WhatsApp डेस्कटॉपवर आले कमालीचे फीचर, आता कॉन्टॅक्टच्या नावाने सर्च करता येणार ग्रुप
WhatsApp डेस्कटॉपवर आले कमालीचे फीचर, आता कॉन्टॅक्टच्या नावाने सर्च करता येणार ग्रुप
WhatsApp डेस्कटॉपवर आले कमालीचे फीचर, आता कॉन्टॅक्टच्या नावाने सर्च करता येणार ग्रुप
Whatsapp groups search : तुम्ही जर रोज डेस्कटॉपचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. WhatsApp यूजर्सला आता डेस्कटॉपवर एक कमालीचे फीचर मिळणार आहे. कॉन्टॅक्टच्या नावाने ग्रुप सर्च करता येणार आहे.
Whatsapp groups search : तुम्ही जर रोज डेस्कटॉपचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.…
View On WordPress
0 notes
Gyan Ganga Marathi | Audio Book | Topic - 042 | Sant Rampal Ji Marathi S...
अवश्य ऐका ऑडियो बुक - ज्ञान गंगा मराठी विषय:- "त्रेता युगामध्ये कविर्देव (कबीर साहेब) यांचे मुनीन्द्र नावाने प्रकटन" "नल आणि नील यांना शरणामध्ये घेणे" |Gyan Ganga Marathi| Audio Book| Topic-042| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Pimple Saudagar: पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या नावावर कर्ज घेत केली तब्बल 26 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करत अज्ञात व्यक्तींनी महिलेला 26 लाखांचा गंडा घातला. महिलेच्या नावाने पार्सल आले असून त्यात अमली पदार्थ असल्याचा बहाणा करून महिलेच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेतले. तसेच महिलेच्या खात्यातील रक्कम देखील काढून घेत एकूण 26 लाख 48 हजार 198 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 9 ते 10 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.
याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील एका महिलेने…
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राज्यात ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मान्यता, छत्रपती संभाजीनगर इथं इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा प्रकल्प उभारणार
मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनामी आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय
आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्यास, तसंच नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनु भाकर आणि सरबजोत सिंग जोडीला कांस्यपदक
सविस्तर बातम्या
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, याअंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलेच्या कुटुंबाला, तसंच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातल्या सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना, घरगुती वापराच्या वार्षिक तीन गॅस सिलिंडरचं पुनर्भरण मोफत करून दिलं जाणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सदर गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे. एका कुटुंबात फक्त एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल, तसंच फक्त १४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना हा लाभ लागू असेल असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्यात ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून, सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा, इलेक्ट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, पाच हजार २०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
****
मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनामी आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या जमिनी मूळ मालकाला मिळणार असल्यानं गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. यासंदर्भातला प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जवळपास ५५ हजार हेक्टर जमिनी खुल्या होणार आहेत.
****
विविध विभागांची वसतीगृहं, तसंच आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. विविध विभागांमार्फत सुरु असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित संस्थांमधलं अनुदान आता प्रति विद्यार्थी दरमहा दीड हजार रुपयांवरून बावीसशे रुपये, तर एड्सग्रस्त आणि मतिमंद निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारं अनुदान सोळाशे पन्नास रुपयांवरून चोवीसशे पन्नास करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नांदेड इथल्या श्री गुरुजी रुग्णालयास विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज, नव तेजस्विनी-ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला एक वर्ष मुदतवाढ, आयुर्मान पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांचं नूतनीकरण तसंच आधुनिकीकरण, यंत्रमाग सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, आदिम जमातीतल्या कुटुंबांसाठी आवास योजना, आदी निर्णयांनाही कालच्या बैठकीत मंत्रिमंडळानं मान्यता देण्यात आली.
