Tumgik
#माझा भारत महान आहे
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 February 2023
Time : 07.10 AM to 07.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
अंकाई-औरंगाबाद रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला प्रधान मंत्री गतिशक्ती उपक्रमांतर्गत मंजुरी
आगामी निवडणुका शिवसेनेसोबत युती करुन लढवण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
हिंदुत्व नव्हे, भाजपला सोडल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करणार, शिंदे गटाकडूनही कॅव्हेट दाखल
देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी, शिवनेरीवर शिवजन्मोत्सव तर पुण्यात शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताचा अधिकृत शुभारंभ
मुख्यमंत्र्यां विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी  खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध नाशिकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आणि
बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
वर्षानुवर्षे रखडलेल्या अंकाई-औरंगाबाद रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर मंजूरी मिळाली आहे. पी.एम. गतिशक्ती उपक्रमांतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप -एनपीजी ने औरंगाबाद-अंकाई सह अन्य तीन मार्गाच्या दुहेरीकरणालाही मंजुरी दिली आहे. औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरणामुळे मुंबई, नवी दिल्ली, बेंगलोर, अमृतसर, हैद्राबाद, निझामाबाद अशा लांबच्या स्थळांना पोहचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरून प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतुक, तसंच औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीला मोठी मदत होणार आहे.
****
आगामी निवडणुका शिवसेनेसोबत युतीत लढवणार असल्याची घोषणा, केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी केली आहे. काल कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले..
Byte…
2024 मे फिर से एक बार देश मे चुनाव होने वाला है। हमे मालूम है, की हम और हमारे साथी दल शिवसेना महाराष्ट्र मे चुनाव लडेंगे। और सामने सारे इकठ्ठा होकर लडने वाले है। मै आपको विश्वास दिलाता हूं मित्रों की आने वाले चुनाव मे भारतीय जनता पार्टी का विजय ये महान भारत की रचना का चुनाव है, समृद्‌ध भारत की रचना का चुनाव है।
लोकसभा निवडणुकीत बहुमत नव्हे, तर संपूर्ण विजय मिळवण्याचं आवाहन शहा यांनी केलं. राज्यातल्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी करावा, असं त्यांनी सांगितलं.
****
आपण हिंदुत्व सोडलं नसून, भाजपला सोडलं असल्याचा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल मुंबईत उत्तर भारतीय नागरिकांशी संवाद साधत होते. आपण काँग्रेससोबत गेलो नाहीत, तर भाजपने आपल्याला काँग्रेसकडे ढकललं, असा आरोप करत, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपलं काय चुकलं, असा सवालही ठाकरे यांनी केला. ते म्हणाले…
Byte …
हम तो हिंदुत्ववादी थे। आज भी मै कहता हूं मै हिंदू हूं। मैने हिंदुत्व कभी छोडा नही और ना ही कभी छोडुंगा। मैने तो भाजप को छोडा है, हिंदुत्व को नही छोडा है। भाजप मतलब हिंदुत्व नही है। और उनका जो हिंदुत्व है वो हमारा हिंदुत्व नही है। वो हमे मंजूर नही है, खुले आम कहता हूं।और मै काँग्रेस के साथ गया, मै नही गया भाजप मुझे ढकेला है। और ये बात मै दोहराना इसलिये चाहता हूं ताकि गलत फाहमी आप के मन मे ना रहे। मुझे तो लोगों के सामने आना है, लोगों के बिच मे आना है, और पुछना है बताओ मैने क्या गलती की है? ढाई साल मै मुख्यमंत्री था, कहां मैने भेद किया है?
****
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करणार आहे. आज सकाळच्या सत्रात सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण उपस्थित केलं जाईल, असं आमदार अनिल परब यांनी काल सांगितलं. जुन्या याचिकांमध्ये नव्या याचिकेचाही समावेश केला जावा, अशी विनंती न्यायालयाला केली जाईल, असंही परब यांनी सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणी शिंदे गटाकडुनही न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमची बाजुही ऐकून घ्यावी, अशी विनंती शिंदे गटाकडून या कॅव्हेट द्वारे करण्यात आली आहे.
