Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सायबर सुरक्षा हा देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन.
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांवर समाजघटकांशी चर्चा.
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ.
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू.
****
सायबर सुरक्षा हा विषय देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी अर्थात भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते. जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात, त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांविषयीच्या माहितीचं सर्वसमावेशक संकलन करण्यासाठी समन्वय या मंचाचं तसंच संशयित बाबींची नोंद करणाऱ्या सस्पेक्ट रजिस्ट्रीचं उद्घाटन त्यांनी केलं. या मंचावरची माहिती सर्व चौकशी यंत्रणांना उपलब्ध असेल. सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरचं लोकार्पणही शहा यांनी या कार्यक्रमात केलं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलिसांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती आणि उपाययोजनांचं प्रशिक्षण देणाऱ्या सायबर कमांडो कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांनी केला. सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ७२ दूरचित्रवाहिन्या, चित्रपटगृहं आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहचवली जाणार आहे. सायबर सुरक्षेसाठी १९३० हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोरसीनं उपलब्ध करुन दिला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त दिलीप पावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांनी राज्यपालांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर राज्यपालांनी शहरातल्या सुभेदारी विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यपालांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत मराठवाडा विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर लवकरात राज्यभवनात विशेष बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय केला जाईल असं सत्तार यांनी सांगितलं.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांशी पाणी प्रश्नावर आपण चर्चा केली, तसंच वैधानिक विकास महामंडळा विषयी देखील चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासात्मक अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, आज सकाळी राज्यपालांनी जळगाव इथं लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. जळगाव जिल्हा सुवर्णालंकार व्यवसायात अग्रेसर आहे. त्यासाठी गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं. जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करत, जलसिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावं, राष्ट्रीय महामार्गाच्या १८ किलोमीटरचं रखडलेलं काम विशेष बाब म्हणून पूर्ण करावं. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी विमान वाहतूक महत्त्वाची असून मुंबईसाठी दररोज विमान सुरु करण्याचा प्रयत्न करावा असं राज्यपालांनी यावेळी सूचित केलं.
****
राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मूर्तीकार जयदीप आपटेची पोलिस कोठडी १३ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर चेतन पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांच्या कोठडीची मुदत संपल्यानं, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मुख्य संशयित जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली, न्यायालयानं ती काही अंशी मान्य करत, १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
****
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदीची मुदत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यू. राठोड यांनी ही माहित दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली होती. मात्र पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे तसंच संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आठ हजार ६०३ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातच पुरेसा पाऊस झाला नाही तसंच आता लोकसंख्या वाढली असल्याने नाशिक जिल्ह्यालाच पुरेसं पाणी उपलब्ध नाही, असं सांगत, आमदार फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, समन्यायी पाणी वाटपाच्या पुनर्विलोकनासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यास गटाला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी आणि या कालावधीत त्यांनी अभ्यास करून पुनर्विलोकन अहवाल जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला द्यावा असे आदेश न्यायालयाने दिल्याचं, आमदार फरांदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. महात्मा फुले पुतळा इथून संवादयात्रा रॅली काढण्यात आली. यावेळी भटके विमुक्त संयोजन समितीचे समन्वयक विधिज्ञ अरूण जाधव, राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२८ ऑगस्ट रोजी पुण्यातल्या फुलेवाडा इथून सुरू झालेल्या या संवादयात्रेचा २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात समारोप होणार आहे. भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय, भटक्यांना अर्थसंकल्पीय तरतूद, जातिनिहाय जनगणना, प्रशिक्षण संस्था अशा एकूण १७ मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
****
प्राथमिक शिक्षक पदाकरिता केवळ पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या १० नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा महाटीईटी’चं आयोजन करण्यात आलं आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. शिक्षण सेवकशिक्षक या पदांकरिता १० नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-१ घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-२ दुपारी २ ते साडे चार वाजे दरम्यान होणार आहे.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील १० हजार ६९१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३३ पूर्णांक ३९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यतल्या उर्वरीत १३१ पात्र शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार असून या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येत असलेला लाभ तात्काळ मिळावा, यासाठी थेट हस्तांतरण योजना अर्थात डीबीटी द्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याकरिता लातूर जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रं लातूर तहसील कार्यालयात सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
(इंजिनियरिंग ड्रॉइंग निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
तांत्रिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनियरिंग ड्रॉइंग. थोडक्यात, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही इंजिनियर्सची भाषा असते. भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार, संकल्पना, भावना हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे साधन होय. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात; परंतु तांत्रिक शिक्षणात या भाषा उपयुक्त ठरत नाहीत. त्याऐवजी चित्रकला ही संकल्पना उपयोगात आणून एका व्यक्तीकडून विविध विचार अनेक व्यक्तींपर्यंत पोहचवणे सहजरित्या शक्य होते. म्हणूनच, अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींसाठी आपल्या संकल्पनांचे किंवा विचारांचे व्यवस्थितपणे दृश्य स्वरूपात संक्रमण करण्यासाठी जी पद्धत शोधून काढली; त्या पद्धतीलाच ‘इंजिनियरिंग ड्रॉइंग’ असे म्हणतात.
