Vastu Tips For Money: नोटा मोजताना या चुका करू नका, गरीब व्हाल!
Vastu Tips For Money: नोटा मोजताना या चुका करू नका, गरीब व्हाल!
Vastu Tips For Money: नोटा मोजताना या चुका करू नका, गरीब व्हाल!
Vastu Tips For Money:आयुष्यात प्रत्येकजण आपल्या आर्थिक स्थितीबद्दल चिंतित असतो. आपल्या सर्वांना काही प्रमाणात आर्थिक सुरक्षितता हवी आहे. तथापि, वास्तुशास्त्राच्या मदतीने आर्थिक स्थैर्याने आपले जीवन जगता येते. माँ लक्ष्मीच्या कृपेने अपार धन आणि सुख प्राप्त होते. म्हणूनच माँ लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि तिचे सदैव रक्षण…
View On WordPress
0 notes
असा असेल तुमचा आजचा दिवस...
सोमवार, १५ एप्रिल २०२४. चैत्र शुक्ल सप्तमी. वसंत ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन/कर्क.
“आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे.” सूर्याला दवणा वहाणे
मेष:- आर्थिक उलाढाल वाढेल. नफा होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करावी…
View On WordPress
0 notes
विरंगुळा घ्या, नाहीतर निराश व्हाल.
बऱ्याच लोकांना हे समजत नाही की दीर्घ कालावधीसाठी काम करणं तितकंच वाईट असतं.मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कामादरम्यान खरोखरच विश्रांती घेतली पाहिजे.हे करणं निश्चितपणे तुमची तणाव पातळी तसंच तुमची निराशा कमी ठेवण्यास मदत करतं.मेंदूवर खूप अनावश्यक ताण टाकणं ही एक अतिशय वाईट कल्पना आहे.
एकदा,काही वर्षांपूर्वी, मी काही लेखावर सुमारे तीन तास सतत काम करत होतो.यामुळे मला खूप त्रास झाला. मुख्य गोष्ट जी…
View On WordPress
0 notes
डॉक्टर (Pradip ला) : मी तुम्हाला असं एक औषध देतो,
ज्याने तुम्ही तरुण व्हाल.
Pradip : नको! माझं पेन्शन बंद होईल.
🤣🤣🤣😛😛😛🥳🤔🥳🥳
1 note
·
View note
हाडाचा सापळा झाला असेल तर खा दुधासह हे शाकाहारी पदार्थ, १ महिन्यात व्हाल गुबगुबीत
मांसाहार केल्याने वजन वाढतं असं म्हटलं जातं. मात्र तुमचे वजन कमी असेल आणि हाडांची अक्षरशः काडं झाली असतील तर काही शाकाहारी पदार्थांचे सेवनही तुमचे वजन वाढविण्यास उपयुक्त ठरतात
वजन कमी करणे असो अथवा वजन वाढवणे असो दोन्ही लाइफस्टाइल आणि योग्य खाण्यापिण्यावर अवलंबून असते. तुम्ही जे डाएट फॉलो करत आहात, ते शरीरांच्या गरजा पूर्ण करत आहेत की नाही हे जाणून घेणं गरजेचे आहे. मांसाहारी खाण्यामुळेच वजन…
View On WordPress
0 notes
Jaya Prada यांना प्रसिद्ध निर्मात्यांसोबत लग्न करून देखील नाही मिळाला पत्नीचा मान; कारण जाणून व्हाल थक्क - Bollywood actress Jaya Prada love story with srikant nahata
लग्नानंतर जया प्रदा यांना नाही मिळाला पत्नीचा मान... संपत्ती, प्रसिद्धी असूनही नाही अनुभवता आलं मातृत्वाचं सुख... कारण जाणून व्हाल हैराण
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावत स्वतःचं नाव भक्कम केलं. पण अनेक अभिनेत्रींपैकी ८० ते ९० च्या दशकातील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जया प्रदा (Jaya Prada)… जया प्रदा आज सिनेविश्वात सक्रिय नसल्यातरी त्यांच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. जया प्रदा यांना रुपेरी पडद्यावर प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं, पण खासगी आयुष्यात मात्र लग्न होवून देखील अभिनेत्रीला कधीही पत्नीचा मान मिळाला नाही. शिवाय संपत्ती, प्रसिद्धी असूनही त्यांना कधीही मातृत्वाचं सुख अनुभवता आलं नाही. आज जया प्रदा यांच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेवू…
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ८० च्या दशकात जया प्रदा टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. प्रत्येत दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते जया प्रदा यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. १९८५ साली जेव्हा जया प्रदा यांचं करियर यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्री इनकम टॅक्सच्या रडारवर आल्या. तेव्हा अभिनेत्रीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
आलेल्या अडचणींचा परिणाम अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यावर देखील झाला. तेव्हा जया प्रदा यांच्या आयुष्यात निर्माते श्रीकांत नाहटा यांची एन्ट्री झाली. श्रीकांत नाहटा यांनी टॅक्स प्रकरणात अभिनेत्रीची मदत केली. अशाप्रकारे दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि भेटीचं रुपांतर अखरे प्रेमात झालं.
