Rohit Pawar : मुंबईतील बेस्ट बसचे फोटो ट्वीट करून रोहित पवार यांनी व्यक्त केली 'ही' खंत
Rohit Pawar : मुंबईतील बेस्ट बसचे फोटो ट्वीट करून रोहित पवार यांनी व्यक्त केली ‘ही’ खंत
Rohit Pawar : मुंबईतील बेस्ट बसचे फोटो ट्वीट करून रोहित पवार यांनी व्यक्त केली ‘ही’ खंत
Rohit Pawar Tweet : मुंबईतील बेस्ट बसेसवर झळकलेल्या जाहिरातींचे फोटो ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे.
Rohit Pawar Tweet : मुंबईतील बेस्ट बसेसवर झळकलेल्या जाहिरातींचे फोटो ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे.
Go to…
View On WordPress
0 notes
Pune: पुण्यातील इंदापूरजवळ एका बसचे दोन्ही टायर फुटल्याने भीषण अपघात ;सुदैवाने जीवितहानी नाही
एमपीसीन्यूज – पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून (Pune)दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खासगी प्रवाशी बसला अपघात झाला आहे.ही बस पुण्याच्या दिशेने निघाली असतांना इंदापूर पासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती या बसचे दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाला आहे.
टायर फुटल्याने या बसने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला धडक दिली. ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली…
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती मुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, बँकाकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर इंथ वार्ताहारांशी बोलताना केली. ते मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांना मोफ वीज, बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना राज्याचे कृषीमंत्री परदेश दौऱ्यावर जातात. या मंत्र्यांसह राज्य शासनाला शेतकऱ्यांचं काही देणघेणं राहिलेलं नाही. त्यांचं फक्त टेंडरवरच लक्ष असल्याची टिकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. इंथली माणसे त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर पुढे जावी, अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मु यांनी व्यक्त केली.
****
चार मे पासून सुरू झालेल्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत १३ लाख ३६ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे. केदारनाथ इंथ दर्शनासाठी दररोज २० हजारांहुन अधिक भाविक पोहचत आहेत. राज्य शासनानं यात्रेसाठी केलेली तयारी भाविकांच्या गर्दीमुळं अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेक भाविकांना गर्दीमुळं केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य होत नाही. १० मे पासून आतापर्यंत केदारनाथाचं ५ लाख ५१ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली आहे. हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.
****
महावितरणने एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असलेल्या ग्राहकांसाठी वीज जोडण्यांची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही देण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त वीज जोडण्या आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या सरकारी तसंच खाजगी कंपन्यासाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनीला या सुविधेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात याबाबत मार्गर्शनाची सोय करण्यात आली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जिंतूर जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसचे चाक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतुर टी पॉइंट जवळील टोलनाक्या जवळ आज सकाळी साडे सात च्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर इथं काल कृषि विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. डाळींब ही जिल्ह्याची ओळख असून रेशीम शेतीसाठी इथं पोषक वातावरण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी डाळींब आणि रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. यावेळी कृषी अधिकारी आणि तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्ये आज सकाळी रेल्वेस्टेशन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
दिल्लीतील कथीत आबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवारील यांनी नियमीत जामीन देण्याच्या मागणीसाठी स्थानिक राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना १० मे रोजी १ जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीतील प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजुर केला होता.
****
0 notes
https://marmikmaharashtra.com/the-wheel-of-st-came-off-the-bus-went-30-feet/
0 notes
भरधाव एसटीची दोन कारसह पाच दुचाकींना धडक
पुणे : येथे फातीमानगर भागामध्ये भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने ७ वाहनांना उडवले असून अपघातामध्ये ६ जण जखमी झाले आहेत. भरधाव एसटीने २ मोटारींसह ५ दुचाकींना धडक दिली आहे. पोलिसांनी एसटी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.