मोटारगाडी, रेल्वे, विमान, घडयाळ इ. प्रकारची अनेक यंत्रे तसेच या यंत्रांचे वेगवेगळे भाग निरनिराळ्या ठिकाणी तयार होतात. हे तयार करणाऱ्या कामगाराला/कारागिराला यंत्राची किंवा यंत्राच्या विशिष्ट भागांची माहिती तोंडी सांगणे शक्य आणि सोईचेही न��ते. त्यामुळे अभियंता त्या यंत्राचे किंवा विशिष्ट भागांचे प्रमाणबद्ध चित्र काढून कामगाराला/कारागिराला देत असतो. प्रमाणबद्ध चित्रावरून कामगाराला/कारागिराला यंत्राची तसेच यंत्राच्या भागांची व्यवस्थित कल्पना येते आणि त्यातून निर्मिती सहज शक्य होते. याच कारणामुळे, अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या काम करण्यासाठी प्रत्येकाला इंजिनियरिंग ड्रॉइंग या विषयी सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे.
साधारणत: इंजिनियरिंग ड्रॉइंगमध्ये कुठल्याही यंत्राचे तसेच यंत्रांच्या वेगवेगळ्या भागांचे चित्र रेखाटून त्यात लांबी, रुंदी, उंची इत्यादिपासून ते वापरण्याची जागा, वापरला जाणारा धातू, रंग, वजन या सर्व बाबींची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळेच यंत्रनिर्मिती प्रक्रिया व काही काळानंतर त्या यंत्राची दुरुस्ती करणे सहज शक्य होते. उदा. मोटार वाहनाची निर्मिती ते गॅरेजमध्ये होणारी दुरुस्ती त्याचबरोबर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, हाऊस वायरिंग, पाणी पुरवठा/गॅस पुरवठा या सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया व दुरुस्ती सहज होते.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने निर्मितीचा वेग वाढविण्यात इंजिनियरिंग ड्रॉइंगचा मोठा वाटा आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंगच्या माध्यमातून प्रत्येक यंत्राच्या तसेच यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती प्रक्रिया, दुरुस्ती यामध्ये लागणारा वेळ कमी होऊन उत्पादन वाढीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.
वरील मांडलेल्या सर्व गोष्टींचा बारकाई अभ्यास व विचार केल्यास लक्षात येते, की इंजिनियरिंग ड्रॉइंग एक महत्त्वाचा विषय असून त्याची इत्यंभूत माहिती व ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंग हा इंजिनियर्सचा आत्मा आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
माझे (संत रामपाल दास यांचे) पूज्य गुरुदेव स्वामी रामदेवानंदजी महाराज यांना सोळाव्या वर्षी एका महात्म्याचा सत्संग ऐकून वैराग्य प्राप्त झाले. एक दिवस ते शेतामध्ये गेले होते. जवळच एक जंगल होते. त्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी एका मृत जनावराच्या हाडांजवळ आपले कपडे फाडून फेकले आणि ते महात्माजींसोबत निघून गेले.
घरातील व्यक्तींनी जेव्हा त्यांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना जंगलामध्ये हाडांजवळ त्यांचे फाटलेले कपडे दिसले. घरच्यांना वाटले, की एखाद्या जंगली प्राण्याने त्यांना खाल्ले असावे. त्यांनी ती कपडे आणि हाडे उचलून घरी आणली आणि अंतिम संस्कार केले. त्यानंतर दहावा, तेरावा, वर्षश्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी श्राद्ध घालणे सुरूच झाले.
