जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण मेळाव्यात पालकंंत्र्यासह खासदार,आमदारांना डावलले
सीईओसह प्रकल्प संचालकांवर लोकप्रतिनिधी हक्कभंग आणणार काय?
गोंदिया, दि.28ः जल जीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, पंचायत विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद गोंदिया यांच्या समन्वयाने दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण व संकल्प मेळाव्याचे आयोजन सकाळी 9वाजता न्यू ग्रीनलण्ड लान, बालाघाट रोड गोंदिया येथे करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून…
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
मंदिरं आणि तीर्थस्थळं ही देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा-पंतप्रधानांचं प्रतिपादन.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचं येत्या शुक्रवारपासून पुण्यात कामकाज.
सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा यासाठी मराठी नागरिकांनी आग्रही राहावं-साहित्य संमेलनाचा मतप्रवाह.
आणि
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंडसमोर ३९९ धावांचं लक्ष्य.
****
मंदिरं आणि तीर्थस्थळं ही फक्त धार्मिक महत्त्वाची स्थळं नसून, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आसाममध्ये गुवाहाटी इथं जाहीर सभेत बोलत होते. ही देवस्थानं पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त बनवणारी केंद्रं असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. या कार्यक्रमात एकंदर ११ हजार ५९९ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.
****
राज्यात २२ हजार शिक्षकांची भरती होणार असून त्यात खासगी अनुदानित शाळांमधील नऊ हजार तर उर्वरित जवळपास १३ हजार पदभरती जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांसाठी होणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के तर खासगी अनुदानित शाळांमध्ये ८० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. खासगी अनुदानितसह जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पदभरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे. खासगी शाळांना एका रिक्त जागेसाठी तीन उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे तर जिल्हा परिषदांच्या शाळांवरील शिक्षकांची निवड गुणवत्तेनुसार थेट होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज येत्या शुक्रवारी ८ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू होत आहे. हे कामकाज १२ फेब्रुवारीपर्यंत चालेल. या काळात आयोगाकडून विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी विविध जणांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधीज्ञ प्रकाश आंबेडकर, एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या हर्षाली पोतदार आणि पुण्याच्या विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आलं आहे. कोरेगाव भीमा इथं जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचारासंदर्भात ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे.
****
संत परंपरेतील आद्यपीठ संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढं कायमस्वरूपी निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुंबई�� वर्षा निवासस्थानी या वारी संदर्भात आढावा बैठकित ते बोलत होते. त्र्यंबकेश्वर इथं या सोहळ्याचं नियोजन करतांना प्रशासनानं याला नाशिक इथं २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून या सोहळ्याकडं पाहावं असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
****
युवक-युवतींमध्ये जो उत्साह आहे; त्याच उत्साहानं गडचिरोली जिल्हादेखील विकासाच्या वाटेवरुन धावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज गडचिरोली इथं पोलिस दलाच्या महा मॅरेथॉन रॅलीत बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते यांच्यासह अनेक नेते या मॅराथॉनमध्ये सहभागी झाले. दरम्यान, पोलिस अधिकारी आणि अंमलदारांच्या प्रस्तावित निवासस्थानांचं भूमिपूजनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
धुळे इथंही आज पोलीस दल आणि प्रशासकीय कार्यालयांच्या वतीने धुळे मॅरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी आज अभूतपूर्व प्रतिसाद नोंदवला.
****
भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. या अभियानात धाराशिव जिल्ह्यातील भाजपाचे एक हजार २०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक गावापर्यंत प्रवास करून नवमतदार, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक यासह गावातील सर्व प्रमुख घटकांशी याअंतर्गत संवाद साधला जाणार आहे.
छत्रपती संभाजी नगर इथं पूर्व मतदार संघातून या अभियानाला प्रारंभ झाला दुपारच्या वेळेस रेणुका माता मंदिर एम 2 इथून मध्य मतदारसंघांमध्ये प्रारंभ झाला. साडेचार वाजता कांचनवाडी पैठण पैठण रोड परिसरातून गाव चलो अभियानाला सुरुवात झाली. या अभियानात केंद्रीय राज्य अर्थ मंत्री भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, सहभागी झाले
****
सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा यासाठी मराठी नागरिकांनी आग्रही राहावं, असं मत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यक्त झालं आहे. या संमेलनात आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली 'अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का ?' या विषयावर अभिरूप न्यायालय चालवण्यात आलं. न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांनी तर शासनाच्या वतीने वकिल म्हणून डॉ नीलम गोऱ्हे यांनी काम पाहिलं. डॉ. गणेश चव्हाण, प्रा.एल.एस.पाटील, मराठी भाषा विभागाचे संचालक श्यामकांत देवरे यांनी साक्षीदार म्हणून आपली मतं मांडली.
