गरिबी असल्याने शिक्षण घेता आले नाही, आता शेती व्यवसायातून कमवतोय 8 लाख
गरिबी असल्याने शिक्षण घेता आले नाही, आता शेती व्यवसायातून वर्षाकाठी कमवतोय 8 लाख
Successful Farmer : शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवण्यासाठी शेती व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना असणे आता अत्यावश्यक बनले आहे. शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे.
मित्रांनो जर शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा यशस्वी…
View On WordPress
0 notes
सकस अन्न, संपन्न शेतकरी | डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन
रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा अतिवापर, त्यामुळे बिघडलेला जमिनीचा पोत, मानवी आरोग्य तसेच परिसृष्टिचे बिघडत चाललेले संतुलन यामुळे सेंद्रिय शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टीने नैसर्गिक शेती अतिशय महत्वाची ठरते. बदलत्या परिस्थितीत शेतीसाठी लागणारा मशागत, आंतरमशागत, काढणी इ. सर्व टप्प्यांवर यांत्रिकीकरण वाढले असून खर्चात वाढ झाली आहे. (जैविक शेती मिशन)
शेतीवरील भांडवली खर्च कमी करून…
View On WordPress
0 notes
गांजाची शेती प्रकरणात ' त्या ' शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती प्रकरणात ‘ त्या ‘ शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती केल्याप्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शेतकऱ्याला दिलासा दिलेला असून आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य ठरवलेला आहे. गांजाची झाडे आणि त्याच्या पानांच्या आधारे तो गांजा आहे असा दावा करून अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असे देखील न्यायालयाने सांगत पन्नास हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर आरोपीची…
View On WordPress
0 notes
गांजाची शेती प्रकरणात ' त्या ' शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती प्रकरणात ‘ त्या ‘ शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती केल्याप्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शेतकऱ्याला दिलासा दिलेला असून आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य ठरवलेला आहे. गांजाची झाडे आणि त्याच्या पानांच्या आधारे तो गांजा आहे असा दावा करून अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असे देखील न्यायालयाने सांगत पन्नास हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर आरोपीची…
View On WordPress
0 notes
गांजाची शेती प्रकरणात ' त्या ' शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती प्रकरणात ‘ त्या ‘ शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती केल्याप्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शेतकऱ्याला दिलासा दिलेला असून आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य ठरवलेला आहे. गांजाची झाडे आणि त्याच्या पानांच्या आधारे तो गांजा आहे असा दावा करून अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असे देखील न्यायालयाने सांगत पन्नास हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर आरोपीची…
View On WordPress
0 notes
गांजाची शेती प्रकरणात ' त्या ' शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती प्रकरणात ‘ त्या ‘ शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती केल्याप्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शेतकऱ्याला दिलासा दिलेला असून आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य ठरवलेला आहे. गांजाची झाडे आणि त्याच्या पानांच्या आधारे तो गांजा आहे असा दावा करून अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असे देखील न्यायालयाने सांगत पन्नास हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर आरोपीची…
View On WordPress
0 notes
गांजाची शेती प्रकरणात ' त्या ' शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती प्रकरणात ‘ त्या ‘ शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती केल्याप्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शेतकऱ्याला दिलासा दिलेला असून आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य ठरवलेला आहे. गांजाची झाडे आणि त्याच्या पानांच्या आधारे तो गांजा आहे असा दावा करून अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असे देखील न्यायालयाने सांगत पन्नास हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर आरोपीची…
View On WordPress
0 notes
गांजाची शेती प्रकरणात ' त्या ' शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती प्रकरणात ‘ त्या ‘ शेतकऱ्याला जामीन , युक्तिवाद मात्र सडेतोड
गांजाची शेती केल्याप्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शेतकऱ्याला दिलासा दिलेला असून आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य ठरवलेला आहे. गांजाची झाडे आणि त्याच्या पानांच्या आधारे तो गांजा आहे असा दावा करून अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असे देखील न्यायालयाने सांगत पन्नास हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर आरोपीची…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार - केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांची माहिती
वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्तारोको आंदोलन, बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद
आणि
चेन्नई कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड, विजयासाठी सहा बळींची आवश्यकता
****
सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद-२०२४ या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातली ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले...
आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज् आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये
****
‘आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
परभणीतही जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, एक पेड माँ के नाम, एकल वापर प्लास्टिक बंदी, कंपोस्ट खत निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वच्छतेची जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
देशातली लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार असल्याचं, केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितलं आहे. पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा आणि प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत असून, याचा लाभ घेण्याचं आवाहन सत्तार यांनी यावेळी केलं.
****
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातले उमेदवार त्यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २६ सप्टेंबर रोजीचा नियोजित वाशिम जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून, ते आता पाच ऑक्टोबर रोजी या दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नंगारा संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेतला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत येतआहोत
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आं��ोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी पुकारलेल्या बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला काल सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तर लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे.
****
दरम्यान, जालना जिल्ह्यात वडीगोद्री फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचंही उपोषण सुरू असून, पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा हा रस्ता बंद केला आहे. तो रस्ता सुरू करावा, अशी मागणी करत वडीगोद्री इथं काल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रत्युत्तर देतांना घोषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळाची भेट घेत दोन्ही समाजांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं. त्यांनी वडीगोद्री - आंतरवाली सराटी - नालेवाडी -चंदनापुरी या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचे आदेश जारी केले.