जेव्हा माझे पूज्य गुरुदेव अत्यंत वृद्ध झाले, तेव्हा एकदा त्यांच्या स्वत:च्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्या घरच्यांना समजले, की ते जिवंत आहेत आणि घर सोडून निघून गेलेले होते. घरच्यांनी सांगितले, की जेव्हा तुम्ही घर सोडून गेला, तेव्हा तुमचा फार शोध घेण्यात आला. शेवटी जंगलामध्ये तुमचे कपडे मिळाले. त्या कपड्यांजवळ काही हाडेही पडलेली दिसली, तेव्हा आम्हाला वाटले, की एखाद्या हिंस्र प्राण्याने तुम्हाला खाऊन टाकले असेल. आम्ही ते कपडे आणि हाडे घरी आणून अंतिम संस्कार केला.
नंतर मी (संत रामपाल दास) माझ्या पूज्य गुरुदेवांच्या लहान बंधूंच्या पत्नीला विचारले, की जेव्हा आमचे पूज्य गुरुदेव घर सोडून निघून गेले, त्यानंतर तुम्ही त्यांच्या माघारी काय केले? तिने सांगितले, की जेव्हा विवाह होऊन मी या घरी आले, तेव्हा त्यांचे श्राद्ध घातले होते. त्यानंतर मी माझ्या स्वत:च्या हातांनी त्यांचे सुमारे सत्तर वेळा श्राद्ध घातले आहे. तिने पुढे सांगितले, की जेव्हा घरामध्ये एखादे नुकसान व्हायचे, म्हणजे म्हशीने दूध न देणे, म्हशीचे सड खराब होणे किंवा अन्य काही तरी नुकसान, त्यावेळी आम्ही एखाद्या शहाण्या मांत्रिकाकडे जायचो. तो म्हणायचा, की तुमच्या घरी कोणाचा तरी निःसंतान, लग्न न होता मृत्यू झालेला आहे. तेच तुम्हाला दु:खी करत आहे. त्यावेळी आम्ही त्या मांत्रिकाला वस्त्रे, धन इत्यादी द्यायचो.
यावर मी (रामपाल दास) म्हणालो, की हे तर जगाचा उद्धार करत आहेत. हे कुठे कोणाला काय दु:ख देत होते? ते तर आता सुखदाता आहेत. आता तर ते आपल्यासमोरच आहेत. आता तर श्राद्ध घालणे इत्यादी व्यर्थ साधना बंद करा. तेव्हा त्या म्हणाल्या, की ही तर आमची जुनी परंपरा आहे. हे कसे काय सोडू? याचा अर्थ असा, की “आपण आपल्या जुन्या रीती-परंपरांमध्ये इतके लीन झालेलो आहोत” की प्रत्यक्ष प्रमाण असूनही त्या अयोग्य परंपरा आपण सोडू शकत नाही. यावरून हे सिद्ध होते, की श्राद्ध घालणे, पितरपूजा करणे इत्यादी सर्व व्यर्थ आहे.
तुम्हाला किती पैसे मिळतात,त्यातील किती पैशांची बचत करायची,कुठे किती गुंतवणूक करायची ,भविष्यात किती पैसे लागतील याचा तुम्ही विचार करता का? करत असाल तर अभिनंदन, करत नसाल तर असा विचार करायला सुरुवात करा. असा विचार करून कोणती कृती करायची याची माहिती तुम्हाला त्या विषयातील तज्ञ येथे देत राहतील. मी त्या विषयातील तज्ञ नाही, मी मनातील भावना आणि विचार यांचा अभ्यासक आहे. मनातील भावना कशा निर्माण होतात, त्रासदायक भावना कशा बदलता येतात, भावनांचा आपल्या वागण्यावर कसा परिणाम होतो याची माहिती मी देऊ शकतो. पैसा,धन याविषयी देखील तुमच्या मनात ज्या भावना असतात त्यानुसार तुमचे वागणे होत असते. पैशांची बचत, गुंतवणूक, पैसे कोणत्या गोष्टींसाठी वापरायचे अशा अनेक गोष्टीविषयी प्रत्येकाच्या मनातील भावना वेगळी असू शकते, त्यानुसार प्रायोरिटी, प्राधान्य क्रम बदलतात. तुमचे व्यक्तिमत्व,संस्कार, तुमची आर्थिक धोका पत्करण्याची तयारी, तुम्ही भविष्याचा विचार कसा करता, आणि याविषयीच्या तुमच्या भावना कशा महत्वाच्या असतात याची चर्चा आपण येथे करणार आहोत.
