Tumgik
#महामार्गाचं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं… नागपूर : आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. या महामार्गावरून आता सर्वसामान्यांना सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 22 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
आर्थिक आणि तंत्रज्ञान - फिन्टेक क्षेत्रात भारताची क्रांती सर्वत्र दिसून येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये आज ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातले जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक डिजिटल व्यवहार भारतात होत असून, भारताचं युपीआय हे ॲप, फिन्टेकचं जगभरातलं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी नमूद केलं. इतर देशातले लोक भारतात येतात तेव्हा त्यांना सांस्कृतिक विविधतेसोबतच, आता फिन्टेक क्षेत्रातही विविधता दिसून येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या दहा वर्षात फिन्टेक स्टार्टअप मध्ये ५०० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. फिन्टेक मुळे आलेल्या परिवर्तनामुळे आमुलाग्र सामाजिक बदल झाले असून, तळागाळातल्या लोकांपर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. जनधन, मुद्रा योजना यासह महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पालघर इथं आज विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. डहाणू गावात ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
****
पुण्यात शिवाजीनगर इथं दूरशिक्षण तंत्रनिकेतन परिसरात उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या आतंरराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महासंघ - एन एस डी सी इंटरनॅशनलच्या पुणे विभागाचे सहसंचालक डॉ दत्तात्रय जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रशिक्षण केंद्रात पहिल्या टप्प्यात एनएसडीसी इंटरनॅशनल मार्फत आरोग्य, रूग्णालय, ब्युटी अँड वेलनेस आणि ग्रीन जॉब स्केल सेक्टर, सौर उर्जा या विभागातलं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं शिवरायांचा पुतळा कोसळल्याची संपूर्णपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज सकाळी राजकोट इथं या दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ही घटना अतिशय दुर्देवी आहे, मात्र याविषयी वाद घालणं योग्य नाही, नेते आणि कार्यकर्ते यांनी या विषयात सयंम दाखवावा, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
****
मुंबई - गोवा महामार्गाचं काम नि��ृष्ट दर्जाचं करून अनेकांच्या मृत्यूस जबाबदार असलेले चेतक एन्टरप्रायजेसचे व्यवस्थापकीय संचालक हुकुमचंद जैन, सर व्यवस्थापक अवधेश सिन्हा आणि प्रकल्प अभियंता सुजित कावळे यांच्यावर आज माणगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी अभियंता कावळे याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या महामार्गाची पाहणी करुन, कारवाईचे आदेश दिले होते. चेतक एन्टरप्रायजेसकडे इंदापूर ते वडपाले या टप्प्याचं काम होतं. कंपनीने हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्यानं या टप्प्यात २०१७ नंतर १७० अपघात झाले, त्यात ९७ जणांचा मृत्यू झाला.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल जिल्ह्यातले साखर कारखाने, महाविद्यालये आणि सहकारी बँकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जिल्ह्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी आस्थापनांनी या योजनेतून युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केले.
****
मध्यप्रदेशात सतना रेल्वे स्थानकावर सतना-बरेठीया या नवीन रेल्वे लाईनचं काम करण्यासाठी लाईन ब्लॉक  घेण्यात आला आहे. त्यामुळे जालना-छपरा-जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यात १८ आणि २५ सप्टेंबर रोजी धावणारी जालना ते छपरा ही गाडी, तर परतीच्या प्रवासात २० आणि २७ सप्टेंबर रोजी  धावणारी छपरा ते जालना गाडी रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. 
****
गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर येत्या १२ तासांत ईशान्य अरबी समुद्रात चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता असून, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पीएम मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन, नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचंही भूमिपूजन
पीएम मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन, नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचंही भूमिपूजन
पीएम मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन, नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचंही भूमिपूजन Samruddhi Mahamarg Inauguration : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. Samruddhi Mahamarg Inauguration : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पंतप्रधान मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात वेगवान समृद्धी महामार्गाचं लोकार्पण
पंतप्रधान मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात वेगवान समृद्धी महामार्गाचं लोकार्पण
पंतप्रधान मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात वेगवान समृद्धी महामार्गाचं लोकार्पण मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 11 डिसेंबर रोजी म्हणजेच, आज “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आधी कर्नाटकवर बोला, मग समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करा, उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन
आधी कर्नाटकवर बोला, मग समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करा, उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन
आधी कर्नाटकवर बोला, मग समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करा, उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन जालनाः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात दोन ज्वलंत प्रश्न आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आणि…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नागपुरात उद्या महासोहळा, ठिक-ठिकाणी शिंदे-भाजपचे झेंडे, पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन, काय Updates?
नागपुरात उद्या महासोहळा, ठिक-ठिकाणी शिंदे-भाजपचे झेंडे, पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन, काय Updates?
नागपुरात उद्या महासोहळा, ठिक-ठिकाणी शिंदे-भाजपचे झेंडे, पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन, काय Updates? नागपूरः महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं (Samruddhi High way) उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यानिमित्त नागपुरात (Nagpur) महासोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचं लोकार्पण…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
·      गौरी गणपतीनिमित्त राज्यसरकारकडून १ कोटी ७० लाखावर पात्र नागरिकांना आनंदाचा शिधा
·      मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला येत्या दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड इथून प्रारंभ
·      पंचवीसावा कारगील विजय दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा
·      छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून तीन दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन
·      महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारत श्रीलंका संघात उद्या अंतिम सामना
आणि
·      पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धांना दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्यानं प्रारंभ
सविस्तर बातम्या
यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातल्या १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात येणार आहे. प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या  या "आनंदाचा शिधा" संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. या शिध्याचं वाटप १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई-पॉस प्रणालीद्वारे होणार आहे.
****
राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडं तसंच भाजीपाला लागवडीची योजना राबवण्यासाठी ४० लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील नांदेडसह १४ जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाना या योजनेचा लाभ होणार आहे.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी विनंती याचिका शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या या आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती न्यायालयात केली असल्याचं, पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत वाटाघाटींसाठी राज्य तसंच मुंबई स्तरावर दोन विशेष समित्यांचं गठन केलं आहे. पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला येत्या दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड इथून प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सिल्लोड इथं यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोहोचवून महिला सशक्तीकरणाचे ध्येय्य पूर्ण करावं, असे निर्देश दिले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचं काम जिल्ह्यात उत्तमरित्या होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा येत्या मंगळवारचा उदगीर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातून ही माहिती कळवण्यात आल्याचं, क्रीडा मंत्री संजय बनसोडे तथा लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितलं आहे.
****
कारगील विजय दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत कुलाबा इथल्या हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवदन केलं. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबातल्या ११ वीर नारींना यावेळी सन्मानित करण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत, या युद्धात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा सैनिकांचं स्मरण केलं. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांप्रती राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही ��ुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कारगील युद्धात सक्रिय असलेले सैनिक प्रल्हाद गोपीनाथ पठारे यांच्यासह तीन वीर मातांचा तसंच सहा वीर पत्नींचा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुख मेजर एस फिरासत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठारे यांनी युद्धातील आठवणीला उजाळा दिला.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं. माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी काल दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रामुख्यानं लातूर - कुर्डूवाडी- टेंभुर्णी या महामार्गाचं चौपदरीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी काळगे यांनी केली. हे सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडवले जातील, असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं खासदार काळगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून ‘तरंग, हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तीन दिवसीय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. जालना रस्त्यावर पाटीदार भवन इथं २९ जुलैपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी असं, आवाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केलं आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांत हा मेळावा होणार आहे.
