Tumgik
#खरं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रोनाल्डोला प्रशिक्षकांनी महत्वाच्या सामन्यात सुरुवातीला का खेळवलं नाही, समोर आलं हे खरं कारण
रोनाल्डोला प्रशिक्षकांनी महत्वाच्या सामन्यात सुरुवातीला का खेळवलं नाही, समोर आलं हे खरं कारण
रोनाल्डोला प्रशिक्षकांनी महत्वाच्या सामन्यात सुरुवातीला का खेळवलं नाही, समोर आलं हे खरं कारण Cristiano Ronaldo : रोनाल्डोला महत्वाच्या सामन्यात सुरुवातीपासून का खेळवण्यात आले नाही याची जोरदार चर्चा सुरु होती. पण रोनाल्डोला का खेळले नाही, याचे कारण आता समोर आले आहे. कारण गोल झाल्यावर पोर्तुगालच्या प्रशिक्षकांनी दुसऱ्या सत्रात त्याला मैदानात पाठवले होते. रोनाल्डा यो सामन्यात सुरुवातीला का खेळला…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 month
Text
डॉक्टर : काल रात्री काय खाल्लं होतं?
Pradip : बर्गर, पिझ्झा आणि कोक!
डॉक्टर : हे बघं! हे सोशल मीडिया नव्हे! खरं सांग!
Pradip : शिळी पोळी आणि भेंडीची भाजी!
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
1 note · View note
bandya-mama · 1 month
Text
डॉक्टर : काल रात्री काय खाल्लं होतं?
Bandya : बर्गर, पिझ्झा आणि कोक!
डॉक्टर : हे बघं! हे सोशल मीडिया नव्हे! खरं सांग!
Bandya : शिळी पोळी आणि भेंडीची भाजी!
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सुपीक, हवामानाला अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वाटप
ऊसाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त
जालना - जळगाव रेल्वेमार्ग पुढच्या चार ते पाच वर्षांत पूर्ण होईल-  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
राजकीय स्वार्थासाठी राज्यात जातीय द्वेष-राज ठाकरे यांच्याकडून खंत व्यक्त
प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजाराने निधन
आणि
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप, स्पर्धेत भारताने जिंकली एकूण सहा पदकं
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अत्यंत सुपीक, हवामानाला अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ करणार आहेत. यावेळी ते शेतकरी आणि वैज्ञानिकांशी संवाद साधतील. यात ३४ नगदी पिकं आणि २७ बागायती पिकं आहेत. यात भरडधान्य, तेलबिया, कडधान्य, ऊस, कपाशी, तृणधान्य यांसह भाज्या, फळं, कंदमुळं, मसाले, औषधी वनस्पती, फुलं अशा विविध पिकांचा समावेश आहे.
****
देशात ऊस पिकाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. येत्या काही वर्षांत वर्षाकाठी एक हजार कोटी लीटर इतकी इथेनॉलची गरज भासणार असून, भविष्यात इथेनॉल इंधनाच्या निर्यातीच्या दृष्टिकोनातून उत्पादन वाढवण्याची तयारी केली पाहिजे, असं ते म्हणाले. २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं शाह यांनी सांगितलं.
****
जालना - जळगाव रेल्वेमार्ग पुढच्या चार ते पाच वर्षांत पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. ते काल या प्रकल्पाबाबत माहिती देत होते. या प्रकल्पामुळे ६० लाख मनुष्य दिवस रोजगार निर्माण होणं अपेक्षित असून, कार्बन उत्सर्जन ५४ कोटी किलो कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या मार्गासाठी सुमारे ९३५ हेक्टर भूसंपादन केलं जाणार असून, साडे २३ किलोमीटर अंतराचा देशातला सर्वाधिक लांबीचा बोगदा साकारला जाणार असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं.
****
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. सात हजार १५ कोटी रुपयांच्या या योजनेतून, पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून, १० पूर्णांक ६४ शतांश टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. या योजनेमध्ये नऊ धरणं प्रस्तावित आहेत. त्यातून २६० पूर्णांक ३० दशलक्ष घन मीटर पाणी उपसा करुन, चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव, पारोळा, भडगाव तालुक्यांतल्या एकूण ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना येत्या १७ तारखेला ओवाळणी म्हणून दोन महिन्यांचं अनुदान खात्यात जमा केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल धुळ्यात झालेल्या सभेत बोलत होते. या योजनेअंतर्गत एकही पात्र बहीण वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
राजकीय स्वार्थासाठी राज्यात जातीय द्वेष पसरवला जात असल्याची खंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं नवनिर्माण यात्रेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत ��ोलत होते. उपलब्ध संधीचा योग्य वापर केल्यास राज्यात आरक्षणाची गरज नाही असं सांगत आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या मागणीचा ठाकरे यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले...
महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला अस वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठलं राज्य नाही आहे. या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नौकऱ्यापर्यंत, उद्योग - धंद्यांपर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असतांना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात. पण आमच्या मुलींना मुलांना इथे मिळत नाहीत त्या ज्या महाराष्ट्रामधल्या जो कोटा आहे महाराष्ट्रातील ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत या जर समजा आपण नीट वापल्या महाराष्ट्रातील मुलामुलीसाठी, मराठी मुलामुलींसाठी तर आपल्याला खरं तर आरक्षणांची गरज नाही.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजिक नक्षत्रवाडी इथल्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत गृह प्रकल्पाचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल भूमिपूजन झालं. या प्रकल्पाचं बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार असल्याने, संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास, सावे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे साडे सहा हेक्टर क्षेत्रावर एक हजार छपन्न सदनिका बांधण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापनासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी दिली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत...
****
मराठी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. विजय कदम यांनी मराठी नाटकं, चित्रपट तसंच दूरदर्शन मालिका अशा तीनही माध्यमांमधून अनेक वर्ष काम केलं. त्यांनी भूमिका साकारलेलं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य, तसंच ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलिसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ‘आम्ही दोघ राजा राणी’ आदी चित्रपटही खूप गाजले. कदम यांच्या पार्थिव देहावर काल अंधेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा हिला उपांत्यपूर्व फेरीत किरगिझस्तानच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. गोल्फ मध्ये अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांचंही आव्हान काल संपुष्टात आलं. या स्पर्धेत भारतीय खेळाडुंचे सामने संपले असून, भारताने एक रौप्य आणि पाच कांस्य, अशी एकूण सहा पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडे बारा वाजता समारोप सोहळ्याला सुरुवात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत भारतीय कुसतीपटू विनेश फोगाटला अपात्र केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिडा न्यायालय येत्या मंगळवारी १३ तारखेला निकाल सुनावणार आहे. या याचिकेत विनेशनं संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली आहे.  
****
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना फसवी असल्याची टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा काल लातूर इथं पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठवाड्यातल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात काल राज्यस्तरीय मातंग समाज मेळावा घेण्यात आला. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था -आर्टी ची स्थापना केल्याबद्दल मातंग समाजाच्यावतीनं शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आरक्षण प्रश्नी लवकरच तोडगा निघेल, मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं.  
****
धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यात मौजे बावची इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा उपक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी आणि उमेद महिला स्वयंसहायता गटातल्या महिलांनी तिरंगा रॅली काढली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी सामूहिक तिरंगा प्रतिज्ञा घेतली. तसंच, गावातल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळांसह विविध शाळांमधले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.
****
परभणी इथं काल महसूल पंधरवाड्यामध्ये 'सैनिक हो तुमच्यासाठी' हा कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी हुतात्मा सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता-पिता यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
****
परभणी इथं काल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जिल्हा परिषदेत विविध पदाकरता विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातले जवळपास ३०० युवक या शिबिरात सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात प्रशासनातर्फे आज विशेष मतदार नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे. पुढच्या आठवड्यातही १७ आणि १८ तारखेला हे अभियान पुन्हा राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
Video
youtube
खरं तर आपल्याला आरक्षणाची गरज नाही ?
0 notes
shrikrishna-jug · 2 months
Text
एक मात्र खरं जे आहे ते तसंच आहे.
मी श्री समर्थांना म्हणालो “मला असं वाटतं की, हे विश्व अपघाताने निर्माण झालेलं नाही.तसंच हे विश्व अराजकतेमध्ये सहअस्तित्व ठेवून विविध घटकांच्या संयोजनात संधी मिळवून अपघाताने निर्माण झालेलं नाही.” श्री समर्थ मला म्हणाले,“उलटपक्षी,अर्थ आणि उद्देश असलेल्या ह्या संघटित विश्वावर,विश्वास ठेवण्यासाठी,आपल्यामध्ये अशी भावना निर्माण झालेली असते की,सुसंवाद आणि सुव्यवस्थेची पुरेशी सोय असलेलं हे विश्व आहे.मला…
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months
Text
27. स्वधर्माशी समन्वय    
श्रीकृष्ण स्वधर्माचे स्पष्टीकरण देतात (2.31-2.37) आणि ते अर्जुनला सांगतात की अशी अवांछित लढाई स्वर्गाचे दार उघडते (2.32) आणि त्यापासून पळून गेल्याने स्वधर्म आणि कीर्ती नष्ट होईल आणि पाप होईल (2.33). रणांगणावर अर्जुनाला दिलेला हा उपदेश त्याच्या योग्य संदर्भात पाहण्याची गरज आहे. श्रीकृष्ण खरे तर स्वधर्माशी संदर्भात समन्वय आणि सुसंवादाबद्दल बोलत आहेत, युद्धाबद्दल नाही.
श्रीकृष्णाला अर्जुनाचे विचार, शब्द आणि कृती यात विसंगती आढळते. तो अर्जुनाला सुसंगती आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनाच्या बाबतीत, स्वतःच्या धर्मानुसार युद्ध लढण्यात सुसंगती आहे आणि युद्धापासून पळून जाण्यात विसंगती आहे.
खरं तर, समन्वय हा सृष्टीचा नियम आहे जिथे सर्वात लहान ‘इलेक्ट्रॉन’, ‘प्रोटॉन’ आणि ‘न्यूट्रॉन’ पासून ते मोठ्या आकाशगंगा, ग्रह आणि तारे एकसंध असतात. जेव्हा रेडिओ आणि रेडिओ स्टेशनचा ताळमेळ (ट्यून) असतो तेव्हाच आपण आपल्या आवडत्या संगीताचा आनंद घेऊ शकतो. मान���ी शरीरापेक्षा समन्वयाचे कोणतेही मोठे उदाहरण नाही, ज्यामध्ये अनेक अवयव आणि रसायने असतात ज्यांच्या समन्वयात्मक कार्यामुळे आपण जसे आहोत तसे बनलो आहोत. समन्वय म्हणजे गोष्टी आणि परिस्थिती जशा आहेत तशा, आपल्या संदर्भ आणि मूल्यव्यवस्यच्या  चौकटीत आपल्याला हवेत तशा नव्हे.
आपल्या लहानपणापासून, आपल्याला शिकविण्यात आले आहे की सत्कर्मांमुळे मृत्युंनंतर आपण स्वर्गात जातो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात. श्रीकृष्ण म्हणतात, स्वर्ग आणि नरक या मृत्यूनंतरच्या गोष्टी नाहीत, तर त्या आता आणि येथेच अस्तित्वात आहे. कुणाच्या क्षमतेला कशी आणि किती संधी मिळते त्यावर हे अवलंबून आहे.
जेव्हा आपण इतरांचा स्वधर्म समजून घेतो तेव्हा कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद असतो जो स्वर्ग आहे आणि त्याचा अभाव नरक आहे. आपल्या इच्छा पूर्ण होतात की नाही यावर आपल्या आनंद किंवा दुःखचा अनुभव अवलंबून असतो. जेव्हा स्वधर्माशी आंतरिक समन्वय साधला जातो तेव्हा तो बाह्य जगाचा विचार न करता स्वर्गासारखा असतो.
