राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल
राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल
राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल
मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन 2022-23 या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत 12 हजार 952.82 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 9748.96 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. गतवर्षीच्या तुलनेत महसूलात 32.86 टक्के वाढ झाली आहे.
राज्यात एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 July 2024
Time 16.45 to 16.55
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जूलै २०२४ सायंकाळी १६.४५
****
चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर
तीन लाखापर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त-स्टॅण्डर्ड डिडक्शन पन्नास हजारावरून ७५ हजार रुपये
कर्करोगाची औषधं, मोबाईल, इलेक्ट्रीक वाहनं, तसंच मौल्यवान धातूंच्या सीमा शुल्कात कपात
महाराष्ट्रासाठी विविध विभागांतर्गत सुमारे सात हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद
आणि
महिला आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत- नेपाळ सामना
****
आयकर दात्यांना दिलासा, उद्योग क्षेत्राला चालना, धार्मिक पर्यटनाचा विकास, आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारा चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आदी नऊ प्राधान्यक्रमांवर हा अर्थसंकल्प आधारलेला आहे.
या अर्थसंकल्पात आयकर रचनेत बदल प्रस्तावित असून, वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं असून, स्टॅंडर्ड डीडक्शनची मर्यादा वाढवण्यात आली असून, पगारदारांसाठी ही मर्यादा ७५ हजार रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी २५ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे पगारदारांच्या आयकरात साडे सतरा हजार रुपये बचत होणार असून, सरासरी सुमारे चार कोटी पगारदारांना याचा लाभ होणार आहे.
वार्षिक सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के, सात लाख ते १० लाख रुपयांपर्यंत १० टक्के, १० लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत १५ टक्के, १२ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत २० टक्के तर १५ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर आकारला जाणार आहे. नव्या कर विवरण पद्धतीने करमूल्यांकनासाठी या तरतुदी लागू असणार आहेत.
****
विदेशी कंपन्यांसाठी कार्पोरेट कर ४० टक्क्यांवरून ३५ टक्के, ई कॉमर्स कंपन्यांसाठी स्रोतावर कर कपात - टीडीएसचा दर एक टक्क्यावरून शून्य पूर्णांक एक टक्का करण्याची तसंच स्टार्टअप्सनास प्रोत्साहन देण्यासाठी एंजल कर रद्द करण्याची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.
****
या अर्थसंकल्पात, कर्करोगावरची औषधं तसंच वैद्यकीय उपकरणांवरचं सीमा शुल्क माफ करण्यात आलं असून, मोबाईल फोन, इलेक्ट्रीक वाहनं, चामड्याच्या वस्तू, अणु उर्जेसाठी लागणारी उपकरणं, प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे तसंच इतर २५ धातूंवरच्या सीमा शुल्कात कपात प्रस्तावित करण्���ात आली आहे. तर प्लास्टिक तसंच टेलिफोन उपकरणांवरच्या सीमाशुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
****
पीएम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरं बांधली जाणार असून, शहरी भागात गरीबांच्या घरांसाठी दहा लाख कोटी रुपये तर महिला आणि बालिका विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पंतप्रधान पाच योजनांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना कामावर घेण्यास मदत करण्यासाठी नियोक्त्यांना एक महिन्याचा पगार अनुदान म्हणून दिला जाईल. या योजनेसाठी पात्रता मर्यादा १ लाख रुपये मासिक वेतन असेल. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असेल.
