टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या ऐवजी राहुल गांधी ओपनिंग बॅट्समन करणार, टीव्ही अँकरचा व्हिडिओ व्हायरल
टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या ऐवजी राहुल गांधी ओपनिंग बॅट्समन करणार, टीव्ही अँकरचा व्हिडिओ व्हायरल
T20 विश्वचषक टीम इंडिया: टी २० विश्वचषक तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे विरोधात आता सलामीवीर रोहितसह विजयी मैदानात उतरणार अशा चर्चा रंगत आहेत. यावरून उत्तर देत अलीकडेच रोहित शर्माने के. एल राहुलच सलामीवीर असेल असे सांगितले होते. पण तरीही विजयाचा सुधारित फॉर्म शेवटच्या शेवटच्या क्षणी रोहित भिन्न विचार मांडणी अशी सुरुवात आहे. या चर्चांमध्ये भारतातील एका हिंदी वृत्तवाहिनीवर मात्र…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाकीत.
काँग्रेसचे २२ आमदार फुटण्यासंदर्भातील वक्तव्य मागे घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी.
कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशानं राज्य शासन काम करत असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना.
शालेय पोषण आहार योजनेचं राज्यातही प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं नामकरण.
आणि
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा श्रीलंकेवर चार गडी राखून विजय, ऑस्ट्र��लिया स्पर्धेबाहेर.
****
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे. मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्ते आणि नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं. राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही मोठमोठ्या घोषणा करत आहेत. यावरून राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं मनिषा कायंदे यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
दरम्यान, सत्ताधारी गटानं मात्र मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपले कार्यकर्ते टीकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्याचं काम सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून केलं जात असल्याचं सांगितलं. एकूण परिस्थिती पाहता शिवेसेनेचं आढावा घेण्याचं काम सुरू आहे. जनतेत काम करणारी मंडळी कोणीच शिल्लक राहिलेली नसल्यामुळे शिवेसना आता द्विधा मनस्थितीत असल्याचं ते म्हणाले.
****
काँग्रेसचे २२ आमदार फुटणार आणि ते भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेले वक्तव्य मागे घेतलं आहे. माजी खासदार खैरे यांनी न्यायालयाच्या निर्णयानं शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यास सरकार कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपद कायम राहावं यासाठी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवण्यात आहे आहेत, असा दावा केला होता.
या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर खैरे यांनी महाविकास आघाडीमध्ये नाराजी नको म्हणून आपण शब्द मागे घेत असल्याचं सांगितलं. यासोबतच काँग्रेस दुखावली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असंही ते म्हणाले.
****
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अत्यंत कमी, अवघं ३१ पूर्णांक ७४ शतांश टक्के एवढं मतदान झालं आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत.
****
राज्य शासन कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काम करीत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९सावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सपत्नीक सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात सरन्यायाधीश लळीत यांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री शिंदे यांनी न्यायालयीन कामकाज अधिक गतीनं आणि पारदर्शकपणे व्हावं असा त्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
आमच्याकडे जेव्हा जेव्हा कॅबिनेटमध्ये विषय येतात त्यावेळेस, मग नवीन न्यायालय असू द्या, त्याच्यासाठी लागणारी सामग्री, नवीन नवीन पदं असू द्या, क्षणाचाही विलंब न लावता आमच्या उच्च न्यायालयाकडून आलेल्या सगळ्या सूचना असतात, त्याचं पालन तातडीनं सरकार करत असतं. शेवटी न्यायदानामध्ये पारदर्शकता आणि त्याचा निपटारा जो आहे तो लवकर लागला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, हीच भावना सरकारची आहे. कायद्याच्या अंमलबजावणीतून न्यायाधीश सुदृढ लोकशाही निर्माण करू शकतात हा विश्वास बाळगणारे श्री लळीत सर हे देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये एक नवे सुवर्ण पान लिहतील असा देखील आपल्या सर्वांनाच विश्वास आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळीत, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिरातून कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळणार असुन त्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी होईल. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. ते आज शिर्डी इथं राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा या शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. केंद्रातील मोदी सरकार प्रत्यक्ष काम करतांना भेदाभेद करुन महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवून नेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असलेले पवार डॉक्टरच्या सल्ल्यामुळे या शिबिरात सविस्तर मार्गदर्शन करु शकले नाहीत. सुरूवातीला काही वेळ बोलून त्यांचं उर्वरित भाषण पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.