अखेर जया प्रदा आणि श्रीकांत नाहटा यांनी १९८६ साली लग्न केलं. श्रीकांत नाहटा यांनी जेव्हा ���या प्रदा यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा निर्माते विवाहित होते. श्रीकांत नाहटा यांच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता. तरी देखील श्रीकांत नाहटा यांनी जया प्रदा यांच्यासोबत लग्न केलं. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न झाल्यामुळे श्रीकांत नाहटा कधीही जया प्रदा यांना पत्नीचा मान देवू शकले नाही.
त्यानंतर काही वर्षांनी जया प्रदा आणि श्रीकांत नाहटा विभक्त झाले. महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्धी संपत्ती सर्व काही असताना जया प्रदा यांना कधीही मातृत्वाचं सुख अनुभवता आलं नाही. आज जया प्रदा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी देखील चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात.
Read the full article
0 notes
मृत्यू समोर असतानाही घाबरले नाही हरीण. कारण वाचून व्हाल चकित
मृत्यू समोर असतानाही घाबरले नाही हरीण. कारण वाचून व्हाल चकित
सदर फोटो दुर्मीळ आणि सर्वोत्तम फोटो म्हणून जिओ चॅनेल ने निवडला आहे. कारणही तसेच आहे. हा फोटो घेताना फोटोग्राफर च्या देखिल डोळ्यात पाणी आल्या वाचून राहिले नाही. फोटो मध्ये एक हरीण आणि दोन बिबट्या दिसत आहेत. यातील ते हरीण आपल्या दोन पिल्लांसोबत खेळत होते.
असे असताना जेव्हा दोन बिबटे अचानक समोर येतात तेव्हा पळून जाण्याशिवाय हरणाकडे कोणताही पर्याय नसतो. या हरिनापुढेही हाच पर्याय होता. परंतू…
View On WordPress
0 notes
Manuka Water : पोट साफ न होणं, मुळव्याध, गॅस-अपचन, आतडे-पोटाच्या सर्व समस्यांतून व्हाल मुक्त, प्या हे खास पाणी
Manuka Water : पोट साफ न होणं, मुळव्याध, गॅस-अपचन, आतडे-पोटाच्या सर्व समस्यांतून व्हाल मुक्त, प्या हे खास पाणी
Manuka Water : पोट साफ न होणं, मुळव्याध, गॅस-अपचन, आतडे-पोटाच्या सर्व समस्यांतून व्हाल मुक्त, प्या हे खास पाणी
Benefits of Drinking Munakka Water Daily : मुनका हे एक ड्राय फ्रूट आहे जे अत्यंत पोषक तत्वांनी भरलेले असते. मणुक्याला इंग्रजीत ब्लॅक ग्रेप रेजिन (Black Grape Raisin Benefits) असेही म्हणतात. ज्यामध्ये फायबर (fiber), जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजे (minerals) असे अनेक गुणधर्म…
View On WordPress
0 notes
सोमवार, ९ ऑक्टोबर २०२३. भाद्रपद कृष्ण दशमी. वर्षा ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००चंद्र नक्षत्र – आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. “आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस” *एकादशी श्राद्ध* मेष:- सन्मान होईल. स्तुतसुमने मिळतील. मात्र अचानक एखादे संकट उभे राहू शकते. वृषभ:- अचानक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
अनेक भाषा अवगत करा मात्र, मातृभाषेचा अभिमान बाळगून वाटचाल करा; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांचं आवाहन.
सुमारे २३ हजार कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून २५ जणांविरोधात गुन्हा दाखल.
जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यात ७० गावांमधल्या ६६ कोटी रुपयांच्या पाणीपु��वठा योजनांचं उद्घाटन.
आणि
माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही राज्य शासनाची योजना देशभर राबवण्याचा विचार सुरू - आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत.
****
अनेक भाषा अवगत करा मात्र, मातृभाषेचा अभिमान बाळगून पुढील वाटचाल करा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यां���्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्येयासाठी झपाटून कामाला लागाल तरच आयुष्यात यशस्वी व्हाल, इतिहासातून प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श ठेवला तर संस्कार निर्माण होतील, परिणामी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. देशाला विश्वगुरु करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं –
सबसे पहले जब यहां से निकलेंगे, हम इस युनिव्हरसिटी से बाहर जायेंगे, तो आज यहां से संकल्प कर के जायेंगे की हम इस देश को विश्वगुरू बनाना है। देश को सर्वश्रेष्ठ बनाना है। चारों ओर वर्ल्ड क्लास सडक बन रही है। वर्ल्ड क्लास एअरपोर्ट बन रहे है। इसके लिए इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, देश आगे बढ रहा है।
परम सुपर संगणकाचे जनक विजय भटकर यावेळी उपस्थित होते. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश हे जसं आव्हान आहे तशी ती संधी असल्याचं भटकर यांनी नमूद केलं. संगणक, बायोटेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान असे आधुनिक विषय मराठीतून शिकवणं गरजेचं असल्याचं मत विजय भटकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना यावेळी मानद डी. लिट. पदवी कुलपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
पवार यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्यात साखरेवर संशोधन करणारी राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक संस्था जालना इथं उभारण्यात येणार असून येत्या सहा महिन्यात या कामाला गती मिळणार असल्याची माहिती दिली.