****
देशभरात शिवजयंती काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांसह, शोभायात्रा तसंच मिरवणुका काढण्यात आल्या. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शिवनेरी परिसराचा विकास तसंच गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी पोलीस बँड पथकानं राष्ट्रगीत आणि 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून वाजवून सलामी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
किल्ले प्रतापगडावरही शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
आग्रा इथल्या लाल किल्ल्यातल्या दिवाण - ए - आम मध्ये शिवजयंती काल उत्साहात साजरी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रा किल्ल्यावर यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणं हा ऐतिहासिक क्षण असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरवर्षी आग्र्याच्या किल्ल्यात शिवजय���ती साजरी करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.
****
छत्रपती असूनही उपभोगशून्य स्वामी कसा असावा, याचा आदर्श शिवाजी महाराजांनी सर्वांसमोर ठेवला, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण शाह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी बोलताना ते म्हणाले…
Byte…
उन्होंने इस दुनिया के सभी शासकों के लिये एक उदाहरण प्रस्थापित किया की उपभोग शुन्य स्वामी कैसा होता है। स्वयं तो राजा थे, छत्रपती थे। पर उपभोगशुन्य स्वामी राज्य के धन का अपने लिये कदापि उपयोग न करनेवाला स्वामी कैसा होता है, राजा कैसा होता है, उसका उदाहरण शिवाजी महाराज ने हमारे सामने रखा है।
बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहता आलं, याचा अभिमान वाटत असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवसृष्टीचं उर्वरीत कामही वेळेवर पूर्ण होईल, त्यासाठी लागेल ती मदत राज्य सरकार करेल असं आश्वासन देत, राज्य सरकारच्यावतीनं ५० कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं क्रांतीचौक इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याना अभिवादन करण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवप्रतिमेची ढोल ताशाचा गजर आणि लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रसिद्ध व्याख्याते विश्वधर देशमुख यांचं शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यान झालं, शिवाजी महाराजांच्या कृतीशील स्मरणाची आता गरज असल्याचं, देशमुख यांनी नमूद केलं. ते म्हणाले…
Byte …
२६ नोव्हेंबर १९४९ ला आपण वचन दिलं, ते वचन आहे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय सगळ्यांना मिळवून देण्याचं. दर्जाची आणि संधीची समानता सगळ्यांना मिळवून देण्याची. आणि समजा हे घडत नसेल तर मला वाटतं ते घडण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच कृतीशील स्मरण आहे. शिवाजी राजांचं शाब्दिक स्मरण आता पुरे झालं, काल्पनिक स्मरण आता खूप झालं. आवेशपूर्ण स्मरणंही बऱ्यापैकी झालंय. छत्रपती शिवाजी राजांचं जे कृतीशील स्मरण आहे, ते कृतीशील स्मरण आपल्याला कसं करता येईल, याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे.
****
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झाल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल घोषित केलं. ते काल चंदपूर इथं झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम जागवतो, गीतामधून वीरतेचा मंत्र दिसतो असंही ते यावेळी म्हणाले. राज्यात काल सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. तसंच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचं सामुहिक गायन करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे काल रक्तदान अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी परिचारिका महाविद्यालयातर्फे पथनाट्याचं सादरीकरण, रक्तदान विषयक चित्र प्रदर्शन तसंच रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयोजित तीन रक्तदान शिबिरातून १०७ जणांनी रक्तदान केलं.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार महसूल संतोष बनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
जालना शहरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीनं गांधीचमन चौक ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. एम.एस. जैन इंग्लिश स्कूलचे शिक्षक रमेश काळे आणि विद्यार्थ्यांनी दहा क्विंटल रांगोळीचा वापर करून चार हजार चौरसफूट जागेवर शिवरायांची प्रतिमा साकारली.
****
उस्मानाबाद इथं शिवजयंतीनिमित्त महाशिव दुचाकी फेरी काढण्यात आली. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर या दुचाकी फेरीत सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत मूर्तीसह शेकडो शिवप्रेमींनी या दुचाकी फेरीत सहभाग नोंदवला होता.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. हिंगोली शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विविध पारंपरिक देखावे साकारण्यात आले होते. सायंकाळी आतषबाजीने या उत्सवाची सांगता झाली. औंढा नागनाथ इथल्या नागनाथ मंदिर परिसरातील ऋणमोचन नागतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त बारव सजावट करून ११ हजार दिव्यांची आरास करण्यात आली.