सानेगुरूजी यांचं साहित्य तसंच महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद झाला पाहिजे अशी अपेक्षा साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने व्यक्त केली आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
दरम्यान, या संमेलनाचा आज समारोप होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचीही आज प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या सादरीकरणाने सांगता होणार आहे. या महोत्सवात आज प्रसिद्ध अभिनेत्री तसंच नृत्यांगना उर्मिला कानेटकर आणि वैदेही परशुरामी यांचं सादरीकरणही होणार आहे.
अंबाजोगाई इथल्या गुणीजन संगीत महोत्सवाचा आज अमान अली बंगश आणि अयान अली बंगश यांच्या सरोद वादनाने आज समारोप होत आहे.
****
संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीचं औचित्य साधून आज नांदेड इथं राज्यस्तरीय संत नामदेव साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. सचखंड गुरुद्वारा इथून सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरवात करण्यात आली. श्री गुरु ग्रंथ साहिब भवन यात्री निवास इथं मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचं लक्ष्य दिलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव २५५ धावात आटोपला. आजच्या खेळात रोहीत शर्मानं १३, यशस्वी जैस्वाल १७, श्रेयस अय्यर २९ तर रजत पाटीदारनं ९ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या एक बाद ६७ धावां झाल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला आणखी ३��२ धावांची गरज असून सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडे तीनशेव्या राज्यभिषेक वर्षानिमित्त पालघर इथं महासंस्कृती महोत्सव आणि महानाट्याचं आयोजन करण्यात येणार आहे. ७ ते ११ फेब्रुवारी पर्यंत या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात शाळा महाविद्यालयांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, मोडी लिपीतील पत्रांचे प्रदर्शन, तसंच ऐतिहासिक दुर्मिळ वस्तूंचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे.
****
नाशिक रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेल्वेची प्रतीक्षा करताना वाचनाचा आनंद घ्यावा यासाठी छोटं पुस्तक घर सुरू करण्यात आलं आहे. रेल्वे स्थानकावरील पहिल्या क्रमांकाच्या फलाटावर सुरू करण्यात आलेल्या या पुस्तक घरामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकं उपलब्ध आहेत. या पुस्तकांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, वाचन झाल्यानंतर रेल्वेत बसण्याआधी ही पुस्तकं पुन्हा पुस्तक घरात ठेवणे आवश्यक आहे.
****
नांदेड तालुक्यातील बळीरामपूर इथले रहिवासी शहीद महेंद्र बालाजी अंबुलगेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं शोकाकूल वातावरण आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र अंबुलगेकर यांना अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना ३१ जानेवारी रोजी सायंकाळी वीरमरण आलं होतं.
****
नांदेड जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशिक्षणाद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौशल्यवर्धन करणार आहे. यासाठी मुंबईच्या आयआयटी आहारशास्त्र विभागानं हेल्थ स्पोकन ट्युटोरियल कोर्स तयार केला असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
नाहटा जिला चिकित्सालय में ओपीडी काउंटर और पुलिस चौकी का लोकार्पण।
नाहटा जिला चिकित्सालय में ओपीडी काउंटर और पुलिस चौकी का लोकार्पण।
विधायक स्थानीय क्षेत्र विकास योजनान्तर्गत नाहटा चिकित्सालय में मुख्य पार्क स्थल में पुलिस चौकी ओ पी डी काउंटर शैड आदि निर्माण कार्य का लोकार्पण समारोह मुख्य अतिथि पचपदरा विधानसभा विधायक मदन प्रजापत द्वारा फीता काटकर किया गया।
इस अवसर पर बालोतरा पंचायत समिति प्रधान भगवत सिंह जसोल पि एम ओ गहलोत ,बलराज सिंह, पूर्व सभापति रतन खत्री, जसोल सरपंच ईश्वर सिंह चौहान जसोल, नगर परिषद प्रतिपक्ष नेता महबूब भाई सिंधी, पार्षदो सहित सैकड़ो गणमान्य लोग मौजूद रहे।
15 अगस्त की हार्दिक शुभकामनाए समस्त क्षेत्र वासियों को
नगर परिषद बरघाट अध्यक्ष (श्रीमति इमरता साहू ), उपाध्यक्ष (श्रीमति ममता अनिल पाठक ), मुख्य नगर परिषद अधिकारी, एवं समस्त नगर वासियो को 77वे स्वतन्त्रता दिवस की हार्दिक शुभकामनाए
