पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत़्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती ‘ केसरी ‘ गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने ‘केसरी ‘ च्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे , तर भारदस्त लेखक या दृष्टीने ‘ केसरी ‘ च्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता.
राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते. जहाल , सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने ‘ केसरी ‘ ला काही धोका नव्हता ,असे असताना त्यांना ‘ केसरी ‘ त जागा मिळाली नाही. याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. ‘ केसरी ‘ त जागा मिळाली असती तरीही ‘ केसरी ‘ कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टडीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज ‘ केसरी ‘ कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण ‘ केसरी ‘ कंपूला झाली असती तर बरे झाले असते.
मला त्यांच्यासंबंधी काय वाटते हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. कै. श्रीधरपंत टिळक हे एका ब्राह्मण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव. त्यांचे वडील लो. टिळक यांना १९१६ साली जेव्हा मी ‘ मूकनायक ‘ पत्र चालवीत असे त्यावेळी दर अंकात जरी नसले, तरी अंकाआड शिव्याशापांची लाखोली वाहात असे. ब्राह्मण्याशी अहनिर्श लढणा-या माझ्यासारख्या अस्पृश्य ज्ञातीतील एका व्यक्तीने ब्राह्मण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दु:खी व्हावे हा योगायोग तर त्याच्याही पेक्षा विलक्षण आहे हे कोणीही कबूल करील. परंतु हा योगायोगच मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे.
कोणी काहीही म्हणो , श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजनसमाजाचा उपहास करणा-या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतांसच होय . टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे.
(उल्हास पाटील, संगमनेर, यांची एका ग्रुपमधील पोस्ट. - प्रल्हाद मिस्त्री, दुरूस्ती करून पुन्हा पोष्ट केली : डाॅ आर् वाय् शिंदे , वाई )
Dear Reader, In continuation of the earlier post (which I will post here later ) here is the article by Dr Ambedkar who has denied the title of Lokmanya to Tilak and has claimed that Shridharpant Tilak , his son deserves the title of Lokmanya .. Leader of the Masses … more than Bal Gangadhar. It’s interesting to note that Mama Varerkar who introduced us to Sharadchandra (Sharad Babu of recently remade Devdas with Aishwarya Rai and Shah Rukh Khan) and who adapted Galsworthy’s play Strife for us as सत्तेचे गुलाम Slaves of the Power … he published this article in his periodical … now it’s an ointment in the eyes of certain people (intellectuals and so called academics included among them) to make them see that Varerkar was a Brahmin, Tilak of course and Dr Ambedkar had excellent understanding with such intellectual and liberal (though Tilak was not as liberal as Agarkar ) Brahmins. It grieves people like me to see that so called social leaders and politicians, including the intellectuals and press persons seem to divide people by the castes of their birth …isn’t this tragic? … We have made progress or regress… intellectually … it’s a matter of concern. …The other day I brought it to personal attention of one Great Maratha friend of mine , an English teacher (a member of my Whatsapp Group … I call him a Great Maratha because he had put a post canvassing that movement, which has lost its sheen after the daring Maratha farmer girl wrote in her suicide note that evil practices of victimising a bride for dowry must first stop and then fight for your rights) that I was wonder struck when I heard on Radio recently that the most beautiful bhajan in P K Atre’s famous musical drama - sangeet natak Preetisangam .. the natyageet .. राधाधर मधुमिलिंद जयजय रमारमण हरी गोविंद .. was written by the novelist who wrote Shreeman Yogi (a magnum opus on Shivaji the Great). It clearly means that a writer with the height of creative talent living in a small village near Kolhapur like Kowad was on excellent terms with P K Atre. Their social background did not come as a hindrance in their friendship. I wonder what type of society was in those days. I must have been a child then. However, I envy the earlier generation and today’s generation that has seen those days. My English teacher friend he didn’t respond to my question. This is exactly like my friend Dr C L Khatri calls in his famous poem Two Minute Silence. We have lost all values of good social relationship and we are extremely hypocrite when we stand up and observe silence. This is no silence indicating any peace. It’s a silence that breaks all limits of noise ..noise in relationships , noise in conscience, noise in politics , noise in fine arts and literature. … I had once removed that friend but included him again because the kind of reaction I expected from other fellow member teachers was so ‘cool’ that I was frustrated …. what use is our assertive action of choice or decision ordained by Sartre ? (whose ghost is still on our neck since our M A days ) I have realised that we can’t bring about any change in the system in which we work as teachers. …forming a whatsapp group of teachers, some sensitive senior society members and artistes was my meak attempt to organise right minded minority … but I failed.. now I don’t visit my own group any more..I have used the post in the group as a continuation here in the blog.. I place my views before a larger public. I’m happy that some very sensitive persons are there who have responded positively to my blogs. It’s difficult for them to submit their likes or comments in Tumbler here but I will use the ability of editing the blog and will put their comments here ..received in whatsapp ..(as direct copy of the chat .. authenticating … thanks !
