Don't wanna be here? Send us removal request.
Text
परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार - श्री.ना.पेंडसे
परिस्थितीला नायकत्व देणारा कादंबरीकार – श्री.ना.पेंडसे
नितीन साळुंखे..
दापोलीला जायचं ठरलं तेंव्हा तिकडून कदम वकिलांचा फोन आला. म्हणाले, गारंबीचा बापू आता पुन्हा वाचा, आणि शिवाय येताना ते पुस्तक घेऊनच या. म्हणजे ��खादा संदर्भ पाहावा वाटला तर पुस्तक हाताशी असावं, यासाठी.
दापोलीला गेल्यावर प्रमुख आणि एकमेव कार्यक्रम गारंबीचा बापू मध्ये उल्लेख असलेले प्रत्येक स्थळ पाहणे, हाच. मग जाताना रस्त्यापलीकडे माडांच्या, नारळांच्या झावळ्या दिसायला लागल्या,…
View On WordPress
0 notes
Text
गांधी मला भेटला.-अक्षय शिंपी
गांधी मला भेटला.-अक्षय शिंपी
गांधी मला आरेच्या जंगलात रात्री कापून काढलेल्या झाडांच्या खोडांवर मायेने हात फिरवत बसलेला दिसला. मला पाहून मास्क नाकातोंडावर ओढत म्हणाला- “कितीही आणि कशानंही झाका, सत्य उघडं पडतंच! व्हायरसचं सत्य वेगळं असेल पण सत्याला व्हायरस ग्रासू शकत नाही. कधीही.”
गांधी मला अर्णब गोस्वामीच्या कर्कश्श आरडाओरडीत भेटला. हातातल्या स्मार्टफोनवर शांतपणे ‘India wants to know’ ऐकत, लेज वेफर्सचा बाईट घेत मधूनच गालातल्या…
View On WordPress
0 notes
Text
गांधींचा पुतळा(दहा कथा)
असगर वजाहत
१ तो गांधींचा पुतळा आहे , हा गांधी खरा गांधी नाही असं समजूनच गांधींच्या पुतळ्याला गोळी घातली जात होती , पण प्रत्यक्षात गोळी गांधींना लागली. पुतळ्यातून गांधी पुढे आले . गोळ्या घालणाऱ्यांना आनंद झाला . म्हणाले – ‘हे तर छानच झालं , खऱ्या गांधींला गोळ्या लागल्या . पण पुढच्या वर्षी आम्ही पुतळ्याला गोळ्या घालू तेव्हा पुतळ्यातून गांधी कसा बाहेर पडणार ? ‘
’ तुम्ही काळजी करू नका , दर वर्षी…
View On WordPress
0 notes
Text
मार्क्सवादी चिंतक, समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य – नरेंद्र देव !
मार्क्सवादी चिंतक, समाजवादी नेता आणि बौद्ध आचार्य – नरेंद्र देव !
व्यक्ती,विचार आणि विश्व
देवकुमार अहिरे ..
वासाहतिक काळामध्ये एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ चालू होती तर दुसरीकडे आधुनिक भारताची वैचारिक जडणघडण आणि बांधणी चालू होती. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या विचारांची मंडळी काँग्रेसच्या छत्राखाली जशी एकत्र होती तशीच काँग्रेसच्या वर्तुळाबाहेरही कार्यरत होती. वेगवेगळ्या कल्पना आणि अनेक प्रकारची स्वप्ने घेऊन आधुनिक भारताच्या निर्मितीचा…
View On WordPress
0 notes
Text
‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं !
‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं !
सुभाष गाताडे
विचारस्वातंत्र्य फक्त आस्तिकांपुरत लागू असत काय ? कधी कधी साधारण प्रश्नांच उत्तर मिळण्याकरता पण कोर्टाची पायरी चढावी लागते. मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला/डिवीजन बेंच ला- न्यायमूर्ती एस मनिकुमार आणि सुब्रहमण्यम प्रसाद यांनी – काही दिवसांपूर्वी हे सांगाव लागल कि विचारस्वातंत्रयाचा अधिकार – जो भारताच्या संविधानाने प्रत्येकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये सामिल आहे – ही बाब…
View On WordPress
#आस्तिक#धर्मनिरपेक्षता#नरेंद्र दाभोळकर#नास्तिक#न्यायालयीन निर्णय#पेरियार रा��ास्वामी#भारतीय संविधान#भारतीय समाज#विवेकवाद#सुभाष गाताडे
0 notes
Text
जातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने
जातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने
दीपक कसाळे दयानंद कनकदंडे
लोकसभा निवडणुकीच्या काळात निर्माण झालेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने धनगर, वडार, कुणबी, कोळी, भिल्ल, आगरी इत्यादी समाजातील नेत्यांना लोकसभेच्या उमेदवाऱ्या दिल्या. वंबआ ने उमेदवाऱ्या जाहीर करताना त्यांच्या जातीही जाहीर केल्या. जाती जाहीर करण्याच्या कृतीचे बरेवाईट प्रतिसाद लोकांमध्ये उमटले. वंचित बहुजन आघाडीने लोकसभेप्रमाणेच…
View On WordPress
#आरक्षण#जातवास्तव#जातीनिहाय उमेदवारी#जातीनिहाय जनगणना#जातीवाद#दयानंद कनकदंडे#दीपक कसाळे#प्रकाश आंबेडकर#वंचित बहुजन आघाडी
0 notes
Text
कश्मीर - राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क!