ग्राम पंचायत साल्हे खुर्द (गुर्रा) अध्यक्ष, सरपंच , सचिव एवं समस्त ग्राम वासियो को 77वे स्वतन्त्रता दिवस की हार्दिक शुभकामनाए
ग्राम पंचायत टिकारी (खूंट) सरपंच , सचिव एवं समस्त ग्राम वासियो को 77वे स्वतन्त्रता दिवस की…
आजादी के 77 वें अमृत महोत्सव स्वतंत्रता दिवस के अवसर पर राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय रंगपुर में सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन रखा गया कार्यक्रम का शुभारंभ झंडारोहण व मां सरस्वती की पूजा अर्चना कर कार्यक्रम का शुभारंभ किया कार्यक्रम में मुख्य अतिथि रतन लाल मीणा , अध्यक्षता प्रदेशाध्यक्ष उपभोक्ता कांग्रेस राजस्थान विजय पंडित , विशिष्ट अतिथि जिला परिषद सदस्य मुकेश वर्मा , सी.ई.ओ गिरीश अग्रवाल, प्रदेश महासचिव अजय शर्मा, पूर्व जिला परिषद सदस्य पूजा मेघवाल, बनवारी केवट, रेनू राजावत, रामनारायण मालव, देवकरण मालव, डैनी केवट, डालचंद शर्मा, भंवरलाल मालव, चंद्र प्रकाश मालव, अमरलाल केवट, सरपंच नाथू लाल मेघवाल, लाडपुरा विधानसभा अध्यक्ष उपभोक्ता कांग्रेस राजस्थान जगन्नाथ मीणा आदि रहे इस मौके पर बाल विवाह मुक्त भारत एनजीओ उदयपुर की कोऑर्डिनेटर प्रियंका व राजकुमार द्वारा सभी विद्यार्थियों ग्राम वासियों को शपथ दिलाई गई की बाल विवाह जैसी कुरीति को जड़ से मिटाने की शपथ दिलाई विजय पंडित ने अपने उद्बोधन में कहां आज के बालक बालिकाएं कल के भविष्य है और उनका भविष्य शिक्षकों के हाथों में है शिक्षा के साथ साथ उनको नैतिक शिक्षा का ज्ञान भी होना चाहिए आजादी का मतलब जब तक सार्थक नहीं होगा जब तक इस देश से छुआछूत जैसी कुरीति जड़ से समाप्त नहीं होगी इस मौके पर प्राचार्य जितेंद्र शर्मा द्वारा सभी अतिथियों को का सम्मान वह आभार व्यक्त किया गया कार्यक्रम का संचालन हरिशंकर गुप्ता ने किया
लोकतंत्र उद्घोष
बड़नगर।। ग्राम भाटपचलाना में आजादी की अमृत महोत्सव मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत पौधारोपण ,ध्वजारोहण , सैनिकसम्मान ,कलश पूजा ,प्रभात फेरी आदि का आयोजन ग्राम पंचायत द्वारा सोनामा घाट मंदिर परिसर पर किया गया जिसमें सरपंच गिरजा कुंवर भानु प्रताप सिंह ,जनपद सदस्य रौनक जैन ,जन अभियान परिषद ब्लॉक समन्वयक श्रीमती रेणुका श्रोत्रिय ,पर्यावरणविद और पत्रकार मोहन सिंह सोलंकी पंच शहजाह बी…
ग्रामीण भागातील शाळांमध्ये अंधाराचे साम्राज्य,व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे,
दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी आपल्या कानावर पडली.आपले मायबाप सरकार ग्रामीण भ���गातील शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे,हे आपण सारे आजवर अनुभवत आलो आहोत.ग्रामीण भागातील शांळामध्ये पुरेसे शिक्षक नाहीत,वर्गखोल्या नाहीत,विद्यार्थ्यांना पिण्यासाठी धड पाणी नाही,मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत.इ.समस्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाचवीला पूजल्या आहेत.यंदाचे हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष आहे.गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रात देशाने सर्वांगीण प्रगती केली.विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात आपण जी कामगिरी केली,त्याचे दृष्यपरिणाम आपण काल अनुभवले.आपले चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राकडे झेपावले.पुढच्या महिन्यात ते चंद्रावर उतरेल असा अंदाज आहे.आपल्या शास्त्रज्ञानी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.आज आपली अनेक मुलं इस्रो व अमेरिकेच्या नासा अंतराळ संशोधन केंद्रात महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
हे सांगण्यामागचा उद्देश असा कि ही जी सर्वांगीण प्रगती साध्य होण्यामागे केवळ शिक्षण ही एकमेव व्यवस्था आहे.पण ती अधिक सक्षम व्हावी,यादृष्टीने गेल्या ७५ वर्षात सरकारकडून प्रामाणिकपणे प्रयत्नच झाले नाहीत.शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकडे प्रत्येक सरकारने लक्ष दिले,ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र कायम उपेक्षित राहिला.२१ व्या शतकात आता ग्रामीण भागही कात टाकू लागला आहे.पण त्यास योग्य ती गती मिळालेली नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थी,शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी कसाबसा धडपडतोय,पण सरकारकडून त्याला मदतीचा हात पुढे करण्यात येत नाही.