अधिक माहितीनुसार, एसटी बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरामध्ये बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे बसने दोन चार चाकी…
View On WordPress
0 notes
डीटीसी एप्रिलपर्यंत 300 नवीन इलेक्ट्रिक बस जोडणार आहे त्यांचे मार्ग आणि भाडे याबद्दल माहिती आहे
डीटीसी एप्रिलपर्यंत 300 नवीन इलेक्ट्रिक बस जोडणार आहे त्यांचे मार्ग आणि भाडे याबद्दल माहिती आहे
नवी दिल्ली. येत्या काही दिवसांत दिल्लीचे रस्ते आता इलेक्ट्रिक बसने भरून जाणार आहेत. सध्या दिल्लीच्या रस्त्यावर फक्त दोन इलेक्ट्रिक बस धावत आहेत, पण लवकरच हा आकडा 100 च्या पुढे जाईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 17 जानेवारी रोजी इंद्रप्रस्थ डेपोतून वर्तुळाकार मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली. आता दोन दिवसांपूर्वी आनंद विहार ते मेहरौली मार्गावर दुसरी ई-बस सेवा सुरू करण्यात…
View On WordPress
0 notes
नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आमदार रहांगडाले यांच्या हस्ते सफारी बसचे लोकार्पण
नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आमदार रहांगडाले यांच्या हस्ते सफारी बसचे लोकार्पण
तिरोडा, दि.3 : जिल्हा वन पर्यटन विकास निधी अंतर्गत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या चोरखमारा गेट येथे पर्यटकांना वनभ्रमंतीसाठी 15 सीटर सफारी बसचे लोकार्पण तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्याला पर्यटनाचा खूप मोठा वारसा निसर्गाकडून लाभला आहे. न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला देश-परदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.…
View On WordPress
0 notes
PAK vs SL Asia Cup 2022 : महत्त्वपूर्ण झेल सोडल्यानंतर शादाब खानची भावनिक पोस्ट; म्हणाले, "चूक झाली..."
PAK vs SL Asia Cup 2022 : महत्त्वपूर्ण झेल सोडल्यानंतर शादाब खानची भावनिक पोस्ट; म्हणाले, “चूक झाली…”
काल ११ सप्टेंबरला चर्चा आशिया कप २०२२ च्या अंतिम परिणामचा श्रीलंकेने पाकिस्तान २३ धावांनी केला. श्रीलंकेने सहाव्यांदा या चषकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. हा सामना जोरदार आणि अटीतटीचा ठरला. पहिल्या १० षटकांमध्ये श्रीलंकेतून निसटला असे वाटते. कारणही तसेच होते. श्रीलंके बसचे पाच माघारी ५८ धावून परतले. हा संघी पाकिस्तानी गोलंदाजी खूप कमी कुवत होता.
मात्र, पाकिस्तानच्या शादाब खानने सोडलेल्या दोन…
View On WordPress
0 notes
बस दरीत कोसळली, २ ठार, ४० जखमी
सुरत : गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सपुतारानजीक ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २ ठार, तर ४० जण जखमी झाले आहेत. भीषण दुर्घटना घडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
सुरतनजीकच्या अमरोली येथील एका खाजगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची सहल डांगमध्ये आली होती. सापुतारापासून काही अंतरावर डांगच्या घाटात अडीचशे फूट दरीत ही बस कोसळली. या बसमध्ये ५० जण होते. परतीचा प्रवास करीत असताना बस दरीत कोसळली.
या भीषण दुर्घटनेमुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डांग जिल्ह्यातील पंपासरोवर, शबरीधामसारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी ही सहल नेण्यात आली होती. जखमींना अहवा आणि सुरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली.
Read the full article
0 notes
स्कूल बसची फी वाढ : लाखो पालकांच्या खिशाला फटका, स्कूल बसच्या फीमध्ये किमान 20% वाढ होणार!
स्कूल बसची फी वाढ : लाखो पालकांच्या खिशाला फटका, स्कूल बसच्या फीमध्ये किमान 20% वाढ होणार!
स्कूल बसची फी वाढणार!
प्रतिमा क्रेडिट स्रोत: twitter
स्कूल बसची फी मुंबई: स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या (एसबीओए) अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेगवेगळ्या प्रदेश आणि शाळांनुसार स्कूल बसचे शुल्क वाढवले जाईल.
