कोणत्या मंत्राचा जाप केल्याने काल सुद्धा नतमस्तक होतो पहा आज
दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
4 notes
·
View notes
कोणत्या मंत्राचा जप केल्याने काल सुद्धा नतमस्तक होतो?
अवश्य पहा आज दुपारी 1.00 वा. LIVE आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर व उद्या सकाळी 5.55 वा. LOKशाही न्यूज़ चैनल वर
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
लोकांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर पर्यायी विवाद निराकरण यंत्रणेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये एकता नगर इथं सर्व राज्यांचे कायदा मंत्री आणि कायदा सचिवांच्या परिषदेचं आज दूरदृशय प्रणालीच्या माध्यमातून उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. खटले जलदगतीनं निकाली काढण्यासाठी लोकअदालतीच्या भूमिकेचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची समिक्षा करणं आवश्यक असून, जुने आणि असंबद्ध कायदे सुधारित किंवा रद्द केले पाहिजेत, असं पंतप्रधान म्हणाले. कायदा बनवतानाच तो कायदा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही समजेल अशा भाषेत लिहिण्यावर आपलं लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. नागरीकांचं राहणीमान अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात ३२ हजार तरतुदी हटवल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी बोलताना, न्यायदानात होणारा विलंब कमी करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि अंमलबजावणी यांच्यातल्या समन्वयावर भर दिला.
****
माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. अब्दुल कलाम यांची जयंती आज राज्यात सर्वत्र 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जात आहे.
****
उत्पादनांची गुणवत्ता टिकवणं या मंत्राचा वापर करून भारत आपल्या उत्पादनांची जगभरात ब्रँडिंग करू शकतो, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारतीय मानक संस्थेच्या मुख्यालयात आयोजित जागतिक मानक दिन समारंभात ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. राष्ट्रीय मानक संस्थेनं शून्य दोष तर शून्य परिणाम यास समर्थन देणारी मानकं तयार करून, उद्योगांना सुविधा देणारी संस्था म्हणून काम केलं पाहिजे असं गोयल यावेळी सांगितलं.
****
शेती आणि उद्योग क्षेत्रानंतर खनिज आणि खाण क्षेत्रं ही रोजगाराची संधी पुरवत असून, २०४७ पर्यंत भारत विकसित देश म्हणून ओळखला जावा यासाठी, या दोन क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात आयोजित "मिनकॉन २०२२" या परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र खनीकर्म महामंडळ, विदर्भ आर्थिक विकास परिषद, यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते.
****
उस्मानाबाद जिल्हा विकासासाठी ३७४ कोटी ४८ लाख ९३ हजार रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दिली. ते काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ होण्यासाठी तुळजापूर देवस्थान विकास आराखडा तयार करावा तसंच धोकादायक असलेल्या ६५० वर्गखोल्यांना नव्याने बांधण्याची मान्यता देत असल्याचंही सावंत यांनी यावेळी सांगितलं.
****
‘स्वच्छ भारत मिशन’ ग्रामीण अभियानाअंतर्गत आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं सातारा इथल्या जिल्हा परिषद शाळेत जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाचे प्रमुख राजेंद्र देसले यांनी यावेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता आणि गावासह परिसरातल्या स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. तसंच शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ कसे धुवायचे या बाबत प्रात्याक्षिक करुन दाखवलं. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्ररेणा दिन म्हणून यावेळी साजरी करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करण्यास जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केला आहे. रेतीची वाहतूक, उपसा करण्यास प्रतिबंध करण्याला तसंच नदी लगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी, किंवा इतरांनी अवैधरित्या रेतीचा साठा करू नये अथवा करू देऊ नये, असंही त्यांनी सांगितलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काल नांदेड इथं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १४ आस्थापनांमधील एकूण दोन हजार ३४० रिक्त पदांसाठी भरती घेण्यात आली.
****
बांग्लादेशातल्या सिल्हेट इथं आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु झाला आहे. श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकला असून, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
//**********//
0 notes
Nag Mantra नागपंचमीच्या दिवशी या मंत्रांचा जप केल्यास फायदा होईल, सापाची भीती दूर होईल
Nag Mantra नागपंचमीच्या दिवशी या मंत्रांचा जप केल्यास फायदा होईल, सापाची भीती दूर होईल
Nag Mantra नागपंचमीच्या दिवशी या मंत्रांचा जप केल्यास फायदा होईल, सापाची भीती दूर होईल
भविष्य पुराणातही परंपरा पद्धती आणि त्याचे फायदे सांगितले आहेत. नागपंचमीच्या दिवशी ब्रह्माजींनी जनमेजयाच्या नाग यज्ञापासून नागांचे रक्षण करण्याचे साधन सांगितले होते. या दिवशी जरतकरूचे पुत्र आस्तिक मुनी यांनीही नागांना भस्म होण्यापासून वाचवले, म्हणून …
नागपंचमीचा दिवस नागदेवतेला प्रिय आहे. नागपंचमी हा सण…
View On WordPress
0 notes
कालसर्पयोगशांती
काल सर्प योगाचे हानिकारक प्रभाव टाळण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या उपायांनुसार पंचाक्षरी मंत्राचा १०८ जप “ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र रोज करावा. राहू ग्रहाच्या बीज मंत्राचा 108 वेळा काळ्या अकीक मालेने जप करावा. शनिवारी पिंपळाच्या मुळास पाण्याने पाणी द्यावे. नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नागदेवाची पूजा करावी. मोराची पिसे धारण करून श्रीकृष्णाची पूजा करावी. शनिवारी किंवा पंचमी तिथीला वाहत्या पाण्यात 11 नारळ वाहावेत. धातूपासून बनवलेल्या नागांच्या 108 जोड्या वाहत्या पाण्यात वाहाव्यात. रुद्राभिषेक सोमवारी विद्वान पंडिताकडून करावा. कालसर्प गायत्री मंत्राचा जप करावा. या उपायांमुळे काल सर्प आणि सर्प योगाचे वाईट परिणाम कमी होतात आणि त्यांच्यामुळे जीवनातील अडथळ्यांना तोंड द्यावे लागत नाही.
जे कालसर्प योगात असतात त्यांना सापाची भीती असते. त्यांना साप चावण्याची भीती वाटते. स्वप्नात शरीराभोवती साप गुंडाळलेला पाहणे किंवा स्वप्नात साप दिसणे ही देखील या योगाची लक्षणे आहेत. उंचावर गेल्यावर अज्ञात भीती, अस्वस्थता, आणि निर्जन ठिकाणी गेल्याने मनात भीती निर्माण होणे ही काल सर्पाची लक्षणे मानली जातात.
0 notes
अक्षय तृतीया कधी आहे ? जाणून घ्या हा दिवस कोणत्या राशिसाठी राजयोग बनत आहे?जाणून घ्या, महत्व, पूजा-विधि आणि शुभ मुहूर्त! | 03-May-2022
अक्षय्य तृतीय हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी सुरू केलेले प्रत्येक काम अक्षय्य लाभ देते, म्हणून याला अक्षय्य तृतीया असे नाव देण्यात आले आहे. काही ठिकाणी हा दिवस आखा तीज म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि श्रीहरी यांची पूजा केल्यास अक्षय फळ मिळते. हिंदू धर्मानुसार या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते.इंग्रजी कॅलेंडरनुसार, यावर्षी अक्षय्य तृतीया 3 मे, मंगळवार 2022 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी तीन विशेष राजयोग तयार झाल्याने या अक्षय्य तृतीयेचे महत्त्व अनेक पटींनी वाढणार आहे.