पालघर या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्यामुळे महावितरणने खंडित केला.सुमारे ७५ लाख रु.चे बिल थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.या बिलापोटी सरकार जे अनुदान देते ते २०१९ पासून देण्यात आले नाही,असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.लाखो कोटी रु.चे अंदाजपत्रक असलेले आपले राज्य सरकार ७५ लाख रु.देऊ शकत नाही,ही बाबच मुळात शरमेची आहे.हे केवळ पालघर जिल्ह्यातच अस घडलं नाही तर इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.पुणे-७९२,सातारा-३१३,जळगाव-२४८,कोल्हापूर-१४८ एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही वर्षात विजेची बिले भरली नाहीत,म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.याव्यतीरिक्त अन्य जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.मंत्रालय व मंत्र्यांचे बंगले याची कोट्यवधी रु.ची वीजबिले वेळेवर भरणारे सरकार शाळांची वीजबिले भरत नाही,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.उन्हाळ्यात या मुलांची काय अवस्था झाली असेल,याची कल्पनाही करवत नाही.एकीकडे खोक्याचा वारेमाप वापर सुरू असताना,आमदार,खासदार मंत्र्यांना वीजबिलात भरमसाठ सवलती दिल्या जातात तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र घामाघूम होत शिकतोय,हे चित्रच मुळात आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
आजही अनेक जिल्हा परिषद शाळांना स्वतःच्या मालकीच्या वास्तू नाहीत,अनेक शाळांमध्ये वर्गखोल्या नसल्यामुळे शिक्षक एकाच वर्गात दोन इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात.अपुरा शिक्षक वर्ग,वर्गखोल्या नाहीत,वीजपुरवठा खंडित,अशा स्थितीत मुलं शिकणार कशी ? यावर एकाही सरकारने आजवर उपाययोजना करणे टाळले.त्यामुळे ग्रामीण भागात साक्षरतेचा वेग आता मंदावला आहे.विद्यार्थ्यांची गळती,हे फार मोठे संकट असून ते रोखण्यासंदर्भात राज्य शासनाचे शिक्षण विभाग संवेदनशील नाही,ही खऱ्या अर्थाने दुर्देवाची बाब आहे.दुसरीकडे खाजगी शाळांचे पीक मात्र जोमात आले आहे.जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहेत तर दुसरीकडे खाजगी शाळा बेडकासारख्या फुगत चालल्या आहेत.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था का होतेय ? याचा विचार होण्याची गरज आहे.विजबिलापोटी देण्यात येणारे अनुदान रोखणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत,अशांना हुडकून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.गावागावात शिक्षण समित्या कार्यरत आहेत.या समित्यांच्या सदस्यांनी गावातील सरपंच व ग्रामसेवकाना थकीत वीज बिलसंदर्भात जाब विचारायला हवा होता.वास्तविक पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या स्थानिक सदस्यांनी या ज्वलंत समस्येचा आजवर पाठपुरावा केला असता तर अशी नामुष्कीची पाळी आली नसती.
एकीकडे आपण चंद्रावर पाय ठेवण्यासाठी अब्जावधी रु.खर्च करतो,तर दुसरीकडे शाळांची विजबिले वर्षानुवर्षे भरत नाही,याची सांगड कशी घालायची ? जी अवस्था जिल्हा परिषद शाळांची तीच अवस्था आश्रमशाळा व अंगणवाड्याची आहे.मग अस वाटत कि चंद्रावर जाण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च कशासाठी ? आज २१ व्या शतकात ग्रामीण भागातील जनतेला कुपोषणमुक्त जीवन,पाणी,
शिक्षण,आरोग्य व दोन वेळचे जेवण,यासाठी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागत आहे.हे विदारक चित्र बदलण्याचे कोणी प्रयत्न केले नाहीत,आणि पुढेही होतील,असे वाटत नाही.पालघर जिल्ह्यात विक्रमगड म्हसेपाडा या आदिवासी पाड्यावरील चिमुकली वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडते,हे कसले लक्षण आहे.या व्यवस्थेला आपण प्रगल्भ लोकशाही व्यवस्था म्हणावे का ? मंत्र्यांच्या दालनावर सरकार वर्षाकाठी हजारो कोटी रु.खर्च करत असते,पण ग्रामीण भागातील शाळांची विजबिले भरण्यास टाळाटाळ करते.या व्यवस्थेत सुधारणा होईल," सबका साथ,सबका विकास," ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल,अशी शक्यता नाही.आपण महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत.आपला देश,आत्मनिर्भर व डिजिटल इंडिया होण्याच्या मार्गावर आहे,असा डिंगोरा सतत पिटला जातो,पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात वास्तव काय आहे ? यावर सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे.आजवरच्या प्रत्येक सरकारचा केवळ शहरी भागावर फोकस राहिला,त्यांना खरा " भारत खेड्यात," आहे,हे महात्मा गांधी यांचे म्हणणे कधीच पटले नाही.त्यामुळे पाच ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची आपण जी स्वप्ने पाहत आहोत,ती व्यर्थ आहेत.ग्रामीण भागातील निरक्षरता कायमची नष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी दमदार पावले उचलत नाही,तोवर ग्रामीण भागातील तरुणाईला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार नाही.
