मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिच�� पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोच�� शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्��णालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते. https://www.kaizengastrocare.com/
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
कांदा निर्यातीसाठी किमान मूल्याची अट रद्द-गहू साठवणुकीच्या मर्यादेतही कपात
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव तसंच लातूर दौऱ्यावर
आणि
आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
****
कांदा न���र्यातीसाठीची किमान मूल्याची अट केंद्र सरकारनं रद्द केली आहे. कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी प्रतिटन साडे पाचशे अमेरिकी डॉलर मूल्य मर्यादा होती, ही मर्यादा हटवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारातल्या संधीचा लाभ घेता येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, गव्हाची साठेबाजी तसंच दरवाढ रोखण्यासाठी वितरण व्यवस्थेतले घाऊक तसंच मोठ्या विक्रेत्यांसाठी साठवणुकीची मर्यादा तीन हजार मेट्रिक टनांवरून दोन हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. पुढच्या ३१ मार्चपर्यंत ही मर्यादा लागू असेल.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरं परवडणाऱ्या दरात उभारली जाणार असून, म्हाडाच्या माध्यमातून ती मंजूर केली जाणार आहेत.
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील दोन हजार ३० सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी येत्या १९ सप्टेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याच दिवशी रात्री बारा वाजेच्या आत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा अर्जदारांना करता येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव तसंच लातूर दौऱ्यावर येत आहेत. परांडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडे ११ वाजता मुख्यमंत्र्यांचं लातूर विमानतळावर आगमन होईल, तिथून हेलिकॉप्टरने ते परांड्याकडे प्रस्थान करतील. सायंकाळी सव्वा चार वाजता लातूर मार्गे ते विमानाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. परांडा इथं होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात छत्रपती संभाजीनगर इथं उपोषणास बसलेल्या राजश्री उंबरे यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राजश्री उंबरे यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. वेरूळ इथल्या शहाजी राजे स्मारकाबाबत बैठक घेण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना निर्देश दिले.
****
हिंदी राजभाषा दिवस आज साजरा होत आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या समारंभाचं उद्घाटन होईल. हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्र्यांचं देशाला उद्देशून संबोधन आज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे.
****
अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर हे शहर आता श्री विजयपुरम म्हणून ओळखलं जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. ऐतिहासिक चोल साम्राज्याचा नौदल तळ या ठिकाणी होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक क्रांतिकारक इथं बंदिवासात होते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारचा ध्वज भारतीय भूमीवर प्रथम इथंच फडकावला होता, याकडे शहा यांनी या संदेशातून लक्ष वेधलं आहे.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्यानं, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहिमा राबवण्याचे तसंच फिरती पथकं तैनात करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिले आहेत.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं उद्या धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचंही धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात, हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात तर जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली.
दरम्यान, राहुल गांधी यांना धमकी प्रकरणाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने काल राज्यभर भाजपविरोधात आंदोलन करण्यात आलं. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलतांना, राहुल गांधी यांनी आरक्षण बंदींबाबत कोणतंही विधान केलं नसल्याचा दावा केला.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत माहिती आपण जाणून घेत आहोत. ब्रिटनमध्ये साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत जयश्री काशिद यांनी माहिती दिली:
“मातीच्या मूर्ती लंडनमध्ये मिळतात. त्यातल्या बऱ्याच मूर्ती भारतातून आलेल्या असतात. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने अर्थ समजावून जयश्री दंडवते काकू अनेक वर्षापासून पूजा सांगत आहे. दूरवरुन लोक दर्शनाला येत असल्याने प्रसाद हा जेवणासारखा असतो. पूर्णपणे वर्गणीतून हा उत्सव साजरा केला जातो. लंडनपासून अर्ध्या तासावर असलेल्या साऊतंड सी या समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी एक दिवस स्थानिक प्रशासन परवानगी देते. त्या दिवशी आसपासच्या भागातील शेकडो लोक किनाऱ्यावर जमतात. त्यामुळे भारतातच चौपाटीवर विसर्जन सुरु आहे की काय असं एक क्षण वाटून जातं.’’