या योजनांमुळे पाच वर्षांत चार कोटी १० लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. युवकांसाठी इंटर्नशीप आंतरवासिता योजना सीतारामन यांनी जाहीर केली, यामध्ये पुढच्या पाच वर्षात पाचशे कंपन्यामध्ये युवकांना १२ महिने इंटर्नशीपचा अनुभव मिळणार आहे, यासाठी दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन आणि कार्यकाळ पूर्ण झाल्यावर सहा हजार रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजनेत कर्ज मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून, अधिक उत्पादन देणारी ३२ विविध वाणं तसंच बागायती पिकांसाठी शंभरावर नवी वाणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक लाख ५२ हजार कोटी रुपये, ग्रामीण विकास दोन लाख ६६ हजार कोटी रुपये, तर शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी बिहार राज्यात गया इथं विष्णूपद मंदिर, तसंच महाबोधी मंदिराचा काशी विश्वनाथ कॉरीडॉरच्या धर्तीवर तर ओडिशातल्या मंदिरांचा तसंच पर्यटन स्थळांचा जागतिक पातळीवर विकास करण्यात येणार आहे. नालंदा हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
बिहार राज्यात रस्ते बांधणीसाठी २६ हजार कोटी तर आंध्रप्रदेशात राजधानी अमरावतीसह विविध प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री जनजाती उन्नत अभियानाची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली, या माध्यमातून ६३ हजार गावांतल्या पाच कोटी आदिवासी बांधवांना लाभ होणार आहे.
सीतारमन यांनी लोकसभेत वित्त विधेयक सादर केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. वित्तमंत्र्यांनी राज्यसभेतही वित्त विधेयक सादर केलं, त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
दरम्यान, या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी सुमारे सात हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये विदर्भ तसंच मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ६०० कोटी, ग्रामीण रस्ते सुधार ४०० कोटी, कृषी प्रकल्पांसाठी ५९८ कोटी, उद्योग ४६६ कोटी, आदी तरतुदींचा समावेश असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
****
आज सादर झालेला अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना सशक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, आणि या गतीत सातत्य राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचं सांगत, कररचनेततल्या मोठ्या बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवल्याची भावना व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, हा अर्थसंकल्प दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, आणि अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचं नमूद केलं.
****
विरोधी पक्षांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर केंद्र सरकारने तुरी दिल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अवघ्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी महाराष्ट्राला देशाचा पॉवर हाऊस म्हणून संबोधलं होतं, मात्र त्यांचं प्रेम हे बेगडी असल्याचं, या अर्थसंकल्पावरून दिसून आल्याचं मत, दानवे यांनी व्यक्त केलं.
विधान सभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला सापत्न वागणुक दिल्याची टीका करत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने केंद्र सरकारला पाठिंबा दिल्यामुळेच या दोन्ही राज्यांना भरभरून देण्यात आल्याचा आरोप केला.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी, धोरण आणि दृष्टी नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नोंदवली.
****
मतदान केंद्र सुसूत्रीकरण आणि नवीन मतदान केंद्र तयार करताना मतदारांच्या मतदान केंद्रात बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी, भारतीय जनता पक्षातर्फे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन दिल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मतदान केंद्राच्या ठिकाणीच वाढीव मतदान केंद्र त्याच इमारतीत मंजूर करावे अशी मागणीही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आकाशवाणी आज आपला सत्त्याण्णवावा वर्धापन दिन साजरा करत आहे. १९२७ साली आजच्या दिवशी आकाशवाणीचं पहिलं केंद्र मुंबई इथं सुरू झालं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी नावानं सुरू झालेलं हे केंद्र १९५७ नंतर आकाशवाणी या नावानं प्रसिद्ध झालं.
****
महिला आशिया चषक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं भारताचा सामना नेपाळसोबत होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे.
****
बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन मोहिमे अंतर्गत पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बालविवाहाविषयी माहिती देण्यासाठी दहा-नऊ-आठ या चाईल्ड मदतवाहिनीवर संपर्क करावा अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
****
सुधारित फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी धाराशिव इथं मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाला आज प्रारंभ झाला. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे प्रदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीत दोन दिवस चालणार आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहयोगी प्राध्यापकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या २९ जुलैला नवी मुंबई इथं घेण्यात येणार आहेत. मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.
****
0 notes
कांदा निर्यात शुल्कात वाढ मागे न घेतल्यास आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
0 notes
महाराष्ट्रातील बार-रेस्टॉरंट चालकांना झटका! राज्य सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ
महाराष्ट्रातील बार-रेस्टॉरंट चालकांना झटका! राज्य सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ
मुंबई : गेल्या दोन वर्षापासून कोविड प्रकोपाचा सामना करणाऱ्या (COVID-19) महाराष्ट्रातील रेस्टॉरेंट आणि बार मालकांवर करवाढीचा झटका बसला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) वार्षिक उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.