सतना। जनपद पंचायत क्षेत्र के ग्राम पंचायत पालदेव अंतर्गत के पास इस्थित कटनी में विधायक मद से स्वीकृत पांच लाख रुपए की लागत से सामुदायिक भवन का भूमि पूजन चित्रकूट विधायक नीलांशु चतुर्वेदी ने किया तत्पश्चात नारी सम्मान योजना कार्यक्रम के तहत एनएसयूआई के कार्यकर्ता आलोक तोमर एवं युवा मोर्चा कांग्रेश के अध्यक्ष केके मिश्रा एवं चित्रकूट नगर परिषद के पूर्व अध्यक्ष मोहन शर्मा, पालदेव सरपंच पति ऐडवोकेट…
#मिशन_सुरक्षा_परिषद ब्रेकिंग न्यूज-------------------------🌷 श्री चन्द्रबोस यादव जी बनें मिशन सुरक्षा परिषद बिहार राज्य के जनपद नालन्दा के जिला सलाहकार। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 बिहार राज्य के जनपद नालन्दा के युवा समाजसेवी श्री चन्द्रबोस यादव जी को प्रदेश सचिव प्रभारी जहानाबाद जनपद मा.श्री दीपक कुमार उर्फ मानस जी के अनुमोदन पर राष्ट्रीय अध्यक्ष युवा प्रकोष्ठ एवं प्रभारी बिहार,छत्तीसगढ़ एवं पश्चिम बंगाल राज्य मा.श्री चन्द्रहास यादव जी एवं राष्ट्रीय सचिव सह प्रभारी बिहार राज्य मा.श्री किरण देव यादव जी एवं प्रदेश अध्यक्ष बिहार राज्य मा.श्री संजय मुखिया जी द्वारा मिशन सुरक्षा परिषद बिहार राज्य के नालन्दा जनपद का जिला सलाहकार बनाया गया हैं। श्री चन्द्रबोस यादव जी को हार्दिक बधाई। 🌹🌹🌹🌹 1-विनोद कुमार पासवान प्रदेश अध्यक्ष युवा प्रकोष्ठ। 2-श्रीमती ललिता कुमारी प्रदेश अध्यक्ष महिला प्रकोष्ठ। 3-प्रो.दिलीप राज कुशवाहा प्रदेश अध्यक्�� पिछड़ावर्ग प्रकोष्ठ। 4-विनोद कुमार यादव सरपंच प्रदेश महासचिव प्रभारी सहरसा प्रमण्डल। 5-संजय शर्मा प्रदेश महासचिव प्रभारी मुंगेर प्रमण्डल। https://www.instagram.com/p/CpE203DSR-D/?igshid=NGJjMDIxMWI=
आपदा प्रबंधन एवं सहायता विभाग मंत्री श्री मेघवाल के जन्मदिन पर पूगल में आयोजित हुआ वृहद रक्तदान शिविर -750 यूनिट रक्त हुआ संग्रहित
बीकानेर, 20 जनवरी। आपदा प्रबंधन एवं सहायता विभाग मंत्री श्री गोविंदराम मेघवाल मेघवाल के जन्म दिवस के अवसर पर शुक्रवार को पूगल में विशाल रक्तदान शिविर आयोजित हुआ।पूगल पंचायत समिति प्रधान गौरव चौहान, पूर्व प्रधान और भूदान बोर्ड सदस्य सरिता चौहान के नेतृत्व में आयोजित शिविर में खाजूवाला एवं पूगल क्षेत्र के सरपंच, पंचायत समिति एवं जिला परिषद सदस्यों सहित बड़ी संख्या में ग्रामीणों ने भाग लिया।…
गोरेगाव, दि.19 : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत जानाटोला ते भंडगा दरम्यान आज शुक्रवारला सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया निवासी श्रीचंद रोहडा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Death in a car accident
श्रीचंद रोहडा हे तालुक्यातील कुऱ्हाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच या क्षेत्रातूनच ते जिल्हा परिषदेचे सदस्य बहुजन समाज पक्षाच्यावतीने राहिले. त्यांच्या निधनाने…
सर्व शाळांमध्ये सिनियर आणि ज्युनियर केजीचे वर्ग सुरू करण्याचा राज्यसरकारचा निर्णय
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात;शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्री
चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारकडून खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात
औरंगाबाद इथं राज्य कामगार विमा आयुक्तालय दोनशे खाटांचं सुसज्ज रुग्णालय उभारणार
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
आणि
स्कॅश विश्वचषक स्पर्धेत भारत प्रथमच उपान्त्य फेरीत दाखल
सविस्तर बातम्या
शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्ग अर्थात सिनियर आणि ज्युनियर केजीचे वर्ग सुरू केले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यात आलं असून, दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेलं एकच पुस्तक आणयचं असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
****
नवीन शैक्षणिक वर्षाला कालपासून सुरुवात झाली. राज्यभरात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला.