****
आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि श्रीलंका संघात होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं बांग्लादेशचा तर श्रीलंकेनं पाकिस्तानचा पराभव केला. बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, भारताला दिलेलं ८१ धावांचं आव्हान, भारताच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनं अवघ्या ११ षटकांत साध्य केलं. दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं दिलेलं १४० धावांचं लक्ष्य श्रीलंकेच्या संघानं एक चेंडू आणि तीन बळी राखून पार करत, अंतिम फेरीत धडक मारली.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं काल रात्री दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झालं. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅक्रां यांनी या स्पर्धेच्या प्रारंभाची घोषणा केली. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच मैदानाच्या बाहेर सीन नदीच्या किनारी भर पावसात पार पडलेल्या संचलन सोहळ्यात सात हजारावर खेळाडू सहभागी झाले. भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू यांनी केलं.
दरम्यान या स्पर्धेत आज हॉकी, बॅडमिंटन, टेनीस, टेबल टेनीस, नेमबाजी, मुष्टियुद्ध आणि नौकानयन आदी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत
****
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. प्राचार्य मगदूम फारुकी यांनी उर्दुत अनुवादित केलेल्या पद्मविभूषण शरद पवार - दि ग्रेट एनिग्मा या पुस्तकाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
दरम्यान ज्येष्ठ विचारवंत लेखक शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ४ पुस्तकांचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते आज होणार आहे.
****
ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान, ज्ञानराधा पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश कुटे याला बीड कारागृहातून जालना इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्याला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
दरम्यान हिंगोली इथल्या अनुराधा पतसंस्थेत ६ कोटी २७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचा अध्यक्ष अशोक कांबळे याला आर्थिक गुन्हे शाखेनं काल अटक केली. कांबळे हा गेल्या ५ महिन्यांपासून फरार होता.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ४ लाख ५९ हजार ४५ ग्राहकांकडे सुमारे २३३ कोटी ३० लाखांचं वीजबिल थकित आहे
****
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काल लातूर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतला. पावसाच्या पार्श्वभूमीवर नाले साफसफाईतील हलगर्जीपणा टाळावा, रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, आदी सूचना, देशमुख यांनी मनपा अधिकाऱ्यांना केल्या.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर काल जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
नांदेड महापालिकेनं पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. पुढच्या दोन महिन्यात शहरांमध्ये २५ हजार झाडं लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात २२ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत हिपॅटायटिस पंधरवाडा पाळण्यात येत आहे. या निमित्त काल जिल्हा रुग्णालयात हिपॅटायटिस बी आणि सी ची तपासणी करण्यात आली.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
                                        ****
छत्रपती संभाजीनगर इथं काल दिवसभरात १२२ जणांची तर गेल्या आठवडाभरात ३३९ संशयित रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सांगितलं आहे. गेल्या दोन दिवसात शहरात एकूण तिघांना कोविडची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कोविड चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असून, संभाव्य रुग्णांवर उपचारासाठीची यंत्रणा सज्ज ठेवली  आहे.
                              **** हिवाळी अधिवेशना दरम्यान लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघासह जिल्ह्यातील विकासकामांसाठी १ हजार १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. निधीच्या विनियोगातून औसा मतदारसंघातील ५० पेक्षा अधिक खेड्यांचा कायापालट, लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक ते किल्लारी राष्ट्रीय महामार्गाचं विस्तारीकरण, महावितरणची कामं, आदी विकास कामं करण्यात येणार आहेत.
                              **** अकोला जिल्ह्यात आजपासून येत्या २९ तारखेपर्यंत ६७ वी राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धा  आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १४, १७ आणि १९ या वयोगटामध्ये सामने होणार आहेत. स्पर्धेत हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिसा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यातले विविध एकूण ३४ संघ सहभागी झाले असून एकूण १ हजार ८०० खेळाडूंमध्ये सामने रंगणार आहेत.                               ****
यवतमाळ इथं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि अमोलकचंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं काल पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ३५१ उमेदवारांची मुलाखतीद्वारे विविध कंपन्यांत प्राथमिक निवड करण्यात आली.
                              ****
शहीद वीर जवान अनिल कळसे  यांच्या पार्थिव देहावर सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील रेठरे खुर्द इथं शासकीय इतमामात काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद अनिल कळसे भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनिअर चमूतल्या २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. मणिपूर मध्ये कर्तव्यावर असताना २१ डिसेंबर रोजी त्यांना वीरमरण आलं.
                              ****
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 04 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
रायगड जिल्ह्यात महाड इथल्या ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये काल सकाळी लागलेली आग आता आटोक्यात आली असून रात्री उशिरा राष्ट्रीय आपत्ती दलाची तुकडी दुर्घटना स्थळी  पोहचली आहे. अंधारामुळं बचावकार्यात अडथळा येत होता. आज सकाळी बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आलं. या स्फोटात आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित बेपत्ता कामगारांचा तपास सुरू आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी दुर्घटना स्थळी काल रात्री भेट दिली. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या नातेवाइकांना जास्तीत जास्त सहकार्य करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेंडी बायपास जवळ नगरच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला एक कोटी रुपयांची लाच घेताना नाशिक इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ अटक केली. एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेताना कारवाई झालेली राज्यातली ही पहिली घटना आहे. या संदर्भात काल रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी प���लीस ठाण्यात गुन्हा दाख��� करण्यात आला आहे.
****
अकोला इथले भाजप नेते तथा अकोला पश्चिम विधानसभेचे आमदार गोवर्धन मांगीलाल शर्मा यांचं काल अकोल्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ७४ वर्षाचे होते. काही महिन्यांपासून ते आजारी होते. १९९५ पासून सातत्यानं पूर्वीच्या अकोला मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी ३ वाजता अकोल्यातील मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं येत्या महिन्याभरात काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत विरारमध्ये वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्णजयंती सोहळ्यात बोलत होते. या महामार्गावर १० फूट पुलाचं कामही करण्यात येणार असून प्रस्तावित दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वे या महामार्गाला वसईशी देखील जोडण्यात येणार असल्याचं मंत्री गडकरी म्हणाले.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बंगळुरू इथं न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघानं ३१ षटकांत एक बाद २१८ धावा केल्या आहेत.
तसंच आजच्या दिवसातील दुसरा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुपारी दोन वाजता अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे.    
****
केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून पीएम ई बस सेवा प्रकल्पा अंतर्गत कोल्हापूर महापालिकेसाठी शंभर ई बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. दोन महिन्यात या बसेस कोल्हापूरमध्ये दाखल होतील अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. या बसेस वातानुकूलित असतील आणि सांगली, मिरजपर्यंत धावतील.  