1.1: [15/05 2:31 pm] Rajendraprasad Yashawant: It seems you want to say something on my blog posts but you are busy and don’t have time to go through steps on Tumbler. Just write your email and your opinion on any or all posts .. I will submit the same on the blog .. it’s essential to have responses on the blog for it to continue on Tumbler, मराठीत आपला अभिप्राय आणि घरातल्या कोणाचाही ईमेल पाठवा , मी तो टंबलर वरील माझ्या ब्लाॅगवर टाकतो : Dr R Y Shinde, Asso Prof Head Eng Vice Prin KVM Wai 15-5-17 1.pm [15/05 6:30 pm] Adv Home Mukund Wagh: My email is [email protected]
आपल्या ब्लाॅगवरील सर्वच लिखाण रोचक, उत्कंठावर्धक व मनोरंजक आहे. मराठीमधील उत्तम साहित्याचे सुबोध इंग्रजीत भाषांतर करण्याची आपली कल्पना तर फारच आवडली. आपल्या प्रयत्नांना मी मनापासून शुभेच्छा देतो व सुयश चिंतितो ! ——अॅडव्होकेट मुकुंद वाघ, सांगली.
1.2: Shriniwas Aasbe , Social Activist and thinker , Rajarampuri , Kolhapur greeted with a positive message and encouraged to keep on writing 2. My student (1989 Wai ) Pratibha Sutar nee Amita Bhagwat , Saraswati English Medium School Thane : [14/05 7:49 am] STE Pratibha Sutar-Bhagwat: Good morning!!,👍🏻 [14/05 10:51 pm] STE Pratibha Sutar-Bhagwat: Sir, read both your articles ..in Pt Gajananrao Joshi’s article you have referred Priyanka Chopra n Sonam Kapoor dancing on a lavani in Bajirao Mastsani..but it is Deepika Padukon with Priyanka Chopra..just wanted to bring it to your notice!!! Rest of d article is very informative!! About Peatonji ..what you mentioned is right by throwing d old writers in pro establishment category we are taking younger generation away from classic literature ..even in d school curriculum , to make d language application based they have excluded all d old writers n their classic literature…
3. My Ph D student Prof Babasaheb Kangune, Rajapur
[14/05 7:48 pm] Ph D Babasaheb Kangune: Good evening sir. I read your blog. [14/05 7:54 pm] Ph D Babasaheb Kangune: Really one should not categorize writers. One should go beyond artists class, caste, society to which he belonged. While appreciating any writer such third party evaluatuon should be there. [14/05 7:56 pm] Ph D Babasaheb Kangune: Sir you have really discussed the universal aspects of an artist which one should try to absorb while reading work of art. [14/05 7:59 pm] Ph D Babasaheb Kangune: A good reader should never say that this and this writer belong to backward classes or scheduled classes and he always writes about ‘Harijans’. Instead a good reader tries to find out universal values in such works. [14/05 8:00 pm] Ph D Babasaheb Kangune: Artists do not have boundaries of time, space and particular culture or society. [14/05 8:02 pm] Ph D Babasaheb Kangune: Sir you write such blogs having different subjects. It gives us new directions and insight.
4. My friend Avinash Medhekar, retired from IDBI , original Waikar ..
[15/05 3:56 pm] Chum Avinash Krishnaji Medhekar: Correct guessing you know my technical knowledge e mail [email protected] Opinion—-Good job done kindly keep it up. My best wishes.👌
5. 16-5-17 My student Swati asked about the lady in inset on this blog , I'm putting reply for the info of other inquisitive readers : [16/05 12:40 pm] STE Swati Banaras Pradip Kulkarni: Who is d lady with u in photo [16/05 1:58 pm] Rajendraprasad Yashawant: Vidushi Basavi Mukherjee , Professor and Head, Dept of Music , Ravindra Bharati University , Shantiniketan, Durgapur , Kolkata ... her photo was the cover page of my book ..CLOJ .. anthology of articles published in my international journal ... I met and gave her the copies of books ... she served food she made herself ... she is the only disciple of great Vidushi Prabha Atre ... she did her Ph D in music under her ... what did you think ?