भविष्याचा विचार अवश्य करायला हवा, त्यासाठी आवश्यक बचत आणि गुंतवणूक करायला हवी. पण एखादा माणूस सतत हाच विचार करत राहिला तर तो वर्तमान क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. असा आनंद घ्यायचा असेल तर विचार करणे आणि मनात आपोआप विचार येणे यातील फरक समजायला हवा.तुम्हाला हा फरक समजतो का? मन विचारात असते त्यावेळी तुम्ही विचार करत असतं किंवा मनात विचार येत असतात. पैशविषयी विचार करायला हवा पण त्याबद्दल आपोआप कोणते विचार मनात अधिक येत राहतात याबद्दल सजगता विकसित करायला हवी. ती काशी विकसित करायची याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.
पैसे खर्च करून तुम्ही एखादा आनंददायी अनुभव विकत घेतला असेल पण त्यावेळी यासाठी इतका खर्च झाला आहे हाच विचार मनात येत राहिला आणि त्यावर तुम्ही विचार करत राहिलात तर खर्च केलेले पैसे वाया गेलेले असतात कारण असे विचार असताना आनंद अनुभवता येत नाही. भरकटणारे मन आनंदी नसते असे जगभरातील संशोधनात स्पष्ट होत आहेच पण तुम्हीही त्याचा अनुभव घेऊ शकता. कोणताही सुखद अनुभव घेताना लक्ष वर्तमान क्षणात कसे ठेवायचे या विषयी आपण येथे चर्चा करू. मात्र केवळ चर्चा पुरेशी नाही, त्यानुसार तुम्ही लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, किंवा मला आत्ता जसे पैसे मिळत आहेत तसे ते भविष्यात मिळतील का असे त्रासदायक विचार बहुसंख्य माणसांच्या मनात येत असतात. मग असे विचार येऊ नयेत म्हणून ड्रिंक, डान्स, सेक्स किंवा मन दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण सतत असे विचारांपासून पळून जाणे योग्य नसते, त्याचे अनेक दुष्परिणाम होत राहतात,मन दुसरीकडे वळवले तरी अबोध मनात ते विचार राहतात. त्यामुळे जाणीव होत नाही, जागृत मनाला समजत नाही असा मानसिक तणाव कायम राहतो. अशा तणावामुळे अनेक शारीरिक आजार होतात. ते कमी करायचे, टाळायचे असतील तर सतत व्यस्त न राहता काहीवेळ काहीही न करता शांत बसायचे. त्यावेळी अज्ञ मनात जे काही आहे त्यानुसार जागृत मनात विचार येतात. या आपोआप येत राहणाऱ्या विचारांच्या आणि भावनांच्या लाटाना सामोरे जाण्याचे कौशल्य विकसित करता येते. हे कौशल्य कसे विकसित करायचे याची माहिती तुम्हाला येथे मिळत राहील.
थोड्या कालावधीत भरपूर पैसे मिळायला हवेत असा विचार बरेच जण करत असतात. आर्थिक फसवणूक याच विचाराला बळी पडून होत असते. असे फसवणूक करणारे एक मोहजाल निर्माण करतात त्यामुळे तार्किक विचार करणारा मेंदूचा भाग काहीकाळ कामच करत नाही.अशा वेळी भावनांची सजगता असेल तर हा लोभ टाळता येतो. एक वर्षात दुप्पट पैसे करून देणारी व्यक्ती खोटे दावे करते आहे,तिने काही वेळा असे पैसे दिले तरीही या व्यवहारात फसवणूक होऊ शकते हा विचार करणे सजगता असेल तरच शक्य होते.अशी भावनांची सजगता कशी विकसित करायची हे आपण येथे पाहू.