****
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारणार असल्याचं राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये कामगार विभागाच्या बैठकीत ते आज बोलत होते. औरंगाबाद विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसंच अन्य कार्यालयाची जागा, विभागातील रिक्त पदं, प्रलंबित प्रकरणं डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मार्गी लावावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कामगार नोंदणी आता फक्त १ रुपयांमध्ये होणार असून ई-श्रम कार्डची नोंदणी वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करावं तसंच औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीनं कारखान्यांचे निरीक्षण वेळेच्या वेळी पूर्ण करावं आणि कामगारांच्या वैद्यकिय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
शालेय पोषण आहार योजनेचं नामकरण केंद्र सरकारप्रमाणेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू आहे. केंद्र सरकारनं या योजनेचं नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं करुन २०२१-२६ या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारनही या योजनेच्या नावात बदल केला आहे. देशातील जवळपास ११ लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होत आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी - ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सिडनी इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ बाद १४१ धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लंडनं १९ षटकं आणि चार चेंडुत सहा बाद १४४ धावा करत विजय संपादन केला. या विजयासोबत इंग्लंडनं ��पांत्य फेरीत प्रवेश केला असून ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाद झाला आहे.
उद्या भारत आणि झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड तसंच पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामने होणार आहेत.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम ५८ टक्के पूर्ण झालं असून पुढील वर्षाखेरपर्यंत ते पूर्णत्वास जा��ल असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्मारकासाठी सर्व परवानग्या काढल्या असून यासाठी झाडांची कत्तल करणार नसल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण यावेळी एका चित्रफितीद्वारे करण्यात आलं.
****
उस्मानाबाद शहरात आज भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओम राजेनिंबाळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील आदीं उपस्थित होते. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला जात असल्याचं नानासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितलं. या यात्रेची शहरात पाच किलोमीटर पदयात्रा झाल्यानंतर मदिना चौकात सांगता झाली.
****
जालना शहरात आज भ्रष्टाचार निर्मूलन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीनं दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या प्रशिक्षणार्थी सैनिकांसह, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
****
मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट परिसरातील दुकानांना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत परिसरातील २० ते २५ दुकाने जळून खाक झाली.
****
0 notes
टी २० विश्वचषकापूर्वीच लागणार भारतीय संघाची कसोटी! ऑस्ट्रेलिया अन् दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
टी २० विश्वचषकापूर्वीच लागणार भारतीय संघाची कसोटी! ऑस्ट्रेलिया अन् दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
टी २० विश्वचषकापूर्वीच लागणार भारतीय संघाची कसोटी! ऑस्ट्रेलिया अन् दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका पूर्ण झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी टी २० विश्वचषक सुरू होणार आहे.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी टी २० विश्वचकाचे आयोजन करण्यात आले आहे. या विश्वचषकापूर्वीच भारतीय संघाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.…
View On WordPress
0 notes
ICC T20 विश्वचषक 2022 च्या आधी ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे IPL 2022 नंतर पहिल्या दुसर्या मालिकेची घोषणा टीम इंडियाचे संपूर्ण पॅक वेळापत्रक
ICC T20 विश्वचषक 2022 च्या आधी ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे IPL 2022 नंतर पहिल्या दुसर्या मालिकेची घोषणा टीम इंडियाचे संपूर्ण पॅक वेळापत्रक
भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. FoxSports.com.au च्या रिपोर्टनुसार, “ऑस्ट्रेलियाचा संघ झिम्बाब्वे, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारताविरुद्ध तीन T20 सामने खेळणार आहे.” ही मालिका ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी आहे. -नोव्हेंबर. असेल
टीम इंडियाचे खेळाडू सध्या आयपीएल 2022 खेळत आहेत आणि मे अखेरपर्यंत…
View On WordPress
0 notes
India set to play day-night Test in Australia says Reports | ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचे संकेत
India set to play day-night Test in Australia says Reports | ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचे संकेत
[ad_1]