****
मानवी तस्करी बाबत जनजागृतीसाठी ओएसिस इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीनं मुक्ती बाईक चॅलेंज २०२३ चं २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे. काल रात्री ही राईड नवी मुंबईत दाखल झाली. या रायडर्संनी बंगळुरू ते मुंबई या मार्गावर दीड हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. तस्करीची चिन्हं ओळखणं आणि महिला आणि मुलांचं संरक्षणाबद्दल या राईडच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
****
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाद्वारा संचालितलातूर जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येत्या सात नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून याविषयीची संपूर्ण माहिती संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं शासकीय अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहामध्ये चालू शैक्षणिक वर्षाकरता प्रवेश देणं चालू आहे. या वसतीगृहामध्ये अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्रता धारक सर्व गरजू मुलींसाठी ७० टक्के तसंच इतर समाजातील ३० टक्के मुलींना प्रवेश देण्यात येतो. अधिकाधिक मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आलं आहे.
****
गोव्यातल्या पणजी इथं सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी काल नवव्या दिवशी महाराष्ट्राच्या संघानं अग्रस्थान अबाधित राखलं. महाराष्ट्रानं आतापर्यंत ६३ सूवर्ण, ५६ रौप्य आणि ५७ कांस्यपदकांसह एकूण १७६ पदके जिंकली आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
संकटकाळात एकमेकांना धरुन राहण्याची ‘सर्वजन हिताय' वृत्ती हीच भारताची मोठी शक्ती - ‘मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
सिंगापूरच्या सात उपग्रहांचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण.
ठाणे- नाशिक आठ पदरी महामार्गाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
आणि
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर कमी करण्यासाठी सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करणार-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती.
****
देशात अलिकडेच आलेल्या नैसर्गिक संकटांचा सामना आपण एकजुटीने केला असून, संकटकाळात एकमेकांना धरुन राहण्याची आपली ‘सर्वजन हिताय' वृत्ती हीच भारताची शक्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं. आकाशवाणीवरुन दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा आजचा शतकोत्तर तिसरा भाग होता. गेल्या महिनाभरात देशाच्या विविध भागात अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणं अशा दुर्घटना झाल्या मात्र देशवासियांनी एनडी आर एफ आणि प्रशासनाच्या बरोबरीने खंबीरपणे सामूहिक शक्तीचं दर्शन घडवलं असं पंतप्रधान म्हणाले.  पावसाळा  ‘वृक्षारोपण आणि ‘जलसंरक्षण' यांच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे, असं सांगून पंतप्रधानांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या ‘अमृत महोत्सवा'निमित्त  तयार  झालेल्या 60 हजारहून जास्त अमृत सरोवरांची माहिती दिली. उज्जैनमधे 18 चित्रकार मिळून भारतीय परंपरेतल्या पुराणकथांवर आधारित चित्रकथा तयार करत आहेत याचा उल्लेख त्यांनी केला. राजकोटचे चित्रकार प्रभातसिंग बरहाट यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच्या प्रसंगावर काढलेल्या चित्राची माहिती देत पंतप्रधानांनी याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
ते म्हणाले -
ये Painting, छत्रपति वीर शिवाजी महाराज के जीवन के एक प्रसंग पर आधारित थी| Artist प्रभात भाई ने दर्शाया था कि छत्रपति शिवाजी महाराज राज्याभिषेक के बाद अपनी कुलदेवी ‘तुलजा माता' के दर्शन करने जा रहे थे, तो उस समय क्या माहौल था| अपनी परम्पराओं, अपनी धरोहरों को जीवंत रखने के लिए हमें उन्हें सहेजना होता है, उन्हें जीना होता है, उन्हें अगली पीढ़ी को सिखाना होता है| मुझे खुशी है, कि, आज, इस दिशा में अनेकों प्रयास हो रहे हैं|
स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवानिमित्त' सुरू होत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश' - ‘माझी माती माझा देश' या अभियानाची पंतप्रधानांनी माहिती दिली. या अभियानात सर्वांनी सहभागी होत, अमृतकालसाठी आपण मागे चर्चा केलेल्या ‘पंच प्राण' पूर्ततेसाठी देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घ्यावी, आणि ही शपथ घेतानाचे सेल्फी yuva.gov.in या संकेतस्थळावर पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान परवा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. येत्या मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण�� इथे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यात फुगेवाडी मेट्रो स्थानक ते शासकीय न्यायालय स्थानक आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानचं मेट्रो रेल्वेचं काम पूर्ण झालं असून या मेट्रोला पंतप्रधान परवा हिरवा झेंडा दाखवतील. पिंपरी चिंचवड पालिकेच्या टाकाऊतून उर्जाप्रकल्प या प्रकपाचं उद्घाटन ही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महापालिकेनं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या एक हजार २८० घरांचं हस्तांतरणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वतीनं आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सिंगापूरच्या डी. एस. - एस. ए. आर. उपग्रहासह एकूण सात उपग्रह आज पहाटे अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. पी.एस.एल.व्ही. सी- छप्पन या रॉकेटद्वारे हे उपग्रह सकाळी साडे सहा वाजता अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. ही कामगिरी भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा असून व्यावसायिक स्वरुपातील अभियानही याद्वारे यशस्वीरित्या साध्य झालं आहे. हे प्रक्षेपण म्हणजे इस्रोच्या रिमोट सेन्सिंग क्षमतेच्या प्रगतीचं प्रतीक आहे. डीएस-एसएआर उपग्रहाच्या माध्यमातून खराब वातावरणात आणि रात्रीही उत्तम दर्जाची छायाचित्रं मिळू शकतात. पीएसएलवीच्या कोर अलोन प्रकारातील हे १७ वं उड्डाण आहे.
****
जम्मू इथल्या यात्री निवासातून एक हजार ९८४ भाविकांचा अठ्ठावीसावा जथ्था आज अमरनाथ यात्रेसाठी अमरनाथ गुहेच्या दिशेनं रवाना झाला . यातले ५६४ भाविक बालतल मार्गाने तर ४१० भाविक नुनवान पहलगाम या मार्गाने अमरनाथ ला पोहोचतील. या वर्षीची अमरनाथ यात्रा गेल्या १ जुलै पासून सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ५३४ भाविकांनी हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी श्रावणपौर्णिमेला ही यात्रा पूर्ण होईल.
****
ठाणे- नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आठ पदरी रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सकाळी ठाणे-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.   लहान वाहनांना रस्ता मिळावा याकरिता अवजड वाहनं डाव्या बाजूने चालवण्यासंदर्भात वाहनचालकांना सूचना देण्याचे  निर्देश मुख्यमंत्र्यांनी  दिले तसंच या मार्गावरील खड्डे तातडीनं मास्टीकनं भरण्याचे आदेश ही त्यांनी यावेळी दिले.
****
कामगार विभागाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे. यासाठी तालुका स्तरावर लवकरच कामगार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितलं आहे. वर्धा इथं शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत २२ ते ३० जुलै या कालावधीत कामगारांना विविध येाजनेचा लाभ देण्यासाठी आयोजित कामगार सेवा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात आज ते बोलत होते. उद्योग व्यवसाय, बांधकाम इतर कामांमध्ये कामगारांची भूमिका महत्वाची असते. मात्र, या कामामध्ये कामगारांना सन्मान मिळत नाही. त्यांना त्यांचा सन्मान मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येत आहेत, असं खाडे यांनी सांगितलं.
