Tumgik
tuljabhavani · 2 years
Text
Best Hotel Near Tuljabhavani Temple | Ambai Executive Lodge
Summary:
Ambai Hotel is a well-known hotel located near Tuljapur in Maharashtra. In this blog, we will explore the various features of the hotel, its location, and why it's a popular choice for travelers visiting Tuljapur.
Discover the Comforts of Ambai Hotel near Tuljapur
Introduction to Ambai Hotel
Ambai Hotel is a renowned hotel located in the town of Ambai, just a few kilometers away from the famous Tuljapur temple in Maharashtra. The hotel is known for its exceptional hospitality, world-class amenities, and comfortable rooms.
Location of Ambai Hotel
Ambai Hotel is situated in a prime location, just a few kilometers from the famous Tuljapur temple. This makes it a popular choice for travelers visiting Tuljapur. Additionally, the hotel is located near many other popular tourist destinations in the region, making it an ideal base for exploring the area.
Features of Ambai Hotel
Ambai Hotel boasts a range of features and amenities that make it a popular choice for travelers. The hotel has comfortable rooms that are equipped with all the necessary amenities, including air conditioning, Wi-Fi, and a flat-screen TV. The hotel also has a restaurant that serves delicious and authentic Maharashtrian cuisine.
Why Choose Ambai Hotel near Tuljapur
There are many reasons why Ambai Hotel is a popular choice for travelers visiting Tuljapur. Firstly, the hotel's location is ideal for visiting the famous Tuljapur temple, as well as other popular tourist destinations in the region.
Secondly, the hotel's exceptional hospitality and world-class amenities ensure that guests have a comfortable and enjoyable stay. 
Conclusion:
Ambai Hotel is a popular choice for travelers visiting Tuljapur. The hotel's exceptional hospitality, world-class amenities, and comfortable rooms ensure that guests have a memorable and enjoyable stay. Additionally, the hotel's location is ideal for visiting the famous Tuljapur temple and other popular tourist destinations in the region. Whether you're a leisure or business traveler, Ambai Hotel is the perfect base for exploring Tuljapur and the surrounding area.
0 notes
tuljabhavani · 2 years
Text
Nidra Kal भवानीमातेचा निद्राकाळ
Nidra Kal भवानीमातेचा निद्राकाळ
तुळजाभवानीमातेचा वर्षातून तीनदा म्हणजेच 21 दिवस निद्राकाळ असतो. याकाळात तुळजाभवानी माता नीद्राकाळात जाते असे मानून तिची मूर्ती तिच्या स्थानावरून हलवून पलंगावर नउ दिवस झोपलेल्या अवस्थेत असते. या दिवसांसाठी खास पलंगही तयार केला जातो. तसेच याकाळत करायचे पूजावीधीही वेगळया प्रकारचे असतात. या काळात मूर्तीवर पंचामृत अभिषेक केला जात नाही. याकाळात मूर्तीला तेल आणि अत्तराने मालिश केली जाते. जणू तिचा थकवा दूर करण्याचा हा एक प्रयास असतो. त्यानंतर देवीला महावस्त्र, साडी व पांघरूण घातले जाते. देवी निद्रा अवस्थेत असताना तिला फक्त नथ आणि डोळे इतकेच अलंकार घातले जातात. नंतर देवीचा मळवट भरून फुलांचा मुकुट चढवला जातो व पुष्पअलंकार घातले जातात. त्या नंतर देवीला नैवैद्य दाखवून धूपार्ती केली जाते.
महिषासूरा बरोबर झालेले युद्ध हे नउ दिवसांचे होते. नउ दिवसाच्या युद्धाची सांगता ही मातेच्या विजयाने झाली आणि मातेने महिषासूराचा वध केला. पण जणू या नउ दिवसांच्या घोर अशा युद्धामुळे माता तुळजाभवानी अत्यंतिक थकली होती. या दिवसांचे प्रतिक म्हणून हे नवरात्र म्हणजेच नउ दिवसांची पूजाविधी करण्यात येते. या दिवसांत भक्त तुळजाभवानीच्या झोपलेल्या अवस्थेतल्या मूर्तीचे दर्शन घेउ शकतात.
अशात-हेेच शारदिय नवरात्र आणि शाकंबरीदेवी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. याकाळात तंत्रमंत्र साधना करणा-या तांत्रिकांसाठी सिद्धी प्राप्त करण्यासाठी चांगला काळ समजला जातो.
भाद्रपद कृष्ण अष्टमी ते अमावास्येपर्यं असेच अश्विन शुद्ध दशमी ते अमावास्ेयपर्यंत आणि पौष प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत हा निद्राकाळ असतो. आणि याच काळात नवरात्री उत्सव श्रद्धाभावाने साजरा होतो.
अशा या जगतस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेला माझे सांष्टांग नमन असो.