अशी फसवणूक होऊ शकते या विचाराने काही माणसे कुठेही गुंतवणूक करायला घाबरतात. काहीजण तर येणाऱ्या पैशांची बचत करणे सोडाच, न आलेला पैसा ही आधीच खर्च करून टाकतात. आज वापरा नंतर पैसे द्या अशा अनेक जाहिराती आपल्याला सतत दिसत असतात. खिशात पैसे नसले तरीही खूप शॉपिंग करता येते. अशी क्रेडिट कार्ड सतत वापरण्याची मानसिकता का निर्माण होते, त्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत, समृद्धी वाढवण्यासाठी अशी मानसिकता कशी धोकादायक असते, याचाही विचार आपण येथे करूया. शॉपिंग करणे हे देखील एक व्यसन आहे, ते केले नाही की अस्वस्थ वाटू लागते यामागे मेंदूतील काही रसायने कारणीभूत असतात, त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे देखील तुम्ही समजून घेऊ शकता.
माणसाचा मेंदू आळशी असतो, त्यामुळे तो फास्ट थिंकिंग करतो. त्यानुसार मनात येणाऱ्या विचारांचा प्रभाव माणसाच्या पूर्ण विचार प्रक्रियेवर राहतो. गुंतवणूक करताना कितीही तांत्रिक विश्लेषण केलेले असले तरीही निर्णय घेताना माणसे या फास्ट थिंकिंग नुसारच निर्णय घेतात. या विषयावर अनेक वर्षे संशोधन करून डॉ डनियल केनहमन यांनी थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्यासारखे अनेक जण बिहेवियर इकॉनॉमी म्हणजे आर्थिक व्यवहारांची मानसिकता आणि वर्तन या नवीन विषयात काम करत आहेत. त्यांचे निष्कर्ष आपण येथे सोप्या भाषेत समजून घेऊ, त्यासाठी नियमितपणे येथे भेटत राहू.
Gyan Ganga Marathi | Audio Book | Topic - 061 | Sant Rampal Ji Marathi S...
youtube
अवश्य ऐका ऑडियो बुक - ज्ञान गंगा मराठी विषय- "यथार्थ ज्ञान प्रकाश विषय" परमेश्वर कबीर यांच्या विषयी शास्त्रे काय सांगतात? Topic -061| Sant Rampal Ji Marathi Satsang.
उमरज येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि राष्ट्रीय कृषि विकास बैंक(नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यामानाने प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये डॉ. संतोष चव्हाण यांनी उपस्थित शेतकर्यना कागदी लिंबू आणि सीताफळ लागवड या विषयी सविस्तर मार्दर्शन करण्यात आले. सदरील पिक लागवड करतना जमिनीची निवड, पूर्व तयारी, रोपांची निवड, बागेची आखणी करणे, लागवड करणे, लागवड खर्च आणि उत्पन या बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास एकूण २४ शेतकरी उपस्थित होते. कार्यकर्माचे सूत्र संचालन प्रदिपकुमार भिसे (कृषितज्ञ) यांनी केले. #KrishiVigyanKendra #agriculture #kvksagroli #शेती #fruits #NABARD #नाबार्ड #लिंबू #सीताफळ #लागवड🌳
ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त जी यांनी दिग्दर्शित केलेला 'देवकी नंदन गोपाला…' हा चित्रपट पाहिला आणि मला त्यावेळी गाडगेबाबा यांच्या विषयी अधिक माहिती झाली, अशा भावना काल व्यक्त केल्या.
वानवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समरसता सेवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात मा. राजदत्त जी आणि डॉक्टर के लक्ष्मण जी यांच्यासह मान्यवरांचे विचार ऐकण्याचे सौभाग्य लाभले.
नाशिकच्या काळाराम मंदिराचे भक्त म्हणून ही प्रसिद्ध आहेत, चारूदत्त थोरात | संपूर्ण परिचय | वेदोक्त चारित्र्य | माहिती | काळाराम मंदिराचे वंशज | हिस्टॉरिक रेकॉरडेड एव्हिडेंस | कोण आहेत चारुदत्त थोरात | चारूदत्त थोरात विषयी संपूर्ण माहिती | असा आहे चारूदत्त
- Full Story https://fb.watch/qsRg6V9vMl/?mibextid=Nif5oz
ऐतिहासिक_कालाराम_के_भक्त_थोरात_चारूदत्त💙
(२१ व्या शतकातील, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर)
______________
| ऐतिहासिक - संदर्भ - पुढीलप्रमाणे - (Reference)
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
कालारामभक्त_चारुदत्त_थोरात चरित्र का महापरिचय
• ऐतिहासिक - https://fb.watch/qsRij2hFe-/?mibextid=Nif5oz
(सौ. चंदन पूजाधिकारी,
ऐतिहासिक काळाराम मंदिर वंशज
तथा Tv9 मराठी महाराष्ट्र/ तथा
चारुदत्त-वेदोक्त-चरित्रवर्णनकार)
#वेदोक्त_मराठा (The Vedokta Maratha)
#वेदोक्तमराठा (The Vedokta Maratha)
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ...