****
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर कमी करण्यासाठी सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार अहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज नाशिक इथं ही महिती दिली. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सभागृहात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शासनाने पहिल्या टप्प्यात ३० हजार तसंच दुसऱ्या टप्यात २० हजार शिक्षकांची भरती सुरू केली आहे. जोपर्यंत नवीन भरती पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे, असंही केसरकर यांनी सांगितलं.
****
पश्चिम विभागीय आंतराज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धे करता महाराष्ट्र संघात औरंगाबाद इथले येथील बॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश कुलकर्णी याची एकेरी करता आणि सोनाली मिलखेलकरची दुहेरी करता निवड झाली आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्य शिवाय गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात  संघांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा या मध्य प्रदेशातील इंदूर या शहरात आठ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. सोनाली आणि प्रथमेश हे दोघं अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
****
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांच्या पार्थिव देहावर आज अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी यांचं काल उपचारादरम्यान निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर इथं एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील दवाखान्यात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
****
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यांना योग्य तो लाभ घेता यावा. तसंच नागरिकांमध्ये महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा बाबत जागरुकता निर्माण व्हावी. यासाठी परवा एक ऑगस्टच्या महसूल दिनापासून राज्यभरात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०६ जून २०२३ सकाळी ११.०० वाजता****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नाराज शिवभक्तांना उद्देशून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतीक्षा करण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमात उपस्थित आहेत.
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेची चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीनंतर परवा गुरुवारी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला जाईल. 
****
अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातल्या समूह विकास योजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झाला. सुमारे पंधराशे हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार घरांची निर्मिती होणार आहे.
****
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे- हरित महामार्गाचं काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.
****
दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त रिपब्लिकन पक्षानं आज नागपुरात, विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघटनेत काम केलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.
//*************//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी सुकाणू समितीची नियुक्ती.
ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं प्रदीर्घ आजाराने निधन.
जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा.
आणि
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा खरेदी केंद्राला आग लागून मोठं नुकसान.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ नुसार शैक्षणिक घटकांचा आढावा घेऊन राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या समितीत ३२ सदस्यांचा समावेश आहे. येत्या काळात शालेय शिक्षणासाठीचा अंतिम आराखडा, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण आराखडाही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्या मुंबईत राजभवन इथं या तिकिटाचं प्रकाशन होणार आहे.
****
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मृत्यू पावलेल्या दोन शिवभक्तांच्या मृत्यूची सखोल चौकशी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी हे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.
****
राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली. महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रात अधिक उत्पादन व्हावं, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी, या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचं, राणे यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ अभिनेते तसंच सहायक दिग्दर्शक गुफी पेंटल यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरबजीतसिंह पेंटल असं मूळ नाव असलेले गुफी पेंटल यांनी १९७५ मध्ये रफू चक्कर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. दूरदर्शनच्या महाभारत या लोकप्रिय मालिकेत शकुनी मामा ही त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिव देहावर मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुलोचना दीदी यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. सुलोचना यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९४ वर्षांच्या होत्या.
****
कांद्याचे भाव सावरण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येवला इथं आज शेतकरी प्रहार संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयासमोर, कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी केली, त्यानंतर मुंडन करत आंदोलन केलं. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, कांदा उत्पादकांना संरक्षण द्यावं, निर्यातमूल्य कमी करावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे- हरित महामार्गाचं काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली. या महामार्गासाठी बाधित शेतीच्या मोबदल्यात चार लाख रुपयांपासून सात लाख रुपयांपर्यंत भरपाई शासनानं जाहीर केली आहे, मात्र ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मंजूर नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत, परभणी, नांदेड, लातूर, बीड, मुंबई, रत्नागिरी आणि सांगली या जिल्ह्यांसाठी, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. २४ ते ४५ वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती, प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकेन्सिंज, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांना, एअर न्यूज पॅनल ट्वेंटी ट्वेंटी टू अॅट जीमेल डॉट कॉम, या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील.
****
जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं सिडको इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन आणि स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. सहकार मंत्री अतुल सावे, महापालिका प्रशासक जी.श्रीकांत, वृक्षारोपणासाठी कार्य करणाऱ्या जनसहयोग संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे येऊन औरंगाबाद शहर प्रदुषण मुक्त राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन, सावे यांनी यावेळी केलं. उपस्थित सर्वांनी यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीची शपथ घेतली. विटखेडा परिसरात माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर मान्यवरच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आज या परिसरात शंभर रोपं लावण्यात आली असून एक हजार झाडे लावण्याचा संकल्प विटखेडा वॉर्डातील नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात ‘हर घर नर्सरी’ उपक्रमाअंतर्गत सर्व नगरपालिकांमध्ये रोपवाटीकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी आज सलग दुसऱ्यांदा दुर्मिळ वृक्ष असलेल्या पट्ट्यात जाऊन, विविध वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं. लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवरा, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ यांच्या सक्रिय सहभागानं ही मोहिम राबवण्यात आली. यावेळी आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस अशा अनेक वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं.
****
वातावरणातील बदलामुळे कृषी उत्पादनावर होणाऱ्या विपरित परिणामांवर उपाय शोधण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन संशोधन करण्याचं आवाहन, वसंतराव ऩाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातले अधिष्ठाता, डॉ. धर्मराज गोखले यांनी केलं आहे. ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष प्रचार कार्यक्रमात बोलत होते. प्लास्टिकच्या वापरावर तसंच उत्पादनावर मर्यादा आणण्याची गरज व्यक्त करुन, कृषी विद्यापीठात होत असलेल्या पर्यावरण अनुकूल कार्यक्रमाची माहिती डॉ. गोखले दिली.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी यावेळी बोलताना, निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मिशन लाईफचा उद्देश आत्मसात करण्याचं आवाहन केलं. शाहीर भारत मुंजे यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावणाविषयी जऩजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते निबंध आणि पोष्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
****
नाशिक शहराजवळ चुंचाळे इथं पांजरापोळ या संस्थेला दिलेल्या जागेत अडीच हजार वृक्ष लावण्यात आले. या ठिकाणी एकूण दहा हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट आहे. यासोबतच नंदिनी नदीकाठावर देखील आज सकाळी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात एकशे एक वृक्षांचे रोपण करण्यात आलं.
****
बुलडाणा इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यात खामगाव इथं जनुना तलाव उद्यान परिसरात १०१ नारळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरु करण्यात आला.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राला शार्ट सर्किटने भीषण आग लागून मोठं नुकसान झालं, आज पहाटे ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमध्ये ५० क्विंटल हरभरा, बारदान्याचे २१ गठ्ठे, फर्निचर, सीसीटीव्ही कॕमेरा, लॕपटॉॕप इत्यादी सामानाचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा गावात आगमन झालं. या पालखीत साडेसातशे वारकऱ्यांचा समावेश आहे. पालखीच्या आगमनामुळे हिंगोली जिल्ह्यातही भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ मे  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता
एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरल्याची मुख्यमंत्र्यांची भावना
राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करण्याची राज्यपाल रमेश बैस यांची सूचना
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार, मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव
सविस्तर बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर ते मुंबई पर्यंतच्या समृद्धी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी ते भरवीर असा ऐंशी किलोमीटर अंतराचा हा दुसरा टप्पा आहे. समृद्धी मार्ग गडचिरोली पर्यंत नेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. ते म्हणाले…
Byte…
आपल्या सगळ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प पहिला टप्पा देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबर मध्ये नागपूर ते शिर्डी झाला. आणि लगेच आपण पुढचा टप्पा ८० किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला, तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला, आणि शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अलीकडेच महामार्गावर झालेल्या अनेक अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं. या महामार्गावर लवकरच सुगम वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येईल असं ते म्हणाले. महामार्गाचं महत्त्व विशद करताना ते म्हणाले....