अक्षय्य तृतीयेचे मुहूर्त
ज्योतिषाचार्य पं.सुनील दवे यांच्या मते वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला सूर्य मेष राशीत आणि चंद्र वृषभ राशीत जातो, तेव्हाच अक्षय्य तृतीयेचा योग तयार होतो. पौराणिक ग्रंथांनुसार, या दिवशी श्रीहरीचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवातही झाली. या तिथीचे शुभ मुहूर्त लक्षात घेऊन भगवान गणेश आणि वेद व्यास यांनी महाभारताची रचना सुरू केली. या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती. या दिवशी बद्रीनाथचे दरवाजेही भाविकांसाठी उघडले जातात. आखा तीज मुहूर्ताच्या या दिवशी पंचांग न पाहता शुभ व शुभ कार्य पूर्ण होतात. या दिवशी गया आणि हरिद्वारमध्ये मोठ्या संख्येने लोक पिंड दान करतात, ज्यामुळे पितरांचे आशीर्वाद देखील अक्षय असतात.
अक्षय तृतीया तिथि आणि शुभ मुहूर्त
अक्षय तृतीया प्रारंभः 05.18 AM (3 मे, मंगलवार 2022) पासून
अक्षय तृतीया समाप्ती : 05.18 AM (4 मे, बुधवार 2022) पर्यंत
अक्षय्य तृतीया हा बूज मुहूर्ताचा काळ मानला जातो, त्यामुळे दिवसाची समाप्ती अक्षय्यतेने होते, शुभ कार्य केव्हाही करता येते.
राजयोग
शुक्र मीन राशि मध्ये राहून मालव्य राजयोग तयार करत आहे. गुरुच्या मीन राशिपासून हंस राजयोग आणि शनि आपल्या घरामध्ये शश राजयोग बनत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रहांची ही स्थिती खूप शुभ मानली जात आहे. सोन, घर, जमीन, दुकान, वाहनची खरेदी तुम्ही या दिवशी करू शकतात.
पूजा विधि
अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरि आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. महिला आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी व्रत ठेवतात. सकाळी सूर्योदय पूर्वी अभ्यंग स्नान केले जाते. स्वच्छ कपडे घालून पूजा केली जाते. लक्ष्मी आणि श्रीहरिच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मीजीचा आह्वान मंत्राचा जाप करा.
https://svns-san.blogspot.com/2022/04/03-may-2022_30.html
0 notes
कोणत्याही सोमवारी गळ्यात घाला असा रुद्राक्ष नोकरी प्राप्तीचे योग जुळून येतील नोकरी मिळण्यासाठी उपाय
कोणत्याही सोमवारी गळ्यात घाला असा रुद्राक्ष नोकरी प्राप्तीचे योग जुळून येतील नोकरी मिळण्यासाठी उपाय
आज आपण नोकरी प्राप्तीसाठी म्हणजेच नोकरी मिळवण्यासाठी ज्योतिषी उपाय पाहणार आहोत हा उपाय आपण कोणत्याही सोमवारी करू शकता यासाठी आपल्याला एक 4 मुखी रुद्राक्ष आवश्यक असेल
हा चार मुखी रुद्राक्ष सोमवारच्या दिवशी लाल धाग्यात गुंफून त्याची आपण गंगाजलाने विधिवत पूजा करावी या पूजेमध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 हजार वेळा जप करून हा रुद्राक्ष आपण स्वतःच्या गळ्यात धारण करावा
सोबतच आपण महादेवाच्या मंदिरा…
View On WordPress
0 notes
. *मंत्रशास्त्र - जपमाळ*
जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा.
डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये.
नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये.
माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये.
जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.
. *जप करण्याची पद्धत.*
शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा.
. *गोमुखीने केलेला जप .*
उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते.
अंगठयाच्या सहाय्याने जप : *मोक्ष प्राप्ती होते.*
तर्जनीने जप : *शत्रुनाश होतो.*
मध्यमेने जप : *धनप्राप्ती होते.*
अनामिकेने जप : *शांतीप्राप्त होते.*
करांगुलीने जप : *सुंदरताप्राप्ती होते.*
जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे.
. *जपाची शास्त्रीय पद्धत .*
मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे , या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठमध्यमायोगात्सर्व सिद्धी प्रदासने। (मंत्रमहार्णव) अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्वसिद्धी प्राप्त होतात.
जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघडया जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी.
. *जपमाळेतील १०८ मणी .*
विद्युत शास्त्रात १०८ या अंकाचा खुलासा मिळतो. १०८ हा एक स्थिरांक उल्ल२३ंल्ल३ आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युतशक्ती उपयोगात येते, त्या विद्युतशक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरडे म्हणतात.
[FARADAY (फॅरडे) Rcharge carried by one gram equivalent of an ion, i.e. charge required to pass to liberate १०७.८८= (१०८). gm of silver is called as ONE FARADAY.]
. *धर्मशास्त्रानुसार .*
जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये १०८ मणी असतात. माळेमध्ये १०८ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते.
देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही.
रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो.
शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
*|| बिना दमैश्चयकृत्यं सच्चदानं विनोदकम् |*
*असंख्यता तु यजप्तं तत्सर्व निष्फलं भवेत् ||*
अर्थ :
देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे, त्यानंतर दान-पुण्य आवश्यक आहे. याचप्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधा��ावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो.
माळेमध्ये फक्त १०८ मणी का असतात ? ह्याची वेगवेगळी कारणे….
. *शास्त्रानुसार .*
|| षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकं विशांति |
एतत् संख्यान्तितं मंत्रं जीवो जपति सर्वदा ||
या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या १०८ चा संबंध आहे.
सामान्यतः २४ तासांमध्ये व्यक्ती २१६०० वेळेस श्वास घेतो. दिवसातील २४ तासांमधील १२ तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक १२ तासांमध्ये व्यक्त १०८०० वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या १२ तासांमध्ये १०८०० वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी १०८०० वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी १०८ संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये १०८ मणी असतात.
. *एका मान्यतेनुसार .*
माळेमधील १०८ मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य २१६०० कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये १०८०० वेळेस कला बदलतो. याच १०८०० संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये १०८ मण्यांची संख्या निश्चित केली आहे.
माळेचा एक- एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारी देवता आहे.
. *ज्योतिष शास्त्रानुसार .*
ब्रह्मांडाला १२ भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या १२ भागांचे नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. या १२ राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू संचरण करतात. या ९ ग्रहांच्या संख्येचा गुणाकार १२ राशींशी केला तर १०८ संख्या प्राप्त होते. माळेमधील मोत्यांची १०८ संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते.
. *एका मान्यतेनुसार .*
ऋषीमुनींनी माळेमध्ये १०८ मणी ठेवण्याच्या मागे ज्योतीषीय कारण सांगितले आहे.
शास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि २७ नक्षत्रांचे एकूण १०८ चरण
असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो.