• " Vedokta Biography of Charudatta Thorat "
by has published by chandan pujadhikari,
(Who is, the kalarama temple vanshaj pujadhikari)
____________________________
*💙नासिक के ऐतिहासिक काळाराम मंदिर के वंशज तथा, संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी के वारसदार -*
*नाशिकभूषण मा. चंदन पूजाधिकारी ने दिया* *''कालाराम मंदिर के भक्त चारुदत्त महेश थोरात'' के "दत्ताश्रय" वेदोक्त चरित्र का महापरिचय...*
https://fb.watch/qsRm3oLdT5/?mibextid=Nif5oz
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का परिचय
#The_Historic_Documentary
27 july 2015 ... चारूदत्त थोरात यांचे ऐतिहासिक डॉक्युमेंट्री ... ऐतिहासिक चारित्रात्मक परिचय मिडिया दस्तऐवज ...
Historic Recorded Evidence
_______
• " सुचारू " धोरण -
अज्ञान अंधःश्रद्धांचा त्याग करून,
सज्ञान सूज्ञ श्रद्धांचा स्विकार करू या...
जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त
व्यसनमुक्त महा'राष्ट्र'.. चला घडवू या !
- राजकवी चारूदत्त@CMThorat
_____________
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | उक्त संदर्भ पुनश्चः प्रकाशीत संग्रहित
__________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
_________
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________
••• चारु आकाशाएवढा •••
••• दत्ताश्रय भक्त परिवार •••
_______
• sub topic - चारूआकाशाएवढा
_______
• UPLOAD BY -
|| काळारामभक्त चारुदत्त भक्तपरिवार ||
__________
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
______________
प्रस्तुत उक्त संदर्भ हा उपयोजितदृष्ट्या संग्रहित असून,
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहाला आज संबोधित करणार
पर्यावरण संवर्धनात महाराष्ट्राची आघाडी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याला १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार
मुस्लीम महिलांनाही पोटगीचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पासाठी महिनाभरात कार्यादेश-उद्योगमंत्री उदय सामंत
आणि
भारताची झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत २-१ ने आघाडी
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना ते आज संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती मुंबईतल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.
****
महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचं जनक राज्य आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. १५व्या कृषी नेतृत्व समितीचा २०२४ चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्रयांनी काल दिल्ली इथं स्वीकारला, त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्य सरकारनं २१ लाख हेक्टरवर झाडं लावण्याचा आणि पाच टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होणार आहे. सरकारनं बांबू लागवडीला प्रोत्साहन दिलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. लातूर जिल्ह्यातल्या देशातल्या पहिल्या मायक्रो मिलेट क्लस्टर प्रकल्पाची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बांबू विषयी राज्य सरकारकडून हाती घेतलेल्या उपायांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रशंसा केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं अर्थतज्ज्ञांसमवेत चर्चा करणार आहेत. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात पंतप्रधान तज्ज्ञांचे विचार जाणून घेणार आहेत. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेश २२ तारखेला सुरु होत आहे. २३ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ सादर करणार आहेत.
****
मुस्लिम महिलांनाही पतींकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं काल एका सुनावणी दरम्यान, घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्यास विरोध करणारी एक याचिका फेटाळून लावतांना ही बाब स्पष्ट केली. मुस्लिम महिला अधिनियम १९८६, हा धर्मनिरपेक्ष कायद्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही, असंही न्यायालयानं नमूद केलं.
****
मराठा तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गदारोळ झाल्याने विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज काल तहकूब करण्यात आलं. विधानसभेत या मुद्यावरून सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली.
दरम्यान, गदारोळ वाढत गेल्यानं, सदनाचं कामकाज सकाळच्या सत्रात चार वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गदारोळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर केल्या आणि कोणत्याही चर्चेविना त्या मंजूर करण्यात आल्या. याशिवाय, कर विषयक कायदे सुधारणा विधेयक, महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंध विधेयक आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध करणारं विधेयक, ही तीन विधेयकं विधानसभेनं मंजूर केली.