मुंबई स्कूल बसचे शुल्क: मुंबईत लाखो पालकांच्या खिशाला महागाईचा फटका बसणार आहे. आता मुलांना बसने शाळेत पाठवणे महागात पडू शकते. राज्य स्कूल बस ओनर्स असोसिएशन (SBOA) मुलांना शाळेत आणण्यासाठी आणि…
View On WordPress
0 notes
धक्कादायक ! स्कुल बसचे कंत्राट बंद केल्याने चालकाने पालकांना शाळेत ठेवले कोंडून
धक्कादायक ! स्कुल बसचे कंत्राट बंद केल्याने चालकाने पालकांना शाळेत ठेवले कोंडून
धक्कादायक ! स्कुल बसचे कंत्राट बंद केल्याने चालकाने पालकांना शाळेत ठेवले कोंडून
पुणे – पुण्यातील एका शाळेमध्ये चक्क पालकांना कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कुलबसच्या चालकाने हा प्रताप केळ्याचे समोर आले आहे. पुण्यातील हडपसरमधील एचडीएफसी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हडपसरच्या एचडीएफसी शाळेत स्कूलबस चालवणाऱ्या चालकाच कंत्राट बंद केल्याने त्याने शाळेत गोंधळ केल्याचे समोर आले…
View On WordPress
0 notes
दिल्लीहून कासगंजकडे जाणार�� बसचे टायर फुटले http://www.headlinemarathi.com/citizens-news/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be/?feed_id=42680&_unique_id=5ff840e482463
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 09 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०९ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारताने प्रशासनात क्रांतिकारी बदल करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी, तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी गेल्या नऊ वर्षातले लेख, व्हिडिओ, ग्राफिक्स आणि माहिती पंतप्रधानांनी आज ट्विटरवर शेअर केली. तंत्रज्ञानाने लोकांच्या जीवनात कार्यक्षमता आणि सोयी आणल्या आहेत, आणि डिजिटली सशक्त भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न वाढवले असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
भारताने गेल्या नऊ वर्षांत झपाट्याने परिवर्तन पाहिलं आहे, आता मतांच्या राजकारणाऐवजी कामाचं राजकारण होत असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भाजपच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी करताना ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ सरकारचं कार्यच नव्हे तर देशातल्या राजकारणाची संस्कृतीही बदलली असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या विचारसरणीमुळे इतर सर्व पक्ष विचलित होत असून, भाजपशी सामना करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षानेदेखील काँग्रेसशी हातमिळवणी केली, अशी टीका नड्डा यांनी केली.
****
महाराष्ट्रातल्या लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे या आणि इतर मागासवर्गीय जाती, केंद्रीय यादीत सुचीबद्ध करण्याची प्रक्रिया, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती, आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. गेल्या सहा महिन्यात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केलेल्या कामांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
****
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत येण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा, विद्यापीठ महाविद्यालयांची स्थिती आणि सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, नियामक परिषद इत्यादी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
****
नांदेड रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक नीति सरकार यांनी काल परतूर, सेलू आणि मानवत रोड रेल्वे स्थानकांची पाहणी केली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत या तिन्ही रेल्वे स्थानकांवर आणखी काय प्रवासी सुविधा वाढवता येतील, यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं एसटी बस, कार आणि दुचाकीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. काल दुपारी ही घटना घडली. एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यानं बसने कार आणि दुचाकीला धडक देऊन हा अपघात झाला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या उगम ग्रामविकास संस्था या ठिकाणी 'मिरची : उत्तम कृषी पद्धती' या विषयावर काल कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा सहकार आणि पणन विभाग, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प आणि बी. पी. जी. फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी विविध प्रशिक्षणातून नवीन तंत्रज्ञान आणि माहिती जाणून घेऊन त्याचा वापर शेतीत करावा, तरच शेती समृद्ध होईल, मिरची ही मानवाची दररोजची गरज असून मिरचीची लागवड शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
इंग्लंड इथं सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आजच्या तिसर्या दिवशी भारत पाच बाद १५१ धावांपासून पुढे खेळणार आहे. अजिंक्य रहाणे २९, तर के एस भरत पाच धावांवर खेळत आहे. काल ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद सिराजनं चार, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारत सध्या ३१८ धावांनी पिछाडीवर आहे.
****
जपान मध्ये सुरु असलेल्या महिला कनिष्ठ आशियाई हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं चीनी तैपेई संघाचा ११- शून्य असा पराभव केला.