****
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिकच्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप करत युवा सेनेचे विस्तारक योगेश बेलदार यांनी रात्री उशिरा नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघानं भारताला ११५ धावांचं विजयासाठी लक्ष्य दिलं होतं. त्यापूर्वी काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियानं एक गडी बाद ६१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत संपुष्टात आला. रविंद्र जडेजानं आपल्या कारकिर्दीत सर्वोत्तम गोलंदाजी करत ४२ धावा देत सात बळी घेतले. रविचंद्रन अश्विननं १६ षटकांत ५९ धावा देत तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं चार गडी गमावून ११८ धावा करत विजय मिळवला. रोहित शर्माने ३१ तर विराट कोहलीने २० धावा केल्या तर श्रीकर भरत २३ आणि चेतेश्वर पुजारा ३१ धावांवर नाबाद राहिले. रविंद्र जडेजाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मालिकेतला तिसरा कसोटी सामना इंदूर इथं येत्या एक मार्चपासून खेळवला जाणार आहे.
****
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाला देशात प्रथम क्रमाकांचा विभाग बनवण्याचा सरकारचा मानस असल्याचं, स��र्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. नीति आयोगामार्फत मंजूर मोबाईल मिनी हॉस्पीटल फिरत्या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात सावंत बोलत होते. या फिरत्या रुग्णालयात १२० प्रकारच्या चाचण्या, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया तसंच चार रुग्णखाटांची सुविधा उपलब्ध असेल. वैद्यकीय मदत कक्ष कार्यशाळेचं उद्घाटनही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासनमुक्त करून वारकरी आणि नागरिकांच्या ताब्यात द्यावं, अशी मागणी करणारी याचिका भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरकारला मंदिरे ताब्यात घेण्याचा कोणताच अधिकार नाही, असा दावा त्यांनी केला आहे, याबाबत डॉ. स्वामी यांनी सामाजिक माध्यमांवर माहिती दिली आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
नजर ना लागे हो गाणे: पवन सिंग स्टारर 'मेरा भारत महान' नवीन गाणे रिलीज, व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक
नजर ना लागे हो गाणे: पवन सिंग स्टारर ‘मेरा भारत महान’ नवीन गाणे रिलीज, व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक
पवन सिंग स्टारर मेरा भारत महान नवीनतम गाणे नजर ना लागे हो आऊट, व्हिडिओ पहा ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
devendrasinghworld · 4 years
Link
Tumblr media
बाल गंगाधर तिलक और चंद्रशेखर आजाद की जन्म जयंती, PM मोदी ने किया नमन Image Source : FILE
नई दिल्ली: भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाज सुधारक, वकील और स्वतन्त्रता सेनानी बाल गंगाधर तिलक तथा मातृभूमि के लिए प्राणों का आहुति देने वाले महान क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद की आज जन्म जयंती है। बाल गंगाधर तिलक और चंद्रशेखर आजाद की जन्म जयंती के मौके पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उन्हें याद किया और नमन किया।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुरुवार को ट्वीट कर दोनों को नमन किया। उन्होंने ट्वीट में लिखा, "भारत मां के दो वीर सपूत लोकमान्य बाल गंगाधर तिलक और चंद्रशेखर आजाद को उनकी जन्म-जयंती पर शत-शत नमन।"
भारत मां के दो वीर सपूत लोकमान्य बाल गंगाधर तिलक और चंद्रशेखर आजाद को उनकी जन्म-जयंती पर शत-शत नमन।
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2020
वहीं, पीएम मोदी के अलावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर ने भी ट्वीट कर उन��हें नमन किया। उन्होंने ट्वीट में लिखा, "भारत माता के वीर सपूत चंद्रशेखर आजाद को उनकी जयंती पर शत्-शत् नमन।"
भारत माता के वीर सपूत चंद्रशेखर आजाद को उनकी जयंती पर शत्-शत् नमन। pic.twitter.com/ZakQt1QNn0