****
लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रात, आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. लुब्रिझोल कंपनी ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक वंगणासाठीच्या मिश्रीत प्रणाली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. सुमारे दोन हजार कोटी गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच ९०० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सामंत यांच्या हस्ते बिडकीन परिसरातील १२० एकर जागेचे वाटप पत्र लुब्रिझोल कंपनीस सुपूर्द करण्यात आले.
****
केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यापूर्वी काल मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
****
मराठा समाजातल्या गरीबांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं आरक्षण बचाव यात्रेसाठी आले असता, पत्रकारांशी बोलत होते. लातूरहून काल ही यात्रा बीड जिल्ह्याकडे रवाना झाली.
****
मावळते राज्यपाल रमेश बैस यांना काल मुंबईत राजभवनात निरोप देण्यात आला. नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना आज सायंकाळी राजभवनात पदाची शपथ दिली जाणार आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या उरण इथल्या यशश्री शिंदे हत्याप्रकरणी, मुख्य आरोपी दाऊद शेख याला काल कर्नाटकातल्या अल्लर गावातून अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे, मात्र चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्यानं हत्या का केली याबद्दल कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. त्यांनी दक्षिण कोरियाच्या संघाचा १६ -१० असा पराभव केला. मनू भाकरचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे दुसरं पदक असून, अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय स्पर्धक ठरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी या यशाबद्दल दोन्ही नेमबाजांचं अभिनंदन केलं आहे.
या स्पर्धेत काल हॉकीमध्ये भारतीय संघाने आयर्लंडचा दोन - शून्य असा पराभव केला.
नौकानयन प्रकारात बलराज पवारने उपांत्यफेरीत तर बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज जोडीने इंडोनेशियाई जोडीला हरवत, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तीरंदाजीमध्ये भारताच्या भजन कौरने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रानं फ्रान्सच्या खेळाडुचा पराभव करत उप - उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला, अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे.
****
श्रीलंकेविरुद्ध तीन टी - ट्वेंटी सामन्यांची मालिका भारताने तीन - शून्य अशी जिंकली आहे. काल पल्लेकेले इथं झालेल्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा सुपर ओवरमध्ये पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारित षटकात १३६ धावा केल्या. श्रीलंकेनं देखील २० षटकात १३६ धावा केल्यानं सुपर ओवर खेळवण्यात आली. या ओवरमध्ये श्रीलंकेचा संघ केवळ दोन धावा करु शकला, तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडुवर चौकार मारुन सामना जिंकला.
****
लातूरमध्ये भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस लातूर, नांदेड, बीड, आणि धाराशिव जिल्ह्यातले पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी तसंच कर्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजना, अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी या जनमानसात पोहचवाव्यात असंही या बैठकीत सुचवण्यात आलं.
****
वस्त्रोद्योग आयुक्तालयाने घेतलेल्या राज्यस्तरीय "वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजने" चा निकाल काल जाहीर करण्यात आला. विविध पाच प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. पैठणी साडी वाणात छत्रपती संभाजीनगर इथले गिराम तालेब कबीर यांनी तयार केलेल्या ब्रोकेड पैठणी साडीने पहिला क्रमांक पटकावला, हिमरु शाल वाणात छत्रपती संभाजीनगर इथले ईब्रान अहमद कुरेशी यांनी पहिला तर फैसल इस्तीयाक कुरेशी यांनी दुसरा क्रमांक पटकावला.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ.समीर चव्हाण यांना, तर राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार- प्रफुल्ल शिलेदार यांना जाहीर झाला आहे. येत्या नारळी पौर्णिमेला अहमदनगर इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या एका रुग्णालयातला जैविक कचरा उघड्यावर टाकल्या प्रकरणी, महानगरपालिकेनं २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मनपा उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
****
आष्टी-नगर-पुणे-मुंबई अशी रेल्वे शटल एक्स्प्रेस सेवा तातडीने सुरु करावी अशी मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलं असून, त्याची प्रत पाठपुराव्यासाठी खासदार निलेश लंके यांना सादर केली आहे.