Byte…
हा समृद्धी महामार्ग का आहे, हा एक ईकॉनॉमिक कॉरीडोर आहे. राज्याच्या १५ जिल्ह्यांचं भाग्य हा बदलणार आहे. आणि शेवटी जगाच्या पाठीवर त्याच देशांमध्ये प्रचंड आपल्याला विकास झालेला दिसतो, ज्याठिकाणी पोर्ट लेड डेव्हलपमेंट म्हणजे, पोर्टच्या आधारावर विकास झाला, त्या पोर्ट लेड डेव्हपमेंटचा आतापर्यंत उपयोग हा केवळ मुंबई, एमएमआर रिजन, आणि पुण्याला होत होता, त्याच्या पलिकडे तो होत नव्हता, आता पार गोंदिया पर्यंत पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा उपयोग होणार आहे, आणि म्हणून महाराष्ट्राला रिडीफाईन करणार हा  महामार्ग आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारला काल नऊ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं भाजप, येत्या ३० तारखेपासून जनसंपर्क अभियान सुरू करणार आहे. या अभियानातून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे ‘नौ साल सेवा सुशासन, गरीब कल्याण’, या विषयावरच्या एका राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह याच खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात तीन सत्रं होणार असून, त्यात इंडिया सर्जिंग अहेड, जन जन का विश्वास आणि युवा शक्ती गॅल्व्हानायझिंग इंडिया या तीन विषयावर चर्चासत्रं होणार आहेत. या परिसंवादात विविध मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
****
दिल्लीतल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. ही याचिका सुनावणी घेण्यायोग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलानं ही याचिका मागे घेतली.
दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, यावेळी ७५ रुपयांचं नवं नाणं जारी करण्यात येणार आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, ग्रामविकास तसंच पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या माध्यमातून जालना, नांदेडसह जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतल्या गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश जारी करण्यात येतील असं महाजन यांनी सांगितलं.
****
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं हा उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं काल शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यावेळी उपस्थित होते.
जनतेची कामं लवकरात लवकर होण्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील राहील, असं आश्वासन देताना मुख्यमंत्री म्हणाले,
Byte…
आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागत होतं, पण मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं, की का आपण लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आणि मग या यंत्रणेचा वापर या सर्वसामान्य लोकांना झाला पाहीजे. आपलं सरकार आल्यानंतर २८ प्रलंबित सिंचनाच्या योजनांना आपण सुप्रमा दिला. सहा लाख हेक्टर जमिन या निर्णयामुळे ओलीताखीली येणार आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीची इतर अवजारे वितरीत करण्यात आली. पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांनी शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्न वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथंही शासन आपल्या दारी या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली थेट मिळत आहे. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असं आवाहन बनसोडे यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशेवर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त, राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करावं, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मुंबईहून रायगड इथं सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला राज्यपालांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभियान सुरु करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, पुरातत्व आणि इतिहास यांचा समन्वय साधला जाणार आहे. आज सकाळी सात ते दहा या वेळेत हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन आणि चित्रकला शिबिर घेण्यात येईल. तर संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत, सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर यशवंत जाधव आणि समुहाचं “पोवाडा गायन”, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, आणि वेरुळ लेणींच्या वास्तुकला आणि कलाकुसर यावर आधारित, सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता आणि त्यांच्या महागामी नृत्य समूहाचा “नृत्यांकन”- हा कार्यक्रम होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात वीज जोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. शेतीसाठी रोहित्र तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसंच जळालेली रोहित्रं तात्काळ बदलण्याच्या सूचनाही, त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात यावे, तसंच शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बोगस बि-बियाणं, खते, किटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास, कृषि केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयाचं लोकार्पण सावंत यांच्या हस्ते काल झालं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलतांना सावंत यांनी, राज्यातली आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी रुग्णालयांना आकस्मिक भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतल्याचं सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, महाविकास आघाडीचे जयकुमार जैन यांची, तर उपसभापती म्हणून, संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी एक- एकच अर्ज आल्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी कुमार बारकुल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
****
औरंगाबादमध्ये आजपासून ३१ मे पर्यंत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीनं हा महोत्सव होत असल्याचं, सभापती राधाकिशन पठाडे यांनी सांगितलं. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या आंबा महोत्सवाचं उद्धाटन होईल, अधिक माहिती देताना पठाडे म्हणाले...
Byte…
हा आंबा महोत्सव २७/०५ ते ३१/०५ असं, त्यात पुढे काही वाढवायचं ठरलं शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या नुसार आपण एक दोन दिवस पुढेही वाढवू शकतो. आणि कोकणामधून येणारे, देवगड, रत्नागिरी, चिपळूण या भागातून सर्व शेतकरी याठिकाणी स्वत:चा पिकवलेला आंबा, घेऊन येणार आहेत. पणन मंडळाकडे जे नोंदणीकृत केलेले शेतकरी आहेत. असेच या महोत्सवात भाग घेणार होते. परंतू मिटींगमध्ये असं ठरलं की, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा पिकवत असेल किंवा स्वत:च्या मळ्यातला आंबा असेल तर ते पण या महोत्सवामध्ये भाग घेवू शकतील, त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात गाळयुक्त शिवार मोहीमेअंतर्गत सिंचन प्रकल्पातला गाळ काढण्याची कामं पूर्ण करण्याची सूचना, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध जलसंधारण कामांचं नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत काल त्या बोलत होत्या. शेतकरी, लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा गाळ काढावा, तसंच तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात यावा असंही त्यांना यावेळी सूचित केलं.
****
उस्मानाबाद हा जिल्हा केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित जिल्हा जाहीर केला असून, जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याबाबत माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
Byte..
यामध्ये १९१ तीव्र कुपोषित म्हणजे सॅम आणि एक हजार ५१९ मध्यम कुपोषित म्हणजे मॅम तर सर्वसाधारण श्रेणीतील एक लाख १३ हजार ७९४ बालकं आढळून आली आहेत. यातील एक हजार ७१० बालकांची आरोग्य विभागामार्फत स्वंतत्र पथकाव्दारे जून मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणीमध्ये आढळून आलेल्या आजारी तीव्र कुपोषित सॅम श्रेणीतील बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करुन उपचार केले जाणार आहेत. गंभीर वैद्यकीय दोष आढळलेल्या बालकांना संदर्भ सेवा देऊन वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करुन, अंतिम फेरी गाठली. गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २३३ धावा केल्या. शुभमन गिलनं ६० चेंडूत १२९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १८ षटकं दोन चेंडुत १७१ धावांवर सर्वबाद झाला.
****
परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं, बेरोजगारांसाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत, आज पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं आहे.