औरंगाबाद शहरात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प, मिठाई देऊन स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्या दिवशी करावयाच्या कार्यवाही संदर्भात शिक्षण विभागानं दिलेल्या निर्देशानुसार सकाळी शाळेच्या परिसरात गीत, घोषणाबाजी करत प्रभातफेरी काढण्यात आली. तसंच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
शहरालगत नारेगाव इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शाळा काल उत्साहात सुरू झाल्या. सर्व शाळांमध्ये सजावट करुन विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.
धुळे शहरासह जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्येही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
सोलापूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुलाबाची फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.
नाशिक इथं विद्यार्थ्यांची घोड्यावर मिरवणूक, ढोलताशांचा गजर, शाळेच्या प्रांगणात काढलेल्या रांगोळ्या अशा प्रसन्न वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
****
राज्यात साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यातले शेतकरी, ऊस वाहतूकदार तसंच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. तसंच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं. राज्यातल्या ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला, शेतमाल शहरात आणि विविध परिसरात सहजपणे पोहचतो. यासाठी, वाहतूक परवाना आणि अनुषंगिक बाबींसाठी पणन विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
पालघर इथं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी मेळावा झाला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Byte…
अतिशय उदंड असा प्रतिसाद शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मिळतोय. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी विद्यार्थी तरूण हे सगळे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय. सर्वसामान्यांचा आयुष्यामधे चांगले दिवस आणणे हाच आमचा उद्देश आहे. यापूर्वी देखील सहा - सात ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झाले. हा एक दिवसाचा कार्यक्रम नाहीये. आत्तापर्यंत जवळपास ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपला शासन पोहचलेलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती दिली.
****
राज्यातलं शिंदे - फडणवीस सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. नंदुरबार इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते काल बोलत होते. हर सरकार जनतेचा पैसा जाहिरातबाजीवर खर्च करत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केलं.
****
राज्यात काही समाज कंटकांकडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून, यामुळे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्यानं या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या सर्व घटनांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी, त्यांनी या पत्रात केली आहे.
****
भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाअंतर्गत डब्ल्यू - 20 कार्यगटाची तिसरी बैठक काल चेन्नईनजीक महाबलिपूरम इथं सुरू झाली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी डब्ल्यू-20 प्रतिबद्धता गटाचं निवेदन जारी केलं. लिंगाधारित डिजिटल तफावत दूर व्हायला हवी, तसंच गरीब आणि आदिवासी समुदायांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करणारा भाषेशी संबंधित भेदभाव दूर व्हायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, जी - 20 कृषी मंत्र्यांची बैठक काल हैदराबाद इथं सुरु झाली. कृषी क्षेत्रातल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला हवं, आणि यासाठी जी - 20 हे योग्य व्यासपीठ असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. ते काल या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. पीक विविधतेसाठी धोरण आखणं आणि हवामान बदलाशी सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवं असं ते म्हणाले.
****
ग्राहकांना परवडणाऱ्या दरात खाद्यतेल उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारनं खाद्यतेलांवरचं मूलभूत आयात शुल्क कमी केलं आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं याबाबतचा आदेश जारी केला होता. त्यानुसार रिफाईन्ड सोयाबीन तेल, आणि रिफाईन्ड सूर्यफूल तेलावरचं मूलभूत आयात शुल्क कालपासून साडे सतरा टक्क्यावरून साडेबारा टक्के करण्यात आलं आहे. हा दर ३१ मा��्च २०२४ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे किरकोळ विक्रीचे दर कमी व्हायला मदत होईल.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२१ चा अंतिम निकाल काल जाहीर झाला. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद चौगुले हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम, सोनाली म्हात्रे महिलांमधून, तर विशाल यादव मागासवर्ग उमेदवारांमधून प्रथम आले आहेत.