0 notes
chaitanyakulkarni98 · 5 months
Text
आत्म्याचा आवाज
Tumblr media
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्ह���णं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
Tumblr media
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
Tumblr media
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note · View note
eaksharmanblog · 6 months
Text
Tumblr media
क्षणही थबकतात
सरकताना पुढे
हे खरं की असे क्षण
वाट्याला येतात थोडे...
#चंगो
0 notes
jayantnaiknavare · 9 months
Text
अखेरचा हा तुला बंदोबस्त !
नमस्कार पोलीस बंधू-भगिनिंनो,
मी उदया दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ रोजी साडेएकतीस वर्षांच्या पोलीस सेवेनंतर सेवानिवृ्त्त होत आहे. ३० व ३१ डिसेंबर रोजी सु्ट्टी आल्याने आज हा निरोप समारंभाचा कार्यक्रम होत आहे. मला बरंच काही बोलायचं आहे परंतु नेहमीप्रमाणे वेळेचं बंधन असल्यामुळं मी फक्त माझ्या कारकिर्दिचा आढावा घेणार आहे व मला इतर ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या लिखीत स्वरुपात आपल्या एस पीं कडे पीडीएफ मध्ये पाठवणार आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी वेळ काढून जरुर वाचावं.
एम.पी.एस.सी.ची नागरी सेवा परिक्षा पास होण्यापूर्वी ज्या अनिश्चितेच्या मन:स्थितीतून जात होतो तशाच परंतु थोड्या वेगळ्या भावनाकल्लोळातून आता सेवानिवृत्त होत असताना जात आहे. पायलट, एस्काॅर्ट आणि पी.एस.ओ. काढून घेतलेले व्ही.आय.पी. जसे उसने अवसान आणून मला काय कुणाची भिती आहे असं सांगतात तसं काहीसं झालं आहे.
एकतीस डिसेंबर २०२३ ही तारीख कामाला लागल्यापासून अधून मधून कागदपत्रांमधून डोकावत राहायची. ती आता वास्तव बनून समोर उभी आहे. पोलीस विभागातली कारकिर्द संपली आणि आता पुढे कसं होणार हा अनुत्तरीत प्रश्न कसा सोडवायचा याची चिंता सतावू लागली आहे. कितीही उसणं अवसान आणलं तरी डोक्याला टेन्शन झालं आहे हे खरं.
बहुत शादमा थे
हम उनको भुलाके,
अचानक ये क्या हो गया.
के चेहरेपे रंगे मलाल आ गया.
आजूबाजूला होणारे बदल अनाकलनिय आहेत. वर्तमानामध्ये जगणं बरं असं वाटायला लागलं आहे. आजपर्यंतच्या अनुभवावरुन असं दिसतं की भविष्याचा अचूक वेध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपल्या कल्पनाशक्तिला मर्यादा आहेत हे वेळोवेळी जाणवतं. आपलं भविष्य कसं असेल याचा अंदाज सर्वसाधारणपणे भूतकाळात घडलेल्या घटना व घडामोडींवर बेतलेला असतो. परंतु चालू घटकेला घडणाऱ्या बदलांशी समरस होत आपली जगण्याची व्यूहरचना पदोपदी बदलत जाते. या वास्तवाकडे चिकित्सकपणे पाहिलं तर दिर्घकालीन नियोजनाला तसा फार काही अर्थ राहात नाही.
आता लाईफस्टाईलमध्ये महत्वाचे बदल करावे लागणार आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा बदल करावा लागणार आहे तो म्हणजे पोलीस विभागातील नोकरीच्या अनुषंगाने अंगवळणी पडलेल्या सोयीसुविधा विसरण्याचा. घर, गाडी, कार्यालय, चालक, मदतनीस, अडली वजा करता शिल्लक उरते स्वावलंबन. अतिशय अवघड ॲडजस्टमेंट असणार आहे. ज्या गोष्टी आपण गेली तीस बत्तीस वर्षे गृहित धरुन चाललो होतो त्या आता संपुष्टात येणार आहेत. दुसरा आणि अतिशय महत्वाचा बदल करावा लागणार आहे तो म्हणजे जमेल तितका व्यायाम करणं. कितपत शक्य आहे हे समजेलंच… परंतु संकल्प सोडायला काय हरकत आहे? संकल्प सोडणं म्हणतो ते अशासाठी की या गोष्टीवर पुढं जगण्याचं सगळं नियोजन अवलंबून असणार आहे. आरोग्य ही आतापर्यंत बाजूला ठेवली तरी निभावलं जाणारी गोष्ट होती परंतु इथून पुढं ही बाब जगण्याच्या केंद्रस्थानी ठेवावी लागणार कारण उत्तम आरोग्य व स्वावलंबन ह्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. जसं काम करून वेळ मिळाला तर आरोग्यासाठी दिला जात होता तसं यापुढं, अगदी त्याच्या विरुध्द, म्हणजे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जे काही करावं लागतं ते झाल्यानंतर उरलेल्या वेळेपैकी काही वेळ काम करायला द्यावा असं असणार आहे.
आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी या माझ्या आत्मपर पुस्तकाच्या शेवटच्या भागात सेवानिवृत्तीनंतर काय करणार या प्रश्नावर थोडं विचारमंथन केलं होतं. त्यात चार-पाच मुद्दे नमूद केलेले आहेत. बिहार स्कूल ऑफ योग मध्ये एखादा कॅम्प करुन त्यानंतर योग हा दैनंदिन जिवनाचा भाग करुन टाकायचा, एक कपोलकल्पित (फिक्शन) पुस्तक लिहायचं, भरपूर संगीत ऐकायचं, जमेल तितकं फिरायचं आणि पोलीस शिपायांसाठी काही लिहायचं तसंच शिकवायचं. या संकल्पांवर गांभीर्यपूर्वक विचार करावा लागणार आहे.
मुंबई पोलीसमध्ये उपायुक्त असताना त्यावेळचे पोलीस आयुक्त श्री ए.एन.रॅाय यांनी एका खाजगी कंपनीनं प्रायोजीत केलेलं व्हर्टिकल इंटरॅक्शन वर्कशाॅप ठेवलं होतं. अनेक गोष्टींपैकी "तुमच्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या व्यक्ति कोण'' हे इंग्रजीमध्ये एका फाॅर्मवर लिहून द्यायची एक्सरसाईज होती. मी फाॅर्म भरुन दिला. काही वेळाने मला शोधत बिझनेस सूटमधली एक मुलगी आली आणि पु.ल.देशपांडे म्हणाले होते तसं इथे इथे नाच रे मोरा असं पेनाने दाखवत म्हणाली होती की याचा अर्थ समजला नाही. कसा समजणार ? मी गमतीनं लिहिलं होतं: आयुष्यामधल्या तीन महत्वाच्या व्यक्ति : ड्रायव्हर, ॲापरेटर आणि ॲार्डर्ली...
यातला गमतीचा भाग सोडला तरी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय काम करणं अवघड असतं हे वास्तव आहे. पोलीस अधिकारी प्रशिक्षण संपवून कर्तव्यावर रुजू झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत पर्सनल स्टाफ आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. कितीही दुर्गम भाग- कोणतीही वेळ- कसलंही हवामान आणि कसलीही जबरदस्त दंगल किंवा खराब परिस्थिती असो, अवती भवतीच्या पोलीस सहकाऱ्यांमुळे कधी असुरक्षित वाटलं नाही. दंगलीत डायरेक्ट दगड कधी लागलाच नाही. लागलाच तरी आजूबाजूला असलेल्या कुणाच्यातरी हेल्मेटवरुन, शिल्डवरुन रिकोशिएट होऊन आला तरंच. कितीही कठिण परिस्थिती असो कुठूनतरी कुणी देवदूतासारखा मदतीला धावून येणार हे नक्की. पूजेचं ताट घेऊन मागे न बघता देवाचा नवस फेडायला निघालेल्या भक्तासारखं; लाठी हेल्मेटसह मागे न पाहता जमावात घुसायच्यावेळी खात्री असायची की आपल्यामागे सगळेजण असणारंच. मोझेसला समुद्राने दुभंगून जसा रस्ता करुन दिला होता तसे अधिकारी व कर्मचारी तुम्हाला कितीही गर्दी असलेल्या मिरवणूकीतून पुढे घेऊन जाणार म्हणजे जाणारंच.
पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती
पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती या सापेक्ष गोष्टी आहेत. प्रसरण पावणाऱ्या विश्वासारखा त्यांचा अमर्याद आवाका आहे. या चारही बाबी जणू सणासुदीला फेर धरणाऱ्या महिलांसारख्या नेहमी एकमेकींच्या हातात हात धरुन गोल फिरतात. परस्परावलंबी असल्याने त्यांची व्याप्ती जाणीवपूर्वक आटोक्यात ठेवावी लागते नाहीतर एक गोष्ट मिळाली की दुसरी व दुसरी मिळाली की तिसरी प्राप्त करण्याकडे लोकांचा नैसर्गिक कल राहतो.
पहिली व अतिशय मूलभूत गोष्ट म्हणजे आसक्ती होय. आसक्तीला बरेच कंगोरे आहेत. त्यामध्ये वात्सल्य, माया, ओढ, निरपेक्ष प्रेम इत्यादि बाबी येतात. जसे, कोणतीही अपेक्षा न ठेवता आईवडिलांचे मुलांवरील प्रेम. आसक्तीशिवाय पुनरुत्पादन व मानववंश संवर्धन असंभव आहे- निदान नवजात अर्भकाच्या बाबतीत तरी... जीवनाला पूरक बाबींची निसर्गाने सोय करुन ठेवली असली तरी, विशिष्ट काळासाठी परावलंबी राहणं जीवनाच्या रहाटगाडग्याचा भागच आहे. आईवडिल व मुलं, मित्र- मित्र, प्रियकर-प्रेयसी व पती-पत्नी या समाजमान्य आसक्ती दिसून येतात. उरलेल्या पैसा, प्रसिद्धी व सत्ता या तीन गोष्टींचा दरएक माणसाच्या आयुष्यात येण्याचा क्रम वेगवेगळा असू शकतो.
इंग्रजीतल्या पॅावर या शब्दाला तसं पाहिलं तर चपखल बसणारा मराठी शब्द सापडला नाही. त्याअर्थाने जवळचा शब्द म्हणजे सत्ता. परंतु पाॅवर या शब्दाची व्याप्ती सत्ता शब्दापेक्षा बरीच जास्त आहे. नेतृत्व करणं, प्रभाव टाकणं, अनुयायी तयार करणं या व अशा अनेक बाबींचा सामावेश पाॅवर या शब्दात होतो. सत्ता या शब्दातून बऱ्यापैकी औपचारिकता अभिप्रेत होते. म्हणजे शासनकर्ते, निवडून आलेले लोकसेवक, न्यायव्यवस्था, पोलीस व नागरी सेवेतले अधिकारी, सैन्यदले इत्यादिंना कायदे-कानून तयार करुन शासन चालविण्यासाठी, न्यायनिवाडे करण्यासाठी, प्रशासन-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, देशाच्या संरंक्षणासाठी तसेच समाज नियमनासाठी प्रदान करण्यात आलेले कायदेशीर अधिकार वगैरे होत. सत्ता हा शब्द इंग्रजीतल्या पॅावर या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून या पुस्तकात वापरला आहे.
वर म्हटल्या प्रमाणे आसक्ती वगळता पैसा, प्रसिध्दी व सत्ता या उरलेल्या तीन सापेक्ष गोष्टी आयुष्यात कोणत्याही क्रमाने घडू शकतात. काहींना आधी पैसा मिळतो त्यायोगे प्रसिध्दी व सत्ता मिळते. काहींना आधी सत्ता व सत्तेच्या माध्यमातून पैसा व प्रसिध्दी तर इतरांना आधी प्रसिध्दी नंतर पैसा व त्यानंतर सत्ता मिळू शकते. या सर्वांचा क्रम उलट सुलट असला तरी प्रत्येक बाबीची कमाल व किमान मर्यादा प्रत्येकाच्या कर्तृत्वावर, नशीबावर, वारश्याने मिळालेल्या संपत्तीवर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ही मर्यादा प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकते. पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती या गोष्टी जास्तीत जास्त मिळवण्यासाठीच्या सततच्या स्पर्धेमुळे जगण्याचे संतुलन बिघडते व त्यामुळे जीवनात बऱ्याचदा संघर्ष निर्माण होतात.