तर गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनण्याचं आवाहन केलं. आत्मनिर्भर भारत घडवण्यात तसंच भारताला सुपर इकोनॉमिक पावर बनवण्याची शक्ती विद्यार्थ्यांमध्ये असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.
****
सुमारे २३ हजार कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयने मुंबईतल्या एका खासगी कंपनी, तसंच कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून, या आरोपींनी २८ बॅंकांच्या समूहाची २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार भारतीय स्टेट बँकेनं केली होती. त्या तक्रारीच्या आधारे संबंधित कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, संचालक, हमीदार, यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबाबत खासदार राहुल गांधी जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे. आज मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ खासदार शेवाळे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला, त्यावेळी शेवाळे बोलत होते. शिवसेनेला सावरकरांविषयी खरोखरच आदर असेल तर त्यांनी त्वरित महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, असं शेवाळे म्हणाले.
****
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. खासदार सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.
****
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. लक्ष्मीबाईंनी देशासाठी दिलेलं अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. साम्राज्यवादाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम प्रेरणादायक राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
तरुणांना भारतीय वायुसेनेकडे आकर्षित करण्याचा उद्देशाने आज नागपूर इथं भारतीय वायुसेने कडून एअर फेस्ट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. वायुसेनेच्या वैमानिकांनी यावेळी चित्तथरारक हवाई कवायती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. हवाई कवायती बघण्यासाठी नागपुरातील सुमारे ५ हजार नागरिक यावेळी सहभागी झाले होते.
****
५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचं उद्या गोव्यात दिमाखदार सोहळ्यानं उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात ७९ देशातले २८० चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून पणजी शहर चित्रपटप्रेमींनी गजबजू लागलं आहे.
****
विकास कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं, असं केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यातल्या ७० गावांमधल्या ६६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचं उद्घाटन आज जालना इथ दानवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय योजनांचा फायदा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी गावाचा सर्वांगिण विकास करावा, तसंच शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्याच्या माध्यमातून आथिक उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा, असा सल्ला दानवे यांनी यावेळी दिला. या पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर पाणी दररोज मिळणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही राज्य शासनाची योजना देशभर राबवण्याच्या विचार सुरू असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते आज परांडा इथं बोलत होते. केंद्र सरकारने या अभियानाचं कौतुक केलं असून आता केंद्र सरकार हे अभियान देशपातळीवर राबवण्याचा विचार करत आहे. राज्यात या अभियानास मिळालेला प्रतिसाद पाहता देशपातळीवर हे अभियान तेवढ्याच प्रमाणावर राबवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक पथक राज्यात अभ्यासासाठी पाठवत असल्याचं सावंत म्हणाले.
या अभियानाच्या माध्यमातून साडेतीन कोटी महिलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर राज्यातील सर्व महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सरकारी कार्यालयातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उपचारांवर भर दिला जाणार आहे. आजारांचे निदान झालेल्या अधिकाऱ्यांना चांगले उपचार देण्याचे प्रयत्न केले जातील. ज्या महिलांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार केले जातील, असं सावंत यांनी सांगितलं.
ग्रामीण भागात होणारं पहिलं महाआरोग्य शिबिर २७ नोव्हेंबरला परांडा इथं आयोजित करण्यात आलं असून, यामध्ये राज्यभरातून सहा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. सावंत यांनी परांडा इथं या शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. परंडा शहरातल्या मुख्य रस्त्याच्या कामाचं भूमिपूजनही सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात आज पहाटेपूर्वी दोन वाजून सात मि���िटांनी भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात होता. २ पूर्णांक ४ इतकी रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे परिसरात कोणतेही नुकसान झालं नाही. परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
****
शरद साखर कारखान्याच्या माध्यमातून मंत्री संदिपान भुमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला असून, या व्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
****
0 notes
https://sattakaran.com/web-stories/revanth-reddy-to-be-next-chief-minister-of-telangana/
Revanth Reddy | शेतकरी होणार तेलंगणाचा मुख्यमंत्री, रेवंत रेड्डी यांची संपत्ती पाहुन व्हाल हैराण
0 notes