****
मध्य रेल्वेच्या दौंड रेल्वे स्थानकावरील लाईन ब्लॉक मुळे पंढरपूर-निजामाबाद गाडी आज रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
Realme Narzo N61: Realme Narzo N61 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. Realme चा हा 4G स्मार्टफोन IP54 रेटिंग सह येतो, ज्यामुळे फोन पावसात भिजला तरी खराब होणार नाही. हा फोन 7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
Realme ने भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme चा हा फोन IP54 वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. तसेच फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. Realme Narzo N61 या नावाने लॉन्च झालेल्या या फोनची पहिली सेल 6 ऑगस्ट रोजी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर आयोजित केली जाईल. Realme च्या या स्वस्त फोनच्या पहिल्या सेलमध्ये जोरदार ऑफर्स दिल्या जात आहेत.
0 notes
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग आपण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतःही भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हणाली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोरून एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाले होते. दासीने खाली येऊन राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला विचारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्टातून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेवढे संत आहेत, ते आपापली प्रभुता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
1 note
·
View note
बिलोली येथे पशुसंवर्धन विभाग, बीसीआरसी आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पशुसखी आणि शासनाच्या ‘मैत्री‘ प्रकल्प अंतर्गत कार्यरत असणारे पशुधन पर्यवेक्षक यांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात सहभागी विस्तार कार्यकर्त्यांना शासनाच्या महत्त्वाकांक्षी "पशुधन नोंदणी अभियान" बाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पशूंची नोंदणी शासन स्तरावर करून त्यांना आधार क्रमांकाच्या धर्तीवर १२ अंकी बिल्ला क्रमांक देण्यात येणार आहे. यासाठी पशुसखी आणि पशुधन पर्यवेक्षक यांना घरोघरी जाऊन प्रत्येक पशुधनाची रीतसर नोंदणी घेऊन त्या प्रत्येक पशुधनाच्या कानामध्ये बिल्ले लावण्यात येणार आहेत. तसेच सदरील पशुधन हे पशुमालकाच्या नावाने त्यांच्या मोबाईल क्रमांक द्वारे जोडले जाणार आहे. म्हणजे भविष्यात प्रत्येक पशुधनाची ओळख त्याच्या बिल्ला क्रमांक आणि मालकाच्या नावावर शासनाकडे राहणार आहे. या कार्यक्रमात गाय वर्गीय, म्हैस वर्गीय आणि शेळी तसेच मेंढी यांची नोंद करणे आवश्यक आहे. म्हणूनच या सर्व प्रशिक्षणार्थींना याबाबत सखोल माहिती देऊन त्यांना कोणत्या पद्धतीने माहिती जमा करावी आणि बिल्ले कसे वापरायचे याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात आलेल्या विस्तार कार्यकर्ते सोमवार पासून बिलोली आण��� नायगाव तालुक्यातील पशुधनाची नोंद घेण्यासाठी सुरुवात करतील.
पशुपालकांना आव्हाहन आहे की, आपण आपल्या सर्व पशुधनाची नोंद आवश्य करून घ्यावी. येत्या १ जून पासून पशूंच्या खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी बिल्ले आवश्यक आहेत. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातून मिळणाऱ्या सर्व सुविधा जसे की लसीकरण, उपचार आणि कृत्रिम रेतन इ. करिता बिल्ले असणे बंधनकारक राहणार आहे. #animals #animallover #agriculture #farmer #मैत्री #पशुप्रेमी #पशुधन_नोंदणी_अभियान #बिल्ले
0 notes
द्वापार युगातील सुदर्शनजी यांचे आई वडील कलियुगात कोणत्या नावाने आले | Sa...