व्यापार उद्यम करुन श्रीमंत झालेल्या व्यक्ती त्यांच्याकडे जमा झालेल्या संपत्तीमुळे प्रसिध्द होतात व त्यांना इतरांवर प्रभाव टाकता येतो. नेतृत्वगुण अंगी असलेल्या व्यक्ती समाजोपयोगी कामे करतात. संघटना बांधतात किंवा आधी कुणीतरी बांधलेल्या संघटनेत सक्रिय होऊन समाजावर छाप पाडतात व त्यामुळे प्रसिध्द होतात. काही प्रसिध्दी पर्यंत थांबतात तर बरेचजण त्यामाध्यमातून संपत्ती जमा करतात. ज्यांच्या अंगी सुप्तगुण आहेत असे काहीजण खेळ, संगीत, अभिनय, चित्रकला इत्यादिंमध्ये प्राविण्य मिळवून प्रसिध्द होतात त्यायोगे त्यांच्याकडे संपत्ती येते. याउलट समाजविघातक, अनैतिक व गैरकायदेशीर कामे करुन पैसे मिळवणारे व त्यामुळे कुप्रसिध्द झालेले त्याचप्रकारचे मार्ग पत्करुन सत्ता मिळवणाऱ्यांच्या आश्रयाला गेलेले आपण पाहातो.
जगातल्या पंच्याहत्तर टक्के समस्या ह्या पैशांशी निगडीत असतात असं माझं मत आहे. या पृथ्वीतलावर माणसं अनंत काळापासून समूहानेच राहातात आणि तेंव्हापासूनच पृथ्वीतलावर उदरनिर्वाहासाठी बुफे सिस्टिम अस्तितवात आहे. काही लागलं की निसर्गाकडून घ्यायचं. सुरुवातीला शिकार करणं आणि निसर्गाने पिकवलेलं अन्न गोळा करणं ही मुख्य कामं होती. पोटाला लागेल इतकंच घ्यायचं, संचय करायचा नाही. मुख्य प्रश्न होते ते आरोग्य आणि सुरक्षिततेशी निगडीत. आरोग्याच्या प्रश्नावर उपाय म्हणजे हवामानानुसार वस्रं वापरणं आणि उन, पाऊस आणि वाऱ��यापासून रक्षण करण्यासाठी गुहा खोदून निवारा तयार करणं. सुरक्षेच्या प्रश्नावर छोटे छोटे समूह करुन राहणं, बचावासाठी हत्यारं तयार करणं आणि हवामानानुसार स्थलांतर करणं हा तोडगा काढण्यात आला होता.
युवल नोहा हरारी हा इस्रायली लेखक आपल्या सेपीयन्स या पुस्तकामध्ये लिहितो की सत्तर हजार वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर जेंव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता तेंव्हा मानवाच्या सेपीयन्स जातीने बुध्दीमत्तेच्या जोरावर जवळच्या निआंन्डरथल आणि तशा इतर सस्तन जातभाईंचा, उत्क्रांतीच्या देव- दानव लढाईत, पराभव केला आणि तेंव्हापासून होमो सेपीयन्स ही एकच मानवजात संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करत आहे. आपल्या कुणाच्याही डी.एन.ए.चे, माॅलमधल्या बारकोड रिडर सारखे स्कॅन करुन, जेंव्हा कधी वाचन शक्य होईल तेंव्हा पृथ्वीतलावरची झालेली सगळी महायुध्दं, लढाया आणि भांडणं ही सत्तर हजार वर्षांपासून चालत आलेली भाऊबंदकीच होती हे स्पष्ट होईल.
हरारी यांच्या मते होमो सेपीयन्सनी ही उत्क्रांतीची लढाई जिंकली ती त्यांच्या आकलनाच्या क्षमतेमुळे. याला ते काॅग्निटीव्ह रिव्हाॅल्यूशन म्हणतात. त्यानंतर सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी दुसरी क्रांती झाली ती होती कृषी क्रांती- किंवा ॲग्रिकल्चरल रिव्हाॅल्यूशन. काही संकल्पना, जसे देव, देश, धर्म, चलन, ज्या आभासी आहेत त्यांवर विश्वास ठेवण्याची होमो सेपीयन्सची ही आणखी एक क्षमता ही अद्वितीय होती. या क्षमतेमुळे मोठ्या संख्येने आपापसात सहकार्य करुन, आभासी बाबी खऱ्या आहेत हे मानून परस्पर विश्वासावर तयार केलेली चलनव्यवस्था त्यांच्या लोकसंख्यावाढीला आणि सृष्टीतील इतर प्रजातींवरील त्यांच्या अधिपत्या��ा जबाबदार आहेत. शासन आणि अर्थ या दोन्ही व्यवस्था धर्म व्यवस्थेवर बेतलेल्या आहेत असंही हरारी म्हणतात.
पुढे विज्ञानक्रांतीत लागलेले विविध शोध, औद्योगिक क्रांती यामुळे जीवनशैलीत आमुलाग्र बदल झाले.
हरारी यांचं म्हणणं विज्ञान, मानववंशशास्र आणि तर्कशास्रावर बेतलं असल्यानं मनाला पटतं. आपल्या जगाबाबत आणि मानव जाती बाबत विचार करण्याच्या पध्दतीवर या बाबींचा सखोल परिणाम होऊ शकतो. देव, देश आणि धर्म ह्या मानवनिर्मित संकल्पना आहेत या पार्श्वभूमीवर असंही म्हणता येईल की या संकल्पना ज्या उद्देशांनी निर्माण करण्यात आल्या ती उद्दीष्टं बऱ्यापैकी सफल झाली तर त्या नष्ट होऊ शकतात किंवा त्यामध्ये काळानुसार बदल होऊ शकतात. याचाच अर्थ असा की या संकल्पनांवर विश्वास ठेवणे ऐच्छिक आहे. वसुधैव कुटुम्बकम्, पृथ्वी हा परिवार आहे ही संसदेच्या प्रवेशद्वारावर लिहिलेली संकल्पना आपल्यासाठी फार महत्वाची आहे. जगाबद्दल विचार करताना काल्पनिक सरहद्दींना जास्त महत्व देण्याचं कारण नाही.
स्वत:च्या मनाला बाहेरच्या जगाचा विचार करताना, किमान विचारात तरी, सरहद्दीच्या बंधनात बांधणे योग्य नाही. तिच गोष्ट धर्माची. व्हिक्टर फ्रॅंकल हे विचारवंत म्हणतात त्याप्रमाणे सहिष्णूता म्हणजे इतरांच्या श्रध्देशी सहमत होणं नसून प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे श्रध्दा ठेवण्याच्या अधिकार असल्याचं मान्य करणं होय.
जगातली आत्ताची अर्थव्यवस्था ही कृष्णविवरा सारखी आहे. एकदा त्यामध्ये ओढले गेलो की त्यातून सुटका नाही. बाहेरुन न कळणाऱ्या या कृष्णविवरातला प्रवेश कुणालाही चुकला नाही.
ब्रासटॅक्स् ॲाफ मनी
पैसा हे मानवाच्या श्रमाचं फलित मानलं जातं. पैशांची उपयुक्तता ही आपल्या कृतींवर अवलंबून असते. आपण उत्पादित केलेल्या अनेक वस्तूंपैकी बऱ्याच वस्तू अशा असतात की त्या सर्वांना या ना त्या कारणास्तव नेहमी लागतात. अशा नेहमी लागणाऱ्या वस्तूंचा प्रथम चलन म्हणून उपयोग होऊ लागला. या मालाची अदलाबदल करुन होणाऱ्या व्यापाराला बार्टर पध्दत म्हणतात. या पध्दतीत वेळेचा अपव्यय जास्त होत असे व आपल्याला नेमकी पाहिजे असलेली वस्तू मिळेपर्यंत थांबायला लागे. तसेच समोरच्याला त्याच्या वस्तूच्या बदल्यात नेमकी आपल्याकडील वस्तू पाहिजे असं गिऱ्हाईक मिळायला वेळ लागे. त्याचप्रमाणे आपल्याकडील वस्तूच्या बदल्यात समोरच्याकडील वस्तूचे मूल्य ठरविणं आणखी वेगळीच समस्य़ा होऊ लागली. यावर उपाय म्हणजे सर्वोपयोगी व जास्त मागणी असलेल्या सामान्य वस्तू चलन म्हणून वापरात आणणं. अशा सामान्य वस्तू खरेदी-विक्री व देण्या-घेण्याचे व्यवहार करण्यासाठी वापरायचं माध्यम झालं. हीच पैशांची सुरुवात मानायला हरकत नाही.
त्यानंतर वेगवेगळ्या धातूंच्या अंगी असलेल्या अनेक गुणधर्मांमुळं त्यांचा चलन म्हणून वापर करणं सोय़ीचं ठरु लागलं. धातूंचा टिकाऊपणा, तुकडे करुन विभाजन केलं तरी गुणधर्मात काही फरक न पडणं व त्यांना स्वत:ची अशी आंतरिक किंमत असणं इत्यादिंमुळं प्रामुख्यानं तांबा, चांदी व सोनं ही मुख्य चलनं झाली. एकीकडं सोनं व चांदी या मौल्यवान धातूंच्या नाण्यांना, त्यांच्या आंतरिक मूल्यामुळे जास्त महत्व प्राप्त झालं, व लोक त्यांचा संचय करू लागल्याने ही मौल्यवान जंगम मालमत्ता सुरक्षित ठेवणं जिकीरीचं होऊ लागलं. तर दुसरीकडं बाजारांमध्ये व्यापार उद्यम जसा वाढू लागला तशी वस्तूंच्या देवाण घेवाणीसाठी या मौल्यवान धातूंच्या नाण्यांची गरज वाढूच लागली. ही चलनाची मागणी टाकसाळींमध्ये योग्य प्रतिची नाणी पाडून पुरविणं काही प्रमाणात होत होतं परंतु त्यालाही मर्यादा होत्या. एकीकडे लोकांकडे साठवून ठेवलेली परंतु उपयोगात न आणल्याने पडून असलेली मौल्यवान नाण्यांची जंगम मालमत्ता तर दुसरी कडे व्यापारासाठी अधिकाधीक नाण्यांची आवश्यकता ही मागणी विरुध्द पुरवठा अशी परिस्थिती निर्माण झाली. लोकांकडील नाणेसंचय वर म्हटल्याप्रमाणे असुरक्षित तर होताच त्यावर भर म्हणजे नुसता साठा करुन ठेवल्याने त्यांच्या किमती मध्ये वाढसुध्दा होत नव्हती. यावर तोडगा म्हणून स्वतः:ची अशी समाजामध्ये प्रतिष्ठा असलेला व लोकांचा विश्वास असलेला प्रामाणिक माणसांचा वर्ग तयार झाला. या व्यक्ती सामान्यांकडून व्याजावर ठेवी स्विकारु लागल्या व व्यापाऱ्यांना थोड्या जास्त व्याजाने हे पैसे पुरवू लागल्या. ठेवीदारांना दिलेले व्याज व व्यापाऱ्यां कडून मिळालेलं व्याज यामधील फरक हा या प्रतिष्ठीत व्यक्तींना मिळालेला नफा त्यांच्या उत्पन्नाचं आणखी एक स्तोत्र झालं.