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) July 23, 2020
एक अन्य ट्वीट में केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर ने लिखा, "बाल गंगाधर तिलक को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन । भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाज सुधारक, वकील और एक स्वतन्त्रता सेनानी थे। 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', बहुत प्रसिद्ध हुआ था।"
बाल गंगाधर तिलक को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन । भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाज सुधारक, वकील और एक स्वतन्त्रता सेनानी थे। 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', बहुत प्रसिद्ध हुआ था।#BalGangadharTilak pic.twitter.com/qNKQAdTKnq
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) July 23, 2020
उप-राष्ट्रपति वेंकैया नायडू ने भी बाल गंगाधर तिलक और चंद्रशेखर आजाद की जन्म जयंती के मौके पर उन्हें याद किया है। उप-राष्ट्रपति की ओर से ट्वीट में लिखा गया, "अमर शहीद चन्द्रशेखर आज़ाद की जन्म जयंती के अवसर पर विलक्षण युवा नायक की स्मृति को सादर नमन करता हूं।" उन्होंने लिखा, "किसी भी आंदोलन की सफलता के लिए आवश्यक है कि वह युवा आकांक्षाओं और अपेक्षाओं को प्रतिबिंबित करे। चंद्रशेखर आज़ाद जैसे राष्ट्रवादी नायकों ने आज़ादी के आंदोलन को युवाओं की आकांक्षाओं से जोड़ा और युवाओं के लिए आदर्श स्थापित किया।युवा क्रांतिकारी को मेरी श्रद्धांजलि।"
अमर शहीद चन्द्रशेखर आज़ाद की जन्म जयंती के अवसर पर विलक्षण युवा नायक की स्मृति को सादर नमन करता हूं। #ChandrashekharAzad pic.twitter.com/cm1OpqAw4I
— Vice President of India (@VPSecretariat) July 23, 2020
एक अन्य ट्वीट में उन्होंने लिखा, "राष्ट्र के समक्ष ऐसे उदात्त आदर्शों के प्रणेता लोकमान्य बाल गंगाधर तिलक की जन्म जयंती पर आदर्श पुरुष के यश और उनकी पुण्य स्मृति को सादर प्रणाम करता हूं।" उन्होंने लिखा, ""धर्म और व्यावहारिक जीवन अलग नहीं हैं। सन्यास लेना जीवन का परित्याग करना नहीं है। असली भावना सिर्फ अपने लिए काम करने की बजाय, देश को अपना परिवार मान कर मिलजुल कर काम करना है। इसके बाद का कदम मानवता की सेवा करना है और अगला कदम ईश्वर की सेवा करना है।- बाल गंगाधर तिलक"
"धर्म और व्यावहारिक जीवन अलग नहीं हैं। सन्यास लेना जीवन का परित्याग करना नहीं है। असली भावना सिर्फ अपने लिए काम करने की बजाय, देश को अपना परिवार मान कर मिलजुल कर काम करना है। इसके बाद का कदम मानवता की सेवा करना है और अगला कदम ईश्वर की सेवा करना है।” - बाल गंगाधर तिलक pic.twitter.com/7N8Xp82aWg
— Vice President of India (@VPSecretariat) July 23, 2020
from India TV Hindi: india Feed https://ift.tt/3eUjTCY https://ift.tt/30tsgR2
0 notes
Text
माढा विजय संकल्प सभा
Tumblr media
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी माढा मतदार संघातील अकलूज येथे भव्य प्रचार सभेला उपस्थिती लावली आणि काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला केला तसेच बीजेपी सरकारच्या विविध उपक्रमांची आणि कामांची माहिती दिली.
आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बीजेपी खूप मोठ्या प्रमाणात सज्ज आहे. त्यांनी निवडणूक मोहीम, प्रचार सभा,मुलाखती, विजय संकल्प सभा, रॅली अशा विविध धोरणांचा उपयोग विजयासाठी केला आहे. अकलूज येथे माढा मतदारसंघ अंतर्गत विजय संकल्प सभेचे आयोजन केले होते आणि ही सभा लोक आणि पत्रकार यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. याचे मुख्य कारण माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती व भाषण हे होते. बीजेपी वरिष्ठांच्या भाषणातून आगामी निवडणुकांत बीजेपीला मिळणाऱ्या यशाची झलक दिसत आहे. तसेच पुन्हा नरेंद्र-देवेंद्र मिशन महाराष्ट्रात लागू होईल अशी शक्यता वाटते.