****
आशियायी हॉकी चषक अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं आतापर्यंत चीन, जपान, मलेशिया आणि कोरियाला हरवत उपांत्यफेरी गाठली आहे.
****
लष्करात भरतीचं आमिष दाखवून विविध राज्यातल्या शंभराहून अधिक तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या एकाला अहमदनगर इथ अटक करण्यात आली आहे. ही टोळी प्रत्येक युवकाकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये उकळत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं आज सकाळी दहा वाजता उद्घाटन होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा परवा सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं वाळूजनजीक शिवराई फाट्यावर काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दीड महिन्याच्या मुलासह त्याची आई आणि आजीचा समावेश आहे
夜深,暗中戏
歌词大意: 在我怀抱中
歌词大意: 男,君长在我心
(在我心,於彼宝贝)
余但以经验言之
莫如初
所以我希望这会提醒你
当其真,其常也
故无相忘
当汝须我时
唯唯(
而子唯一
谁教我走来
歌词大意: 因君所得
远超人比,呜呼!
如蜜(然)
子之爱 (子之爱) 至于我 (comes over me)
宝贝,我有赖
辄贯之
再尝君蜜(呜呼)
当其刷我时,其如蜜也
汝知糖从来无此甜过
吾为子死之
Crying for ya (泣)
我爱汝
爱君一击动我()
我被你束缚,亲爱的
君不见(每夕)
每一日夜,吾不可待
再尝尝蜜 呜呼!吾不能测 with you honey (吾爱之)
必也
देर रतिहा अंजोर म प्लेइन' होवत हाबे।
अउ मोर बांह के भीतरी जाग जाथे।
लइका तको हमेसा मोर दिल म रइही अउ
(मोर मन म रइही, ओह, बबुआ)
ए मउका म सिरिफ अनुभव ले बोलत हे।
तुँहर पहिली सच्चा प्रेम ले कोनो भी चीज के तुलना नइ करे जा सकय।
त उहें उम्मीद हवय कि एखर ले आप मन ल सुरता होही ।
जब ए ह वास्तविक बर होही त सदा बर होवत हे।
अइसन म हमन ल नइ भूलय।
जब तको मोला चाही।
तभो ले सिरिफ उहां रेहे बर कहे (उह हुह) ।
अ उ अ उ अ उ अ उ अ
जेन मोला दउड़त आत हावय।
'काबर के तको जेन मिले हावय।
तुलना ले बहुत परे हावय, ऊह
अऊ ए ह शहद जइसन ही हवय (हां)
जब तुँहर प्रेम (जब तुँहर प्यार) मोर उपर आथे (मोर उपर आथे)
अरे बबुआ मोला निर्भरता मिल गे हावय।
हमेशा गला घोंटत रिहिस।
अपन शहद के एक अउ स्वाद के खातिर (ऊह)
मोर उपर धोये म शहद जइसे होथे।
तको पता हावय शक्कर कभू अतका मीठा नइ रिहिस।
अ उ म या बर मउत होवत हवय ।
या बर रोवत (रोना)
म लव या हवय ।
तुँहर प्रेम के एक हिट ह मोला प्रभावित करिन (हां)
अऊ मैं तको गला घोंटत हावं, डार्लिंग।
नइ देखत हावय (हर रात)
हर रात अउ दिन म मुश्किल ले इंतजार कर सकत हावं।
शहद के एक अउ स्वाद के खातिर अरे मैं तको शहद के संग मायावी नइ हो सकत (मोला वो पसंद हावय)
'काबर कि ए ह निश्चित हवय ।
A les nits, jugant a la foscor
I despertar-me dins dels meus braços
Noi, sempre estaràs en el meu cor i
(Estigueu al meu cor, oh, nena)
Només estic parlant per experiència
Res es pot comparar amb el teu primer amor veritable
Així que espero que això us recordi
Quan és real, és per sempre
Així que no t'oblidis de nosaltres
Quan em vulguis
Simplement em demanes que hi sigui (uh huh)
I tu ets l'únic
Qui em fa venir corrent
Perquè el que tens
És molt incomparable, ooh
I és com la mel (sí)
Quan el teu amor (quan el teu amor) ve sobre mi (ve sobre mi)
Oh, nena, tinc una dependència
Sempre enfilat
Per un altre tast de la teva mel (ooh)
És com la mel quan m'envaeix
Saps que el sucre mai va ser tan dolç
I em moro per tu
Plorant per tu (plorant)
T'estimo
Un cop del teu amor em va afectar (sí)
I estic enganxat a tu, estimada
No veus (cada nit)
Cada nit i dia no puc esperar
Per un altre tast de mel Oh, no puc ser esquiu amb tu mel (m'agrada)
Perquè és segur
मुखवट्याच्या आत दडलेल्या चेहऱ्याचा लोक तिरस्कारच करतात….!