नवीन वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० विश्वचषक हे भारतीय संघासमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच वन-डे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी थांबणार आहे. या दौऱ्यात भारत परदेशातला आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयमधील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
२०१९ वर्षात भारतीय संघाने…
View On WordPress
0 notes
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी दिवस-रात्रीची अपेक्षित : गिलखिस्ट वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पुढी��वर्षी भारतीय क्रिकेटचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात उभय संघांत दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळविला जाईल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍडॅम गिलखिस्टने व्यक्त केली आहे. या प्रस्तावाला भारताकडून दुजोरा मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. 2018-19 च्या दौऱयामध्ये दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळण्याची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताकडे केली होती पण भारताने या प्रस्तावाला नकार दर्शविला होता पण आता या घटनेनंतर वर्षभराच्या कालावधीत भारतीय क्रिकेट संघ कोलकाता येथे 22 नोव्हेंबर रोजी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यात दिवस-रात्री खेळ करण्यास तयार झाला आहे. भारतीय संघाची ही दिवस-रात्रीची पहिली कसोटी ठरणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष सौरभ गांगुली कोहलीच्या संघाला या नव्या प्रस्तवावर विश्वासात घेतील अशी आशा गिलखिस्टने व्यक्त केली आहे. पुढील उन्हाळी मोसमात ऑस्ट्रेलियात आयसीसीची टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात येणार असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्रीचा कसोटी सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करेल अशी आशा गिलखिस्टने ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागातर्फे आयोजिलेल्या समारंभात व्यक्त केली. दिवस-रात्रीचे कसोटी सामने पहावयास मिळावे याची मला अधिक उत्सुकता आहे. याचा कसोटी खेळावर कोणताच विपरित परिणाम दिसून येत नसल्याचे आढळून आले आहे. दिवस-रात्रीच्या कसोटीत गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जात आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 11 कसोटी सामने दिवस-रात्रीचे खेळविले गेले असून त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाच सामने खेळले आहेत. 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दिवस-रात्रीचा पहिला कसोटी सामना खेळविला गेला होता. अलिकडच्या कालावधीत कसोटी सामन्याला प्रेक्षकांच्या उपस्थितीत वाढ होत असल्याचे गिलखिस्टने सांगितले. भारत ऑस्ट्रेलिया तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मलिकेला आजही शौकिनांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे 47 वर्षीय गिलखिस्टने म्हटले आहे. #tarunbhartnews #tbdsocialmedia #India_Australiatestcricket #daynighttest #AdamGilchrist (at New Delhi) https://www.instagram.com/p/B4hQnZMhes9/?igshid=1525htshvmi4u
0 notes
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
ऑस्ट्रेलियामध्ये २०२०मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विश्वचषकांमध्ये १२ संघाचा सहभाग असणार आहे. टी-२० क्रमवारीतील अव्वल आठ संघाना सरळ प्रवेश देण्यात आला आहे. इतर चार संघ पात्रता फेरी खेळून येतील. यामध्ये बांगलादेश आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे.
असं आहे वेळापत्रक –
ऑक्टोबर २४- ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर २४- भारत vs दक्षिण आफ्रिका (पर्थ…
View On WordPress
0 notes
ICC T20 पुरुषांच्या विश्वचषकात मोहम्मद शमीचा संघात समावेश न केल्याने काँग्रेस नेते संतापले, एफबी पोस्टवरून इशारा
ICC T20 पुरुषांच्या विश्वचषकात मोहम्मद शमीचा संघात समावेश न केल्याने काँग्रेस नेते संतापले, एफबी पोस्टवरून इशारा
ICC T20 पुरुष विश्वचषक निवड: आगामी आयसीसी टी २० विश्वचषक २०२ साठी भारतीय संघाची घोषणा होती सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया सुधारत आहेत. निर्णायक संकटे फार वापरत नाहीत अगदी सुरक्षित संघ निवडला पण भारताचा अनेक मातब्बरांना मात्र जागा दिली नाही. मोहम्मद, कुलदीप यादव शमी यांचे म्हणणे समाविष्ट न झाल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यावरून आपले उमेदवार निवडले जात नाहीत, तर…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
भारत सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य अर्थात आभा कार्ड नावाचं डिजिटल हेल्थ आयडी कार्ड सुरू केलं आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार आदी माहिती डिजिटल स्वरुपात साठवली जाते. कार्डधारक व्यक्ती ही माहिती केव्हाही आपल्या मोबाइलवर एका क्लिकवर बघू शकतात. एक वर्षाच्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच 'आभा' हेल्थ कार्ड काढणं शक्य असू,न ते पूर्णतः निःशुल्क असल्याची माहिती प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेच्या विभागानं दिली आहे.
