Kalyan girl Murder : कल्याण हादरले! नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा चिरून हत्या
Kalyan girl Murder : कल्याण हादरले! नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा चिरून हत्या
Kalyan girl Murder : कल्याण हादरले! नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा चिरून हत्या
Kalyan Crime : एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने कल्याण हादरले आहे. या प्रकरणी एका संशयीताला अटक करण्यात आली आहे.
Kalyan Crime : एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने कल्याण हादरले आहे. या प्रकरणी…
View On WordPress
0 notes
0 notes
' नऊ वर्ष नऊ प्रश्न ', मोदीजी उत्तर द्या असं का केलं ?
काँग्रेसने सध्या वेगवेगळ्या शहरात पत्रकार परिषदेचा धडाका लावलेला असून केंद्र सरकारला ‘ नऊ वर्ष नऊ प्रश्न ‘ विचारलेले आहेत. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नांची ऍलर्जी असल्याकारणाने ते याची उत्तरे देणार नाहीतच उलट प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना देशद्रोही ठरवणे , खालच्या पातळीवर टीका करणे , प्रश्नाचा रोख दुसरीकडे वळवणे आणि प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचे मानसिक खच्चीकरण करणे असे प्रयत्न…
View On WordPress
0 notes
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे य��ाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes
·
View notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर;विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त
ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं उपोषण स्थगित
आणि
मराठवाड्यात जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची पायाभरणी करतील. भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स तसंच २० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. मराठवाड्याचं आर्थिक केंद्र होण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी ही माहिती दिली.
****
दरम्यान, केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या वाढवण तसंच ग्रेट निकोबार बेटावरच्या गालाथी खाडी इथं नवीन बंदरं विकसित करण्यात येत आहेत. केंद्रीय बंदरविकास, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. देशातल्या बंदरांची एकूण माल हाताळणी क्षमता येत्या ५ वर्षात दुप्पट होणार असल्याचा विश्वासही सोनोवाल यांनी वर्तवला.
****
जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गेल्या दहा वर्षात मजबूत पायाभूत आराखडा निर्माण केल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स च्या एकोणसत्तराव्या स्थापना दिन समारंभात बोलत होते. वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या जागा वाढवणं आणि प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणं, अशी पावलं सरकारने उचलल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.
****
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या औचित्यानं आज मुंबईत मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड महापालिका कार्यालयातही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या चकमकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं मत, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं व्यक्त केलं आहे. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं यावेळी बजावलं.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथे नागरिकांनी आज कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीचं निवेदन यावेळी नायब तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून सोळा बचतगटांची निवड करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. यावेळी गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यानं कसोटी क्रिकेटच्या टॉप टेन मानांकन यादीत पुनरागमन केलं असून, तो आता या यादीत भारताच्याच यशस्वी जैस्वालसोबत पाचव्या स्थानावर आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पाच स्थानांच्या घसरणीनंतरही या यादीत स्थान राखलं असून, तो दहाव्या क्रमांकावर आहे.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १४ दरवाजे अर्धा फूट तर चार दरवाजे एक फूट उघडण्यात आले असून, धरणातून अकरा हजार ५२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
या पार्श्वभूमीवर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता परवा सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं आयोजित केलेल्या या मेळाव्यातून निवृत्तीवेतन तसंच स्पर्श योजनेसंबंधित सगळ्या अडचणींचं निरसन करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छावणी परिसरातल्या सर्वत्रा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.
****
0 notes
Chinchwad : चिखलीमधील नऊ एकर जागेचा पिंपरी चिंचवड पोलिसांना ताबा
Chinchwad : चिखलीमधील नऊ एकर जागेचा पिंपरी चिंचवड पोलिसांना ताबा – MPC…
0 notes
प्लुटो हा खरोखर ग्रह का मानला जात नाही.
“मला असं वाटतं की प्लूटो हा एक ग्रह आहे. मी लहान असताना आम्हाला शिकवलं होतं की आपल्या सूर्यमालेत नऊ ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून,प्लूटो. हे नऊ ग्रह लक्षात ठेवण्यासाठी माझ्या,मेंदूमध्ये ते पक्के रुजवून ठेवले होते.
जेव्हा जगभरातील मथळे प्लुटोला त्याच्या ग्रहाचा दर्जा काढून टाकू लागले तेव्हा माझं संपूर्ण जग उलटं पालटं झालं.“हे कसं असू शकतं?”असा प्रश्न माझ्या मनात…
0 notes
पुण्यात स्वस्तात घर घेण्याची शेवटची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे नऊ दिवस
पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये विविध उत्पन्न गटांसाठी ४७७७ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र, नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० मेपर्यंत वाढवली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे नऊ दिवस आता शिल्लक राहिले आहेत.
म्हाडाच्या पुणे…
View On WordPress
0 notes
सय्यद बिलाल सय्यद अख्तर या 9 वर्षाच्या चिमुकल्याने पूर्ण केला 13 तासांचा पहिला रोजा..Syed Bilal Syed Akhtar, a 9-year-old boy completed his first fast of 13 hours.