****
अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. यामुळे गुजरातच्या तटवर्ती भागात हवामान विभागाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ गोव्यापासून ८२० किलोमीटर, मुंबईपासून ८४० तर पोरबंदर पासून ८५० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिणी गुजरात आणि सौराष्ट्र च्या काही भागांमध्ये १३ जून पर्यंत पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उद्यापासून तीन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलका पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
//************//
0 notes
सहल...
१९७८ साली नववीचे वर्ष सुरु झाले आणि एक दिवस गुरुजींनी जाहीर केले की ‘शाळेची मराठवाडा दर्शनाची सहल जाणार आहे, ज्यांना यायचे आहे त्यांनी नावे नोंदवावीत.’ हे ऐकून नवीन हुरुप आला. शाळा कॉलेजमध्ये अशा सहली जात असतात असे ऐकलेले होते, पुस्तकात वाचलेलेही होते. पण आपल्याला हा अनुभव घेता येईल असे कधी वाटले नव्हते.
त्या दिवशी धावतच घरी आलो. सहलीबद्द्ल घरी सांगितले. बाळू आठवीत होता. त्याचीही यायची इच्छा होती. घरुन होकार मिळाला आणि दुसर्या दिवशी आमची नावे नोंदवून फिसही भरली. नाव नोंदवल्यावर अंगात उत्साह भरला. काय करु अन काय नको असे झाले. मित्रांबरोबर रोज चर्चा होत होती. आपण असं करायचं, तसं करायचं असे एकेक ठरु लागले. सहलीच्या दिवसापर्यंत शाळेच्या शिकवण्याकडे लक्षच लागत नव्हते. कधी एकदा तो दिवस उजाडतो असे झाले होते.
शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. आदल्या दिवशी गुरुजींनी सर्व सुचना दिल्या होत्या. सोबत दोन दिवस पुरेल एवढा डबा घ्यायचा. गरम कपडे, पांघरुन, अंथरुन, ही सर्व यादी सांगितली होती. कुणीही सोबत पैसे ठेवायचे नव्हते. जे काही घ्यायचे असतील ते गुरुजींकडे द्यायचे होते. लागलेच तर त्यांना कारण सांगून मागून घ्यायचे असे सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व तयारी करुन मी व बाळू त्या दिवशी सकाळी सातलाच शाळेत पोहोचलो. शाळेसमोर स्वच्छ अशा दोन लाल बस उभ्या होत्या. दोन्ही बसेसवर ‘भारत विद्यालय उमरगा सहल बस’ असे बॅनर लावलेले होते. त्या लाल पर्या पाहुन खूपच उत्साह वाढला. अशा स्वच्छ बसेस एकतर लग्नाकार्यात असायच्या किंवा रातराणी प्रवासात! मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या बसेस होत्या. घरुन काही पैसे आम्ही आणले होते, ते गुरुजींकडे जमा केले. सर्व विद्यार्थी जमेपर्यंत आणि नाव नोंदणी होईपर्यंत नऊ वाजले. सर्वांची गिनती झाली आणि एकदाचे बसच्या चाकाखाली नारळ ठेवण्यात आले. त्याबरोबर ‘गणपती बाप्पा मोरया’ चा गजर झाला आणि दोन्ही बसेसनी लातूरचा रस्ता धरला. आम्ही काही मित्र ड्रायव्हरच्या मागची आडवी सीट आणि त्यासमोरच्या सीटवर बसलो होतो. समोरासमोर बसून सीटवर पाय ठेवता यायचे त्यामुळे मजा येत होती.
गाणी म्हणत, आरडाओरडा करत प्रवास सुरु झाला. दोन्ही बसचे मध्येच एकमेकांना ओव्हरटेक करायचे कॉम्पिटीशन सुरु व्हायचे. त्यावेळी दोन्ही बसमधले विद्यार्थी ‘हुर्र्यो’ करत ओरडायचे. अशी मजा करत प्रवास चालू असतांना अचानक मध्येच एका ठिकाणी बसेस थांबल्या. सोबतचे सर्व गुरुजी खाली उतरले. बसच्या समोर एक जीप थांबलेली होती. त्यात काही टवाळखोर मुले दिसत होती. दोन तीन वेळेस ही जीप बसेसच्या मागे पुढे करतांना आम्ही पाहिली होती. त्या मुलांशी बोलून गुरुजी आत आले. ते रागात दिसत होते. तिथून निघून आम्ही लातूरच्या सूतगिरणीत आलो. गुरुजींनी कुठूनतरी कुणालातरी फोन केला असावा, त्यामुळे ती जीप आणि ती मुले परत दिसली नाहीत.