Tuljabhavani Live Darshan
Online Pooja Seva, Hotel Booking, Daily Pooja Vidhis, Darshan Program, About Mandir, How to reach, Photo Gallery, Contact, Blog
0 notes
tuljabhavani · 3 years
Text
“Shakambari Navratri Mahatva शाकंबरी देवीचे महत्व”
“Shakambari Navratri Mahatva शाकंबरी देवीचे महत्व मित्रहो, श्री जगन्माता तुळजाभवानीचा महिमा वर्णन करायला शब्दही अपूरे आहेत. भवानीमातेचेच एक रूप असलेली शाकंबरी देवी ही वनस्पती, फळ, फुले, भाज्या यांची देवता आहे असे म्हणले तर वावगे होणार नाही. पौराणीक कथांमधुन शाकंबरी माते बद्यलचा उल्लेख आढळतो. तुळजापूर येथे शांकंबरीदेवीचे नौरात्र अतीशय भक्तिभवाने आणि उत्साहात साजरे केले जाते. नवरात्रीच्या या दिवसांत नित्य पौराणिक असे धार्मिक विधी केले जातात. तसेच याकाळात देवी निद्राअवस्थेत असते असे समजले जाते. यादिवसात माता अन्नपूर्णेची उपासना केली जाते. पौराणिक काळात दानवांच्या उपद्रवाने पडलेल्या दुष्काळामुळे जनतेचे अतोनात हाल झाले होते. परंतु माता भवानी जेव्हा जागृत झाली तेव्हा तिने हे विदारक दृष्य पाहिले आणि तिला अतिशय दुःख झाले. तेव्हा मातेच्या डोळयातून अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंच्या द्रवण्याने दुष्काळ शमला गेला. अशा त-हेने नउ दिवस अश्रू द्रवत राहिले आणि जगभरात परत वनस्पती, भाज्या आणि फळे यांची पैदास झाली. अशा त-हेने भवानीमातेचे शाकंबरी हे नाव जगविख्यात झाले. तिला असलेल्या 1000 डोळयातून अश्रू द्रवले म्हणुनच तिला शताक्षी असेही संबोधण्यात येते. याकाळात तंत्र-मंत्र साधना करण्या-या तांत्रिक साधकांनासाठी याकाळाचे अनन्यसाधारण महत्व समजले जाते. सिद्धी प्राप्त करण्यासाठी तात्रिक या दिवसात धार्मिक विधी संपन्न करून साधना करतात. शाकंबरी मातेचा नवरात्रकाळ हा तुळजापूर मंदिरात अतिषय श्रद्धेने आणि पारंपारीक पूजाविधी करून संपन्न केला जातो. याकाळात नउ दिवस नेहमीपेक्षा वेगळा पूजा विधी असतो. याकाळात नेहमीप्रमाणे पंचांमृताने देवीचा अभिषेक केला जात नाही. हा काळ देवीचा निद्राकाळ समजला जातो. अशा या शाकंबरी मातेसमोर समस्त विश्व नतमस्तक आहे.” Tuljabhavani Live Darshan
Online Pooja Seva, Hotel Booking, Daily Pooja Vidhis, Darshan Program, About Mandir, How to reach, Photo Gallery, Contact, Blog
0 notes
tuljabhavani · 3 years
Text
श्री तुळजाभवानी माता मंदिर शिखर आणि कळस
श्री तुळजाभवानी माता मंदिर शिखर आणि कळस तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे मंदिर हे हेमाडपंथी शैलित तयार केलेले दिसते आणि मातेच्या मंदिराचे शिखर हे अत्यंत कलाकुसरीने बनवलेले आहे तुळजापूरच्या मंदिराचे हे शिखर अत्यंत नयनमनोहर असून त्यावर देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. अगदी दूरूनसुद्धा हे शिखर आपले लक्ष वेधून घेते. जसे हे मंदिर अति पूरातन आहे तसेच या मंदिराच्या बाबत अनेक रोचक कथाही आपल्याला ऐकायला मिळतात. या मंदिर वास्तूत अनेक शतके अनेक घटना घटत आल्या आहेत ज्यामुळे मातेवरची भक्तांची श्रद्धा अधिकच दृढ होत जाते. या शिखर आणि कळसाच्या बांधकामाबाबत अशीच एक रोचक कथा प्रसिद्ध आहे . बीड चे एक भक्त रंगोबा नाईक ठिगळे यांनी त्यांच्या परिवाराच्या समृद्धी आणि सुरक्षितते साठी आई तुळजाभवानी कडे साकडे घातले होते. त्यांची वंश वेल वाढण्यासाठी आणि समस्त परिवाराला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी तुळजाआई कडे नवस केला होता. जर नवस पूर्ण झाला तर तूझे शिखर वाढवीन आणि कळस चढवीन असे तुळजाआईला वचन दिले होते. त्यांचा नवस पूर्ण झाला आणि आई भवानी त्यांच्या नवसास पावली. आईच्या आर्शिवादाने त्यांची वंश वेल वाढली आणि समस्त परिवाराला सौख्य आणि आरोग्य प्राप्त झाले. मग नवस फेडण्यासाठी रंगोबा ठिगळे यांनी देवीच्या मंदिराच्या शिखराचे बांधकाम पूर्ण केले. आणि त्यावर 27 शेर सोन्याचा कळस चढवला. आजुनही रंगोबा नाईक ठिगळे यांचे वंशज तुळजा भवानीची उपासना करतात.
Tuljabhavani Live Darshan
1 note · View note