0 notes
रुद्राक्ष कसा बनवला जातो आणि कुठे मिळतो, या लेखातील सर्व माहिती वाचा
रुद्राक्ष कसा बनवला जातो आणि कुठे मिळतो, या लेखातील सर्व माहिती वाचा
रुद्राक्ष वृक्ष
बऱ्याचदा तुम्ही लोकांना रुद्राक्ष माला किंवा मंत्राचा पठण करताना पाहिले असेल, पण रुद्राक्षचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे का किंवा रुद्राक्ष कोठून येतो, आणि तो कसा बनवला जातो.
आम्हाला वाटते की खूप कमी लोकांना याबद्दल माहिती असेल. अशा परिस्थितीत आज कृषी जागरणाने रुद्राक्षाशी संबंधित महत्वाची माहिती आणली आहे. जर तुम्हालाही रुद्राक्षाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत…
View On WordPress
0 notes
सोहम साधना
या माध्यमाद्वारे सोहम साधनेचे योग्य मार्गदर्शन ज्ञानेंद्रनाथांनी केले आहे.
प्रथम गुरूंकडून दीक्षा मिळाल्यावर जो काही मंत्राचा आपण उच्चार करितो त्या लहरी उपांशु, वाचिक, मानसिक इत्यादी स्वरूपातून सभोवतालच्या वातावरणात स्थिरावतात. आपल्या उघड्या डोळ्यांनी न दिसणार्या गोष्टी आपल्या आसपास वावरत असतात. काहीनां समजते तर काही समजून सुद्धा केवळ अज्ञानापोटी टाळण्याचे पाहतात. मंत्र उच्चारांची अजपाजपात होते. तेव्हा मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक चक्रातील बीज अक्षरावर त्याचा…
View On WordPress
0 notes
Lockdown: 'मंदिरे उघडा असा धोशा लावून कोणी हिंदुत्ववादी ठरत नाही'
Lockdown: ‘मंदिरे उघडा असा धोशा लावून कोणी हिंदुत्ववादी ठरत नाही’
[ad_1]
मुंबई: ‘‘मंदिरे उघडा’’ असा रोजचा धोशा लावून कोणी हिंदुत्ववादी ठरणार नाही व ‘‘मशिदी, चर्च खुली करा’’ अशा मागण्या करून कोणाच्या सेक्युलर टोप्यांवर चार चांद लागणार नाहीत. सध्याचा काळ ‘जगा आणि जगू द्या’ या मंत्राचा धोशा लावण्याचा आहे,’ असा खोचक टोला शिवसेनेनं राज्य सरकारला सल्ले देणाऱ्या विरोधकांना हाणला आहे.
वाचा: विठुरायालाही करोनाचा विळखा, मंदिर परिसर ‘कंटेन्मेंट झोन’
काही दिवसांपूर्वी…
View On WordPress
0 notes
three June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/y2n2u2qk
चालू घडामोडी (three जून 2019) अमेरिकेचे व्हिसा धोरण कडक : अमेरिकेच्या ‘व्हिसा’साठी अर्ज करताना आता सर्वानाच समाजमाध्यमांच्या वापराची माहिती द्यावी लागेल. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने खातरजमा करण्याबरोबरच दहशतवादी आणि समाज विघातक व्यक्तींनाअमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखणे असा उद्देश त्यामागे आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने वे धोरण जाहीर केले. त्यानुसार जवळजवळ सर्वच परदेशी अर्जदारांना त्यांच्या समाजमाध्यम वापराची माहिती द्यावी लागणार आहे. तर अमेरिकेला तात्पुरती भेट देणाऱ्यांनाही ही माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच सध्या तरी अर्जदारांना प्रमुख समाजमाध्यमांच्या संकेतस्थळांचा उल्लेख अर्जावर दिसेल, पण नंतर सर्वच समाजमाध्यमांच्या संकेतस्थळांचे पर्याय दिले जातील. व्हिसा अर्जदार समाजमाध्यमांचा वापर करीत नसेल, तर तसा उल्लेख त्याला अर्जावरील पर्यायात करावा लागेल. पण एखाद्याने खोटी माहिती दिली तर त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागतील, असे परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. भारताच्या व्यापार करसवलती अमेरिकेकडून रद्द : लाभार्थी विकसनशील देशाचा भारताचा दर्जा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढून घेतला असून व्यापार अग्रक्रम व्यवस्थेत (जीएसपी) आतापर्यंत दिल्या जाणाऱ्या व्यापार करसवलती रद्द केल्या आहेत. बाजारपेठांत समान प्रवेश देण्याबाबत असलेल्या शंकांवर भारताने अमेरिकेला आश्वासित करण्यासाठी काहीच केले नसल्याने अखेर या सवलती काढून घेण्यात आल्या आहेत. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी या निर्णयाला विरोध केला असतानाही ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यामुळे कित्येक भारतीय उत्पादनांना अमेरिकेत कर भरावा लागणार असून त्याचा फटका येथील उद्योजकांना बसणार आहे. तर four मार्चला ट्रम्प यांनी असे जाहीर केले होते, की अमेरिका भारताचा जीएसपी दर्जा काढून घेण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी 60 दिवसांची नोटीसही जारी करण्यात येईल. ट्रम्प यांनी जारी केलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत three मे रोजी संपूनही अमेरिकेच्या आक्षेपांचे निराकरण भारताला करता आले नाही, त्यामुळे अखेर जीएसपी दर्जा मागे घेण्यात आला आहे. शहीद पोलिसांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन : शहिदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ करताना वीरमरण आलेल्या पोलिसांच्या मुलांचाही या योजनेत समावेश, शेतकरी सन्माननिधी योजनेचा विस्तार, पशुधन रोग निवारणासाठी आर्थिक साह्य़, शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक निवृत्तिवेतन योजना आणि किरकोळ विक्रेत्यांबरोबरच स्वयंरोजगार क्षेत्रातील व्यक्तींना निवृत्तिवेतन; असे अनेक धडाकेबाज निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले. महाविजयानंतर पदभार स्वीकारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. त्या बैठकीत या निर्णयांवर शिक्कामोर्तब करीत ‘जय जवान, जय किसान’ याच मंत्राचा कृतीशील उच्चार जणू सरकारने केला आहे. तर या आधी शहीद जवानांच्या मुला-मुलींनाच केवळ सरकारतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळत होती. तसेच ही शिष्यवृत्ती ‘राष्ट्रीय सुरक्षा निधी’ (एनडीएफ)द्वारे दिली जाते. हा निधी 1962 मध्ये स्थापन करण्यात आला. त्यात राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रयत्नांमध्ये नागरिकांना उत्स्फूर्त देणग्या देता येतात. सध्या या निधीचा विनियोग सेनादले, निमलष्करी दले आणि रेल्वे सुरक्षा दलांमधील जवानांच्या कुटुंबियांच्याशैक्षणिक प्रगतीसाठी प्रामुख्याने होतो. याआधी शेतकरी सन्माननिधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात होते. त्या योजनेचा विस्तार झाला आहेच, पण शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक निवृत्तिवेतन योजनाही सरकारने जाहीर केली आहे. त्यानुसार 18 ते 40 यावयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येते. दिनविशेष: three जून 1916 मध्ये महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना three जून 1947 मध्ये जाहीर झाली. जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी three जून 1998 मध्ये झाली. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
गरिबी दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या ‘या’ मंत्रांचा करा जप; कधीही भासणार नाही आर्थिक समस्या
गरिबी दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या ‘या’ मंत्रांचा करा जप; कधीही भासणार नाही आर्थिक समस्या
गरिबी दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या ‘या’ मंत्रांचा करा जप; कधीही भासणार नाही आर्थिक समस्या
धनाची देवी लक्ष्मीची कृपा असेल तर आयुष्य सुंदर होते. त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात.