ठेवीदारांकडून स्विकारलेल्या ठेवींचा पुरावा म्हणून हे समाजात प्रतिष्ठा असलेले विश्वासू लोक ठेवीदारांना पावत्या देऊ लागले. या पावत्यांना विश्वासार्हता असल्याने त्यांचा उपयोग मौल्यवान दस्ताऐवजा सारखा होऊ लागला. प्रारंभी या पावत्या एका व्यक्ती कडून दुसरीकडे व दुसरीकडून तिसरीकडे जात व जेंव्हा केंव्हा ही पावती मोडण्यासाठी प्रतिष्ठीत व्यक्तीकडे जाई तेंव्हा तिच्या पूर्ण मूल्याएवढं चलन मिळू लागलं त्यामुळं या पावत्या हस्तांतरणीय झाल्या. या प्रक्रियेतून दोन बाबींचा उगम झाला. पहिली बाब म्हणजे बॅंका व बॅंकर्स उदयाला आले व दुसरी घडामोड म्हणजे जंगम मालमत्तेच्या ठेवीवर देण्यात आलेल्या पावत्या कागदी चलनं झाल्या.
तरीही खाजगी जंगम मालमत्तेच्या सुरक्षिततेचा मुद्दा येतंच होता. त्यामुळे राजानं ही सुरक्षिततेची जबाबदारी स्विकारणं ओघानंच आलं. नुसती जबाबदारीच नाही तर टाकसाळी सुरु करुन नाणी पाडणं व त्यांच्यामध्ये मौल्यवान धातूंचा योग्य अंश राहिल याची दक्षता घेणं हे सुध्दा राजाच्या विश्वासार्हतेचं प्रतिक झालं. राजाच्या दृष्टीनं कर गोळा करणं यामुळं अधिक सोयीचं झालं. वेगवेगळे राजे आपापल्या मुद्रा टाकसाळीत तयार करून चलनासाठी बाजारात आणू लागले. नाण्यांची शुध्दता व त्यामुळे त्यांना प्राप्त झालेलं आंतरीक मूल्य ही राजांच्या सार्वभौमत्वाची व प्रतिष्ठेची लिटमस टेस्ट झाली. अशी मौल्यवान नाणी त्यांच्या आंतरीक मूल्यामुळे राज्याच्या स्थळसीमांच्या बाहेरसुध्दा आंतरराज्य व आंतर्देशीय व्यापारासाठी स्विकृत होऊ लागली. त्याचबरोबर बॅंकर्सनी दिलेल्या पावत्या व हुंडींचा सुध्दा व्यापाऱ्यांच्या विशिष्ट समूहामध्ये वापर वाढू लागला.
जसजशी राजांच्या साम्राज्यांची व्याप्ती वाढू लागली तसतशी आपापल्या हद्दीत आपलीच नाणी वापरावी जावीत याबद्दल आग्रह व सक्ती सुरु झाली. महंमद बिन तुघलक याच्यासारख्या तिरसट परंतु आर्थिक दूरदृष्टी असलेल्या सुलतानाने टोकन म्हणून पहिल्यांदा तांब्याच्या धातूंची नाणी पाडून चलनात वापरायला मुभा दिली. ही तांब्याची नाणी सियासती टाकसाळींमध्ये पाडून मग एकाधिकाराने चलनात आणण्याचं धोरण न ठेवल्यामुळं त्याकाळी घराघरात टाकसाळी सुरु होऊन सर्रास तांब्याची नाणी तयार होऊ लागली होती व चलनाचे अवमूल्यन झाले होते.
युरोपिय देशांनी गोल्ड स्टॅंडर्डवर आधारलेली म्हणजे सुवर्ण मूल्याधारित व्यवस्था सुरु केली. त्यासाठी केंद्रीय बॅंक किंवा रिझर्व्ह बॅंकांची निर्मिती करण्यात आली. या बॅंका शासनाच्या मालकीच्या मौल्यवान धातूंच्या म्हणजे बुलीयनच्या विश्वस्त झाल्या. केंद्रीय बॅंका शासनाचा सोन्याचा साठा आपल्याकडे सांभाळून त्याच्या बाजारमूल्याइतकं चलन छापून व नाणी पाडून अर्थव्यवस्थेमध्ये आणू लागल्या. कायदे करुन नोटा छापणं व नाणी पाडणं ही शासनाची मक्तेदारी करण्यात आली. या एकाधिकारामुळे बनावट चलन बाजारात आणण्याचा मार्ग बंद झाला. शासनाने आपल्याकडील सोन्याच्या साठ्याच्या भरवश्यावर छापलेले चलन म्हणजे गोल्ड स्टॅंडर्ड. आपल्या नोटेवर “मैं धारक को सौ रुपये अदा करने का वचन देता हूँ “ असं लिहून त्याखाली रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची सही असते. हे वचन म्हणजे ज़र कुणा एकाला कधी वाटलं की त्याच्याकडची नोट कुठेच चालत नाही तर तो रिझर्व्ह बॅंकेत ती नोट चालवू शकतो.
पहिल्या महायुध्दापर्य़ंत ही सोन्यावर आधारीत अर्थव्यवस्था व्यवस्थित चालू होती. पहिल्या महायुध्दाच्या प्रचंड खर्चानंतर विकसीत राष्ट्रांवरील कर्जाचा बोजा वाढला. परिणामस्वरूप ही सुवर्ण मूल्याधारित अर्थव्यवस्था सोडून द्यावी लागली. सोन्याच्या पुरवठ्यात तुटपुंजी वाढ झाली परंतु त्या तुलनेत जगभराची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढल्याने मागणी पुरवठ्यात मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे या व्यवस्थेवर असलेला विश्वास समाप्त होऊन ब्रिटीश पाऊंड व अमेरिकन डाॅलर ही जगभराची राखीव चलनं झाली. सगळे देश सोन्याऐवजी ही दोन चलनं व्यापार उद्यमाच्या देण्याघेण्यासाठी आपल्याकडं परदेशी चलन म्हणून साठवू लागली. याचा परिणाम असा झाला की फक्त मोठ्या देशांकडे सुवर्णसाठा वाढला. १९२९ साली जगभरातलं शेयर मार्केट कोसळलं. त्यामुळं ब्रिटननं गोल्ड स्टॅंडर्ड सोडून दिलं. ब्रिटीश पाऊंड सुवर्ण मूल्याधारित व्यवस्थेतून बाहेर गेल्यामुळे फ्रान्स व अमेरिका या दोन देशांकडे सुवर्णसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला.
१९३४ साली अमेरिकेने सोन्याचा भाव २०.६७ डाॅलर प्रति औंस (२८.३५ ग्रॅम) वरुन ३५ डाॅलर प्रति औंस असे पुनर्मूल्यांकन करुन वाढवला. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने अमेरिकेने उचलेले हे पाऊल होते. त्यामुळे प्रति औंस सोनं खरेदीसाठी १४.३३ डाॅलर जास्त द्यावे लागू लागले. याचा परिणाम असा झाला की इतर देशांकडील राखीव सोन्याची किंमत अमेरिकन डाॅलरमध्ये वाढली. त्यामुळे अमेरिकन चलनाचे अवमूल्यन झाले. अमेरिकेने सोन्याच्या बाजारावरचा कब्जा वाढवल्यामुळे जगभरातल्या सोन्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. इतकी की १९३९ सालापर्यंत सगळी चलनं पुन्हा गोल्ड स्टॅंडर्डवर आणता येण्याजोगी परिस्थिती तयार होण्याइतकं सोन्याचं उत्पादन झालं. १९६९ साली अमेरिका व युरोपिय देशांनी लंडनच्या शेअर मार्केटवर सोनेविक्री बंद केली व सोन्याचे भाव मुक्तपणे ठरवले जाऊ लागले. १९६९ ते १९७१ या काळात सर्व देशांच्या रिझर्व्ह बॅंका वाणिज्य व्यवहारांसाठी अमेरिकेला सोन्याची ३५ डाॅलर प्रति औंस या भावाने खरेदी विक्री करु शकत होते. १९७१ साली सोन्याचे भाव मुक्तपणे ठरवले जाऊ लागले व रिझर्व्ह बॅंकाना आपापल्या चलन व्यवस्थेची विश्वासाहर्ता राखण्यासाठी सुवर्णसाठे करून ठेवण्याची गरज संपली.
आता जमाना आहे तो फियाट चलनाचा. फियाट म्हणजे शासनाचा वटहुकूम. मध्यवर्ती बॅंकेला आदेश दिला जातो की अमूक तमूक किमतीचं चलन छापा. आगोदर जेवढ्या किमतीचं सोनं शासन ठेवेल त्याच्या पाठबळावर चलन छापून वितरीत केलं जायचं. परंतु फियाट चलनामध्ये शासनाच्या विश्वासावर चलन छापलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापार डॅालर्समध्ये चालतो त्यामुळे अमेरिकन डॅालर्सचा परदेशी चलन म्हणून सगळे देश साठा करतात. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून हे केलं जातं. परंतु अमेरिकेने मोठ्या प्रमाणात चलनफुगवटा केला तर डॅालरच्या किमती घसरु शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना इतर देशांसमोर ही समस्य़ा कायम असते. अजून तरी सगळं नियंत्रणाखाली आहे असं दिसत असलं तर फियाट चलनाच्या दिर्घकालीन संतुलनाबद्दलचे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत.
चार्लस् पॅान्झी
चार्लस् पॅान्झी हा इटली मधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेला निर्वासीत इसम होता. हा गडी पहिल्या महायुध्दाच्या काळात अमेरिकत अशी काही करामत दाखवून गेला की त्याचं नाव अजूनही फसवाफसवीच्या आर्थिक योजनांना दिलं जातं. त्याचं असं झालं की, अमेरिकेच्या बोस्टन शहरात हा राहात असताना इटलीतील त्याच्या ओळखीच्या एका इसमाकडून त्याला टपालात इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) आलं. अशा प्रकारचं कूपन चार्लस पहिल्यांदाच पाहात होता. या रिप्लाय कूपनचा उपयोग परत पाठवायच्या लिफाफ्यावर लावण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेण्यासाठी करणं अपेक्षित होतं. हे इंटरनॅशनल कूपन काय होतं ते थोडक्यात जाणून घेऊ म्हणजे चार्लस् ने कसा लोकांना गंडा घातला ते समजायला मदत होईल.
तर, युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यु.पी.यु.) नावाची सन १८८७ साली स्थापन झालेली व १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग झालेली आंतरराष्ट्रीय पोस्ट संघटना आहे. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी विकसनशील देशांतून विकसीत देशांना पाठविण्यात येणाऱ्या टपालाचे दर कमी ठेवणे, अर्थव्यवस्थांना चालना देणे वगैरे या संघटनेचे उद्देश होते. यु.पी.यु.ने १९०८ साली इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) योजना आणली. त्याकाळी व्यावसायीक पत्रं पाठविताना त्यांना उत्तर देण्यासाठी जो टपालखर्च लागेल तो सुध्दा पत्र पाठवणारानं देणं हा शिष्टाचाराचा भाग असायचं. त्यामुळं व्यावसायीक टपालाच्या पाकिटांमधून आय.आर.सी. पाठविण्याची पध्दत सुरु झाली. समजा अमेरिकेतून युरोपातल्या एखाद्या देशात व्यावसायीक पत्र पाठवायचं तर पत्र पाठवणारी कंपनी लिफाफ्यात आय.आर.सी. सुध्दा टाकायची. युरोपातल्या त्याकाळातल्या विकसनशील देशात ज्याच्या नावानं हे पत्र असेल तो आय.आर.सी.त्याच्या स्थानिक पोस्टात घेऊन जायचा व त्याच्या बदल्यात युरोपातून अमेरिकेत ज्या दराने पत्र पाठविता येईल त्या किमतीची पोस्टाची तिकीटं त्याला मिळायची. हाच प्रकार युरोपातून अमेरिकेमध्ये पाठविण्यात येणाऱ्या टपाला बाबत होता होता. यामागील उद्देश असा की ज्या कंपनी कडून पत्र आलं तिला उत्तर देणाऱ्या लिफाफ्यावर मिळालेली पोस्टाची तिकीटं लाऊन उत्तर पोस्ट करावं.