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Ex-Uttarakhand chief minister Trivendra Singh Rawat Says Coronavirus Has Right To Live Like Rest Of Us
Ex-Uttarakhand chief minister Trivendra Singh Rawat Says Coronavirus Has Right To Live Like Rest Of Us
त्रिवेंद्र रावत कोरोनाव्हायरसवरील त्याच्या विलक्षण निरीक्षणाबद्दल सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. (फाइल फोटो) देहरादून: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत यांनी गुरुवारी सांगितले की कोरोनाव्हायरस हा जिवंत प्राणी आहे ज्याला जगण्याचा हक्क आहे. “तात्विक कोनातून पाहिलेले, कोरोनाव्हायरस देखील एक सजीव प्राणी आहे. आपल्या इतरांप्रमाणेच जगण्याचा त्याचा हक्क आहे. परंतु आपण (मानवांनी) स्वतःला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
skrafikhsir · 5 years
Photo
Tumblr media
🎓 *'करिअर कट्टा' लेखमाला भाग -1* *प्रिय विद्यार्थी मित्रांनो;* *विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर लेखन-संपादित* *विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन लेखमाला भाग-1 ..* _“The opportunity to explore and choose the right career path for you”_ *एसके कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांपासून विद्यार्थ्यांच्या अविरत सेवेत दिवसागणिक वेगवेगळे शैक्षणिक अभिनव प्रयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावत त्यांना आपल्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देत भावी आयुष्यातील असणा-या करीयरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून हा एक सुंदर संकल्प आपल्या यशाचा राजमार्ग तयार करण्याचा ठाम निर्धार-करिअर मार्गदर्शन लेखमाला आपल्या पुढील वाटचालीस एक ‘दीपस्तंभ’ ठरेल याची आम्ही खात्री बाळगतो.* *ज्ञान आत्मसात करता-करता यशाची नवनवीन उत्तुंग शिखरे ‘सर’ करण्याची जी विलक्षण जिद्द तुमच्यात दिसतंय त्या जिद्दीला मनापासून सलाम..!* *शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी पुढे कोण होणार.?* *असं प्रश्नचिन्ह तुमच्या मनात सतत उमटत असे ज्याला तुम्ही स्वतःच्या आवडी-निवडी ,छंद,कल,* *वातावरण,कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी, पालकांच्या किमान अपेक्षा आणि आपल्या क्षमता कौशल्यानुसार उत्तरे देत असता,पण काही उत्तरे आपलं पूर्ण समाधान करतात का?* *किंबहुना विश��वासवार्ह असतात ?* *मित्रांनो , हे माहिती-तंत्रज्ञानाच आधुनिक सुसज्ज युग आहे. माहितीची विस्तीर्णता आणि तंत्रज्ञानाची सखोलता हे आजची वास्तविकता, त्यामुळे अशा युगात शिकणा-याकडे अधिकाधिक गोष्टी आणि कौशल्य असावेत. अशावेळी अनेक मार्गदर्शकाचं सहकार्य आणि हातभार लागतो.* *आम्ही हाच प्रयत्न मोफत करिअर मार्गदर्शन लेखमाला आणि मेळाव्यातून करणार आहोत.* *एखादे करिअर कसे निवडावे ?* *आपल्या क्षमता आणि कल कसा ओळखावा ? करिअरचे स्वरूप कसे ?* *इच्छित करिअर साठी लागणारी शैक्षणिक पात्रता , व्यक्तिमत्व,शिक्षण आणि वेळ-अनुकूलता ई.सर्व गोष्टी या करीअरच्या विशाल सागरातून मार्गदर्शनाचे मोती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आणि संकल्प आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण व्हावं अशी किमान अपेक्षा ठेवतो.* 🎓 *करिअर म्हणजे काय..?* 🎓 *करिअर चे महत्व काय..?* 🎓 *करिअर कसे निवडावं..?* 🎓 *आपण करिअर निवडतांना काय विचार करतो..?* 🎓 *करिअर बाबत स्वतःला व इतरांना काय विचारावे.?* 🎓 *स्वतःला कसे ओळखावे.?* 🎓 *करिअर कसं घडवावं..?* 🎓 *शिक्षण कसे घ्यावे..?* 🎓 *अभ्यास होत नाही..?* 🎓 *आयुष्या (at SK Coaching Classes Parbhani) https://www.instagram.com/p/B6pwreuHbOS/?igshid=uuea9jrxm3yg
0 notes