धनाची देवी लक्ष्मीची कृपा असेल तर आयुष्य सुंदर होते. त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात. अशावेळी लोक पूजा करतात, मंत्रजप करतात, अनेक उपायही उपाय करतात.…
View On WordPress
0 notes
जाणून घ्या काल सर्प दोष म्हणजे काय, त्यापासून मुक्ती कशी मिळवायची.
तुमच्या कुंडलीमध्ये काल सर्प योग आहे, हे कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून कळते, परंतु जन्मतारीख आणि वेळ यांचे अचूक ज्ञान नसल्यास अनेक वेळा कुंडली चुकीची ठरते. अशा स्थितीत कालसर्प योग तुमच्या कुंडलीत आहे की नाही, हे काही विशेष लक्षणांद्वारे कळू शकते.
कालसर्पाची लक्षणे
काल सर्प योगाने पीडित असताना मृत व्यक्ती स्वप्नात येतात. मृतांमध्ये बहुतांश कुटुंबातील सदस्य आहेत. या योगाने प्रभावित व्यक्तीला घरामध्ये स्वप्नात सावली दिसते. एखाद्या व्यक्तीचे शरी�� आणि घसा दाबल्यासारखे वाटते. स्वप्नात नदी, तलाव, समुद्र इत्यादी पाहणे हे देखील काल सर्प योगाने पीडित होण्याची लक्षणे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगाने प्रभावित व्यक्ती समाज आणि कुटुंबासाठी समर्पित असते, ते त्यांची वैयक्तिक इच्छा व्यक्त करत नाहीत किंवा त्यांच्या आनंदापेक्षा जास्त अर्थ घेत नाहीत. त्यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. आजारपणात किंवा दुःखात एकटेपणा जाणवणे आणि जीवनात व्यर्थ वाटणे ही सर्व या योगाची लक्षणे आहेत.
जर तुम्ही अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर तुम्हाला या योगाने त्रास होण्याची शक्यता आहे. या योगाचा त्रास कमी करण्यासाठी कालसर्प शांती करा.
कालसर्प योग
कर्मफलाची बाब सर्व शास्त्रात आणि धर्मात सांगितली आहे. आपण ज्या प्रकारचे काम करतो त्यानुसार फळ मिळते. कालसर्प योगामागेही हीच श्रद्धा आहे. मान्यतेनुसार, ज्या व्यक्तीने मागील जन्मात सापाला मारले असेल किंवा एखाद्या निष्पाप प्राण्याला इतका त्रास दिला असेल की त्याचा मृत्यू झाला असेल अशा व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प योग तयार होतो. याशिवाय, असेही मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीची तीव्र इच्छा अपूर्ण राहते, तेव्हा ती व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घेते आणि अशा व्यक्तीला देखील या योगाचा सामना करावा लागतो.
कालसर्प योग शांती
काल सर्प योगाचे हानिकारक प्रभाव टाळण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या उपायांनुसार पंचाक्षरी मंत्राचा १०८ जप “ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र रोज करावा. राहू ग्रहाच्या बीज मंत्राचा 108 वेळा काळ्या अकीक मालेने जप करावा. शनिवारी पिंपळाच्या मुळास पाण्याने पाणी द्यावे. नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नागदेवाची पूजा करावी. मोराची पिसे धारण करून श्रीकृष्णाची पूजा करावी. शनिवारी किंवा पंचमी तिथीला वाहत्या पाण्यात 11 नारळ वाहावेत. धातूपासून बनवलेल्या नागांच्या 108 जोड्या वाहत्या पाण्यात वाहाव्यात. रुद्राभिषेक सोमवारी विद्वान पंडिताकडून करावा. कालसर्प गायत्री मंत्राचा जप करावा. या उपायांमुळे काल सर्प आणि सर्प योगाचे वाईट परिणाम कमी होतात आणि त्यांच्यामुळे जीवनातील अडथळ्यांना तोंड द्यावे लागत नाही.
जे कालसर्प योगात असतात त्यांना सापाची भीती असते. त्यांना साप चावण्याची भीती वाटते. स्वप्नात शरीराभोवती साप गुंडाळलेला पाहणे किंवा स्वप्नात साप दिसणे ही देखील या योगाची लक्षणे आहेत. उंचावर गेल्यावर अज्ञात भीती, अस्वस्थता, आणि निर्जन ठिकाणी गेल्याने मनात भीती निर्माण होणे ही काल सर्पाची लक्षणे मानली जातात.
0 notes
खरं तर! असं घडलं!
नवीन लेख- होस्टेलवर नुस्ता धिंगाणा असायचा. मेसमधून जेवण करून आलो कि रात्रभर आम्ही गप्पा मारत, कुणाचीतरी मजा घेत हसत-खिदळत बसायचो. आमचा ग्रुप उशिरा जेवायला जायचा, उशीराच झोपायचा. होस्टेलवरही लोडशेडींगमुळं लाईट जायची. लाईट जाऊ नये म्हणून आम्ही होस्टेलच्या रेक्टरकडे वेळोवेळी तक्रारही केली होती. लाईट गेल्यावर आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळायचो, मोठ्या आवाजात गाणी म्हणायचो, पंजा फाईट खेळायचो. एकदा असंच पंजा फाईट खेळताना जास्त गोंधळ झाला होता, गोंधळावरून होस्टेलमागे राहणाऱ्या तिथल्या लोकल मुलांनी महाराष्ट्राबाहेरील मुलांची रॅगिंगही घेतली होती. रात्रीचे दोन-तीन वाजल्याचे भानसुद्धा आम्हाला राहत नसत. मी आणि अभिजित वांढेकर एका रूममध्ये राहत होतो. तर एका बाजूच्या रुममध्ये अजिंक्य स्वामी आणि विल्यम फर्नांडीस हे दोघेही कोल्हापूरचे. आणि दुसऱ्या बाजूच्या रुममध्ये साताऱ्याचा मयूर केंजळे आणि पुण्याचा विक्रांत पिटके. वरच्या मजल्यावरून सातारचा अमरजित यवतकर अधून-मधून आमच्या ग्रुपमध्ये यायचा. आम्ही अभिजित वांढेकरला वांड्या म्हणायचो, विक्रांत पिटकेला पिटक्या, विल्यमला विल्ल्या, अमरजीतला आमऱ्या आणि मयूरला मयऱ्या! अशी अजब नावं आमच्या मुखी असायची. माझं बारावीपर्यंत सगळ शिक्षण पंढरपूरला झालं होत. इंजिनीअरिंगसाठी कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं. नवीन कॉलेज, नवीन मित्र, नवा परिसर अगदी मजेचे दिवस चालले होते. कॉलेज सुटल्यावर आम्ही क्रिकेट खेळायचो