When we interact with others, we often speak and behave very nicely. But is it just a facade? If we are only being nice to others to gain their approval or to keep them attached to us, then we are deceiving not just them but ourselves as well. On the contrary, if you try to interact with others the same way you behave when you are alone…
मन किती हे भारीकधी अंतरात कधी ते दारी ।कधी हिरमुसतेकधी येई फिरून दिशा चारी ।
सुख असो वा दुःखआतल्या आत चाले मारा मारी ।क्षणात सारून सारेभाव बदलाची करे कशी हुशारी ।
संकटाचे येता वादळसहजच कसे ते होते विचारी ।शांती वाटे हवी तेव्हाहोते संथ किती ते निराकरी ।Sanjay R.
व्हेरिकोज व्हेन्स आजाराने चिंतेत आहात का? अपेक्स हॉस्पिटल घेऊन आले आहे यावर खात्रीशीर उपाय. लेझर या अत्याधुनिक पद्धतीने व्हेरिकोज व्हेन्स वर उपचार. लेझर उपचाराने तुमच्या पायाची सुंदरता कायम राहते, शरीरावर कोणतेही जखम ,वन राहत नाही, 24 तासाच्या आत घरी जाऊ शकतात ,पूर्ण आराम कोणत्याही त्रासा विना.अधिक माहितीसाठी आणि उपचारासाठी आज संपर्क करा अपेक्स हॉस्पिटलला.
https://www.apex-hospital.co.in/
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रख्यात बायोकेमिस्ट डॉ गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार, १० जणांना विज्ञान श्री पुरस्कार, ११ जणांना युवा विज्ञान पुरस्कार, आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या चांद्रयान तीन च्या चमुला विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य जयंत भालचंद्र उदगावकर यांना जीवशास्त्रासाठी, बंगळुरू इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधले उमेश वार्ष्णेय यांना जीवशास्त्रासाठी, तर मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या योगदानासाठी विज्ञान श्री पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातले महेश काकडे यांना गणित आणि संगणक विज्ञान क्षेत्रातल्या योगदानबद्दल युवा विज्ञान पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस उद्या २३ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्यावर्षी २३ ऑगस्टला चंद्रयान तीन मिशन अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरलं आणि हे मिशन यशस्वी झालं. भारतानं मिळवलेल्या या यशानंतर अंतराळ अर्थव्यवस्थेत पुढील दहा वर्षांत पाचपटीनं वाढ अपेक्षित असून, ही उलाढाल सुमारे ४४ अरब डॉलर्स इतकी होण्याचा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
****
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या त���ासाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. या घटनेच्या निषेधार्थ संपावर गेलेल्या डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याचं आवाहन न्यायालयानं केलं आहे.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात राज्यात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, मुलींसाठी तक्रार पेटी, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समितीचं प्रस्तावित गठन, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती, यासंदर्भातले निर्देश या शासन निर्णयात देण्यात आले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापनाने २४ तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असून, यासंदर्भात तडजोड केली जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
****
येत्या रविवारी २५ ऑगस्टला होणारी, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विविध देशांमध्ये आढळून येत असलेल्या मंकीपॉक्स या विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीनं प्रतिबंध आणि सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून या आजाराविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्यासह विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांची देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी सगळ्या ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर जल मित्रांची निवड करावी, असं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केलं आहे. स्थानिक कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून दुरुस्ती आणि देखभालीची कामं तातडीनं करता येतील आणि त्यामुळे गावातल्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सातत्य आणि गुणवत्ता राखली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून, राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.