सूतगिरणीत कापसाचे पिंजणे, गठ्ठे बांधणे आदी सर्व पाहून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. बसच्या मागच्या बाजूला आम्ही काही मुले मिळून गाणी म्हणत होतो. शाळेतून निघतांना गुरुजींनी प्रवासात उपयोगी पडतील म्हणून घुंगरकाठ्या घेतल्या होत्या. त्या काठ्यांचा वापर करुन मागच्या पायर्यावर मी गाण्यांसाठी ताल धरला. घुंगरकाठ्यांच्या खुळ खुळ अन खट खट आवाजाच्या तालात गाणे म्हणायची मजा वाढली होती.
गाणे गाऊन थकल्यावर आम्ही आमच्या समोरच्या आडव्या सीटवर बसलो. समोरासमोर सीट्स असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या मुलांनी पाय सीटसवर ठेवले. पायाच्या या मचानावर बाळू आरामात झोपला. हसत खेळत जोक सांगत परभणी केव्हा आले कळले नाही.
परभणी कृषी विद्यापीठात तिथल्या अधिकार्यांनी हॅचरीज, हॉर्टीकल्चर, अग्रीकल्चर आदीबद्दल माहिती दिली. बदक, डुकर, शेळी पालन कसे करतात हे दाखवले. कित्येक प्रकारची झाडे पाहिली. फारसं कळत नव्हतं, पण गुरुजींच्या धाकाने सर्व पहावे लागले. पाहुन झाल्यावर एका हॉस्टेल बिल्डींगमध्ये रात्री आम्हाला मुक्कामाला नेण्यात आले. त्या बिल्डींगच्या बाहेर बसूनच आम्ही सोबत आणलेला डबा खाल्ला. अॅग्रीकल्चरल कॉलेजच्या हॉस्टेल्सबद्दल बरेच ऐकलेले होते. त्यामुळे आम्ही दबुनच होतो. हॉस्टेलच्या रुम्समध्ये पाच-दहा असे करुन आम्हाला झोपायला जागा दिली होती. थकलेले असल्यामुळे आम्ही लवकरच झोपलो.
पहाटेच गुरुजींनी सर्वांना उठवले. अजून बाहेर अंधारच होता. खाली येऊन बाहेरच्या हौदावर हातपाय तोंड धुतले. थंडी वाजत होती. पाण्यात हात घालायला नको वाटत होते. तशा थंडीतही काही मुले आंघोळ करत होती. ते पाहुन अंगावर काटाच आला. कसेबसे तोंड धुऊन आम्ही बसमध्ये बसलो. कृषी विद्यापीठातून बसेस बाहेर पडल्या. कुठेतरी आम्हाला नाष्टा खायला दिला. खाणे झाल्यावर पुढचा प्रवास सुरु झाला. गाणे, गोंधळ या गदारोळात संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान आम्ही औरंगाबादला पोहोचलो. सरस्वती भुवन प्रशालेत आमची रहायची व्यवस्था करण्यात आली होती. एका हॉलमध्ये सतरंज्या टाकलेल्या होत्या. तिथे सामान ठेऊन मी व बाळू गुरुजींची परवानगी घेऊन बाहेर पडलो. मोठा भाऊ जवळच शारदाश्रम कॉलनीत रहात होता. मागे सातवीत असतांना औरंगाबादला आलेलो असल्यामुळे त्या परिसरातली थोडेफार माहिती होती. भावाकडे जाऊन खाणेपिणे करुन परत शाळेत आलो. गप्पा, हसीमजाक करत रात्री केव्हातरी आम्ही झोपलो.