****
माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीदिनानिमित्त लातूरसह राज्यभरात अभिवादन सभा तसंच विविध कार्यक्रम काल घेण्यात आले. लातूरमध्ये निवळी इथल्या विलास सहकार��� साखर कारखान्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ७३ जणांनी रक्तदान केलं. लातूर तालुक्यातल्या मौजे वासनगाव ग्रामपंचायतीत, विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीनंही विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्यसरकारचा निर्णय
स्थानिकांच्या इच्छेविरोधात बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही-उद्धव ठाकरे यांचा इशारा 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्या कोकणासंदर्भातल्या भूमिकेवर टीका 
देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये आज वैद्यकीय प्रवेशासाठीच्या 'नीट' परीक्षेचं आयोजन
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई
रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच्याकडून जालना रेल्वे स्थानकाची पाहणी
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सची प्रतिस्पर्ध्यांवर मात
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काल पासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बारसू मधल्या स्थानिकांच्या इच्छेविरोधात तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल महाडमध्ये जाहीर सभेत बोलत होते. हा प्रकल्प कोकणाच्या भरभराटीसाठी आणायचा असेल,तर ती तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला, ते म्हणाले…
‘‘जर तो प्रकल्प आणायचा असेल कोकणाच्या भरभराटीसाठी तर तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, तुम्ही सगळे आमच्या कार्यकर्त्यांना आणी तिथल्या भूमीपुत्रांना तडीपाऱ्या लावताय, जिल्हाबंदी लावताय, आणी उद्या सांगताय रिफायनरी आल्यानंतर नोकरी मिळेल.. आज जिकडे बंदी करताय, तिकडे रिफायनरी आल्यानंतर प्रवेश तुम्ही कसा देणार आहात.. प्रकल्प तर मी होऊ देणार नाहीच, जो पर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याचा मनाविरुद्ध हे सगळं चाललंय.. तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसू मध्ये उतरेल.’’
तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित असलेल्या सोलगावला उद्धव ठाकरे यांनी काल भेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना, बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला गैरसमजातून पत्र लिहिलं होतं, ती अंतिम भूमिका नव्हती असा खुलासा केला. बारसूचा तेलशुद्धीकरण प्रकल्प गुजरातला न्यावा आणि गुजरातला गेलेले वेदांत, एअरबससारखे प्रकल्प परत महाराष्ट्रात आणण्याचं आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिलं.
कॉग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आपल्या समर्थकांसह उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
****
कोकणवासियांबद्दल लोकप्रतिनिधींना शून्य आपुलकी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते काल रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत होते. गोवा मुंबई महामार्गाचं काम गेल्या सोळा वर्षांपासून रखडलं असून, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम चार वर्षांत पूर्ण होऊन जनतेसाठी खुला झाल्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. बारसू संदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी, कोकणात जमिनींचा व्यापार होत असल्याची टीका केली. बारसू इथं कातळशिल्पांच्या परिसरात रिफायनरी होणं शक्य आहे का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक विकास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली. आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी काल रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला. तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनात तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं.
****
विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये गेल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते काल कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी, बारसू इथं व्हावी असं पत्र द��ऊन सुचवलं होतं. मात्र आता ते या प्रकल्पाला विरोध करत असल्याचं केसरकर म्हणाले.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट आज देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रा पूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा यंदा एक महिना लवकर सुरु होणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात सुरु होणारा हा पालखी सोहळा यंदा मात्र जून महिन्यातच पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता गृहीत धरुन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाय योजना करण्याचे निर्देश पुणे जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
राज्यात काल कोरोनाच्या १७६ नव्या रुग्णांचं निदान झालं, यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर ४८७ रुग्ण काल कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात एक हजार ८७६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातले फक्त ११५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. काल ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ११ आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी काल जालना इथं रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पीटलाईन आणि इतर कामांचा आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुकुंदवाडी तसंच करमाड रेल्वे स्थानकालाही भेट देऊन निरीक्षण केलं. करमाड इथं मालधक्का करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मालधक्का आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी परिसरातल्या अनेक उद्योजकांची तसंच जालना इथं पोलाद उद्योग प्रतिनिधींची सरकार यांनी काल भेट घेतली.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत काल विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 'स्वच्छ सर्वेक्षण २०२३' अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी काल राज्यभरातील मुलांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. या वन्यप्राणीगणनेत ३३ वाघ आणि १६ बिबट्यांसह अस्वलं, रानगवे, विविध प्रकारची हरणं, वानरं, मगरी, सायाळ अशा एकूण तीन हजार २३ प्राण्यांची नोंद करण्यात आली.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
लातूर जिल्ह्याचा पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यासाठी काल कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी काल अनुभवी व्यक्तींचं म्हणणं ऐकून नोंदी घेतल्या. सोयाबीन हे प्रमुख पीक असलेल्या जिल्ह्यात सोयाबीनचे हब व्हावं, जिल्ह्यात चंदन, अश्वगंधा या सुगंधी औषधी वनस्पतींचं प्रमाण मोठं आहे, त्यासंबंधी युवकांना प्रशिक्षण द्यावं, औसा, उदगीर किल्ला, हत्तीबेट आदी पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं निर्धारित २० षटकात ८ बाद १३९ धावा केल्या. चेन्नईनं १७ षटकं आणि ४ चेंडूत ४ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.
दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सात गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं प्रथम फलंदाजी करत १८२ धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्ली संघानं सतराव्या षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ते साध्य केलं.
या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
****
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बिंदियारानी ने रौप्यपदक पटकावलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत बिंदियारानीने ५५ किलो वजन गटात १९४ किलो वजन उचललं.
****
फिडे आणि टेक महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी पहिली जागतिक बुद्धिबळ लीग दुबईमध्ये होणार आहे. दुबईतले भारताचे वाणिज्य दूत डॉ. अमन पुरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातली सर्वात मोठी आणि फ्रँचायझी-आधारित ही बुद्धिबळ स्पर्धा २१ जून ते २ जुलै दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ६ खेळाडूंचा समावेश असलेल्या ६ संघांमध्ये सामने होणार आहेत.
****
महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात काल दिल्ली पोलिसांनी ७ तक्रारदार कुस्तीपटूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. कुस्तीपटूंच्या वकिलांच्या उपस्थितीत त्याचं जबाब नोंदवण्यात आले. जबाब नोंदवताना या तक्रारदारांनी वेगवेगळ्या घटना सांगितल्या. परंतु, शोषण नेमके कधी झाली ती तारीख कुणाच्याही लक्षात नव्हती. लवकरच पोलीस कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांचा देखील जबाब नोंदवून घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर चिकलठाणा परिसरात सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अहमदनगर इथल्या एका युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघं जन जखमी झाले. माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
सर्वोच्च न्यायालयानं नपुंसक म्हटलं हा राज्याचा अपमान - अजित पवार यांची टीका.
राज्य सरकारनं राजीनामा द्यावा - नाना पटोले यांची मागणी.
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारविरुद्ध निर्णय दिलेला नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आणि
एआयएमआयएम आणि भारतीय जनता पक्षामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव - अंबादास दानवे यांचा आरोप.
****
सर्वोच्च न्यायालयानं या सरकारला नपुंसक सरकार म्हटलेलं आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का, असा प्रश्न विधान सभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. हा सरकारचा कमीपणा नाही का, आपण अधिवेशन काळात दररोज या संदर्भात आवाज उठवत होतो, असंही त्यांनी या संदर्भात नमूद केलं.