****
बीड जिल्ह्याने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा 'स्कॉच २०२४ राष्ट्रीय पुरस्कार' बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना काल प्रदान करण्यात आला. मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पावलं उचलण्यात आली, त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं.
****
भारत आणि बांग्लादेश दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या कालच्या तिसर्या दिवशी, शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्या��ंशी धावांवर घोषीत ��ेला. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं दिवसभर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या. रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक गडी बाद केला. बांगलादेशला विजयासाठी अजून ३५७ धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी सहा बळींची आवश्यकता आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा दिवंगत भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार काल प्रख्यात नाट्य कलावंत आणि नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे, यशवंतराव चव्हाण समितीचे सचिव दगडू दगडू लोमटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
हवामान
नांदेड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या भाटशिरपूरा इथं वीज कोसळून अजय गायकवाड हा तरुण ठार झाला. सोयाबीनची गंज लावत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असून सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येत्या २४ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं काल भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं.
****
0 notes
वार्षिक क्षेत्रीय कार्यशाळेत कृषि विज्ञान केंद्र सगरोळीच्या उत्तम सादरीकरणाचे कौतुक...
नांदेड जिल्हातील आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान पोहचवण्यासोबतच ग्रामीण भागातील सर्व घटकांच्या उत्पन्न वाढीसाठी कायम प्रयत्न करणाऱ्या संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ला नुकतेच बारा वर्ष पूर्ण झाले आहेत. अल्पावधीतच शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यात, त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यात कृषि विज्ञान केंद्राने घेतलेली आघाडी वाखाणण्याजोगी आहे. आज हे सांगतांना अतिशय आनंद होत आहे की, संस्थेच्या कृषि विज्ञान केंद्र नांदेड-II (सगरोळी) ला ATARI झोन VIII द्वारे दिनांक ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान आयोजित वार्षिक क्षेत्रीय कार्यशाळेत कृषि विद्यापीठ जुनागढ (JAU), गुजरात येथे सत्र I, गट III साठी सर्वोत्तम सादरीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले. या कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यातील एकूण ८२ कृषि विज्ञान केंद्राचे सादरीकरण झाले. तसेच या कार्यशाळेत रॅपोर्टर म्हणून काम केल्याबद्दल कृषि विज्ञान केंद्र नांदेड –II (सगरोळी) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांचे ICAR डी डी जी कृषि विस्तार डॉ यु एस गौतम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. या कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात डॉ एस के रॉय, निदेशक अटारी पुणे, डॉ के डी कोकाटे, डॉ एन डी जादव, संचालक विस्तार शिक्षण जुनागढ कृषि विद्यापीठ, गुजरात, डॉ आर सी अग्रवाल डी डी जी कृषि विस्तार इत्यादी उपस्थित होते. #ICAR#कृषी#Agriculture#farming
0 notes
महाराष्ट्र राज्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेले पुणे-सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण संपूर्ण भरले आणि आम्ही सर्व शेतकरी निश्चिंत झालो.
दरवर्षी शंभर टक्के भरणारे धरण उन्हाळ्यामध्ये मात्र तळाला जाते आणि शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहतात. उन्हाळ्यामुळे अगोदरच विजेचा लपंडाव सुरू असतो आणि त्यातच धरणातील पाणी पातळी खूप खाली जाते. नदीवरून पाईपलाईन करून शेती करणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था अतिशय भयावह अशी होते. दोन वेळचे जेवण सुद्धा नीट मिळत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुखी असणाऱ्या शेतकऱ्याला मोटारी नदीपात्रात नेण्यासाठी वाढीव खर्च करून सुद्धा पीक वाचेल याची खात्री नसते. या मोटारी खाली नेत असताना अक्षरशः गाळामध्ये जीव धोक्यात घालून उतरावे लागते. उन्हामुळे त्रासलेले सरपटणारे जीव याच वेळेस नदीकाठी आसरा घेतात आणि चुकून धक्का लागला शेतकऱ्यांच्या जीवावर उठतात. विजेचा धक्का लागून अपघात होण्याचे प्रमाणही याच काळात जास्त असते. पोटच्या पोराप्रमाणे जपलेले पीक समोर दिसत असल्यामुळे शेतकरीही जीव धोक्यात घालून पिकाचा सांभाळ करतात. पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील धरणामध्ये अतिरिक्त झालेले पाणी अचानक खाली सोडल्यामुळे मोटारी सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांची अशीच तारांबळ होत असते.
दरवर्षी भरलेले धरण असे रिते होताना उघड्या डोळ्यांनी आम्हाला पहावे लागते. मान्य आहे की या धरणावरती सर्वांचा हक्क आहे पण ज्यांनी स्वतःच्या काळ्याभोर जमिनी ,घरे दारे या धरणामध्ये अर्पण केली त्यांचे काय? या पाण्याचे योग्य नियोजन होणार आहे की नाही? पिण्यासाठीच पाणीसाठा राखून ठेवून इतर पाण्याचे योग्य व्यवस्थापन काटेकोरपणे जर केले तर उजनी धरण वर्षभर पाण्याने भरलेले असेल. धरण्याची पाणी साठवण क्षमता गाळामुळे कमी होत असतानाच पाणी पळवण्याचे प्रमाण मात्र वाढतच आहे. यासाठीच कृष्ण भीमा स्थिरीकरण जर लवकर झाले तर याचा फायदा पश्चिम महाराष्ट्र बरोबरच मराठवाड्याला सुद्धा होऊ शकेल. यामुळेच उजनी धरणाचे पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने होणे गरजेचे आहे.
1 note
·
View note