सभेच्या सुरुवातीला तज्ञ आणि अनुभवी बीजेपी नेते श्री, विजयसिंह मोहिते-पाटील यांचा माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली तसेच पक्ष आणि समाजकार्यासाठी दिलेल्या योगदानासाठी हा सत्कार करण्यात आला.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी छोट्या व प्रभावी भाषणात काही मुद्दे मांडले. त्यांनी जनतेच्या भरघोस पाठिंब्यासाठी प्रशंसा केली तसेच या दृष्टिकोनामुळेच श्री. शरद पवारांनी निवडणुकांमधून माघार घेतली असावी असे मत व्यक्त केले. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारने लागू केलेल्या विविध योजनांचा पश्चिम महाराष्ट्राला कसा फायदा झाला यावरही भाष्य केले. यामध्ये त्यांनी विविध जलसंधारण योजना, धरणांचे प्रकल्प, कालव्यांची कामे यांचा दुष्काळी असणाऱ्या सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांना कसा फायदा झाला हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी साखरेला भाव निश्चिती केल्याबद्दल आणि वाढीव एफ. आर. पी. साठी केंद्र शासनाची स्तुती केली. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केंद्र सरकारची उत्तमोत्तम पदे असतानाही त्यांनी कृषी आणि दुष्काळासाठी पश्चिम महाराष्ट्रात काहीच केले नाही असा खेद व्यक्त केला.
या सभेचे मुख्य आकर्षण हे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची उपस्थिती व भाषण हे होते. त्यांनी  भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून करून लोकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सध्या सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे असे शेतकरी आणि बळी पडलेले नागरिक यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि मदत ताबडतोब पुरवण्यात येतील असा विश्वास दिला. तसेच त्यांनी श्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भरीव योगदानासाठी आभार मानले.
भाषणाच्या सुरुवातीलाच मिश्किल पद्धतीने त्यांनी असे मत व्यक्त केले की आता मला समजले की श्री. शरद पवार यांनी निवडणुकांमधून माघार का घेतली. पुढे ते असेही म्हणाले की श्री. शरद पवार हे खिलाडूवृत्तीचे आहेत आणि तरीही ते माघार घेतात म्हणजे नक्कीच त्यांचा पक्ष किंवा कुटुंबाला या मतदारसंघात धोका आहे याची जाणीव त्यांना झालेली असणार.
नंतर त्यांनी लोकांना असे आवाहन केले की तुम्ही शैक्षणिक सुविधा, सुरक्षेसाठी लागणाऱ्या सुविधा, आरोग्यविषयक सुविधा यासाठी अतिशय काळजीपूर्वक निवड करता मग इतक्या प्रचंड मोठ्या देशाला योग्य नेत्यांच्या हाती सोपवण्यासाठी तुम्हाला निश्चितच खूप काळजीने आणि योग्य नेत्यांची निवड होणे आवश्यक वाटत नाही का? पाच वर्षे आपण सर्वांनी बीजेपी सरकारचे कार्य पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींसह समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी भरीव कार्य केले आहे. पुढे ते असेही म्हणाले की भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइक आणि इतर मोहिमांमधून आपण दहशतवाद्यांना धडा शिकवला. काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत मुंबई शहरामध्ये दहशतवादाचा उच्चांक होता, तरीही तत्कालीन सरकारने कोणतीही कृती केली नव्हती. त्यांनी जे राजकीय पक्ष भारतीय लष्कराच्या सर्जिकल अटॅक सारख्या मोहिमांवर शंका घेतात त्यांचा समाचार घेण्यास आणि त्यांना योग्य उत्तर देण्यास मी समर्थ आहे असा विश्वास दिला.
पुढे ते असे म्हणाले की यावेळी पहिल्यांदाच निवडणुकांच्या इतिहासात जनता इतक्या उत्साहाने सहभागी होत आहे आणि जनताच भारतीय जनता पक्षाला मते देऊन सरकार पुन्हा एकदा पक्षाच्या आणि मोदी सरकारच्या हाती  सोपवण्यास उत्सुक आहे.
भाषणाच्या पुढील भागामध्ये त्यांनी सरकारच्या विविध कार्याबद्दल विचार व्यक्त केले. त्यांनी असे नमूद केले की बीजेपी कारकिर्दीत कोणताच घोटाळा दृष्टिक्षेपात येत नाही आणि आणि याची तुलना तुम्ही काँग्रेसच्या  कारकिर्दीबरोबर करू शकता. बीजेपी सरकार हे खोटे बोलणार्‍यांना आणि खोटी कृती करणाऱ्यांना योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे. त्यांनी महागाई दर कमी करून सर्वांची जीवनशैली उंचावण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले.