तर शनिवार-रविवार गाठून कधी कोल्हापूरचा परिवार फिरायला जायचो. कधी रंकाळा, कधी ज्योतिबा, पन्हाळा तर कधी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला. बाकीच्या मुलांचेही ग्रुप बनले होते. कुणाचे ग्रुप ज्यांच्या-त्यांच्या गावांप्रमाणे तर कुणाचे इंजिनीअरिंगच्या ब्रांचप्रमाणे. पण आमच्या ग्रुपमध्ये असं काहीही नव्हतं. ग्रुप कसला! वेड्यांचा बाजार नुस्ता! माझ्या कॉलेजलाईफमधला एकही दिवस असा गेला नाही कि मी वांड्याची अक्कल काढली नाही. बरोबर अजिंक्य, विल्ल्या , मयऱ्या, पिटक्या मजा घ्यायला असतच. पण वांड्या कधी चिडायचा नाही, कारण वांड्या चिडला की आमच्या चेहऱ्यावर भलताच राक्षसी आंनंद चढायचा. मग कधी आम्ही पुण्याचे पिटके महाशय, तर कधी मयऱ्याकडे वळायचो, असा एकामागून एकाचा पोपट करायचा आणि खिदळत बसायचं. अधूनमधून कुणी आपले किस्से सांगत असत. आमची पहिली सेमिश्टर अशीच मजा करत संपली होती. बऱ्याच जणांचे विषय राहिले होते. कुणाचा मॅथ्स-एक, कुणाचा ग्राफिक्स, कुणाचा फिजिक्स वगैरे, वगैरे. कॉलेजच सबमिशन जवळ आलं होतं. होस्टेलवर सगळी पोरं एकमेंकांच जर्नल्स घेवून सबमिशन पूर्ण करत होती. ड्रॉईंगचा आभ्यास करत असताना मयऱ्याने वांड्याला टोमणा मारला "प्लँचेटवर वाटी जशी फिरते तसं ड्रॉईंग काढतोयस रे...." "असू दे, काढू डे कसं तरी... ग्राफिक्समध्ये पास होणं महत्वाचं आहे." म्हणत वांड्याने स्वभावाप्रमाणे दुर्लक्ष करत ड्रॉईंग चालू ठेवलं. माझ्या शीटवर मारलेली रेघ मी अर्ध्यावर सोडत वरती पाहिलं आणि मयऱ्याला विचारलं "हा काय प्रकार असतो?" "आ...रे तो आत्म्याचा प्रकार आहे, भविष्यात काय होणार आहे ते समजतं त्याने...! जावू दे, तू आभ्यास कर." "खरं की काय?" मी कुतूहलतेने विचारलं. इतक्यात "हो आम्ही अकरावी-बारावीला करायचो प्लँचेट!" असं म्हणत दारात जर्नल मागायला अजिंक्य आला. "म्हणजे तुम्हाला तुम्हाला भविष्यात काय होणार आहे ते कळायचं?" "हो, आणि आत्मा सांगतो ते." "आता मी हसू कि रडू काय कळेना यार, काहीही फेक ह.. साफ खोटं!" मी हसत हाताला हिसका देत म्हणालो. अजिंक्य म्हणाला "आरे माझ्याबद्दलच्या गोष्टी खऱ्या झाल्या आहेत! मला याचा अनुभव आहे. आणि मीही प्लँचेट करायचं शिकतोयसुद्धा. मला जमायलाही लागलंय." "आरं तर मग चल कि लेकाच्या आपण पास होतो कि नाही ते बघुयात." "आसं नाही करता येत ते, त्याला शांतता लागते, अंधार लागतो, मेणबत्त्या लागतात, त्याला आमवश्या किंवा पौर्णिमा लागते आणि त्याचे आणखी बरेच नियमपण आहेत." आता मात्र वांड्याने मान वर केली आणि म्हणाला "हे असलं काही करायचं नाही ह... हे सगळं थोथांड असतं. अंधश्रद्धा आहे ही! आरे सायन्स कुठं पोहचलं आहे आणि तुम्ही असले-कसले प्रकार करताहात." "तुझ्या घरावरून न्यूटन-आईनस्टाईनचं विमान गेलंय कि काय रे? करून तर बघुयात न. आपण पास होतोय का नाही ते समजेल तरी!" "काही नाही रे, वांड्या. सब झुठ है!" विल्ल्याने वांड्याला कोरस दिली. "आता हे ब..घा... दि ग्रेट सायंटिस्ट मिस्टर विलियम फर्नांडीस!" मी विल्ल्याला टोमणा मारला. "अरे माझं मत काही नाहीरे, पण तुम्हाला करायचं आहे तर करा..." पुन्हा विल्ल्या म्हणाला. "ठरलं तर प्लँचेट करायचं!" मी प्रॅक्टिसची शीट गुंडाळून ठेवली आणि आणि आमवश्या किंवा पौर्णिमा कधी आहे ते पाहिलं. त्याच रात्रीच्या अडीचपासूनच आमवश्या सुरु होणार होती. अजिंक्यने प्लँचेटची तयारी करायला सुरुवात केली. रात्रीचे दीड-दोन वाजले असतील. त्याने एक मोठे शीट घेतले त्यावर त्याने एका बाजूला मोठ्या अक्षरात इंग्लिशमध्ये 'येस' आणि दुसऱ्या बाजूला 'नो' लिहिले, शीटच्यामध्ये ए टू झेड लेटर्स, शून्य ते नऊ अंक काढले. लोड शेडींगमुळं लाईट जायची त्यामुळं आमच्याकडं मेणबत्त्याही होत्या, त्याने ती शीट पसरून त्यावर तीन-चार मेणबत्त्या प्रेत्येक कोपऱ्यात लावल्या. आम्ही हे सगळं डोळे वटारून पाहत होतो. अजिंक्यने सगळ्यांचे मोबाईल बंद करायला सांगितले, ज्यांना बाहेर जायचे आहे त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि दरवाजा बंद करणार इतक्यात वरच्या मजल्यावरचा आमऱ्या फिजिक्सच जर्नल मागण्यासाठी आला. दरवाजा लावणाऱ्यापूर्वी त्यानेही आत येण्याचा हट्ट धरला, हे सगळं काय चालू आहे हे पाहण्याची त्याची कुतुहलता होती. घाईत मी अमऱ्याला रूममध्ये ओढला आणि अजिंक्यने दरवाजा बंद केला. मी, विल्ल्या, मयऱ्या, अजिंक्य, वांड्या आणि आमऱ्या असे एका रूममध्ये होतो. पुन्हा एकदा नियम समजावून सांगितले. अजिंक्यने पुन्हा एकदा अतिशय शांतता राखण्यास विनंती केली. त्याने खिडकीवर चादर टाकली. लाईट बंद केली. आणि सर्व मेणबत्त्या पेटवल्या. शीटवर एक वाटी पालथी करून ठेवली. चौघांना वाटीवर बोट ठेवण्यास सांगितले आणि म्हणाला "वाटी हलायला सुरु झाली की समजायचं आपल्या प्रश्नांची उत्तर दयायला आत्मा आला आहे." मी, अजिंक्य, वांड्या आणि आमऱ्या आम्ही वाटीला बोटाने स्पर्श करून पाहू लागलो. परंतु त्याने सगळ्यांना डोळे मीटण्यास सांगितले. आणि तो स्वतः संस्कृतमध्ये काहीतरी पुटपुटू लागला. मंत्राचा आवाज ऐकताच वांड्या ओरडला "ए..... बंद करा हे सगळं... काय चालवलय हे...? मला भीती वाटायला लागलीय.. अजिंक्य, आमऱ्याच्या आधी मला फिजिक्सच जर्नल दे, मला सबमिशन पूर्ण करायचं आहे! लाईट ऑन करा पहिलं!" आणि त्यान उठून लाईट चालू केली. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. "अरे वांड्या, हे अर्धा तास तर करायचं आहे आपल्याला! बघुयात रे आपण, अजिंक्य कसा आत्मा बोलावतो ते, आजून ते आलेलाही नाही." मी वांड्याला समजावण्याचा, त्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु विल्ल्याच्याही अंगात पुन्हा विज्ञानाच भूत नाचू लागलं. तो म्हणाला "लेकाच्यानो, विज्ञानाने आजवर किती शोध लावले, तेच शिकायला आपण इंजिनीरिंगला एडमिशन घेतलंय न? राईटबंधूच्या विमानाचा शोध, एडिसनचा दिवा, ग्राहम बेलचा फोन असे काहीतरी संशोधन करा रे.. ही काय फालतुगिरी लावली आहे. विज्ञानामुळे माणूस वेगवेगळ्या ग्रहावर जावून आला, समोर कोणतीही क्नेक्टीविटी दिसत नसताना हजारो मैलावर असणाऱ्या माणसाला आपण बोलू शकतो, पाहू शकतो." हे ऐकत आमऱ्या पुढं आला आणि म्हणाला "वांडया म्हणतो ते खरंय.. मी वेगवेगळ्या ग्रहावर जाणारय, खगोलशास्त्रज्ञाप्रमाणे चंद्र, तारे पाहणारय. हे असल्या फालतू उद्योगांसाठी आमवशेची, पौर्णिमेची वाट नाही पाहणार, संशोधनासाठी वाट पाहणार.! चला रे आभ्यास करू, माझही फिजिक्सच सबमिशन बाकी आहे." मी म्हणालो "येह... बस कर आता! मलाही माहितीय हे विज्ञान वगैरे, मीही तुमच्यातलाच एक आहे.. बाहेर काढा रे या बटाट्याला.... आत कोणी आणलं रे याला? आज आमवश्या आहे, आणि पुन्हा संधी दोन अडवडयाने किंवा महिन्याने येणार आहे. आपण फक्त प्लँचेटचा प्रयोग करून बघतोय याच्या आहारी थोडी जात आहोत." अजूनही यावर आमच्यात खूप चर्चा झाली. शेवटी प्लँचेट करण्यास वांड्या आणि सर्व तयार झाले. थोडावेळ मयऱ्याने आणि आमऱ्याने वांड्याला दाबून धरला. त्याला अजून थोडं समजावून जरा शांत केला. दुसरं भूत बोलवण्याच्या अगोदर त्याच्या अंगातल विज्ञानाचं भूत बाहेर काढणं गरजेच होतं. विल्ल्याचाही विरोध मावळला. विल्ल्या आणि वांड्याला आता शांत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुन्हा अजिंक्यने लाईट बंद केली, दरवाजा बंद केला. "आरे दरवाजा बंद केला तर आत्मा येणार कसा? त्याला दिसणार कसं?" आमऱ्याने मध्येच अजून खुसपट काढलं. अजिंक्य आता पुरता वैतागला होता, "यार...प्लँचेट राहू दे.. माझा मूड गेला आता... असं करताना याला कडक नियमांचे पालन करावे लागते ... तुम्ही राव सगळी येडयाची जत्रा...!" "नको नको... आता सगळे शांत बसतील, आपण सुरु करूयात प्लँचेट!" म्हणत सगळ्यांना एक शांततेची शपथ घालून लाईट बंद केली. मी, वांडया, अजिंक्य आणि आमऱ्या पुन्हा आम्ही चौघांनी पालथ्या वाटीवर बोट ठेवलं. अजिंक्यने पुन्हा संस्कृतमध्ये मंत्र म्हणायला सुरुवात केली. पेटलेल्या मेणबत्त्याच्या उजेडात आमची तोंडंच फक्त दिसत होती. वाटी हळू-हळू हलायला लागली आणि वेगवेगळ्या अक्षरावर जावून थांबत होती. अजिंक्यच वाटी हलवत असल्याचे माझ्या लक्षात आलं. अजिंक्यने आत्मा आल्याच सांगितलं. कसला आत्मा? आता मला कळून चुकलं होतं, परीक्षेचा आभ्यास करायचा सोडून, सबमिशन करायचं सोडून आम्हाला कुठून असली दुर्बुद्धी सुचली देव जाणे. वांड्या, विल्ल्या खरा होता हे मलाही माहिती होतं पण आता जे चाललंय ते चालू द्यावं वाटलं. अजिंक्यने आत्म्यास प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू कोणाचा आत्मा आहे वगैरे वगैरे... दादा कोंडके, नथुराम गोडसे, चार्ली चापलीन अशा वेगवेगळ्या नावावर वाटी फिरून यायची. आमचे विषय निघतील काय? आम्ही पास होवू का? नोकरी लागणार का? याची गर्लफ्रेंड आहे काय? त्याची गर्लफ्रेंड आहे काय? गर्लफ्रेंड कोण? लग्न कधी होणार? आम्ही परदेशात कधी जाणार? असे ठरलेले टिपिकल प्रश्न आम्ही विचारत होतो. वांड्याचा ड्रॉईंग विषय निघेल का? मीही माझ्या मॅथ्स विषयावर प्रश्न विचारला, वाटी 'नो'कडे सरकली. आमऱ्याचा मॅथ्स विषय सुटणार का? विचारले असता वाटी पुन्हा 'नो'कडे जाऊन थांबली. त्याच्या नोकरीबद्दल विचारल्यास वाटी सूसाईड या शब्दावर सरकत राहिली. सगळीच उत्तरं विचित्र येत होती, हे सगळं अजिंक्यच करत होता हे माझ्या लक्षात आलं होतच पण मी आता बाकीच्यांच्या प्रतिक्रियेसाठी प्लँचेटमध्ये सहभागी होतो. आमचा सगळा मूर्खाचा बाजार संपल्यानंतर आम्ही अजिंक्यला जाम शिव्या दिल्या, त्याची होती नव्हती, तेवढी सगळी अक्कल काढली. मी, विल्ल्या, वांड्या आम्ही सगळे अजिंक्यवर जाम चिडलो. वांड्या पुन्हा पेटला "हे असले उद्योग करण्यापेक्षा अभ्यास करा, राहिलेले विषय तरी निघतील." पुन्हा एकदा त्याने विज्ञानावर आणि अंधश्रद्धेवर भलं मोठ लेक्चर झाडून दिलं आणि सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. काही दिवसांनी हा प्रसंग आम्ही सगळेच कधीच विसरून गेलो होतो. आता होस्टेलवर सबमिशन आणि परीक्षेचे वारे जोरात वाहू लागले होते. पीएलच्या सुट्टी अगोदर सबमिशन संपवयाचे होते. नंतर सुट्टीत जोमाने अभ्यास करायचा होता. परीक्षा जवळ आली होती. राहिलेले विषय सोडवायचे होते. अभ्यासासाठी कोण लायब्ररीत, तर कोण ��ुठल्या झाडाखाली, कोण रूममध्येच तर कोण होस्टेलच्या गच्चीवर जात असे. आम्ही सगळे मित्र जेवढ्या जोशात क्रिकेट खेळायचो, कँटीनमध्ये गप्पा मारत बसायचो, फिरायला जायचो, पिक्चरला जायचो, होस्टेलमध्ये गाणी म्हणायचो तेवढ्याच जोमाने आभ्यासही करायचो. मे महिन्यात आमची परीक्षा असायची, सगळ्यांनी