विधान परिषदेतही सदर बैठकीला विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून गदारोळ झाला. त्यानंतर उपसभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनमतानं दिवसभराचं कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
****
दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते काल विधानसभेत बोलत होते.
राज्यातील कायमस्वरूपी विनाअनुदानित, दिव्यांगांच्या विशेष शाळा, संलग्न वसतीगृहं, कार्यशाळा तसंच अनाथ-मतिमंदांची बालगृहं यांना अनुदान देण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली.
****
राज्यातल्या मोठ्या शहरांमधल्या शासकीय रुग्णालयांमधल्या, विविध आजारांची तपासणी करणाऱ्या यंत्रणा तसंच जनरेटरची व्यवस्था अशा बाबींचा आढावा घेण्यात येईल आणि त्यात काही त्रुटी आढळल्या तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य रमेश कोरगावकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून त्याचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. यासंबंधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रियेमध्ये अटींचा समावेश करण्यात आला आहे. यानूसार पात्र ठरलेल्या निविदांचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतील, असं मंत्री सामंत यांनी सांगितलं.
****
राज्य शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात चार टक्के वाढ केली असून आता महागाई भत्ता पन्नास टक्के इतका झाला आहे. हा निर्णय या वर्षीच्या एक जानेवारीपासून लागू होणार आहे. महागाई भत्त्यातली ही वाढ निवृत्तीवेतन धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनाही लागू होणार आहे.
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात काल सकाळी झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत याबाबत माहिती दिली. या भूकंपामुळे कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर तसंच वाशीम या जिल्ह्यांमध्ये काल सकाळी सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच इतकी नोंदवली गेली.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे या गावापर्यंत होता. या धक्क्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या पेठ वडगाव इथल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड शहरातही काल सकाळी भूकंपाचे हादरे बसले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अनेक भागात हे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं किलेअर्क परिसरातल्या वसतीगृहाच्या दुरुस्तीचा मुद्दा विधान परिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी, या वसतीगृहाच्या दुरुस्तीसाठी तरतूद केलेली असून, हे काम जलद पूर्ण केलं जाईल, असं सांगितलं. आमदार राजेश राठोड यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सोलार पॅनल न बसवता, देयकं अदा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित प्रकरणी आठ दिवसांत तपास करून कारवाईचं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या वसतीगृहामधली सुरक्षा, पाणी पुरवठा, भोजनाची गुणवत्ता आदी समस्यांकडे सदनाचं लक्ष वेधलं.
****
वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचं झालेलं नुकसान कधीही भरून येणारं नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंढरपूर इथल्या पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवांच्या सेवे साठी सज्ज राहण्याच्या सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी काल संबंधितांना दिल्या. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा असं सांगत त्यांनी हिरकणी कक्ष तसंच वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास संयुक्तीक भेटी देऊन पाहणी केली.
****
सीमा सुरक्षा दलात नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम यांना हरियाणात कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं परवा वीरमरण आलं. कदम हे नांदेडचे रहिवासी होते. नांदेड इथे आज त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
भारत आणि झिम्ब्वाब्वे संघात टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताने २३ धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांचा मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली आहे. काल हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत चार बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास आलेला यजमान संघ निर्धारित षटकांत सहा बाद १५९ धावाच करू शकला. मालिकेतला चौथा सामना येत्या शनिवारी खेळवला जाणार आहे.
कृषी विषयी सर्व माहिती, नवीन संशोधन, शेती पूरक व्यवसायातील संधी आणि अशा प्रकारच्या सर्व नवीन माहिती *कृषिमित्र अॅग्रीटेक* सदैव आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहील...
त्या दिवशी, विश्वास,आशा आणि श्रद्धा ह्या विषयी प्रो.देसायांनी आपले विचार सांगितले.पण आशेविषयी त्यांचे विचार माझ्या मनात घोळत होते.मला वाटतं की,या जीवनात घाबरण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.जशा दहशतवाद,वेडेपण,तानाशाही वगैरे वगैरे.ही यादी आणखी पुढे जाऊ शकते.तेव्हा आपल्या या भीतीदायक जगातल्या सगळ्या भीतीदायक गोष्टींपैकी एक म्हणजे “आशा” असं मला वाटतं.
अशा या निरुपद्रवी दिसणार्या दोन अक्षरी शब्दामूळे,…