****
दिल्लीमधली हवेची गुणवत्ता गंभीर या श्रेणी प्रकारात राहत असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक ४१९ इतका होता. त्यामुळे दिल्ली सरकारचे ५० टक्के कर्मचारी घरून काम करतील, तसंच खाजगी कार्यालयांनाही त्याचं पालन करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.
****
मुंबईत राजभवनात आज देशाचे सरन्यायधीश उदय लळीत यांचा राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. शिर्डी इथं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. प्रकल्प राज्याबहेर गेल्यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली.
या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी, आगामी निवडणुकांमध्ये विजयी होण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसह अनेक उपक्रमांबाबत त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या बुलडाणा इथल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सात नोव्हेंबर रोजी ही स��ा होणार होती. आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाजवळ सभा होणार असल्यानं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
****
मराठी रंगभूमी दिन आज साजरा होत आहे. मराठी नाट्य परंपरेचे जनक विष्णूद��स भावे यांनी १८४३ मध्ये सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सांगलीत रंगभूमीवर सादर केलं होतं, या घटनेचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
यानिमित्त आज औरंगाबाद इथल्या एमजीएम अभिमत विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात नाट्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक यशवंत देशमुख यांचं व्याख्यान झालं. अभिनय या क्षेत्राकडे पालकांनी करिअर म्हणून पाहावं आणि मुलांना या क्षेत्रात पाठवावं असं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. मराठवाड्यातले असंख्य कलाकार मुंबईत अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी येतात, त्यांना मुंबईत राहण्यासाठी वसतीगृहाची व्यवस्था सुरु करावी अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली.
****
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आज सकाळी शालिमार एक्सप्रेसच्या इंजिनच्या पाठीमागील पहिल्या पार्सल डब्याला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. केवळ पार्सल व्हॅनला आग लागल्याने आणि व्हॅन प्रवासी डब्यापासून तत्काळ तोडण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून, आगीचं कारण समजू शकलं नाही, असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं.
****
घराघरांत आणि गावागावांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचा सांगावा घेऊन परभणी जिल्हा परिषद शिक्षक विनोद शेंडगे यांनी सायकलवर ८२० किलो मीटरची मराठवाडा परिक्रमा केली आहे. औरंगाबाद इथल्या बलवंत वाचानालयात शेंडगे यांच्या यासायकल परिक्रमेचा समारोप काल समारोप झाला. २८ ऑक्टोबरला शेंडगे यांनी परभणीतून परिक्रमेला सुरुवात केली. हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना मार्गे ते काल औरंगाबादेत दाखल झाले.
****
जर्मनीत सुरु असलेल्या हायलो खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतनं ३९ मिनिटं चाललेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा २१ - १३, २१ - १९ असा पराभव केला.
****
टोकियो इथं सुरु असलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सुकांत कदमनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात सुकांतने सिंगापूरच्या ची हिऑंग अन्ग याचा २१ - १०, २१ - १५ असा पराभव केला.
****
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान सामना होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
//**********//
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
मोठ्या प्रमाणात सुधारणा, पायाभूत सुविधा आणि सर्वोत्कृष्ट प्रतिभा यांच्या सहाय्याने आपण न्यू इंडियाचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. संभाव्य गुंतवणूकदारांना आकर्षित करणं आणि पुढील दशकातील विकासाचा आराखडा तयार करणं, हे या परिषदेचं उद्दीष्ट आहे. भारताला प्रगतीच्या दिशेनं पुढे जायचं असेल तर राज्यांनी प्रगती करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षात ८४ अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक भारतात आली असून, जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी संपूर्ण जग भारताकडे आशेनं पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतात ड्रोन तंत्रज्ञान, अंतराळ, संरक्षण क्षेत्रात गुंतवणूकीला चालना दिली जात असून, पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वेगानं काम सुरु असल्याचं ते म्हणाले. या परिषदेमुळे हजारो कोटींची भागीदारी आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
****
मुंबईत चैत्यभूमी इथल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथला स्तूप जीर्ण झाला असून, त्यातल्या बाबासाहेबांच्या अस्थी सुरक्षित राहाव्यात यासाठी या स्तूपाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून दीक्षाभूमी प्रमाणे भव्य स्तूप उभारावा, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापारिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी इथं शासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि नियोजनाच्या आढावा बैठकीत बोलत होते. चैत्यभूमीजवळचा रस्ता १५ फूट अधिक वाढवण्यासाठी आणि या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीनं सीआरझेडच्या परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करू असं आश्वासनही आठवले यांनी दिलं.