0 notes
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने पैशांची मागणी; गुन्हा दाखल
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने पैशांची मागणी; गुन्हा दाखल
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने पैशांची मागणी; गुन्हा दाखल
पिंपरी – मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थापकाला फोन करुन एका इसमाने आपण माजी मंत्री पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ���फिसमधून बोलत असल्याचे सांगितले व शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. शुक्रवारी (दि. 9) चिखली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवदास साधू चिलवंत (वय 41, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार…
View On WordPress
0 notes
द्वापार युगातील सुदर्शनजी यांचे आई वडील कलियुगात कोणत्या नावाने आले | Sa...
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग - द्वापार युगातील सुदर्शन जी यांचे आई वडील कलियुगात कोणत्या नावाने आले खरे?|Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०
****
मुख्यमंत्री लाडकी बहीण तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ५२ लाखांवर लाभार्थी महिलांना वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
इनामी तसंच देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये येणार-मराठवाड्यात ५५ हजार हेक्टर जमिनी खुल्या होणार
उरण इथल्या यशश्री शिंदे हत्याप्रकरणी, आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक
आणि
पॅरिस ऑलिपिंकमध्ये १० मीटर एअर पि��्तुल प्रकारात मनु भाकर आणि सरबजोत सिंग जोडीला कांस्यपदक
****
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून याअंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलेच्या कुटुंबाला तसंच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना घरगुती वापराच्या वार्षिक ३ गॅस सिलिंडरचं पुनर्भरण मोफत करून दिले जाणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सदर गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे. एका कुटुंबात फक्त एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल, तसंच फक्त १४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना हा लाभ लागू असेल असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनामी आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या जमिनी मूळ मालकाला मिळणार असल्याने गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. यासंदर्भात यथायोग्य प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावा, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. सदर निर्णयामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जवळपास ५५ हजार हेक्टर जमिनी खुल्या होणार आहेत.
****
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वेगवेगळ्या कारणांमुळे संस्थात्मक पीककर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या नऊ हजार ६९८ आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा, असं निर्देशही पवार यांनी दिले.
****
राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली, या बैठकीत राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामुळे मराठवाड्यासह कोकण तसंच विदर्भात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून, सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
****
म्हाडाच्या पात्र विजेत्या अर्जदारांचं ७० हजार ५०० रुपये ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क माफ करण्यात आलं आहे. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज मुंबईत गाळेधारकांना देकारपत्र प्रदान करण्यात आले, त्या कार्यक्रमात मंत्री सावे यांनी ही घोषणा केली.
****
केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यापूर्वी आज मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.
****
मराठा समाजातील गरीबांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आज लातूर इथं वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेसाठी आले असता, पत्रकारांशी बोलत होते. ही यात्रा औसा, निलंगामार्गे काल रात्री लातूर इथं पोहोचली. लातूरहून आज ही यात्रा बीड जिल्ह्याकडे रवाना झाली.
****
मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज मुंबईत राजभवनात निरोप देण्यात आला. नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उद्या सायंकाळी राजभवनात पदाची शपथ दिली जाणार आहे.
****
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही क्षेत्रासाठी पूर्वीच्या तुलनेत कमी निधीची तरतूद केलेली नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं आहे. त्या आज लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. अर्थसंकल्पावर टीका करण्यापूर्वी अर्थसंकल्प वाचून घेण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं.
****
केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं असून, १२८ हून अधिक जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घनटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या उरण इथल्या यशश्री शिंदे हत्याप्रकरणी, मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील अल्लर गावातून अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी आज नवी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. प्राथमिक चौकशीत दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे, मात्र चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्यानं हत्या का केली याबद्दल कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही असं साकोरे यांनी म्हटलं आहे. २७ जुलैला उरण इथं यशश्रीची हत्या करून दाऊद शेख फरार झाला होता.