चार्लसच्या चाणाक्ष बुध्दीने या रिप्लाय कूपन्सच्या दोन देशांतील किमतीच्या तफावतीची बाब चटकन हेरली. त्याला आलेलं आय.आर.सी. स्पेनमध्ये त्यावेळी असलेल्या चलनफुगवट्यामुळं अगदी कमी पेसेटांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. पेसेटा हे त्याकाळी स्पेनचं चलन होतं. हे कूपन स्थानिक पोस्टात देऊन त्याच्या बदल्यात चार्लस् ने बोस्टनहून इटलीला पत्र पाठवण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेतली. मात्र पाकिटावर न लावता बाजारात विकून रोखीकरण करण्यासाठी स्वत:कडेच ठेवली. त्याचा शातीर मेंदू काम करायला लागला. अमेरिकन डॅालर्स स्पेनच्या पेसेटा चलनात रुपांतरीत करुन स्पेनमधून आय.आर.सी. खरेदी करायचे आणि अमेरिकेत आणून त्याची पोस्टाची तिकीटे घ्यायची व ती स्थानिक बाजारामध्ये विकून नफा कमविण्याचं त्यानं ठरवलं. प्रयोग म्हणून केलेल्या खरेदी विक्रीमध्ये त्याला त्याच्यामते ४००% नफा झाला.
चार्लसने यासाठी सरकारी वाटावी अशी खाजगी कंपनी स्थापन केली आणि तिला नाव दिलं सिक्युरिटी आणि एक्सचेंज कंपनी ... आणि ग्राहकांना तीन महिन्यात पैस दुप्पट करून देण्याच्या योजनेचा उगम झाला. सहाजिकच होतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तरीही काही लोकांनी त्याच्या या स्किममध्ये पैसे गुंतवले. एक्क्याणवव्या दिवशी त्याच्या दारावर गुंतवणूक करणारांनी व्याजासह पैसे घेण्यासाठी गर्दी केली. त्यांना नक्की काय होणार हे समजत नव्हतं आणि चार्लस् पण लवकर काही सांगत नव्हता. ज्यावेळी वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला गुंतवणूक केलेल्या डॅालर्सवर १००% व्याजासह सगळी रक्कम परत मिळाली तेंव्हा गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. नव्या गुंतवणूकदारांचे पैसे त्याने जुन्या गुंतवणूकदारांना दिले होते. हां हां म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि अपेक्षेप्रमाणे या योजनेमध्ये गुंतवणूक करायला लोकांची रिघंच लागली. चार्लस् वर्षभरातंच अतीश्रीमंत झाला. त्याने टोलेजंग घर घेतले व रोझ ग्नेक्को नावाच्या महिलेसोबत लग्न केले. कसा काय नफा मिळवतो या प्रश्नाला त्याचे उत्तर होते इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स (आय.आर.सी.).
आय.आर.सी. योजनेचा कुठे दुरुपयोग होत असल्याचं लक्षात आलं तर यु.पी.यू. कडून दरांमध्ये फेरफार केला जायचा. त्यामुळे घोषणा केलेल्या या योजनेतून मोठा नफा मिळवणं कठिण होतं. पण चार्लससाठी योजना ही फक्त बोभाटा करण्यासाठी व लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी असल्याने त्याला काही फरक पडत नव्हता. वर्षभरात चार्लसने लोकांकडून कोट्यावधी डाॅलर्स जमा केले. बोस्टन पोस्ट या वर्तमानपत्रातल्या लेखमालिकेनंतर पत्त्यांच्या इमल्यासारखी त्याची ही योजना कोसळली आणि चार्लस गजाआड गेला. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना आश्वासीत केल्या प्रमाणे पूर्ण व्याजासह मुद्दल परत मिळाले. दुर्देवाने, माणसाच्या लोभी स्वभावाला औषध नसल्याने त्यापैकी कित्येकांनी व्याजासह मिळालेले पैसे आणखी फायद्यासाठी परत त्याच्याकडेच गुंतवले. काहींनी ॲाटो रिन्युअल करत रक्कम वाढवत ठेवली. चार्लसला सुध्दा तेच पाहिजे होते.
आज शंभर वर्षांनंतरही चार्लसच्या या गुन्हेपध्दतीत थोडेफार फरक करून नवनव्या आवृत्या जगभरचे गुन्हेगार बाजारात आणतंच राहातात आणि लोकही फसत राहातात. योजना कोसळल्यावर लोकांना कळतं की ती पाॅंझी स्कीम होती म्हणून...
लेफ्टनंट जॅार्ज सानाब्रिया व डॅालर्सचा पाऊस
कोलंबीयन लष्कराच्या हंटर बटालियनचा लेफ्टनंट जॅार्ज सानाब्रिया २००३ साली आपल्या ७२ जवानांसह मिशनवर होता. मिशन होतं कोलंबीयाच्या जंगलात अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या परदेशी नागरिकांची सुटका करणं. कित्येक आठवडे झाले होते आणि जंगलातली उदरनिर्वाहाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. तशात एके दिवशी सकाळी एक जवान बेस कॅम्पला आला. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण त्याच्या खिशांत आणि हातात ओसंडून वाहणारे १०० अमेरिकन डॅालर्सच्या नोटांचे बंडल्स होते. जॅार्जला वाटलं खोट्या नोटा असतील. पण निट निरखून पाहता सगळ्या खऱ्या नोटा होत्या. सगळा कॅम्प तहान भूक विसरून गेला. नोटांचं रहस्य होतं एफ.ए.आर.सी. या कोलंबीयाच्या दहशतवादी संघटनेनं जमिनीत पुरुन ठेवलेला पैसा. एफ.ए.आर.सी. जरी दहशतवादी संघटना असली तरी कोकेनचा अवैध व्यवसाय करणं त्यांना जास्त फायद्याचं ठरु लागल्यानं क्रांती वगैरे करण्याचं सोडून कोकेनचा व्यवसाय करत होती. काही आठवड्यांपासून हंटर बटालियनच्या या कंपनीचा मुक्काम एफ.ए.आर.सी. च्या कॅम्पवर होता. सगळे जवान या दहशतवादी संघटना कम ड्रग कार्टेलच्या जमिनीत बॅरल्समध्ये पुरुन ठेवलेल्या मध्यवर्ती बॅंकेच्या साठ्यावर अक्षरश: झोपत होते.
जाॅर्जच्या कंपनीची चांदीच झाली. अतिरेक्यांच्या तावडीतून ओलिसांची सुटका वगैरे करायचं काम कंपनीनं थांबवलं आणि खजिन्याच्या शोध घ्यायचं काम सुरु झालं. जाॅर्जने कंपनी कमांडर म्हणून निर्णय घेतला की सापडलेल्या पैशांबद्दल बटालियन हेडक्वार्टरला काही सांगायचं नाही. साधा सोपा हिशेब ठेवला; जो जितके डाॅलर शोधून काढेल तितके त्याचे. एका बॅरलमध्ये ८० लक्ष अमेरिकन डॅालर अशी वीस पेक्षा जास्त बॅरल्स जवानांनी उकरुन शोधून काढली. सुमारे १५ कोटी अ��ेरिकन डाॅलर���स होते. भारतीय चलनामध्ये ७५ रुपये प्रती डाॅलर हा हल्लीचा भाव धरला तर ११२५ कोटी रुपये होते.
जवानांचं स्वप्नरंजन सुरु झालं. अर्धपोटी असणं सगळे विसरुन गेले. दोन आठवडे असेच गेल्यानंतर सापडलेल्या डाॅलर्सचा वापर दैनंदिन गोष्टींसाठी करत छोटी अर्थव्यवस्था सुरु झाली. शंभर डाॅलरला एक टाॅयलेट पेपर, बॅटरीसह रेडिओ एक हजार डाॅलरला, नविन टूथब्रशची कितीही किंमत दिली तरी एकजण विकायला तयार नव्हता असे प्रसंग घडू लागले. मंडळी कोट्याधिश होती पण खायला काही नव्हतं. आर्मीची हेलिकाॅप्टर्स् इतर महत्वाच्या ॲापरेशन्समध्ये गुंतली असल्यानं या कंपनीच्या जवानांना हेडक्वार्टरला परत न्यायला येऊ शकत नव्हती त्यामुळं हंटर बटालियनच्या कंपनीचे जवान जंगलातच अडकून पडले होते.
शेवटी एकदाची हेलिकाॅप्टर्स आली आणि जितके होतील तितके डाॅलर्सचे बंडल्स घेऊन जवान हेलिकाॅप्टर्स् मध्ये चढले. ठासून हॅवरसॅक्स भरल्या तरी सगळ्यांना मिळून ४ कोटी ६ लक्ष डाॅलर्सच सोबत नेता आले. बाकीचे १०-११ कोटी डाॅलर्स परत बॅरल्समध्ये भरून पुरुन ठेवायला लागले. जवानांचं अवजड लगेज पाहून पायलटना पण आश्चर्य वाटलं. कुणाला काही सांगू नका आणि पैसे खर्च करु नका हा जाॅर्जचा सल्ला मानतील तर ते तरुण जवान कसले? पोपोयान या टाऊन जवळच्या हेडक्वार्टरला परत आल्या आल्या जवानांनी उन्माद सुरु केला. कासा द कॅम्बियो या परदेशी चलन कोलंबियन चलनात बदलून देणाऱ्या ॲाफिसमधलं कोलंबियन चलन संपलं. कुणी महागड्या गाड्या, कुणी मोटारसायकली, कुणी बारमध्ये प्रचंड पैसे उडवायला सुरुवात केली. ही बातमी बटालियनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या कानावर न जाईल तरच नवल. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या जवानांना फाॅलइन व्हायचा आदेश निघाला. जे परेडवर हजर झाले त्यांना अटक करण्यात आली. जे ���सार झाले त्यांचा शोध सुरु झाला.
पळुन गेलेल्यापैकी एकजण वेस्ट इंडिजच्या एका बेटावर पोहोचला. तिथं त्यानं नविन ओळख धारण करुन लहानसे हाॅटेल खरेदी करुन ते चालवू लागला. दुसऱ्याने अर्जेंटिनाची एक बस कंपनी विकत घेतली आणि जवळ जवळ रिकाम्या बसेस चालवून काळ्याचं पांढरं करायला लागला. लेनिन नावाच्या तिसऱ्याने इक्वॅडोरला जाऊन लिंगबदल सर्जरी केली आर्मेनिय़ा नावाच्या शहरात ब्यूटी पार्लर उघडून आणि एका पोलीसाशी लग्न करुन राहू लागला. जरी कोलंबियन सरकारनं या सर्वांना गुन्हेगार घोषित केलं असलं तरी सामान्य लोकांमध्ये हे सगळे आख्यायीकांतले हिरो झाले होते. त्यांच्या मते या जवानांनी जिवावर उदार होऊन अतिरेक्यांशी मुकाबला केला आणि योगायोगानं त्यांना ही संपत्ती सापडली होती. तसं पाहिलं तर ही युध्दात मिळालेली संपत्ती होती आणि त्यामुळे त्यांनी ती स्वत:कडे ठेवण्यात काही गैर नव्हतं.
कालांतराने अटक झालेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आणि काहींना त्यांच्याकडून जप्त केलेलं पैसेही परत मिळाले. परंतु ही शापीत दौलत होती. त्यापायी कित्येकांच्या हत्या करण्यात आल्या. कित्येकांच्या कुटुंबातील लोकांचं अपहरण करुन खंडण्या मागण्यात आल्या तर कित्येकांना सरळ सरळ धाक दाखवून लुटण्यात आलं.
टन ॲाफ लक हा सिनेमा या घटनेवर आधारित आहे. त्याचबरोबर रिग्रेसो अ ला वुआका (खजिन्याकडे परत) ही स्पॅनिश भाषेत सिरीयल पण आली आहे.