****
औरंगाबाद इथं राज्य कामगार विमा आयुक्तालय यांच्याकडून कामगार रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून, त्यामध्ये वाढीव दोनशे खाटांचं सुसज्ज रुग्णालय सुरू होणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं आहे. काल औरंगाबाद इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. या रुग्णालयासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने तातडीनं जागा उपलब्ध करून द्यावी, आणि राज्य शासनाकडे रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना कराड यांनी यावेळी केल्या.
****
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतनं भारताच्याच लक्ष्य सेनचा २१-१७, २२-२० असा पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं हाँगकाँगच्या अँगस एनजी कालाँग याचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला तैवानच्या ताईत्झू-यिंगकडून २१-१८, २१-१६ असा पराभव पत्करावा लागला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या स्कॅश विश्वचषक स्पर्धेत भारत पहिल्यांदाच उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. ब गटातल्या काल झालेल्या सामन्यात भारतानं जपानचा तीन - एक असा पराभव केला. उपान्त्य फेरीत भारताचा सामना मलेशियासोबत होणार आहे.
****
बिपरजॉय चक्रीवादळ काल रात्री गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्रच्या किनाऱ्याला धडकून पुढे सरकलं, त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. ताशी १४५ किलोमीटर वेगानं धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे. किनारपट्टीच्या भागातून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हे वादळ उद्या दक्षिण राजस्थानमध्ये पोहोचेल. त्यामुळे तिथे हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सखल भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
संपूर्ण देशभरात येत्या २३ जून पासून मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. २३ जूनपासून मध्य भारत तसंच महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनची सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
****
राज्य सरकारनं गायरानधारकांना जमिनी सोडण्यासंदर्भात बजावलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीसाठी लाल बावटा शेत मजूर संघातर्फे काल औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं. राज्यातल्या दोन लाख २२ हजार १५३ गायरान धारकांना गेल्या सहा महिन्यांपासून या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये गायरान जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून घर मंजूर झाली आहेत त्यांना बेघर करु नये, सुमारे तीस ते चाळीस वर्षांपासून जमिनी कसणाऱ्यांना शेती करू द्यावी, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
****
नांदेड रेल्वे विभागात काल आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विभागीय रेल्वे व्यवस्थापन नीति सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रेल्वे फाटकांवर जनजागृती अभियान राबवण्यात आलं. नगरसोल, आदिलाबाद, परभणी आणि पूर्णा रेल्वे स्थानकाजवळच्या फाटकांवर नागरीकांमध्ये पत्रकांद्वारे जनजागृती करण्यात आली. तसंच उद्घोषणा प्रणालीद्वारे मुदखेड - परभणी सेक्शन मधल्या नागरीकांचं समुपदेशन करण्यात आलं.
****
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहकांना महावितरणने टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, मिस कॉल आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार याच पर्यायांद्वारे करावी, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाद्वारे करण्यात आलं आहे. मिस कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी शून्य २ २ - ५० ८९ ७१ शून्य शून्य हा क्रमांक असून, महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
****
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये नांदेडमधल्या इंग्रजी माध्यमाच्या काही नामांकित निवासी शाळांत शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पालकांनी येत्या ३० तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असं आवाहन नांदेडच्या समाज कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