****
आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. आतापर्यंत एक जानेवारी, या अर्हता दिनाला किंवा त्याआधी अठरा वर्षं पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत असे. मात्र आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना नोंदणी करता येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आज सकाळी सिन्नर जवळील माळवाडी इथं आग लागली. चालकाने बस मधून धूर निघाल्याचं बघून बस थांबवताच प्रवासी तातडीने बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर ही बस जळून खाक झाली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता माहिती आणि मार्गदर्शन केंद्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलं आहे. विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेणाऱ्या या सत्रासाठी येत्या एक डिसेंबरपासून प्रवेश देण्यात येणार आहेत.
****
बीडमध्ये उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड शहरातल्या गुरुकुल इंग्लिश श���ळेमध्ये होणार्या या मेळाव्यात, औरंगाबाद आणि बीड इथल्या कंपन्या आणि संस्थांकडून मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी महास्वयम या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून उपस्थित रहावं, असं आवाहन, बीडच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केलं आहे.
****
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेश सोबत होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही देशांसाठी हा सामना महत्वाचा आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं सुरू असलेल्या बत्तीसाव्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत काल यजमान महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली असून कोल्हापूरच्या मुलांच्या संघानं आणि विदर्भच्या मुलींनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीत महाराष्ट्राचे किशोर कोल्हापूर विरुद्ध तर महाराष्ट्राच्या किशोरी राजस्थान विरुद्ध लढणार आहेत.
****
देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांनी दिली.
दरम्यान, नाशिक मध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिकचं तापमान १२ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवला आहे.
//**********//
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
दिल्ली- बंगळुरू विमान दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत. दिल्ली विमानतळावरून उड्डाण करताना इंडिगो कंपनीच्या या विमानाच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली. मात्र वेळीच बाब लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. विमानातले १७७ प्रवासी आणि ७ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, हे प्रवाशी दुसऱ्या विमानाने बंगळुरूला रवाना झाले.
****
जागतिक स्तरावरील बदलतं युद्धतंत्र लक्षात घेऊनच अहमदनगर इथल्या आर्मर्ड कोर सेंटर आणि स्कूलमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. या केंद्रातील प्रशिक्षण आणि अन्य युद्धतंत्राविषयी माहिती देण्याच्या हेतूनं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यात ही माहिती देण्यात आली. प्रामुख्यानं रणगाड्याच्या बांधणीपासून ते प्रत्यक्ष युद्धभूमीवरील कारवाईपर्यंतच्या अभ्यासाचा या विशेष प्रशिक्षणात समावेश आहे. अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेचा प्रत्यक्ष युद्धभूमीवर कसा प्रभावी वापर करायचा, याबद्दलही संबंधित रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे.
****
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही तसंच आपण कोणत्याही चौकशीला जाणार नसल्याचं, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबंधित इमारतीच्या परिसरात नेऊन वस्तुस्थिती मांडली. भाजप नेते किरीट सोमय्यांकडून करण्यात येणारे आरोप हा दबाव तंत्राचा भाग असून त्याला आपण बळी पडणार नाही, असंही पेडणेकर म्हणाल्या . मुंबई पोलिसांनी काल पेडणेकर यांची चौकशी केली. त्यांना आजही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ३१ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे. याअतंर्गत ३१ ऑक्टोबरला सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेवून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे उप अधिक्षक मारुती पंडित यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद परिक्षेत्रातील बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात, भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.