पेपर दिले, परीक्षा देवून झाली. ग्रुपमधल्या सगळ्यांना दुसऱ्या सेमिष्टरचे पेपर सोपे गले. ज्याचे पहिल्या सेमिष्टरचे विषय राहिले होते त्यांनाही पेपर सोपे गेले. परीक्षा संपली कि आम्ही चालत ज्योतीबाला जायचो, उन्हाळ्याचे दिवस असल्याने गप्पा गोष्टी करत फिरत, डोंगर-दऱ्यातल्या झाडावर चढून आंबे-जांभळ चाखायचो, होस्टेलच्या दिवसांची मजा कुछ औरच असते. जोतिबाच्याही पाया पडताना अगदी लहाण मुलासारखं आमचे सगळे विषय निघू दे असं निर्लज्जासारखं मागणं मागायचो. परीक्षेनंतरचे दोन-तीन दिवस असे घालवल्यानंतर सुट्टीला प्रत्येकजण आपआपल्या गावी गेला. काही दिवसांनी पहिल्या वर्षाचा निकाल लागला सगळे पास झाले होते. प्रत्येकानं आपापल्या गावावरून ग्रुपमधल्या प्रत्येकाला फोन करून निकाल विचारला. माझा आणि आमऱ्याचा मॅथ्स विषय पुन्हा राहिला होता तरीही आम्हाला दुसऱ्या वर्षाला अडमिशन मिळणार होते, परंतु आम्हाला दुसऱ्या वर्षात हा विषय काढणे गरजेच होतं तेव्हाच आम्हाला तिसऱ्या वर्षाला अडमिशन भेटणार होतं. दुसऱ्या वर्षाच अडमिशन झाल्यानंतर आम्ही दोघांनी पुन्हा मॅथ्स विषयाचा अभ्यास जोमाने चालू ठेवला. पहिल्या वर्षापेक्षा दुसर वर्ष लवकर संपल्यासारखं वाटलं, मॅथ्सच जसंच्या तसं टेन्सन होतं, दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिष्टरलाही पुन्हा आमचा मॅथ्स गेला. आम्ही पुन्हा त्यात पास होऊ शकलो नाही. कधी कधी असं वाटायचं कि "काय पाप केलं आणि या गणिताच्या जाळ्यात अडकलो." बऱ्याच जणांनी गणित आणि ग्राफिक्स या सारख्या महाभयंकर विषयांनाला म्हणजेच ड्रॉईंगला वैतागून पहिल्या वर्षातच इंगीनीअरिंगच अडमिशन कॅन्सल केलं होतं. आता आमच्या पुढं मॅथ्स पास होण्यासाठी एकच परीक्षा उरली होती. ती म्हणजे दुसऱ्या वर्षाची दुसरी सेमिष्टर. आमच्यासारखीच वांड्याचीही अवस्था होती, त्याला ड्रॉईंगमध्ये पास होणे आवश्यक होतं. तो ड्रॉईंगमध्ये फारच कच्चा होता आणि आम्ही गणितामध्ये. मी आणि आमऱ्याने रेटून अभ्यास चालू केला. मी वांडयाबरोबर लायब्ररीत अभ्यासाला जायचो. त्याला थोडे मोठ्याने वाचायची सवय होती, प्रश्न वाचला कि तो दोन वेळा पुटपूटायची सवय होती. तोंडी परेक्षेला परीक्षकाने प्रश्न विचारला की उत्तर आठवण्यासाठी वांडया तोच प्रश्न पुन्हा पुटपुटायचा, त्याला अशी गजब सवय होती. एकदा तर परीक्षक म्हणाले "डोंट आस्क टू मी, आय एम अस्किंग टू यु!" असंच एके दिवशी रात्री लोडशेडिंगमुळे लाईट गेली होती, पिटक्या त्या दिवशी लवकर झोपला होता, उघडा होवून अगदी कुंभकर्णासारखा घोरत होता. तो दुसऱ्या दिवशी लवकर उठून अभ्यासाला लायब्ररीत जाणार होता. वरच्या मजल्यावरून आमऱ्या आला त्यानं पिटक्याच्या रूममध्ये घुसून मेणबत्ती मागितली. त्यादिवशी माझ्या आणि इतर मित्रांच्या रूममध्ये, कोणाकडच मेणबत्ती मेणबत्ती मिळाली नाही. त्याला कसाही दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास सुरु ठेवायचा होता, गणिताचा सराव करायचा होता. शेवटी त्यानं छोट्या मशालीच्या उजेडात अभ्यास करायचं ठरवलं. मशाल बनवण्यासाठी छोटी काटकी आणली, अंधारात कापड शोधू लागला, होस्टेलच्या पॅसेज्यमध्ये त्याला एक मळके कापड सापडलं, त्यातले अर्धे कापड त्याने फाडून काटकीच्या एका टोकाला गुंडाळलं आणि त्यावर पिटक्याच्या रूममधले खोबरेल तेल ओतून ती दिवटी पेटवून पुन्हा वरती अभ्यासाला गेला. दुसऱ्या दिवशी खालच्या मजल्यावरचे आम्ही सगळे लवकर उठलो. अंघोळीसाठी रांगा लागल्या. पिटक्या बाथरूममधून लेडीजचा आखूड टॉप किंवा ब्लाऊज पिसचा जम्पर घालून आल्याचं चित्र पाहून आम्ही खिदळून खिद्ळून हसलो. त्याचा अर्ध्यातून खालचा बनियन आमऱ्याच्या दिवटीला वापरला गेला होता. काहीही करून आमचा अभ्यास चालू असायचा. त्यावेळीही इंजिनीअरिंगच्या फीज महाभयंकर होत्या त्यामुळं याचाही तणाव असायचा. बऱ्याच मित्रांचा हा विषय पहिल्या, दुसऱ्याच प्रयत्नात सुटला होता, त्यांचा पुढचा अभ्यास चालू असायचा. त्यामुळ बाकीच्या मित्रांची आम्हाला आता जास्त मदत होत नव्हती, तरीही आम्ही एकमेकांच्या मदतीन गणितं सोडायचो, सराव करायचो. दुसऱ्या वर्षाचा एखादा विषय राहिला तरी चालेल पण पहिल्या वर्षाचे सगळे विषय सुटले पाहिजेत तरच आम्हाला तिसऱ्या वर्षाला अडमिशन भेटणार होतं . त्यादिशेनेच आमचा प्रयत्न चालू होता. आता आमचं दुसऱ्या वर्षाचं सबमिशन संपून परीक्षा सुरु होणार होती. परीक्षेच्या सुरुवातीला मागच्या वर्षीच्या विषयांचे पहिले पेपर होते. माझा आणि आमऱ्याचा मॅथ्सचा आभ्यास चांगला झाला होता. आम्ही पेपर देवून आलो, दोघांनाही पेपर सोपा गेला. माझा विषय निघेल कि नाही याबद्दल माझ्या मनात जरा शंकाच होती. आमऱ्या पूर्ण आत्मविश्वासाने सांगत होता कि त्याचा विषय निघणार, तो पास होणार म्हणून! त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगत होता. वांड्याही त्याच्या जोडीला होता, तो ड्रॉईंगमध्ये स्कोरिंग घेवून पास होणार असल्याची खात्री देत होता. माझा मात्र चेहरा पडला होता. त्यात आम्ही बाकीचे सर्व पेपर दिले. ग्रुपमधल्या सगळ्यांना पेपर सोपे गेले. मला आणि आमऱ्याला दुसऱ्या वर्षाच्या पेपरच जास्त टेन्शन नव्हतं पण त्याहीपेक्षा पहिल्या वर्षाच्या मॅथ्सचं जास्त होतं. दुसऱ्या वर्षाची परीक्षा संपल्यानंतर आम्ही पुन्हा ज्योतीबाला