कश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क!
तुषार उज्वला अविनाश पठाडे
स्वातंत्र्य ही मानवाची उपजत प्रेरणा आहे. एखाद्या व्यक्तीचे किंवा समूहाचे स्वातंत्र्य तुम्ही मर्यादित काळापर्यंत दमन करू शकता पण एकदा का अवकाश मिळाला की दबलेला व्यक्ती आणि समूह बंधनं झुगारून देऊन विद्रोह करायला लागतात. परकीय सत्तेकडून अधिकार स्वकियांकडे येणे एवढा मर्यादित अर्थ स्वातंत्र्यात अभिप्रेत नाही तर स्वकीय सार्वभौम सत्ता असतांनाही काही मूलभूत अधिकार असणं…
View On WordPress
0 notes
Text
शांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.
शांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.

डॉ. दीपक बोरगावे
गांधी हा विषय आज खूप महत्त्वाचा झाला आहे/झाला पाहिजे. यावर सतत काही चिंतन सुरू राहिले पाहिजे; असा आग्रह धरायला हवा, गांधीच आपले प्रश्न सोडवू शकतील, गांधींना आपण कालबाह्य करू शकत नाही, गांधी हाच भारतीयांचा खरा आवाज आहे, असा एक प्रवाह कार्यरत दिसतो आहे. असे काहीसे आजचे चित्र आहे.
गेल्या सत्तर वर्षात जगभरचा गांधी-साहित्याचा आवाका आणि गांधी या घटीताचा प्रभाव पाहिला तर, एकाच…
View On WordPress
#असंतोष#अहिंसा#गांधी १५०#डॉ.दीपक बोरगावे#महात्मा गांधी#महायुद्ध#रावसाहेब कसबे#वॉर&पीस#शांती#सत्याग्रह#हिंसा#२०१९
0 notes
Text
आणि कदाचित भविष्यातल्या पिढीला गांधी कोण होता असा प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही.
आणि कदाचित भविष्यातल्या पिढीला गांधी कोण होता असा प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही.

अनिकेत लखपती
गांधी …….
आज तुला एक मित्र म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण आदरयुक्त आपुलकीनं ज्या गोष्टी सहज लपवल्या जातात त्या मित्रत्वाच्या नात्यानं लपविल्या जात, नाही. आणि कोणतीही शंका मनात राहू न देता बोलण्याचीच माझी आज इच्छा आहे. लहानपणीपासूनच तुला राष्ट्रपिता म्हणत असलो तरीही तुला देवत्व बहाल करून मंदिराच्या गाभाऱ्यात बसवत त्याला केवळ स्वतःच्या सोयीसाठी प्रदक्षिणा मारण्याचं कर्मकांड…
View On WordPress
0 notes
Text
कलम ३७० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कलम ३७० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
‘कलम ३७० आणि डॉ. आंबेडकर’ या नावाखाली काही मेसेज वजा छोटेखानी लेख व्हाट्सएप इत्यादी माध्यमातून फिरविले जात आहेत. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला ते लेख इतिहासाची मोडतोड करणारे वाटतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा आणि लिखाणाचा बऱ्याचवेळा लोकांमध्ये गैरसमज निर्माण व्हावेत अशा पध्दतीने वापर केला जातो. असे अनेक मुद्दे आहेत त्यावर कधीतरी क्रमाक्रमाने चर्चा करता येईल.
काल…
View On WordPress
0 notes
Text
आत्महत्याग्रस्त समाज आणि आपण
आत्महत्याग्रस्त समाज आणि आपण
शेतकरी आत्महत्या होत असतांना आता कार्पोरेट क्षेत्रातील उद्योजक देखील आत्महत्या करायला लागले सुप्रसिद्ध कॅफे कॉफी डे CCD चे प्रवर्तक व्ही जी सिद्धार्थ यांनी केलेल्या आत्महत्येमुळे आत्महत्या हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. या आत्महत्येची माध्यमातून चर्चा सुरु आहे. संबंधित तपास यंत्रणा आपला तपास करतीलच प्रत्येक आत्महत्येनंतर ती तांत्रिक बाब सुरु होते.आत्महत्या कुणाची का असेना ती दुखद घटना असते.…
View On WordPress
0 notes
Text
रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देताना पुरस्कार समिती म्हणते...
रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देताना पुरस्कार समिती म्हणते…
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात गेल्या काही वर्षात स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचा अवकाश आक्रसत असल्याचे आपल्याला दिसत आहे.नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावाने बदलत चाललेले माध्यमांचे स्वरुप, माहिती आणि मते यांचे वाढते बाजारीकरण,सरकारची वाढती बंधने आणि सर्वात चिंताजनक म्हणजे लोकसंमत एकाधिकारशाही तसेच धार्मिक,वांशिक,आणि मूलतत्त्ववादी राष्ट्रवाद यामुळे विभाजनवाद,असहिष्णुता आणि हिंसा…
View On WordPress
0 notes
Text
रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार
रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार
पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद केल्याचा गौरव म्हणून एनडीटीव्ही वृत्तवाहिनी मध्ये कार्यरत जेष्ठ पत्रकार रविश कुमार यांना २०१९ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
रविश कुमार याना हा पुरस्कार त्यांच्या धाडसी आणि बेधडक पत्रकारितेकरिता दिला जात असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रविश कुमार हा पुरस्कार प्राप्त करणारे ११ वे भारतीय व्यक्ती आहे��. या वर्षी हा पुरस्कार एकूण पाच…
View On WordPress
0 notes
Text
लोकशाहीर अण्णा भाऊ : एक क्रांतिकारी झंझावात
लोकशाहीर अण्णा भाऊ : एक क्रांतिकारी झंझावात
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाने लोकमत जागे करण्याचे काम केले. त्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष १ ऑगस्ट पासून सुरू होत आहे. उपेक्षित साहित्यिक, लेखक, कलावंत, गायक या सगळ्या भूमिकांमध्ये अण्णाभाऊंनी जनतेची मने जिंकली. सरकारी मात्र यांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही आणि आजही घेतली जात नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
लोकशाहीर…
View On WordPress
#अण्णाभाऊ साठे#कामगार#क्रांती#जात्यंत#डॉ.बाबासाहेब आंबेडकर#भारतीय कम्युनिस्ट पक्ष#लोकशाहीर#शेतकरी आंदोलन
0 notes
Text
रामचंद्र गुहा,अदूर गोपाळकृष्णन सहित ४९ बुद्धीजीवींची मोदींना पत्र लिहून मॉब लिंचीगच्या घटना रोखण्याची मागणी
रामचंद्र गुहा,अदूर गोपाळकृष्णन सहित ४९ बुद्धीजीवींची मोदींना पत्र लिहून मॉब लिंचीगच्या घटना रोखण्याची मागणी
देशभरात जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या (Mob Lynching) च्या घटनांमध्ये वाढ झाली असून हा मुद्दा युनो च्या चर्चेतही पोचला आहे. नाटककार, दिग्दर्शक एस.रघुनंदन यांनी नुकताच ईश्वराच्या नावावर होत असलेल्या मॉब लिंचीग व��षयी चिंता व्यक्त पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. भारताकडून संविधानातील तरतुदींप्रमाणे काम करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रामध्ये मॉब लिंच च्या संदर्भातील चर्चेत पुढे आली. त्यानंतर…
View On WordPress
0 notes
Text
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ला पालघर जिल्ह्यात विरोध सुरूच.. वाळवे येथे उधळला सर्व्हे
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ला पालघर जिल्ह्यात विरोध सुरूच.. वाळवे येथे उधळला सर्व्हे
महाराष्ट्र आणि गुजरातच्या राजधानी शहराला जोडणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पास पालघर जिल्ह्यातील नागरिकांचा विरोध कायम असून पडघे येथील सर्वे ग्रामस्थांनी उधळला.
काही दिवसांपूर्वीच जामशेत(डहाणू) विराथन (सफाळे) ,वाळवे (पालघर) येथे प्रशासनाने सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास आंदोलक ग्रामस्थांनी हानून पाडल्यानंतरही सोमवारी (दि.२२ जुलै) रोजी पडघे येथे सर्व्हे करण्याचा प्रयत्न…
View On WordPress
0 notes
Text
वचन साहित्य हि अशी काव्यात्मक अभिव्यक्ती आहे जी जात आणि लिंगभावाची समीक्षा करते -किशोर मोरे
वचन साहित्य हि अशी काव्यात्मक अभिव्यक्ती आहे जी जात आणि लिंगभावाची समीक्षा करते -किशोर मोरे
युरोपियन इतिहासात मध्ययुगीन कालखंड ‘अंधारयुग’ म्हणून गणला गेला व अशीच ��क्यता सर्वत्र असण्याची समज तयार झाली परंतु आशियातील सामाजिक आणि धार्मिक संरचनेमध्ये वेगवेगळे प्रयोग, बंड, वैचारिक घुसळण, जातीविरोधी समतेचा विचार प्रबोधनपूर्व काळातच आपल्याकडे झालेला दिसतो. आपल्याकडील इसवीसनापूर्वी पासून वेगवेगळ्या विचारधारा, धर्ममतं तेव्हाच्या वर्चस्वशाली असलेल्या वैदिक संस्कृती आणि त्यावर आधारीत सामाजिक…
View On WordPress
0 notes