पैशांबद्दलच्या दहा गोष्टी
आपल्याकडे असलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी. थोडक्यात काय तर पैसे कमावणं आणि कमावलेले पैसे सांभाळूणं वाढवणं या दोन वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. पगारदार तसेच ज्यांची मासिक आमदानी ठरलेली असते अशांना पैसे बॅंकेत टाकता येतात त्यामुळं सांभाळायचे कसे हा प्रश्न राहात नाही. परंतु त्यामुळे त्यांच्यापुढे कमाईवृद्धी कशी करायची ही मोठी समस्य़ा असते. दुर्देवानं याकरीता मूलभूत गरजांना आणखी कात्री मारुन बचत वाढविणं हाच पर्याय राहतो. दुर्देवानं अशासाठी की सकस आहार, रोजच्या जिवनातले छोटेमोठे आनंद इत्यादिंना यांना व यांच्या कुटुंबीयांना जास्त बचतीपायी मुकावं लागतं. देशापुरताच विचार केला तर गृहिणींनी केलल्या बचतीमुळे बहुतांश मध्यम आणि गरीब वर्ग तग धरुन आहे असं आय.आय.एम.बंगळूर अर्थशास्राचे प्राध्यापक डाॅ. आर. वैद्यनाथन म्हणतात ते खरंच आहे. या उलट व्यापार उद्यमाच्या माध्यमातून ज्यांच्याकडे पैसे येतात ते पुन्हा उद्योगधंद्यात योग्यप्रकारे गुंतवूण वाढवणं हे सुध्दा मोठं आव्हान असतं.
पैसा कुणाचा? तर जो उपयोगात आणेल त्याचा, असं बेंजामिन फ्रॅंक्लीन म्हणंत. पैसे मिळविण्यातल्या व्यस्ततेत कमावलेल्या पैशांचा उपभोग घेण्याचं राहूनंचं जातं. पैसे बँकेत, शेअर मार्केट, रिअल इस्टेट वगैरेमध्ये अडकून किंवा दुर्लक्ष झाल्याने पडून राहतात. गुंतवणूक केलेल्या समभागांच्या कल्पनारम्य (नोशनल) मूल्यामध्येच समाधानी राहावं लागतं. नोशनल मूल्य म्हणजे समभागांचे बाजारमूल्य. शेअरबाजाराच्या निर्देशांच्या वाढ किंवा घटीप्रमाणे समभागांचे मूल्य कमी जास्त होत राहाते. पुन्हा प्राध्यापक आर. वैद्यनाथन यांच्या मिश्कील शब्दात सांगायचं तर शेअर बाजारामध्ये लक्षावधी अभिमन्यू गुंतवणूकदार आहेत ज्यांनी शेअरबाजाराच्या चक्रव्यूहात प्रवेश तर केला परंतु त्यातून सहीसलामत बाहेर कसं पडायचं हे माहित नसल्याने आतंच अडकून पडलेले आहेत. काहींची मोठे परतावे कमी वेळेत देतील अशा आकर्षक परंतु फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक होते. बाजारात प्रचलीत असलेल्या व्याजदरापेक्षा गुंतवणूकीवर जास्त व्याज देणाऱ्या बऱ्याच योजना बनवाबनविच्या असतात. जेष्ठ नागरिक ठराविक मासिक उत्पन्न मिळेल या आशेने या योजनांमध्ये सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे गुंतवतात. फसवणूक करणं हे अशा खाजगी कंपन्यांचं पहिल्यापासून बिझनेस मॅाडेल असल्यानं पश्चाताप करण्याशिवाय गुंतवणूकदारांच्या हातात काही शिल्लक उरत नाही.
काही बनेल रिअल इस्टेटवाले मोठ्या परताव्याचं अमिष दाखवून दरमहा अमूक तमूक व्याज देऊ असं सांगून रोकड उचलतात. दरमहा व्याज योग्य रितीनं मिळत असल्यानं गुंतवणूकदार समाधानी असतात आणि आपल्या गुंतवणूकीच्या वृध्दिबद्दल निश्चिंत होतात. एके दिवशी रिअल इस्टेटवाला झटका देतो आणि जाहिर करतो की मार्केट फार डाऊन आहे. इथूनपुढे व्याज काही देऊ शकत नाही. इतकंच नाही तर मुद्दल सुध्दा द्यायला मार्केटची परिस्थिती सुधारेपर्यंत थांबाव लागेल. यामुळं गुंतवणूकदारांचं धाबं दणाणतं. वाटाघाटी होतात, प्रश्न काही सुटत नाही. कसा सुटणार ? तो रिअल इस्टेट वाल्यानं मुद्दाम तयार केलेला असतो. वादावादी वाढते. दिवाणी कोर्टात जावं तर बरीच वर्ष लागतील म्हणून पोलीसात जातात. पोलीस स्टेशनला रिअल इस्टेटवाला कबूल करतो की अमूक वर्षांपूर्वी अमूक रोख रक्कम कच्च्या कागदावर लिहून घेतली होती. त्याचबरोबर प्रत्येक गुंतवणूकदाराला दरमहा दिलेल्या व्याजाची यादी देतो. गुंतवणूकदारांच्या आश्चर्याला तेंव्हा पारावार ��ाहात नाही जेंव्हा त्यांना समजतं की व्याजाची रक्कम जवळपास मुदलाएवढी झालेली असते. पोलीसांकडील जबाबात हे नमूद केलं जातं. खोट्या नम्रतेने आपण प्रामाणिक आहोत आणि मार्केट डाऊन असल्यानं हतबल असल्याचं रिअलइस्टेटवाला सांगतो. त्यावेळी समजून जायचं की पैसे घेताना मुदलाएवढं व्याज देऊन झालं की हात वर करायचे हे ठरवूनच रिअल इस्टेट वाल्यानं व्यवहार केलेला आणि प्रत्यक्षात कुठलंही व्याज न देता तीन चार वर्षे गुंतवणूकदारांचे पैसे वापरलेले असतात. गुंतवणूकदारांची फक्त मुदलावरंच बोळवणं होते.
पैसे तात्पुरते उसणे दिलेल्या नातेवाईक किंवा मित्रांनी ऐनवेळी धोका दिला तर आपल्या पैशांवर त्यांना मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. या उलट उत्पन्न तुलनेनं कमी असलं तरी आहे त्याचा पुरेपुर उपयोग करणारे काहीजण असतात. वेळोवेळी देश विदेशात पर्यटन करणारे. कुटुंबासोबत सणासुदीला एकत्र राहणारे सदैव पैसे मिळवण्यात व्यग्र राहात नाहीत. आयुष्यातले छोटे छोटे आनंद वेचण्याची मजा घेतात. खऱ्या अर्थानं पैसा त्यांचा असतो.
मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. पैसे कमावणं हे जुगाराच्या आहारी गेल्यासारखं होऊन बसतं. आजच्या समाजव्यवस्थेमध्ये पैसे हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं महत्वाचं एकक झालं आहे. पूर्वीच्या समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येकाची कामं आणि त्याबाबत मिळणारा मोबदला परंपरागत रितीने ठरलेला होता. परस्परावलंबी असल्याने कुणाकडे किती द्रव्यसंचय व्हावा याला मर्यादा होत्या. सततच्या युध्दांमुळं शांततेचा अभाव, करांचा बोजा आणि स्थावर मालमत्तेच्या मालकीबद्दलची संदिग्धता असल्याने फक्त व्यापारीवर्ग चोरुन लपवून थोडेफार पैसे बाळगून असायचा. त्यांच्यापुढेही पैशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न होता. चोर लुटारुंची नेहमीची भिती आणि त्यांच्यापासून वाचवला तरी तात्कालीन राज्यकर्त्यांपासून धोका होताच. त्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणावर द्रव्यसंचय होण्याची परिस्थिती नव्हती. सध्याच्या समाज व अर्थव्यवस्थेत या सर्व समस्यांवर खुबीनं मात करण्यात आली. त्यामुळं जगण्यासाठी पैसा हे सूत्र दुर्देवानं मागं पडलं व पैशाकरीता जगणं सुरु झालं. आनंदी जिवन जगण्यासाठी संतुलन आवश्यक आहे. ते ज्यांना साधलं ते नशिबवान.
प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा काॅईनबाॅक्स पॅटर्नवर बेतलेल्या असतात. नाणं टाकल्याशिवाय पूर्वी टेलिफोन लागत नसत तशा. शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुध्दा पैशाशी निगडीत असतात. या गरजा पुरविण्यासाठी बचत फार आवश्यक ठरते. मुलांच्या शिक्षणाबाबत सुरुवातीपासूनच फार जागरुक राहायला लागतं. चांगल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुलांना चांगलं शिक्षण देणं क्रमप्राप्त ठरतं. कुणी काहीही म्हणो परंतु चांगलं शिक्षण नसेल तर चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. तीच परिस्थिती आरोग्यसेवांची आहे. कोरोना महामारीच्या काळात याची सर्वांना चांगलीच जाणीव झाली. आरामदायी जिवनशैली, व्यायामाचा अभाव, नोकरी व्यवसायाच्या मागे लागल्यामुळे प्रकृतीची हेळसांड झाल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचं प्रकर्षानं जाणवलं. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर मृत्युच्या थैमानामुळं सर्वांचंच धाबं दणाणलं होतं.
फॅमिली डॅाक्टर ही संस्था आता वैद्यकीय व्यवसायातल्या वेगवेगळ्या विशेष तज्ञांमुळे जवळ जवळ लयास गेली आहे. रुग्णाची स्टेथेस्कोप लावून तपासणी आणि लक्षणांबाबत विचारपूस करुन रोगनिदान जवळ जवळ कालबाह्य झालं आहे. डॅाक्टर थोडा नावारुपाला आला की ज्युनिअर डॅाक्टर्स सोबत ठेवतो. पेशंटच्या रोगाबद्दल व त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल हे ज्युनिअर डॅाक्टर्स पेपर्स तयार करुन ठेवतात. मग एकामागोमाग एक पेशंट नामवंत डॅाक्टरांच्यापुढे पाठवले जातात. एक किंवा दोनच मिनिटात फॅार्म बघून गोळ्याऔषधांचं प्रिस्क्रिप्शन सांगितलं जातं. गमतीची गोष्ट अशी की पेशंटशी हे निष्णात डॅाक्टर कधी कधी डायरेक्ट बोलत सुध्दा नाहीत. किमान रक्त व मूत्र तपासणी केल्याशिवाय रोगनिदान केलं जात नाही. क्लिनिक, लॅब्ज, डायग्नोस्टिक सेंटर्स आरोग्यविमा कंपन्या व औषध कंपन्याच्या साट्यालोट्यात रुग्णांची ससेहोलपट व पिळवणूक होते. आंतररुग्णांसाठी तर आरोग्यविमा ही अत्यावश्यक गरजच झाली आहे. कधी कधी जेवढा विमा मोठा तेवढ्या वेगवेगळ्या तज्ञ डॅाक्टरांच्या भेटी जास्त आणि करायच्या टेस्ट्सची संख्या मोठी. विम्याच्या देय पैशांइतका आंतररुग्णाचा रुग्णालयातला मुक्काम वाढतो. बेजार झालेल्या नातेवाईकांना रोगनिदाना बद्दल काही शंकासुध्दा घेता येत नाही कारण सगळे रिपोर्ट हे पुरावे असतात. तसं पाहिलं तर विशिष्ट वयानंतर शरीरातल्या व्याधी शोधायच्याच म्हटलं तर ते काही फार अवघड काम नाही.
दैनंदिन गरजांचा विचार करता पूर्वी सामानाची यादी करून वाण्याकडे दिली की किराणा भरला जायचा. आता कुणी याद्या वगैरे तयार करायच्या भानगडीत पडत नाही. मॅालमध्ये बास्केट किंवा ट्रॅाली फिरवत कशावर काय फ्री, किती सूट हे बघायचं आणि आवश्यक वस्तूंबरोबर गरज नसलेल्या वस्तूंचं शाॅपींग करायचं. मॅालवाले ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन भुलभुलैय्ये तयार करतात व ग्राहकांना भुरळ पडेल अशी वस्तूंची मांडणी करुन ठेवतात. सरकत्या जिन्यांवरुन चढताच अवतीभोवती सगळ्या वस्तू आकर्षक पध्दतीने लावलेल्या दिसतात. ज्या वस्तूंच्या किमती बद्दल गृहिणी जागरुक असतात अशा वस्तूंचे भाव कमी ठेवले जातात व त्यांच्यावर आणखी सवलती, छोट्यामोठ्या वस्तू फ्री देऊ केल्या जातात. मोठे दुकानदार आपला नफा ग्राहकांना किमतीचा अंदाज नसलेल्या इतर आकर्षक वस्तू व ब्रॅंडच्या माध्यमातून वसूल करतात.