****
राज्य सरकारनं तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आज केली. राज्यातल्या भारतीय जनता पक्ष प्रणित शिंदे सरकारच्या नऊ महिन्यांतल्या कारभारानं राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असल्याचा आरोप त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत. सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार नपुंसक असल्याचे ताशेरे ओढले आहेत. न्यायालयानं ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त केला आहे, असं पटोले म्हणाले. सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार खुलेआम गुंडगिरी करतात. गृहमंत्र्याच्या घरात कुख्यात माफीयाचा हस्तक राजरोस वावरतो तरी पोलीस यंत्रणा, गृहमंत्र्यांना त्याची खबर लागत नाही, अशी टीका त्यांनी केली. माजी मंत्री, आमदार यांच्यावर हल्ले होतात तरीही त्याची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार करतो तरी त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोपही पटोले यांनी केला.
****
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारविरुद्ध निर्णय दिलेला नाही, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दिली आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले –
सॉलिसिटर जनरल साहेबांनीही इतर राज्यांमध्येही काय काय होतंय आणि कसं महाराष्‍ट्रालाच पिन पॉईंट करण्याचा प्रयत्न होतोय हे लक्षात आणून दिल्यानंतर एक जनरल स्टेटमेंट सगळ्यांबद्दल त्यांनी केलेलं आहे की राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतंय की कुठेही राज्य सरकारच्या विरूद्‌ध निर्णय दिलेला नाही. कुठेही कंटेम्पट सुरू केलेला नाही. जाणीवपूर्वक कुठलं तरी वाक्य एखादं काढायचं आणि त्या सदंर्भात बोलायचं, मला वाटतं हे जे बोलतायत त्यांना न्यायालयाची कारवाई समजत नाही. न्यायालय काय म्हणतंय हे देखील समजत नाही आणि त्यामुळे हे लोकं असं बोलतायत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशानं सातत्यानं उच्च आर्थिक वृद्धी दर साध्य केला असून कोविड काळातही सगळ्या समस्या योग्य पद्धतीनं हाताळल्या असल्याचं केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज जी -२० समुहाच्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यसमुहाच्या बैठकीत ते बोलत होते. भारत अनेक विकसित आणि विकसनशील देशांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तसंच जागतिक व्यापारासाठी केंद्र सरकार सुक्ष्म आणि लघू उद्योगांच्या एकत्रितकरणावर भर देत असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं.
****
मुंबई-गोवा महामार्गाचं काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि यामुळं कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे या संदर्भातल्या प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ झाला, त्यावेळी गडकरी बोलत होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
श्रीरामनवमी आज ठिकठिकाणी भक्तीभावात साजरी करण्यात येत आहे. जालना शहरासह जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जुना जालना परिसरातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात तसंच नवीन जालन्यातल्या श्रीराम मंदिरातही विविध धार्मिक क्रार्यक्रम सुरू आहेत. या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असून येथे श्रीरामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पैठण इथंही आज रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. नाशिक इथं पंचवटी परिसरातल्या श्री काळाराम मंदिरात भाविकांनी आज मोठी गर्दी केली. शिर्डी इथं साईबाबा देवस्थानात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धुळे शहरात श्रीराम मंदिरात आज राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. वाशिम, सोलापूर, पंढरपूर इथंही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
****
पत्रकार शिवीगाळ, धक्काबुक्की प्रकरणात अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयानं आज संपूर्ण प्रकरण रद्द केलं आहे. तसंच अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स उच्च न्यायालयानं रद्द केले आहेत. वर्ष २०१९ मध्ये सलमान खान अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना पत्रकार अशोक पांडे यांनी त्याचं चित्रीकरण केलं. हे चित्रीकरण त्यानं `यू ट्यूब`वर अपलोड करण्यासाठी केलं होतं. ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाला आवडली नाही. त्यामुळं सलमान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकानं त्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, अशी तक्रार या पत्रकारानं पोलिसांकडे केली होती.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड - नांदेड रस्त्यावर ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात आज एका सात महिन्यांच्या बालिकेसह पाच मजुरांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मुदखेड शहरातून निघालेल्या या रिक्षातून दहा जण कामासाठी नांदेडला येत होते. मुगट शिवारा जवळ समोरुन आलेल्या ट्रकने रिक्षाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघातामुळं मुदखेड नांदेड मार्गांवरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन गटांमध्ये झालेला वाद आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आज या भागात शांततेचा संदेश देत ऐक्याची मिरवणूक काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेतली तसंच नागरिकांना एकोप्यानं सण साजरे करण्याचं आवाहन केलं. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या प्रकणात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन -एआयएमआयएम आणि भारतीय जनता पक्षाला दोष दिला आहे. पोलिस रोखठोक भूमिका घेण्यात कमी पडल्याची टीकाही त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले –
मागच्या महिनाभरापासून लोक बोलत होते. मी सुद्धा चारदा पोलिसांना बोललो, कमिशनरांना बोललो. परंतु मला असं वाटत त्याची दखल घेतली गेली नाही. जातीय विद्वेश स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी याठिकाणी होत आहेत. आणि पोलिस कमीशनर सुद्धा याबाबती सुस्पष्टपणे रोखठोक भूमिका घेण्यास कमी पडले असं मी समजतो. परंतू या दंगलीला एमआयएम आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे त्यांचे मित्र हे जबाबदार आहेत, हे मी जबाबदारीनं सांगतो.
 [$724C5F1E-4B7D-49FE-A362-A346742C390A$Ambadas Danve Byte for 30.03.2023 - Ambadas Danve Byte for 30.03.2023 - ]
****
छत्रपती संभाजीनगर मधील तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी त्यात तेल ओतण्याचा प्रयत्न करु नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ते आज पुण्यामध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन धर्मात तेढ आणि तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात प्रशासन कमी पडले. संपूर्ण राज्यात यापद्धतीचे तणाव निर्माण करण्याचा कट काही लोकांचा आहे. असा तणाव छत्रपती संभाजीनगर मध्ये होईल असं खाजगीत असंख्य लोकं कुजबुजत होते. पोलिस प्रशासनानं यासंदर्भात अधिक लक्ष घालून दोन धर्मात कटूता निर्माण होणार नाही. याची काळजी घेण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केलं.
****
नांदेड जिल्ह्यातील किनवट इथून आज आनंदाचा शिधा वितरणाला प्रारंभ करण्यात आला. पात्र गरजूंना याचा विशेष लाभ होणार असल्याचं प्रतिपादन आमदार भिमराव केराम यांनी यावेळी केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज- जनरल मनोज पांडे यांचं प्रतिपादन.
मकर संक्रांतींचा सण आज देशभरात पारंपरिक उत्साहानं साजरा
औरंगाबाद इथल्या विवेकानंद महाविद्यालयात उद्यापासून ‘विवेकानंद व्याख्यानमाला’.
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं श्रीलंकेसमोर ३९१ धावांचं लक्ष्य.