****
भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. दक्षिण कोरियाच्या संघाचा १६ -१० असा पराभव करत, मनू आणि सरबजोत जोडीनं कांस्यपदकाला गवसणी घातली. मनू भाकरचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे दुसरं पदक आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय स्पर्धक ठरली आहे. याच स्पर्धेच्या वैयक्तिक प्रकारातही तिने कांस्यपदक पटकावलेलं आहे. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच मुष्टियोद्धा सुशीलकुमार यांनीही ऑलिम्पिमध्ये प्रत्येकी दोन पदकं मिळवली आहेत, पण ती वेगवेगळ्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांसाठी मिळवली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी या यशाबद्दल दोन्ही नेमबाजांचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनच्या दुहेरी प्रकारात सात्विक आणि चिराग तसंच तनिषा आणि अश्विनी जोडीचे सामने होणार असून, मुष्टियुद्ध प्रकारात अमित पंगाल, जॅस्मिन आणि प्रीती पवार यांचे सामने होणार आहेत.
****
श्रीलंकेत सुरू ��सलेल्या भारत आणि श्रीलंका संघात तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय संघानं पहिले दोन सामने जिंकून मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
५६ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदक पटकावलं आहे. महाराष्ट्रात जळगावच्या देवेश पंकज भैया यानं सुवर्ण, मुंबईचा अवनिश बन्सल आणि हैदराबादचा हर्षिन पोसीना यानं रौप्य पदक तर मुंबईच्या कश्यप खंडेलवाल यानं कांस्यपदक पटकावलं आहे.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रेमानंद गज्वी यांना, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ.समीर चव्हाण यांना, राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार- प्रफुल्ल शिलेदार यांना, अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार डॉ.श्रीनिवास हेमाडे यांना, राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना जाहीर झाला आहे. येत्या नारळी पौर्णिमेला अहमदनगर इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. पुरस्काराचं हे चौतीसावं वर्ष आहे.
****
राज्यात महसूल दिनानिमित्त एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार आहे. यात राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येणार आहेत.
बीड इथं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. परभणी जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांनी या महसूल सप्ताहामध्ये सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात या सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं रुग्णालयातला जैविक कचरा उघड्यावर टाकल्या प्रकरणी, महानगरपालिकेकडून सदर रुग्णालयाला २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मनपा उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
****
0 notes
मराठी मनाचा, मराठी माणसाचा, महोत्सव मराठी नव-वर्षाचा, साजरा करा AdBanaoसह.
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच प्रतिपदा, आपण गुढी पाडवा सण साजरा करतो. हा दिवस मराठी नववर्षाचा प्रारंभ आहे.
देशभरात ठिकठिकाणी गुढीपाडवा साजरा केला जातो. हा सण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. त्याविषयी जाणून घेऊया.
गोवा आणि केरळमधील कोकणी समाज गुढी पाडव्याला संवत्सर पडवो म्हणून साजरा करतात.
कर्नाटकात गुढीपाडव्याचा हा सण युगाडी म्हणून ओळखला जातो.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढी पाडवा उगादी म्हणून साजरा केला जातो.
काश्मिरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात.
गुढी पाडवा: नव्या वर्षाची सुरुवात AdBanao अॅपसोबत
गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा सण आहे. या दिवशी, प्रत्येक मराठी माणूस नवीन उमेदीने आणि आनंदाने वर्षाची सुरुवात करतो. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, जी विजयाचे प्रतीक मानली जाते. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या रांगोळी, तोरण, फुलांच्या सजावटीतून आपल्या घरात सकारात्मकता आणि समृद्धी येते.
AdBanao अॅपच्या मदतीने आपण या सणाच्या उत्सवाला अधिक भव्य आणि आकर्षक बनवू शकता. या अॅपच्या मदतीने आपण स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स, व्हिडिओज तयार करून आपल्या व्यवसायाचा, उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करू शकता. यामुळे आपल्या ग्राहकांपर्यंत आपल्या ब्रँडची ओळख पोहोचवण्यास मदत होईल.
Download AdBanao app for Business branding and festival posters.
Read the full blog on website https://www.adbanao.com/blog-details/celebrate-gudipadva-with-adbanao-app
0 notes