असो... शिक्षण, आरोग्य व दैनंदिन गरजा भागविताना येणाऱ्या समस्या बचतीच्या पैशामुळं पूर्णपणे सुटल्या जरी नाहीत तरी सुसह्य होतात.
गुंतवणूकीत एक्झिट पाॅलीसी, म्हणजे कधी बाहेर पडायचं याची वेळ महत्वाची असतं. आधी म्हटल्याप्रमाणे अर्थविषयक जागरुकता व नियोजन या दोन्ही गोष्टींकडे बहुतेकांचं सर्रासपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. कोणत्या ठेवी कधी परिपक्व होतात, किती व्याज मिळालं, व्याज योग्यरित्या आकारुन दिलं आहे का या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. योग्यप्रकारे पाठपुरावा न केल्यानं ठेवींना बॅंक आपोआप मुदतवाढ देते. प्रथमदर्शनी व्याज बुडाले नाही तरी त्याला तसा फार अर्थ नसतो. एखाद्या ठेवीची मुदत संपताच रोखीकरण करून गुंतवणूक विश्राम घेणं बरं. त्या व्यवहारात मिळालेले व्याज किंवा झालेला नफा आपल्या कुटुंबाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकणं योग्य. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. बचतीच्या बाबतीत असं म्हणतात की खर्चकरून शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे बचत असं न समजता आधी बचत किती करता येईल हे पाहावं व तेवढी बचत करायचं नियोजन करून शिल्लक राहिलेले पैसे खर्च करावेत. मिळकत वृध्दीच्या प्रमाणात बचतीची टक्केवारी तसं पाहिलं तर वाढायला पाहिजे. परंतु तसं नेहमी होत नाही. कित्येकवेळा या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबूनही राहात नाहीत. त्यामुळे बचतीसाठी काटकसर, साधी राहाणी हाच पर्याय आपल्यासमोर शिल्लक राहातो.
बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या लिखाणात क्रेडिटर्सच्या म्हणजे पैसे उधारीनं देणाऱ्यांच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. पैसे उधार देणारी माणसं ज्याला पैसे दिलेले असतात त्याच्या राहणीमानाकडे कायम लक्ष ठेऊन असतात. आपल्याकडे असलेल्या कोणत्याही वस्तूपेक्षा महागडी वस्तू कर्जदाराने घेतल्याचं उधार देणाऱ्याच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या दारात, आपले ठरलेल्या व्याजासह पैसे परत मागायला आलाच म्हणून समजा. कर्जदार जर मेहनत करताना आढळला तर तोच उधार देणारा शाश्वत होऊन आपल्या पैशांबाबत निश्चींत राहातो. कुणाकडून कर्ज घेतलं तर आपल्याकडे पैसे येताच जेवढे शक्य असतील तेवढे परत करावेत. पैसे कमी आहेत म्हणून कसे द्यावे असा संकोच करू नये. उधार देणारा त्याला योग्य प्रकारे आग्रह केल्यास ते स्विकारतो. थोडं थोडं करून कर्ज उतरवित जावं असा मोलाचा सल्ला बेंजामिन फ्रॅंक्लिन यांनी देऊन ठेवला आहे.
इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थाॅट या तत्वज्ञानात मानलं जातं. अस्तित्व, सत्य आणि ज्ञान या त्रिसूत्रीशी निगडीत अध्यात्माचा शोध घेण्याची एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिका व ब्रिटनमध्ये एक चळवळ सुरु झाली. राल्फ वाल्डो इमरसन यांच्या अच्च्युतम व अलौकिक अनुभवाच्या तत्वज्ञानाचा या चळवळीवर प्रभाव आहे. शारिरीक व मानसिक व्याधींची उत्पत्ती आधी मनात होते त्यामुळे सकारात्मक विचार मनात आणले तर यावर मन:शक्तीने मात करता येऊ शकते असं ही विचारधारा म्हणते. ख्रिस्ती विचारसरणी वर बेतलेली असली तरी वेगवेगळ्या अतिप्राचीन विचारांची एकत्र मोट बांधून न्यू थाॅट तयार झाल्याचं दिसतं. ध्यान, प्रार्थना, सकारात्मक विचार आणि जे मिळेल त्याच्याबद्दल कृतज्ञता असेल तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या प्राप्त होऊ शकतात असंही या विचारसरणीत सांगितलं आहे. वॅलेस डी वॅटल यांचं "सायन्स ॲाफ गेटींग रिच" (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं "द सिक्रेट" ही दोन पुस्तकं न��यू थाॅट विचारसरणीवर आधारीत आहेत.
गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. सिकटा पटी या लेखिकेनं पायोनियर या वर्तमानपत्रातील गरीबीच्या उदात्ती करणाची मिमांसा करताना लिहिलं होतं की भारतात चांगलं विरुध्द वाईट या अनुभूतींशी गरीबी श्रीमंती विनाकारण जोडले गेले आहेत. पौराणिक कथा, रामायण- महाभारतातले प्रसंग आणि हल्ली सिनेमातून दाखवण्यात येणाऱ्या महिलांच्या व्यक्तिरेखा या ध्रुविकरणाला जबाबदार असाव्यात. कुटंबासाठी कष्ट उपसून मुलांना नावारुपाला आणणारी महिला साध्या कपड्यात, साध्या राहणीमानाने त्यांना नितीमत्तेचे, परोपकाराचे आणि चांगुलपणाचे धडे देत मोठं करते. शेवटी तिचा विजय होतो आणि वार्धक्यात ती सुखी होते. या उलट श्रीमंत महिलेची पाश्चिमात्य वेषभूषा, लाईफस्टाईल, घमेंडी स्वभाव आणि आरामदायी सुखसोयींचा उपभोग घेणारी प्रतिमा दाखवली जाते. गरिबी म्हणजे प्रामाणिकपणा, साधेपणा, त्याग तर श्रीमंती म्हणजे अप्रामाणिकपणा, लोकांचे शोषण आणि गर्व असं दाखवलं जातं. प्रामाणिकपणे कामधंदा करून श्रीमंत होताच येत नाही अशी लोकांची धारणा करुन देण्यात आली आहे. एक योगिनी तर दुसरी भोगिनी. असं चित्रण केल्यामुळे काळ्या पांढऱ्यांमधल्या विविध छटा स्पष्टपणे दिसतंच नाहीत. श्रीमंतीतली माणसं प्रामाणिक, दयाळू आणि पापभिरू तर गरिबीतली माणसं क्रूर, अनैतिक आणि बेईमान असंही असू शकत हे आपल्या सहजासहजी पचनी पडत नाही. गरीबीतून सगळा समाजंच बाहेर काढणं हे राष्ट्रांचं धेय्य असायला हवं. विकसीत राष्ट्रांमध्ये ही परिस्थिती बऱ्याच प्रमाणात वास्तवात आल्याचं दिसतं.
कोडिपेंडन्सी
कर्तृत्ववान माणूस सेंच्युरी मिल्स च्या लोगो मधल्या हर्क्युलस सारखा दिसतो. जणू खो-खो खेळायला बसला आहे. दोन्ही हातांनी पृथ्वीगोल मानेवर तोलून धरलेला आणि त्यामुळे सदैव सतर्क राहून जणू खो ची वाट पाहाणारा. गोदीतली वॅगन खाली करणाऱ्या माथाडी कामगारासारखा पाठीवर लादलेल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यांमुळे झुकलेला. हाच तो कोडिपेन्डन्ट. मराठी भाषेत याला काय शब्द आहे ते माहित नाही परंतु या लेखापुरतं को-डिपेन्डन्टला आपण हर्क्युलस म्हणू.
को-डिपेन्डन्सी हा गेल्या काही वर्षात इंग्रजी भाषेत प्रचलित झालेला शब्द आणि मानसिक आजार आहे. आपल्या माणसांना म्हणजे लाभार्थीना गरज असो वा नसो त्यांना सदैव मदत करणारा. त्यांच्या विचित्र, बेजाबदार आणि हेकट वागण्यापुढे मान तुकवून त्यांची काळजी घेणारा, आपल्या वैयक्तिक गरजा, आनंद इत्यादि बाबी गौण माननारा, सदैव आपल्या माणसांना वाचवणारा त्यांच्यासाठी लढणारा ग्लॅडिएटर ही को-डिपेन्डन्टची म्हणजे आपल्या हर्क्युलसची स्वप्रतिमा असते. या इमेजमध्ये तो दंग आणि खुष असतो. इतका की एखाद्या जुगाऱ्यासारखा आपल्या माणसांना मदत करणं हे व्यसन होऊन बसतं. चुकून कुणाला नाही म्हणायची जर वेळ आली तर त्याला ओशाळल्यासारखं व्हायला लागतं.
खेडेगावी एक साधा पत्यांचा जुगार चालायचा. दोन प्रतिस्पर्धी समोरा समोर बसायचे. एकजण पत्ते पिसायचा व दुसरा बोली लावायचा. समजा बोली लावली की कोणताही गुलाम पत्ता ज्याच्याकडे पहिला येईल तो जिंकला... आणि यावर एक रुपयाची बोली. पत्ते पिसणाऱ्याने बोली स्विकारली की दोेघे एक एक रुपया टेबल टाकायचे. मग पत्ते पिसणारा एक समोरच्याकडे आणि दुसरा स्वत:कडे असे पत्ते उघड करायचा. ज्याच्याकडे गुलाम पत्ता पहिल्यांदा येईल तो डाव जिंकायचा. मग पुढची बोली आणि पुढचा डाव. पत्त्याचा हा जुगार खेळणारे जरी दोघे असले तरी भोवती कोंडाळं करुन पहाणारे दहाबारा असायचे. मग अवती भोवतीचे पाहणारे त्याच डावावर जोड्या करुन पाच-दहा पैशांच्या लहान लहान पैजा लावायचे. अशा प्रकारे हर्क्युलसच्या डावावर अवलंबून राहणारी बरीच माणसं त्याचं कौशल्य गृहित धरु लागतात आणि आपल्या पैजा हर्क्युलस जिंकून देईल या विश्वासावर निर्धास्त जगतात. हर्क्युलसला मानसिक त्रास होईल, समाजामध्ये त्याची पत घसरेल, त्यांच्यावतीने इतरांना विनंत्या करताना त्याला ओशाळल्यासारखं होईल याचीसुध्दा काहींना फिकीर नसते. हर्क्युलसनं दहा पैजा जिंकल्या आणि अकरावी मोठी पैज हरला तर त्याच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभं करतात.
को-डिपेन्ड्न्सी हे व्यसन प्रयत्नपूर्वक संपवणं महत्वाचं आहे. कोणत्याही नात्यामध्ये सकारात्मक देव-घेव असणं नात्याला पोषक असतं. ज्यावेळी एकतर्फी आवक बारनिशी चालू होते त्यावेळी आपल्यातल्या ग्लॅडिएटरला थोडा आवर घालणं गरजेचं ठरतं. इतरांचे प्रश्न आपण तयार केलेले नसतात, त्याच्यावर आपलं काही नियंत्रण नसतं आणि ते सोडवणं नेहमीच काही शक्य नसतं. नेहमीच जिंकून देऊ न शकल्यानं येणारी गिल्ट प्रयत्नपूर्वक संपवावी, कोणत्या रास्त गोष्टींबाबत मदत करू शकतो आणि कोणत्या नाही याची सीमारेषा स्पष्ट करावी, आपल्या सौख्याला प्राथमिकता देण्यामध्ये काही गैर नाही ही भावना जोपासणं गरजेचं ठरतं.