जालना शहरातील माळीपुरा भागातील सय्यद बिलाल सय्यद अख्तर या नऊ वर्षीय चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचा त्याच्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केलाय. आज तब्बल 13 तासाचा रोजा सय्यद बिलालने पूर्ण केल्या बद्दल परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले. बिलालच्या नातेवाईकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिलेत. चिमुकल्याने रोजा ठेवला याचा आनंद त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर साफ दिसत…
View On WordPress
0 notes
एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे,गायक हर्षद कांबळे
0 notes
११ वर्षीय मुलाची बिबट्याशी झुंज यशस्वी; बिबट्याला लावले पळवून
नाशिक : नदीच्या परिसरामध्ये नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पत्र्याचा डबा बिबट्याच्या दिशेने ताकदीने भिरकावल्याने बिबट्याने धूम ठोकली. यामुळे किरकोळ दुखापतीवर वन्यप्राण्याचा हल्ला निभावून गेला. ही घटना नाशिक रोड वालदेवी नदीकाठाजवळ असलेल्या पिंपळगाव खांब परिसरात रविवारी (दि. १०) दुपारीच्या सुमारास घडली.
अभिषेक सोमनाथ सारसकर असे मुलाचे नाव असून अभिषेक हा बालंबाल…
View On WordPress
0 notes
सोयी सुविधांचा लाभ सर्वांना मिळावा हीच मोदी सरकारची हमी आहे - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
समाजातल्या सर्व घटकांना कोणताही भेदभाव न करता योजनांचा लाभ मिळत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासारख्या सोयी सुविधांचा लाभ सर्वांना मिळावा हीच मोदी सरकारची हमी आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी सांगितले.
मुंबईतल्या चेतना महाविद्यालयच्या प्रांगणात विकसित भारत संकल्प यात्रे निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शिरिष चौधरी, आमदार कालीदास कोळंबकर, यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडे नऊ वर्षात लोककल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना देशात राबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. आगामी काळातही सबका साथ सबका विकास यावर आधारित सरकारची वाटचाल सुरू राहील असे गोयल म्हणाले.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यतातून संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण मुंबईतल्या चेतना महाविद्यालयाच्या प्रांगणात पाहण्यासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम स्थळावर उज्वला गँस योजना, पीएम-स्वनिधी योजनेचा स्टाँल लावण्यात आला. तसेच मुंबई महापालिकेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीरही भरवण्यात आले होते
***
NM/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai Image result for facebook icon /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
0 notes
दिव्य धर्म यज्ञ दिनानिमित्त अप्रतिम माहिती
केशव बंजारा (व्यापारी) च्या रूपात भगवान कबीरजींनी आपल्या सतलोकातून नऊ लाख बैलांच्या वर पोत्यात (पिशव्या) भरून शिजवलेले अन्न आणले आणि एक लाख सेवेकरीही आणले. आणि काशीत भव्य दिव्य भंडारा आयोजित करण्यात आला होता.
#foodie #sewa#reels #trending
#trend #explore #trendingreels #indianreels
#KabirisGod
#SupremeGod
0 notes
राज्यात ९ लाखांहून अधिक बालके आजारी, जन्मजात व्यंग, कर्करोग अन्...; पालकांनो वाचा सविस्तर
मुंबई : राज्यात आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ या अभियानाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला नऊ लाख ६४ हजार ३८४ बालके आजारी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात जवळपास सात लाख बालकांना बाल्य आजार झाल्याची नोंद करण्यात आली असून, १३ हजार ९०५ बालकांमध्ये जन्मजात व्यंग असल्याचे आढळून आले आहे. या एकूण आजारी बालकांपैकी ९ लाख ६ हजार ८६३ बालकांवर उपचार या अभियानाच्या…
View On WordPress
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भारतीय अर्थव्यवस्था २०३० पर्यंत सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याकडे अग्रेसर असल्याचं निरीक्षण, अमेरिकेतल्या गोल्डमन सॅक्स या जागतिक ब्रोकरेज कंपनीनं नोंदवलं आहे. सक्षम सकल घरगुती उत्पादन आणि सकारात्मक गुंतवणूकदार यामुळे भारताचं उत्पन्न स्थिरगती राखून आहे आणि ही गती २०३० पर्यंत कायम राहील, असं या कंपनीनं म्हटलं आहे. मूडीज ॲनलिटिक्स या दुसऱ्या अशाच कंपनीनं, २०२५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सात पूर्णांक एक टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
****
अपघात घडवून आणण्यासाठी रेल्वे रुळांवर अडथळे निर्माण करण्याच्या घटनांची रेल्वेनं गंभीर दखल घेतली असून अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन दक्ष आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालय यासंदर्भात सर्व राज्य सरकारांच्या निरंतर संपर्कात आहे. राज्यांचे पोलीस महासंचालक, गृह सचिव, तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयए यांनाही या घटना टाळण्याच्या अनुषंगानं दक्ष राहण्याच्या सूचना दिल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. कोणीही अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशारा वैष्णव यांनी दिला.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ते आज नाशिक इथं उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहा यांनी काल नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. सध्या धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क रहावं, कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये, तसंच कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पवना धरणही शंभर टक्के क्षमतेने भरलं आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमं��्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. बळीराजाला सुखी, समृद्ध करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढवणं गरजेचं असून, प्रगती पथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या निम्न खैरी, रामनगर, दिंडेगाव लघू पाटबंधारे प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला आहे. करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली
****
0 notes
Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकाला मिळणार बळ; नऊ पदे भरण्यास मान्यता
Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकाला मिळणार बळ; नऊ पदे भरण्यास मान्यता – MPC…
0 notes