****
पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीच्या निमित्तानं दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन श्रीविठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा चार नोव्हेंबर रोजी होत असून यात्रा कालावधीत पंढरपुरात सुमारे आठ ते १० लाख भाविक येण्याची शक्यता आहे
****
अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पानं विकसित केलेली तुरीची दोन वाणं राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आली आहेत. नवी दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या केंद्रीय वाण प्रसार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फुले तृप्ती आणि फुले कावेरी अशी या दोन वाणांची नावं आहेत. ही वाणं अधिक उत्पादनक्षम, लवकर तयार होणारी आणि मर तसंच वांझ रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता विकसित केलेली आहेत. राज्यात खरीप हंगामात तूर हे महत्त्वाचं पीक असून या पिकाखाली असलेल्या राज्यातल्या सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्रामधून सुमारे साडेबारा लाख टन उत्पादन मिळतं.
****
३२ व्या किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला आज सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये प्रारंभ होत आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये राज्यातून महाराष्ट्राच्या संघाव्यतिरिक्त विदर्भ आणि कोल्हापूरचे संघ सहभागी होत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी या स्पर्धांचं उद्घाटन होईल . महाराष्ट्राच्या किशोर गटाचा सलामीचा सामना झारखंड तर किशोरी गटाचा सलामीचा सामना उत्तराखंडबरोबर होणार आहे.
****
फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने पुरुष दुहेरी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत सात्विक ��िराग जोडीने गेल्या वेळच्या विजेत्सर जपानच्या ताकुरा होकी आणि युगो कोबायाशी जोडीचा २३-२१, २१-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. काल अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही सामने पावसामुळे रद्द करावे लागले. या सर्व संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. भारताचा पुढचा सामना उद्या दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
सरकारचा सर्वाधिक भर तरुणांच्या कौशल्य विकासावर असून, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी देशात मोठी मोहीम सुरू असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहिमेचा दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केल्यानंतर ते आज बोलत होते. यावेळी पहिल्या टप्प्यात देशभरातल्या ७५ हजार युवक-युवतींना नियुक्तीची पत्र सुपूर्द करण्यात आली. देशातल्या युवा वर्गासाठी विविध धोरणांना अधिक सोपं बनवलं जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी सरकारद्वारे केल्या जात असलेल्या विविध कामांची यावेळी माहिती दिली. रोजगार उपलब्धतेमुळे भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशा प्रकारे रोजगार योजना राबवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते. लवकरच राज्यात पोलीस दलातल्या १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येत दिवाळीनिमित्त होणार्या भव्य दिपोत्सवात सहभागी होणार आहेत. आयोध्या भेटीत ते भगवान रामलल्लांचं दर्शन घेतील आणि पूजा करतील तसंच रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या जागेची पाहणी करणार आहेत.
****
सरसेना अध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्यासह, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी पुण्यातल्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी - एनडीए मधल्या, हट ऑफ रिमेंबरन्स इथं देशसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या एनडीएच्या माजी विद्यार्थ्यांना आदरांजली वाहिली. यावेळी चौहान यांनी एनडीए मधल्या प्रशिक्षणाचा आढावा घेऊन, सुधारणा आणि संयुक्त उपक्रमांना चालना देण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात हासोरी परिसरात सौम्य भूकंपाच्या नोंदी झाल्या. त्यावर उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आढावा बैठक घेतली. नागरिकांसाठी तात्पुरता निवारा उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी तातडीने आराखडा तयार करून निधी मागणी प्रस्ताव सादर करावा. तात्पुरत्या वर्ग खोल्यां उभारण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारीनी यावेळी दिल्या.
****
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनी वंचित, उपेक्षित तसंच गरजूंसाठी काल दिवाळी साहित्याचं वाटप केलं. दिवंगत मेटे हे दरवर्षी दिवाळी फराळ तसंच आवश्यक साहित्याचं वाटप करत. त्यांची ही परंपरा खंडित होऊ नये, या हेतुने ज्योती मेटे यांनी बीड शहरालगत असलेल्या वस्तीवर दिवाळी साहित्याचं वाटप केलं.
****
दिवाळी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं हुजूर साहिब नांदेड ते हडपसर दरम्यान आणखी एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी २५ तारखेला संध्याकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी नांदेड इथून सुटेल आणि पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, अहमदनगर, दौंड कोर्ड लाईन मार्गे हडपसर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हडपसर इथून २६ तारखेला दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल आणि नांदेडला दुसर्या दिवशी सकाळी साडे चार वाजता पोहोचेल.
****
इजिप्त इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल कनिष्ठ गटात भारताच्या सागर डांगी, वरुण तोमर आणि सम्राट राणा यांच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. तर सागरनं वैयक्तिक रौप्यपदक आणि वरुण तोमरनं कांस्य पदक जिंकलं.