गेलो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलो. एक-दोन दिवसांनी सगळे आपआपल्या गावी गेले. मी जेव्हा जेव्हा पंढरपूरला येत असे नव्हे मी कॉलेजचं सगळं टेन्शन डोक्यातून काढून सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असत, परंतु या वेळेला चित्र वेगळं होत. थोडं टेन्शन होतं. दहावी-बारावीला जितकी वाट पाहिली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मी निकालाची वाट पाहत होतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमचा निकाल होता. चार जूनला माझ्या घरी मला वांड्याचा फोन आला. माझ्या भावाने फोन घेतला होता, नगरहून अभिजित बोलत असल्याचे सांगितले. मी फोन घेतला, "हं बोल वांडया!" "आरे तुझा मॅथ्स निघाला.." "काय सांगतो?" माझ्या चेहऱ्या��र बारीकसे हसू खुलले. "... आणि तुझा ड्रॉईंग रे?" "हो मी जरा जास्तच स्कोर केला आहे, मलाच समजत नाहीय कसं काय ते... आमऱ्याचं कळलं का ?" "हं त्याचा मॅथ्स निघाला का..?" "त्यानं आत्महत्या केली, आता तो आपल्यात नाहीय.." मी सुन्न झालो. काय बोलावे मला कळेना. माझ्या डोळ्यासमोर फक्त आमऱ्या दिसत होता. काही वेळ मी स्वप्नात असल्यासारख वाटलं. तो असं-कसं करू शकतो यावर माझा विश्वास बसत नव्हता. पुढचं बोलणं सोडून दिलं आणि मी फोन तसाच ठेवून दिला. अर्धाभर तास तिथंच गुडघ्यावर बसलो. माझे डोळे भरून आले होते. माझ्या डोळ्यासमोर आम्ही आभ्यास करतानाच चित्र दिसत होतं. माझे बाबा माझ्या जवळ होते. "आरे नापासच झाला, मग काय झालं आपण पुन्हा परीक्षा देवू, इतकं भयंकर असं का खचून जातोय? आपण गेलेला विषय पुन्हा सोडवू." मला धरून उठवत म्हणाले. "माझा मित्र हे जग सोडून गेला, त्यानं आत्महत्या केली." हे ऐकताच आमच्या घरातील सगळ्यांनाच वाईट वाटले. मी डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून दिली. होऊ शकेल की आत्तापर्यंत आमऱ्या चुकला, जगाला समजायला. प्रेम, वेदना, जगणं आणि मरणं समजायला. अशी काही घाई गडबड देखील नव्हती. फक्त एक वर्ष वाया गेलं होतं. आमच्या होस्टेलवर नापास झालेली पोरं होतीच ना आमच्याबरोबर मजा-मस्ती करायला. पण तोही नेहमीच मजा-मस्ती जगण्याच्या घाईत दिसायचा. या सगळ्या कालावधीत कधी इतका अस्वस्थ दिसला नाही. तो असं काही करेन असं काही वाटलं नव्हतं. आमऱ्या त्याच्या बालपणाच्या एकटेपणातून कधी बाहेरच येऊ शकला नव्हता. लहानपणी त्याला कोणाकडूनच प्रेम मिळालं नसल्याचं कानावर पडलं होतं. त्यानं इतक्या टोकाचा निर्णय घेतला यावर विश्वास बसत नव्हता. आत्महत्या या कधीच साध्या सरळ नसतात. फार गुंतागुंतीच्या असतात. म्हणजे माणसाने आत्महत्या केली ही गौण गोष्ट नसते. त्याबरोबरच होजारो प्रश्न उभे राहतात. कोणालाही जबाबदार धरू नये म्हणून त्यानं स्वतःला संपवण्यापूर्वी चिट्टी लिहिली होती. लोक त्याला पळपुटा घोषित करतील, स्वार्थी देखील, मूर्ख देखील म्हणतील जेव्हा तो निघून गेला होता. आता त्याला काही फरक नाही पडत लोक त्याला काय म्हणतील. आता तो या दुनियेत नव्हता. तो मृत्यूनंतरच्या कथा, भूतप्रेतांमध्ये विश्वास ठेवत नव्हता. जर कोणत्या गोष्टीवर त्याचा विश्वास असेल तर ती ही की मी ताऱ्यांपर्यंत प्रवास करू शकेन आणि समजू शकेन की त्याची दुसरी दुनिया कशी आहे? इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आम्ही अडमिशन घेतलं. पुन्हा दुसऱ्या वर्षाचेही राहिलेले विषय बरोबर होतेच. आमचा ग्रुप आमऱ्याला खूप मिस करत होता. कारण सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्या फिरायला तो आमच्या बरोबर नव्हता. राहिलेल्या विषयांचा अभ्यास करायला नव्हता. आमऱ्याचा निकाल आणायला मयऱ्या आणि पिटक्या गेले होते, त्यानं निकाला अगोदरच हे टोकाचे पाऊल उचलले होते. त्याला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळाले होते तो पासही झाला होता. माझाही अंधश्रद्धेवर काडीमात्र विश्वास नाही आणि अंधश्रद्धेच समर्थन मी कधी केलंही नाही. त्याच्या घरचा, काहीतरी कौटुंबिक प्रोब्लेम असल्याचे समजले होते. प्लँचेट ती गोष्ट खरी झाली होती की त्यानं कौटुंबिक तणावातून आत्महत्या केली? आजही आम्हा सर्वांना हा प्रश्न पडतो आणि आम्ही पुन्हा हादरून जातो. प्लँचेटची ही गोष्ट आम्हा सर्वांना थक्क करणारी होती. तेव्हापासून आम्ही प्लँचेट करण बंद केले. http://feedproxy.google.com/~r/GaneshAtkale/~3/KUO1b76Nzog/blog-post.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ गणेश अत्कले
0 notes
खरंच पैशाची तंगी असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला हा मंत्र
खरंच पैशाची तंगी असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला हा मंत्र
भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला पैशाची तंगी असेल धनप्राप्ती हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी सकाळी उठल्यावर दिवसभरात कधीही की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा स्वामींचा आहेत मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे या मंत्राचा महिमा खूप मोठा आहे त्या मंत्राचा केवळ उच्चारण केल्याने आपल्या सर्व समस्या आपली सर्व दुःख आपल्या सर्व अडचणी सर्व कटकटी दूर होतात
आज आम्ही तुम्हाला खास करून…
View On WordPress
0 notes