रामटौरिया बस स्टैंड चौराहे पर महारानी अहिल्याबाई होल्कर जी की प्रतिमा का क्षेत्रीय विधायक ने किया अनावरण
रामटौरिया बस स्टैंड चौराहे पर महारानी अहिल्याबाई होल्कर जी की प्रतिमा का क्षेत्रीय विधायक ने किया अनावरण
क्षेत्र के रामटौरिया बस स्टैंड चौराहे पर इंदौर की महारानी अहिल्याबाई होलकर जी की जन्म जयंती के उपलक्ष्य पर प्रतिमा का अनावरण मध्य प्रदेश राज्य नागरिक आपूर्ति निगम अध्यक्ष एवं विधायक प्रधुम्न सिंह लोधी के द्वारा किया गया है।
इंदौर की रानी अहिल्याबाई होलकर आज भी किसी परिचय की मोहताज नहीं है इतिहास गवाह है कि उन्होंने देशभर में अलग-अलग स्थानों पर कई मंदिरों, घाटों का निर्माण कराया था।
रानी अहिल्या बाई होल्कर भारत की उन प्रमुख महिला शासिकाओं में से हैं। जिन्होंने अपना राज्य स्वयं संभाला अहिल्याबाई होल्कर मराठा रानी थीं, और उनकी प्रशासन क्षमता और राज्य को चलाने की योग्यता अद्भुत थी।
बुधवार की शाम करीबन 4 बजे पाल समाज के युवाओं के द्वारा माता अबार माता मंदिर प्रांगण से प्रारंभ होकर रामटौरिया तक बाइक रैली निकाली गई रैली में करीब 200 सौ मोटरसाईकल थी।
सभी बाइकों पर भगवां ध्वज एवं आगे आगे डीजे पर धार्मिक भजन चलते रहे पीछे पीछे युवा महारानी अहिल्या बाई जी के जयघोष करते चले जा रहे थे।
मध्यप्रदेश के खाद्य नागरिक आपूर्ति निगम अध्यक्ष व कैबिनेट मंत्री दर्जा प्रद्युम्न सिंह लोधी करीबन 5 बजे कार्यक्रम में पहुंचे जहां उनके द्वारा मां अहिल्या बाई होलकर जी की प्रतिमा का पूजन अर्चना कर विधि विधान से अनावरण किया गया। तत्पश्चात क्षेत्रीय विधायक के द्वारा मंचीय उद्वोधन में मां अहिल्या बाई होलकर जी के जीवन पर प्रकाश डालते हुए रामटौरिया बस स्टैंड का नाम करण करते हुए कहा गया है कि भविष्य में बस स्टैंड बनाया जाएगा उस नवीन बस स्टैंड का नाम मां अहिल्या बाई होलकर दिया जाएगा। इसी बीच क्षेत्रीय विधायक के द्वारा कहा गया है कि जल्द से जल्द नगर घुवारा में भी मां अहिल्या बाई होलकर जी प्रतिमा स्थापित की जाएगी।
इस आयोजन का मंच का संचालन मंजू राजा ने किया।
कार्यक्रम में मुख्य अतिथि क्षेत्रीय विधायक प्रद्युम्न सिंह लोधी, भाजपा मंडल अध्यक्ष पहलवान सिंह, घुवारा नगर परिषद अध्यक्ष प्रतिनिधि अभय प्रताप सिंह, सरपंच बबली आदिवासी, पूर्व सरपंच गजाधर लोधी,पवन शुक्ला,टिकू गोस्वामी, जिला पंचायत सदस्य लखन अहिरवार, वरिष्ठ नेता तुलसीराम लोधी, सासंद प्रतिनिधि टीकाराम लोधी,मबई सरपंच हेमराज लोधी, पाल महासभा जिला उपाध्यक्ष किशोरी पाल,श्याम पाल (मूर्तिकार) ब्रजेश पाल,बिहारी लाल प्रजापति, मुन्ना पाल, कल्लू पाल, बाबू पाल, गोर्वधन पाल,भागीरथ पाल, रूपेंद्र पाल भगवाँ, भगवानदास पाल, सुरेंद्र पाल, इन्द्रपाल पाल,लखन पाल, राकेश पाल, महेंद्र पाल सहित सैकड़ों की संख्या में पाल समाज के अलावा अन्य समाज मौजूद रहे।
Rewari News: श्रीराम के जयघोष के साथ हिंदुओ ने निकाली भगवा यात्रा, पुष्ष वर्षा से हुआ स्वागत
Rewari News: श्रीराम के जयघोष के साथ हिंदुओ ने निकाली भगवा यात्रा, पुष्ष वर्षा से हुआ स्वागत
रेवाडी: विश्व हिंदू परिषद ने बजरंग दल के सहयोग से गीता जयंती व शौर्य दिवस के उपलक्ष्य में बाइक से भगवा यात्रा निकाली। श्रीराम के जयघोष के साथ यात्रा अनाजमंडी स्थित शिव मंदिर से चलकर शहर के सर्कुलर रोड से होती हुई बस स्टैंड स्थित हनुमान मंदिर पर जाकर समाप्त हुई।
यात्रा में विहिप व बजरंग दल के अलावा सर्वसमाज के हजारों लोग शामिल हुए। चांदावास के सरपंच सुनील कुमार बतौर मुख्यातिथि रहे। रास्ते में…
करौली: विजयपुरा के राजकीय अस्पताल में 6 महीने से नहीं डॉक्टर, मरीज परेशान
करौली: विजयपुरा के राजकीय अस्पताल में 6 महीने से नहीं डॉक्टर, मरीज परेशान
सूरौठ, करौली: गांव विजयपुरा के राजकीय प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में पिछले 6 माह से एलोपैथिक डॉक्टर नहीं होने के कारण चिकित्सा व्यवस्था बाधित हो रही है। इस संबंध में जिला परिषद सदस्य भूपेंद्र सिंह सोलंकी ने करौली जिला मुख्य चिकित्सा एवं स्वास्थ्य अधिकारी से विजयपुरा के राजकीय अस्पताल में एलोपैथिक डॉक्टर लगाने की मांग की है।
जिला परिषद सदस्य भूपेंद्र सोलंकी एवं ग्राम पंचायत विजयपुरा के सरपंच…