श्री. मोदी यांनी या मुद्द्याकडे ही लक्ष वेधून घेतले की सध्या कॉंग्रेसचे सर्व नेते फक्त 'मोदी हटाव' एवढ्याच गोष्टीबद्दल बोलताना दिसतात. ते त्यांच्या आधीच्या कोणत्याच कार्याबद्दल किंवा भविष्यातील कोणत्याच योजनांबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या खालच्या पातळीवरील चौकीदार आणि जातीयवादी टीकेची देखील आठवण करून दिली. तसेच असा इशाराही दिला की मी माझ्या वरील टीका सहन करू शकेल, परंतु अशा पद्धतीची टीका लोकांवर झालेली मी कधीच सहन करणार नाही.
आज त्यांनी सभेमध्ये शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या परिवार या मुद्द्याला ही उत्तर दिले. श्री. मोदी यांच्या मते माझा परिवार हा मर्यादित नसून तो अनेक महान व्यक्तींच्या विचारधारेने आणि प्रेरणेने बनलेला आहे. ज्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, वीर सावरकर यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी असा सल्लाही दिला की श्री. पवार यांनी त्यांचे राजकीय गुरू स्वर्गीय श्री. यशवंतराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घेतली असती तर बरे झाले असते.
भाषणाचा समारोप करताना त्यांनी सरकारच्या विविध योजना आणि निर्णयांची थोडक्यात माहिती दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या आयुष्मान भारत योजनेचा त्यांनी उल्लेख केला. या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा आणि औषधे यासाठी सरकारकडून मदत मिळू शकेल. त्यांनी साखरेवरील आयात-निर्यात धोरणांचा फेरविचार व या निर्णयांचा शेतकऱ्यांना झालेला फायदा यावरही भाष्य केले. तसेच ते हेही म्हणाले की आम्ही फक्त उसापासून साखरेची निर्मिती इतकाच विचार करत नसून, इथेनॉल आणि जैवइंधन निर्मितीचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. भारताचे कृषिमंत्री असणारे श्री. शरद पवार या गोष्टी पूर्वीच करू शकले असते, परंतु मी भाग्यवान आहे की ही संधी मला मिळाली. त्यांनी पुढे असाही विश्वास व्यक्त केला की सरकारच्या पुढील कार्यकाळामध्ये पाण्यासाठी आणि पाण्याच्या कमतरतेच्या  विविध समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात येईल.
शेवटी त्यांनी बीजेपी उमेदवारांना मत देऊन मोदी सरकारला येत्या निवडणुकीत विजयी करा असे आवाहन लोकांना केले.
0 notes
theinvisibleindian · 7 years
Video
youtube
हा गाढ झोपी गेलेल्या गर्दीचा महान देश आहे त्याला एक शेपुट होतं. वानरासारखं लांब लचक आणि वेड्यावाकड्या वळनाचं. त्याची हनवट हनुमानासारखी लाल रंगाने रंगवलेली होती. गळ्यात कसलातरि हारसुद्धा घातला होता. देवाला घातलेल्या हारासारखाच. त्याच्या पुढ्यात कोणीतरि उभ्या उभ्याच चालता-चालता १० रुपयेची नोट टाकलेली दिसत होती. ती दहा रुपयाची नोट त्याच्या दोन हातांच्या मधे अडकून बसली होती. तो मात्र गाढ झोपेत होता. असं बसुनच झोपल्यानं त्याचा तोल जात होता. स्वत:ला सावरत त्याचं ताठ बसणं सुरु होतं. रस्त्यावरुन ये जा करणारी माणसं  त्याच्याकडे पाहुन उगाचंच सहानुभूती दाखवल्यासारखं काहितरी करुन..