****
चीन-भारत यांच्या दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रतिपादन सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज केलं. भारतीय सैन्याच्या स्थापना दिनानिमित्त कर्नाटकच्या बेंगळुरू इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मागील महिण्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. त्याठिकाणी कठीण प्रदेश आणि खडतर हवामान असूनही, आपले शू��� जवान तिथं तैनात आहेत. त्यांना सर्व प्रकारची शस्त्रं, उपकरणं आणि सुविधा पुरेशा प्रमाणात पुरवल्या जात असुन स्थानिक प्रशासन, इतर एजन्सी आणि लष्कराच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पायाभूत क्षेत्रात सुधारणा झाल्याचंही ते यावेळी म्हणाले.
****
नेपाळमध्ये काठमांडूहून पोखरा इथं जाणाऱ्या विमानाला आज सकाळी झालेल्या अपघातात किमान ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. येति कंपनीच्या या विमानात ६८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत ६३ मृतदेह बाहेर काढले आहेत. पोखरा विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना ही दुर्घटना झाली.
****
हवामान बदलाचा परिणाम डोंगरांप्रमाणेच समुद्रकाठच्या शहरांवरही होण्याची शक्यता असून ही शहरं पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याची भीती भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोच्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. उत्तराखंडात जोशीमठ इथली जमीन गेल्या काही दिवसांत वेगानं खचत असल्याचं इस्रोच्या उपग्रह पाहणीतून समोर आलं आहे. मानवाकडून केल्या जाणाऱ्या विविध कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतं आहे. यासंदर्भात पावलं उचलली नाहीत, तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल, असा इशारा इस्रोच्या या संशोधन अहवालातून दिला आहे.
****
जी-ट्वेंटी परिषदेच्या अनुषंगानं पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाची पहिली बैठक उद्या आणि परवा पुण्यात होत असून, त्यासाठी पुणे शहर सज्ज झालं आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग या बैठकीचं यजमानपद भूषवेल, तर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवतील. या परिषदेत सात सत्रांमध्ये पायाभूत सुविधांशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. विविध देशांमधल्या प्रमुख मान्यवरांच्या सहभागाच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनानं यासाठी सर्व तयारी केली आहे.
****
केंद्र सरकारच्या वतीनं नाशिक जिल्ह्यात निफाड इथं ड्रायपोर्ट उभारण्यात येणार आहे या संदर्भात आज लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौर यांनी निफाड इथं नियोजित जागेची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्गाचं काम करणाऱ्या लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनी बरोबर जेएनपीटी हे काम करणार आहे.
****
मकर संक्रांतींचा सण आज देशभरात पारंपरिक उत्साहानं साजरा करण्यात येत आहे. सूर्याच्या मकर संक्रमणाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. देशाच्या विविध भागांमध्ये मकर संक्रांती विविध नावांनी आणि स्वरुपात साजरी केली जाते. दक्षिण भारतात पोंगल, पंजाबमध्ये लोहरी आणि गुजरातमध्ये उत्तरायण म्हणूनही हा सण साजरा केला जातो.
आज संक्रांतीनिमित्त महिलावर्गाची विशेष लगबग दिसून आली. मातीच्या सुगड्यांमध्ये विविध भाज्या, ऊसाचे कांडे, बोरं आणि तीळगूळ भरून, ही वाणं देण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच मंदिरांमध्ये गर्दी केली. औरंगाबादसह ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये देवीला पहिलं वाण देण्यासाठी महिलांनी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर मंदिर परिसरात महिलांनी परस्परांना वाण देऊन संक्रांतीचा सण साजरा केला.
हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं नागनाथ मंदिरात महिलांनी विठ्ठल रुखमाई मंदिरात रांगा लावून रखुमाईला वाण देत मकर संक्रांतीच्या सण उत्साहाने साजरा केला.
औरंगाबाद इथल्या गुलमंडी परिसरात मकरसंक्रांतीनिमित्त शिवसेनेच्या वतीनं पतंग महोत्सव घेण्यात आला. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी या पतंग मोहत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींनी पतंग उडवले. यावेळी शहरातील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास नागरिक आप्तस्वकीय आणि मित्रवर्गाच्या घरी जाऊन तीळगूळ वाटप करत परस्परांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत.
****
भरडधान्यांमध्ये असलेली पौष्टिकता मानवी आरोग्यासाठी गरजेची असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केलं आहे. २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगर जिल्ह्यातल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात पौष्टिक भरडधान्य दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी भरडधान्याचं उत्तम बीज आणि अधिक उत्पादनशील वाण यावर संशोधन होणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त करत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे हवामान बदलाचा सामना आपण करु शकतो असंही ते म्हणाले.
****
औरंगाबाद इथल्या विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात उद्यापासून तीन दिवसीय ‘विवेकानंद व्याख्यानमालेला’ सुरुवात होणार आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते उद्या सायंकाळी सहा वाजता होणार आहे. उद्घाटनानंतर पहिले पुष्प ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे सदस्य कुमार केतकर गुंफणार आहेत. ‘बदलते विश्व’ या विषयावर ते भाष्य करणार आहेत. १७ जानेवारी रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं ‘स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर शेवटचं व्याख्यान १८ जानेवारीला डॉ. रवींद्र कोल्हे यांचं होणार आहे. ‘मेळघाटातील प्रबोधन पर्व’ या विषयावर ते व्याख्यान देतील. ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी सहा वाजता महाविद्यालयाच्या परिसरात होणार असल्याचं प्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे यांनी सांगितलं आहे.
****
तिरुवअनंतपुरम इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेसमोर ३९१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या ११६ आणि विराट कोहलीच्या नाबाद १६६ धावांच्या बळावर भारतीय संघानं पाच बाद ३९० धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा ४२ तर श्रेयस अय्यर ३८ धावांवर बाद झाले. केएल राहुल सात तर सूर्यकुमार यादव चार धावा करून तंबूत परतले. अक्षर पटेल दोन धावांवर नाबाद राहिला.
****
हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड संघात सामना होणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरवात होईल. भारतानं या स्पर्धेत स्पेनसोबत झालेला पहिला सामना जिंकला आहे.
****
मुंबईत आज ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३’ स्पर्धा घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघालेल्या या शर्यतींमधील विविध प्रकारांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेत सुमारे ५५ हजारांहून अधिक धावपटू यात सहभागी झाले. या शर्यतींमधील विजेत्यांना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-राजूर मार्गावर आज सकाळी स्कुटी आणि बैलगाडीच्या अपघातात पोलीस मुख्या���यात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ, असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून, या अपघातात गाडी चालवत असलेला त्यांचा मुगलाही जखमी झाला आहे. ढोबाळ या भोकरदन तालुक्यातल्या इब्राहिमपूर या मूळ गावाहून जालना इथं कर्तव्यावर हजर होण्यासाठी येत असताना ही दुर्घटना घडल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरात आजपासून २६ जानेवारीपर्यंत महानगरपालिकेच्या वतीनं नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांसाठी गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी सुक्ष्म नियोजन करावं, आशा सुपरवायझर यांनी सर्व आशा वर्कर्स यांची बैठक घेऊन लसीकरण बळकटीकरण साठी प्रयत्न करणे, बालरोग तज्ञ असोसिएशनने गोवर उद्रेक भागात पालकांमध्ये लसीकरणा बाबत जनजागृती करावी, एकही बालक गोवर रुबेला लसीकरणा पासून वंचित राहता कामा नये असे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी संबंधितांना दिले आहेत.
****
0 notes