सकाळी लवकर उठून तयार झालो आणि सिद्धार्थ उद्यानात गेलो. तिथे उद्यान आणि झू पाहून दुपारी जेवायला आम्हाला स्टेशनजवळच्या पंजाब हॉटेलमध्ये नेण्यात आले. आम्ही मित्र एकाच ठिकाणी बसलो होतो. काही वेळातच सर्वांसमोर राईसप्लेट्स आल्या. जेवता जेवता बियाणी नावाच्या मुलगा ‘हड्डी’ असे जोरात ओरडला. त्याच्या भाजीत त्याला नॉनव्हेजचा तुकडा दिसला होता. आरडाओरडा सुरु झाला. हॉटेलच्या मॅनेजरने माफी मागितली. पुन्हा दुसरे ताट देण्यात आले. यात बराच वेळ गेला. कसेबसे जेवणे आटोपून आम्ही विद्यापीठात गेलो. तिथली बॉटनिकल गार्डन वगैरे पाहुन औरंगाबाद केव्हज, बिबी का मकबरा अन पाणचक्की करुन संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो.
संध्याकाळी गुलमंडीवर जाण्याचा प्रोग्राम होता. बाजारात काही विकत घ्यावे तर जवळ पैसे नव्हते. घाबरत घाबरत गुरुजींना पैसे मागितले. आमचेच पैसे असले तरी कारण सांगावे लागायचे. पण बाजारात जायचे असल्यामुळे गुरुजींनी आम्हाला दहा दहा रुपये दिले. गुलमंडीवर फिरून काही वस्तू विकत घेतल्या. कामाक्षी हॉटेलमध्ये दोसा खाऊन लस्सी पिली. पोट चांगलेच भरले होते. हॉटेलच्या रेलिंगवर असलेल्या लाकडी अर्धनग्न मुर्त्या पाहुन मुलांचे टिंगलटवाळी करणे सुरु होते. ते ऐकत हसत हसतच आम्ही बाहेर पडलो.
रात्री आठच्या सुमारास आम्ही परत मुक्कामी आलो. चालून चालून खूपच थकलेलो होतो. तरी काही मुलांना पिक्चर बघायची हुक्की आली. गुरुजींना त्यांनी पटवले. त्यांनीही ते मान्य केले आणि रांगेत चालवत आम्हाला सादिया टॉकीजमध्ये नेले. ‘मै तुलसी तेरे आंगन की’ हा सिनेमा होता. गुरुजींनी तिकिट काढून आम्हाला सर्वांना खुर्च्यांवर बसवले. पिक्चर सुरु झाला. काहीच समजत नव्हते. समोर पाहता पाहता केव्हा डोळा लागला कळलेच नाही. जवळ जवळ सर्व मुले गाढ झोपली होती. पिक्चर सुटल्यावर रात्री बारा वाजता सर्वांना उठवायचे कष्ट गुरुजींना घ्यावे लागले. झोपेतच शाळेत आलो आणि सतरंजीवर ताणून दिली. थिएटरमध्ये जरी झोपलेलो असलो तरी त्या पिक्चरचे टायटल साँग मात्र आजही कुठे ऐकले तर त्यावेळचा प्रसंग डोळ्यासमोर येतो!
सकाळी लवकर उठलो. शाळेतल्या हौदावर कशीबशी आंघोळ उरकली. दोन दिवस गोळीच घेतली होती, त्यामुळे नाईलाजाने आंघोळ करावी लागली. सर्वजण तयार झाल्यावर आम्ही वेरूळला गेलो. कैलास लेणी पाहुन आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. बसमध्ये बसून परत गाणी गात, विनोद करत प्रवास सुरु झाला. दुपारी तीन चार वाजता आम्ही कुंथलगिरीला पोहोचलो. डोंगर चढत अनेक दिगंबर मुनींच्या मुर्त्या पाहिल्या. भव्य संगमरवरी मुर्त्या पाहतांना त्याबद्दल खूप कुतुहल वाटत होते. तिथे असलेल्या एका जैन मुनींनी या मुर्त्यांबद्दल बरीच माहिती सांगितली.
रात्री कुंथलगिरीलाच देवस्थानाच्या एका हॉलमध्ये मुक्कामाची व्यवस्था होती. जेवणे आटोपून शेकोटीच्या भोवती करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात आले. सर्व मुला-मुलींनी यात भाग घेतला होता. गाणी, नाच, असे बरेच काही चालले होते. ते संपल्यावर रात्री बाराच्या सुमारास आम्ही झोपलो.