त्यांनी “ मी लाभार्थी” नाही म्हटले तरी फारसा फरक पडू नये. दातृत्वाचा मूलभूत नियम आहे की देणाऱ्याने कुवतीपेक्षा थोडं जास्त द्यावं आणि घेणाऱ्यानं गरजेपेक्षा कृतज्ञतापूर्वक थोडं कमी घ्यावं. जिथं घेणारा हा नियम मोडेल तिथं देणाऱ्यानं भविष्यातलं देण्याघेण्याचा विषय संपवावा.
नात्यागोत्यांच्या बाबतीत आतापर्यंत सांगेन तिथं कडाडून विरोध होतो अशी माझी एक पक्की धारणा आहे. ती म्हणजे आपल्यावर सदैव निस्पृह प्रेम करणारी नाती दोनचं- आई आणि मुलगी- बाकीं नात्यांमध्ये काहीना काही स्वार्थ दडलेला असतो. आईकडे हवंतेवढं लक्ष न देणारा मी अपराधी आहे. त्यामुळं मुलांनी माझी अपेक्षेएवढी काळजी घेतली नाही तरी तक्रार करणार नाही असं ठरवतो आहे.
पोलीसींगच्या बाबतीत इतक्या वर्षांच्या नोकरीनंतर सुपरकाॅप, गुन्हेगारांचा कर्दनकाळ हे फिक्शन असतं असं माझं मत आहे. पोलीस दलामध्ये सिनेमाच्या लार्जर दॅन लाईफ व्हायरस पासून जे स्वत:ला दूर ठेवतात, यशाचं श्रेय सहकाऱ्यांना देतात आणि तत्वज्ञान हा फक्त विद्यापीठातच शिकवायचा विषय आहे अशी ज्यांची धारणा असते अशीच माणसं नेतृत्व देतात. खोटं वाटत असेल तर ब्रिटीश फिल्ड मार्शल माँटगोमेरी यांचं लिडरशीप हे पुस्तक वाचावं.
पोलीसासारखी इंटरेस्टिंग दुसरी नोकरी नाही. खात्यात आल्यापासून नोकरीबद्दला कधीही पश्चाताप झाला नाही. उलट कित्येक वेळा वाटायचं, खरंच आपण गेल्या जन्मी काहीतरी मोठं पुण्यकर्म केलं असावं. काही सहकाऱ्यांना पोलीस विभागाबद्दल नाराजीचा सूर लावताना आणि स्वत:वर कसा नेहमी अन्याय होत आला याचा पाढा वाचताना पाहतो तेंव्हा मला आश्चर्य वाटतं की हे असं का बोलत आहेत? कितीही खडतर पोस्टींगवर काम करायची वेळ आली तरी तिथंही असेच उल्हासाने काम करणारे सहकारी मिळतातंच. त्यामुळं पोलीसींग एन्जाय करायला शिकलो. पोलीस स्टेशन म्हटलं की तिथं समाजात घडणाऱ्या वाईटसाईटाचं रिपोर्टिंग होणारंच. कायदा सुव्यवस्थेचे मोठमोठे प्रश्न निर्माण होणारंच आणि त्यामुळे कधी काळी आपल्याला शारीरिक इजा किंवा मानसिक त्रास होईल असं वाटलं तरी योग्य प्रकारे तयारी क��ुन दोन हात केले तर तसा काही धोका वगैरे होत नाही असं मला जाणवलं आहे. या गोष्टींकडे आपल्यावर आलेली संकट म्हणून न बघता दैनंदिन पोलीसींगचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलं तर त्रास होत नाही.
सेवानिवृत्तीची आतापर्यंत ऐेकलेली भाषणं आठवता सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा कंठ दाटून येण���, डोळ्यांत टचकन पाणी येणं या गोष्टी होताना पाहिल्या आहेत. आपल्या बाबतीतही असं काही होणार नाही याचा भरवसा नसल्यामुळं हे सगळं लिहून ठेवावं असं मनात आलं.
जयंत नाईकनवरे. (९८९२००२५००)
३० डिसेंबर, २०२३
1 note · View note
mhlivenews · 10 months
Text
तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!
पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. खरं तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, या जागेवर काही पोटनिवडणूक झाली नाही. त्यामुळे काही महिन्यातच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेचा खासदार कोण असेल यासाठी आता सर्वच पक्षातून मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. २०१४ पासून या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Video : एक जरी गाडी मध्ये आली असती तर काहीच खरं नव्हतं! ब्रेक फेलमुळे अनर्थ
Video : एक जरी गाडी मध्ये आली असती तर काहीच खरं नव्हतं! ब्रेक फेलमुळे अनर्थ
Video : एक जरी गाडी मध्ये आली असती तर काहीच खरं नव्हतं! ब्रेक फेलमुळे अनर्थ लोणावळा, पुणे : पुणे मुंबई द्रूतगती महामार्गावर शुक्रवारी एक मोठा अनर्थ टळला. चालकाविना सुसाट निघालेल्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाले होते. हा ट्रक संरक्षक भिंतीला धडक देत अमृतांजन पुलाखालून जात होता. यावेळी सुदैवानं एकही वाहन मध्ये नव्हतं. त्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 7 months
Text
शिक्षक : सांग Pradip माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
Pradip : मंकी.
शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना.
Pradip : नाही सर देवा शपथ.
मी तुमच्याकडे बघून बोललो !
0 notes
bandya-mama · 7 months
Text
शिक्षक : सांग Bandya माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
Bandya : मंकी.
शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना.
Bandya : नाही सर देवा शपथ.
मी तुमच्याकडे बघून बोललो !
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती सं��ाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
बँकिंग क्षेत्रात सरकारकडून बहुप्रतिक्षित सुधारणा-केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन
रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी “लिओ पॉलिमर तंत्रज्ञान” वापरण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
राजकीय स्वार्थासाठी राज्यात जातीय द्वेष-राज ठाकरे यांच्याकडून खंत व्यक्त
प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजाराने निधन
आणि
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना फसवी असल्याची काँग्रेसची टीका
****
बँकिंग क्षेत्रात सरकारकडून बहुप्रतिक्षित सुधारणा राबवल्या जात असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या आज रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाशी संवाद साधत होत्या. बँकिंग नियमन सुधारणांची दीर्घ काळापासून गरज होती असं त्यांनी सांगितलं. बँकांनी आपल्या व्यवहारात कोअर बँकिंगवर लक्ष केंद्रित करण्याच्या आवश्यकतेवर अर्थमंत्र्यांनी भर दिला.
****
रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी “लिओ पॉलिमर तंत्रज्ञान” वापरण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काल दिल्या. ठाणे नाशिक महामार्गावरच्या खारेगाव ते पडघा, तळवली ते शहापूर या रस्त्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या महामार्गावरची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावी तसंच कामात अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी असं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सांगितलं. कामं करताना वाहतूक कोंडी होऊ नये याकरता सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
****
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. ७ हजार १५ कोटी रुपयांच्या या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १० पूर्णांक ६४ शतांश टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. या योजनेमध्ये ९ धरणं प्रस्तावित आहेत. त्यातून २६० पूर्णांक ३० दशलक्ष घन मीटर पाणी उपसा करुन चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव, पारोळा, भडगाव तालुक्यांतल्या एकूण ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेते तसंच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हे आरोप लावण्याबाबतचे ध्वनिचित्रफितीचे पुरावे सुद्धा केंद्रीय अन्वेषण विभागाला सादर केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
राजकीय स्वार्थासाठी राज्यात जातीय द्वेष पसरवला जात असल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं नवनिर्माण यात्रेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. उपलब्ध संधीचा योग्य वापर केल्यास राज्यात आरक्षणाची गरज नाही असं सांगत आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या मागणीचा ठाकरे यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले –
महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला अस वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठलं राज्य नाही आहे. या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नौकऱ्यापर्यंत, उद्योग - धंद्यांपर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असतांना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात. पण आमच्या मुलींना मुलांना इथे मिळत नाहीत त्या ज्या महाराष्ट्रामधल्या जो कोटा आहे महाराष्ट्रातील ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत या जर समजा आपण नीट वापल्या महाराष्ट्रातील मुलामुलीसाठी, मराठी मुलामुलींसाठी तर आपल्याला खरं तर आरक्षणांची गरज नाही.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजिक नक्षत्रवाडी इथल्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत गृह प्रकल्पाचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालं. या प्रकल्पाचं बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार असल्याने, संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास, सावे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे साडे सहा हेक्टर क्षेत्रावर १ हजार छपन्न सदनिका बांधण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापनासाठी दोनशे कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी दिली.
****
मराठी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं आज मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. विजय कदम यांनी मराठी नाटकं, चित्रपट तसंच दूरदर्शन मालिका अशा तीनही माध्यमांमधून अनेक वर्ष काम केलं. त्यांनी भूमिका साकारलेलं ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य, तसंच ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलिसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘आम्ही दोघं राजा राणी’ आदी चित्रपटही खूप गाजले. विजय कदम यांच्या पार्थिव देहावर आज अंधेरीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
****
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना फसवी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आज लातूर इथं पार पडला, त्यावेळी पटोले बोलत होते. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, आमदार अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठवाड्यातले काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे, वसंतराव चव्हाण आणि कल्याण काळे यांचा सत्कार करण्यात आला. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावेळी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात आज राज्यस्तरीय मातंग समाज मेळावा घेण्यात आला. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-आर्टी ची स्थापना केल्याबद्दल मातंग समाजाच्यावतीनं शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार करण्यात आला. आरक्षणाचाही प्रश्न लवकरच निकाली निघेल. मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं. आरक्षण विषयक अंतर्गत वर्गवारी न्यायालयाच्या निर्देशानंतर पूर्ण केली जाईल असंही देसाई यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यात मौजे बावची इथं पालक मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी आणि उमेद महिला स्वयंसहायता गटातील महिलांनी तिरंगा रॅली काढली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी सामूहिक तिरंगा प्रतिज्ञा घेतली. तसेच, गावातल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटनांवरील विषयांवर निबंध सादर केले. जिल्हा परिषद शाळांसह विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा हिला उपांत्यपूर्व फेरीत किरगिझस्तानच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह एकूण सहा पदके जिंकली आहेत. उद्या या स्पर्धेचा समारोप होत आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचा आज पॅरिसमध्ये इंडीया हाऊस इथं सत्कार करण्यात आला. यावेळी ऑलिम्पिक संघटनेच्या सदस्य नीता अंबानी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मिनी मॅरेथॉन घेण्यात आली. मदत आणि पुनर्वसन विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यावतीनं घेण्यात आलेल्या या मॅरेथॉनला गारखेडा इथल्या संत गजानन महाराज मंदिरापासून प्रारंभ होऊन विभागीय क्रीडा संकुलात तिचा समारोप झाला.
****
परभणी महसूल विभागामार्फत महसूल पंधरवाड्यामध्ये 'सैनिक हो तुमच्यासाठी' हा कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात घेण्यात आला. हुतात्मा सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता-पिता यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच सैनिक कल्याण विभागाव्दारे माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत, शिष्यवृत्ती, आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले
****
लातूर शहरात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत १५ तारखेला कल्पतरु मंगल कार्यालयात रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात रानभाज्या तसंच रानफळांची तांत्रिक माहिती आणि पाककृती यांची सचित्र माहिती देण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातल्या रानभाज्या आणि रानफळं विक्रीसाठी घेऊन येण्याचं आवाहन प्रकल्प संचालक एस. व्ही. लाडके यांनी केलं आहे. तालुकास्तरावर कालपासूनच या महोत्सवाला सुरूवात झाली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजीक भांगसी माता गडावर विविध विकासकामांसाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालक��ंत्री अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली. भांगसी माता गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासन सत्तार यांनी दिलं.
****
आषाढी एकादशीनंतर पंढरपूर इथून निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी आज बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं पोहाचली. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ही पालखी उद्या पहाटे शेगावकडे मार्गस्थ होणार आहे.
****
0 notes
Video
youtube
निवडणूक आयोगाची अवस्था खोट्या सोन्याला खरं म्हणण्याची..
0 notes