तोंडं मुरडून तसेच आपल्या वाटेने पुढे जात होते. फारसं कोणाचं त्याच्याकडे लक्ष जात नव्हतं. लक्ष गेलंच तरि कोणाला त्याच्या तश्या बसल्या बसल्या झोपण्याचा फरक पडणार नव्हता. मधुनच तो त्या झोपेतून दचकुन जागा झाला. दोन मिनटं त्याला काहिचं कळालं नाही. नंतर त्याला त्याच्या पुढ्यात कोणीतरी टाकलेली दहा रुपयाची नोट दिसली. तो कावरा बावरा होऊन इकडं तिकडं पाहू लागला. आणखीन कुठे बाजुला पैसे पडले आहेत का ते तपासू लागला. समोरुन जाणारी ती गर्दी शांतपणाने एका रिदम मधे तशीच चालली होती. त्यांचे हालणारे पाय काय ते त्याला दिसत होते. खाली पडलेली दहाची नोट त्यानं एका हातात घट्ट पकडली अन् दुसरा हात हनवटीवर ठेवून तो पुन्हा गाढ झोपी गेला. गाढ झोपी गेलेल्या आमच्या महान भारत देशासारखाच. फुटपाथवरुन चालणार्यांसाठी तो जणू इनव्हिजिबलच होता. अपुर्या झोपेमुळे आणि उपाशी पोटामुळे त्याला प्रचंड थकवा आला असला तरि चेहर्यावरच्या त्या रंगरंगोटीमुळे तो तजेलदार दिसत होता. जणु स्वत:च्या बेरंग जिंदगीला लपवता यावं याचसाठी त्यानं त्याचा चेहरा रंगीन करुन घेतला होता. हनवटीवर बोट ठेवून गाढ झोपी गेलेला तो आता चांगलाच डुलक्या मारु लागला होता. डुलक्या घेत घेत त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. माझा कॅमेरामात्र मी तोपर्यंत स्टाॅप केला होता. सगळे कॅमेरे हे असेच स्टाॅप होतात. इनव्हिजिबल ला इनव्हिजिबल ठेवून. https://youtu.be/DCxz5Yl9c9c
0 notes
loksutra · 2 years
Text
रवी किशन आणि अंजना सिंग यांचे रोमँटिक गाणे 'अभीयो उहे टेस्ट बा' रिलीज, व्हिडिओमध्ये दिसत आहे क्युट केमिस्ट्री
रवी किशन आणि अंजना सिंग यांचे रोमँटिक गाणे ‘अभीयो उहे टेस्ट बा’ रिलीज, व्हिडिओमध्ये दिसत आहे क्युट केमिस्ट्री
रवी किशनचे भोजपुरी गाणे: भोजपुरी सुपरस्टार रवी किशन आणि अभिनेत्री अंजना सिंगचे भोजपुरी गाणे ‘अभीयो उहे टेस्ट बा’ यूट्यूबवर खूप धमाल करत आहे. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
पवन सिंह 'बिंदिया लीलार के' गाण्यात गरिमा परिहारसोबत डान्स करताना दिसला, व्हिडिओ झाला व्हायरल
पवन सिंह ‘बिंदिया लीलार के’ गाण्यात गरिमा परिहारसोबत डान्स करताना दिसला, व्हिडिओ झाला व्हायरल
मेरा भारत महान: पवन सिंह आणि गरिमा परिहार यांचे भोजपुरी गाणे ‘बिंदिया लिलार के’ रिलीज-पहा व्हिडिओ: पवन सिंह ‘बिंदिया लिलार के’ गाण्यात गरिमा परिहारसोबत डान्स करताना दिसला, व्हिडिओ झाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
पवन सिंग आणि रवी किशन स्टारर मेरा भारत महान ट्रेलर आऊट, व्हिडिओ पहा
पवन सिंग आणि रवी किशन स्टारर मेरा भारत महान ट्रेलर आऊट, व्हिडिओ पहा
रवी किशन आणि पवन सिंग स्टारर ‘मेरा भारत महान’चा ट्रेलर आऊट, व्हिडिओ पहा मेरा भारत महान ट्रेलर आऊट नाऊ: पवन सिंग आणि रवी किशन यांच्या आगामी ‘मेरा भारत महान’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा व्हिडिओ इथे पहा… मेरा भारत महान ट्रेलर आऊट: भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता पवन सिंग आणि रवि किशन द्वारे एक चित्रपट ‘मेरा भारत महान’ धन्सूच्या निर्मात्यांनी चाहत्यांमध्ये रिलीज केले आहे. ट्रेलर…
Tumblr media
View On WordPress
0 notes