सकाळी कुंथलगिरी पर्वतावरच्या रम्य वातावरणात स्नान आटोपून तयार झालो. भूक लागली होती. जवळचा डबा उघडला. दशम्या शिल्लक होत्या, पण भाजीला वास येत होता. नाईलाजाने डबा फेकून द्यावा लागला. पाणी पिऊन मुकाट बसमध्ये बसलो. कुंथलगिरी फाट्यावर सर्वांना नाष्टा देण्यात आला. एकदम हायसे वाटले. खायला मिळेल का नाही ही भीती वाटत होती, पण ती खोटी ठरली. भरपेट नाष्टा करुन तिथले प्रसिद्ध पेढे घरी नेण्यासाठी विकत घेतले आणि तृप्त होवून दहाच्या आसपास आम्ही तिथून निघालो.
पाचवाच दिवस होता, पण असे वाटत होते की आपण खूप दिवसांपासून बाहेर आहोत. आता घरचे वेध लागले होते. सर्व हौस पूर्ण झाली होती. त्या तंद्रीतच मौजमस्ती करत प्रवास चालू होता. प्रवासात कोणकोणती गावे लागली, काय काय झाले याचे कुणाला काही देणे घेणे नव्हते. फक्त मस्ती, आरडाओरडा, गाणे यातच सर्वजण मग्न होते. या गोंधळ गडबडीत उमरगा केव्हा आले कुणाला कळलेही नाही. संध्याकाळी पाच वाजता बसेस सुखरुप शाळेच्या प्रांगणात आल्या आणि हर्षोल्हासाने सर्वांनी जोरात ‘गणपती बाप्पा मोरया’ चा गजर केला. कुठलेतरी शौर्य गाजवून आलो अशा अविर्भावात सर्वजण खाली उतरले.
आमची आयुष्यातली पहिलीवहिली सहल निर्विघ्न पार पडली. आनंदाने घरी येवून सहलीचा सर्व वृत्तांत सांगितला. रोजच्या दैनंदिन जीवनात या सहलीमुळे नवे चैतन्य आले होते. दुसर्या दिवशी पासून शाळा सुरु होणार होती, पण कंटाळा येण्याऐवजी नव्या दमाने शाळेत जायचा हुरुप आला होता. कदाचित सहली अॅरेंज करण्यामागे शाळा कॉलेजचा हाच हेतू असावा...
नितीन कंधारकर,
औरंगाबाद.
0 notes
कंटेनरने एस टी बसचालकाला चिरडले , चालक ठार
कंटेनरने एस टी बसचालकाला चिरडले , चालक ठार
कंटेनरने एस टी चिरडले अपघातात चालक ठार
निफाड : लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर या बसगाडी साठी बस क्रमांक एम एच १४ -३६४१ ही बस शनिवारी सकाळी लासलगाव बस आगारात प्रवेश घेत असताना कंटेनर नंबर एम एच ४३ वाय ७४६३ ने धक्का दिल्याने बसचे चालक एस. पी.निकम यांनी खाली उतरून पाहणी करीत असतांना कंटेनरने या चालकास फरफटत नेऊन या चालकाचे तुकडे तुकडे करीत ओढून नेले .या दुर्दैवी अपघातात चालक एस. पी.निकम…
View On WordPress
0 notes
ukraine bus hostage एका चित्रपटासाठी त्याने केले बसचे अपहरण!
ukraine bus hostage एका चित्रपटासाठी त्याने केले बसचे अपहरण!
[ad_1]
किव: खंडणी, तुरुंगातून गुन्हेगाराची सुटका, शत्रू देशाविरोधात कारवाई आदी वेगवेगळ्या कारणांसाठी बस, विमानांचे अपहरण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, युक्रेनमध्ये एकाने बसचे अपहरण करत अनेकांना ओलीस ठेवले होते. या ओलीस नाट्याचा शेवटही एखाद्या चित्रपटाला साजेशा असा झाला. ज्या कारणासाठी बसचे अपहरण करण्यात आले ते कारण ऐकून अधिकारीही चक्रावून गेले.
युक्रेनमधील लुट्स्क शहरात सोमवारी एका…
View On WordPress
0 notes