****
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ मध्ये मध्ये उद्या भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे अडीच फूट उंचीवर स्थिर करुन एकूण ४७ हजार १६० घनफूट प्रतीसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
मान्सून काल विदर्भाच्या उर्वरित भागातूनही माघारी फिरला असून, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अजूनही मान्सूनचं अस्तित्व कायम आहे. येत्या ४८ तासात मान्सून संपूर्ण देशाचा निरोप घेईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
0 notes
T20 वर्ल्ड कपसाठी स्टँडबाय लिस्ट बनवल्यानंतर रवी बिश्नोई यांनी गूढ कथा पोस्ट केली | क्रिकेट बातम्या
T20 वर्ल्ड कपसाठी स्टँडबाय लिस्ट बनवल्यानंतर रवी बिश्नोई यांनी गूढ कथा पोस्ट केली | क्रिकेट बातम्या
2022 टी-20 विश्वचषक आता फक्त एक महिना बाकी आहे. सर्व संघ तयारीच्या अंतिम टप्प्यात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन द्विपक्षीय मालिकांसह मेगा स्पर्धेसाठी सज्ज आहे. मुख्य संघातील १५ सदस्यांव्यतिरिक्त, निवडकर्त्यांनी चार स्टँडबाय खेळाडूंचीही घोषणा केली, ज्यात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, अष्टपैलू दीपक चहरफिरकीपटू रवी बिश्नोई आणि टॉप…
View On WordPress
0 notes
"कोणत्याही टप्प्यावर विराटला नकार देण्यासाठी तुम्ही खूप धाडसी व्हाल": ऑस्ट्रेलिया T20I कर्णधार अॅरॉन फिंच | क्रिकेट बातम्या
“कोणत्याही टप्प्यावर विराटला नकार देण्यासाठी तुम्ही खूप धाडसी व्हाल”: ऑस्ट्रेलिया T20I कर्णधार अॅरॉन फिंच | क्रिकेट बातम्या
आरोन फिंच-नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया मंगळवारी मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20I सामन्यात भारताविरुद्ध खेळत असताना मंगळवारी त्यांची T20 विश्वचषक तयारी सुरू होईल. उशिरापर्यंत, फिंचच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजाने अलीकडेच वनडेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये त्याने खेळलेल्या 9 टी-20 सामन्यां��ध्ये फिंचने 247…
View On WordPress
0 notes
BCCI ने 2022 T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या नवीन T20 जर्सीचे अनावरण केले | क्रिकेट बातम्या
BCCI ने 2022 T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या नवीन T20 जर्सीचे अनावरण केले | क्रिकेट बातम्या
टीम इंडियाची नवीन जर्सी T20 विश्वचषक 2022 च्या आधी जारी करण्यात आली आहे.© ट्विटर
बीसीसीआयने रविवारी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांसाठी टी-20 जर्सीचे अनावरण केले. हे अनावरण पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या 2022 T20 विश्वचषक स्पर्धेच्या एक महिना अगोदर आणि भारताच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20I मालिकेच्या दोन दिवस आधी होणार आहे. “तिथल्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यासाठी, हे तुमच्यासाठी आहे.…
View On WordPress
0 notes
ऑस्ट्रेलियाच्या T20 विश्वचषक संघात टीम डेव्हिडचे नाव, डेव्हिड वॉर्नरला भारत विरुद्ध मालिकेसाठी विश्रांती | क्रिकेट बातम्या
ऑस्ट्रेलियाच्या T20 विश्वचषक संघात टीम डेव्हिडचे नाव, डेव्हिड वॉर्नरला भारत विरुद्ध मालिकेसाठी विश्रांती | क्रिकेट बातम्या
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने गुरुवारी आगामी ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. अष्टपैलू टिम डेव्हिड असताना संघात स्थान देण्यात आले आहे आरोन फिंच ऑस्ट्रेलिया आपल्या घरच्या मैदानावर टी-20 विश्वचषक विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी संघाचे नेतृत्व करेल. गेल्या वर्षी, संघाने शिखर लढतीत न्यूझीलंडचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती. 22 ऑक्टोबर रोजी SCG येथे न्यूझीलंड विरुद्ध…
View On WordPress
0 notes