सर्व बारवर आकारण्यात येणाऱ्या वार्षिक उत्पादन शुल्कात 15 टक्क्यांची वाढ केली आहे. तर वाईनच्या दुकानांसाठीच्या (Wine Shops) शुल्कात 70 टक्क्यांनी वाढ करण्यात…
View On WordPress
0 notes
खाद्यतेल ३० रुपयांनी स्वस्त होणार
नवी दिल्ली : अनेक तेल उत्पादक कंपन्यांनी जुलैच्या तिस-या आठवड्यात एक लिटरची बाटली आणि पाऊचच्या किंमतीत ३० रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे.
खाद्यतेल लवकरच ३० रुपयांनी स्वस्त होणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने(डीएफपीडी) याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या, जुलैच्या तिस-या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत ३० रुपयांची घट येईल. एवढंच नाही तर सरकार खाद्यतेलावरील सेवा शुल्कात अजून कपात करण्याची ही शक्यता आहे. सरकारने यासाठी कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत खाद्यतेल घरातील किचनमध्ये गोडवा आणेल हे नक्की. एक लिटरची बाटली आणि पाऊच्या किंमतीत ३० रुपयांच्या कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. मध्यंतरी तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घराचे बजेट वाढले होते आणि सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळला होता.
कंपन्यांची दर कपात
अडाणी विल्मर कंपनीने त्यांच्या खाद्यतेल उत्पादनावरील दरात १० ते ३० रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. तर जेमिनी एडिबल अँड फॅट्स कंपनीने ही त्यांच्या उत्पादनावर ८ रुपये ते ३० रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. इमामी अॅग्री कंपनीने एमआरपीवर ३५ रुपयांपर्यंतची कपात केली आहे. कंपन्यांच्या या कपात धोरणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर दिसून येईल. त्यांना पहिल्यापेक्षा स्वस्त खाद्य तेल खरेदी करता येईल. मदर डेअरीने सुद्धा त्यांच्या खाद्यतेलाच्या किंमती उतरवल्या आहेत. त्यांनी तेलाच्या किंमतीत १५ रुपये प्रति लिटर कपात केली आहे. यामध्ये सोयाबीनचे तेल आणि राईसब्रान तेलाचा समावेश आहे.
बैठकीनंतर तेल कपातीवर तोडगा
सरकारने नुकतीच तेल उत्पादक कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सामान्य जनतेवरील खाद्यतेलामुळे वाढलेला भार कमी करण्यावर जोर देण्यात आला. एवढेच नाही तर कंपन्यांकडून सेवा शुल्काविषयी कंपन्यांकडून सूचना ही मागवण्यात आल्या आहेत. या बैठकीनंतर कंपन्यांनी तातडीने त्यांच्या तेलाच्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे.
Read the full article
0 notes
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती
प्रतिनिधी । कणकवली : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी स्वागत केले आहे.एका प्रसिद्धी पत्रकात राजन तेली यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात…
View On WordPress
0 notes
हाऊस टॅक्सनंतर आता गाझियाबादमध्ये पाच पट वाढणार पार्किंग शुल्क, जाणून घ्या तासाला वाहनांचे दर
हाऊस टॅक्सनंतर आता गाझियाबादमध्ये पाच पट वाढणार पार्किंग शुल्क, जाणून घ्या तासाला वाहनांचे दर
गाझियाबाद. दिल्ली-एनसीआरच्या चालकांसाठी एक वाईट बातमी आहे. आता गाझियाबाद महानगरपालिका पार्किंग शुल्कात पाच पटीने वाढ करण्याची तयारी करत आहे. काही महिन्यांपूर्वी घरफाळा वाढवल्यानंतर महापालिका आता अतिरिक्त पार्किंग शुल्काचा बोजा वाहनचालकांवर टाकणार आहे. यासंदर्भात महापालिकेने नुकतीच निविदा काढली आहे. आता महापालिकेच्या सर्व ३४ वाहनतळांच्या संचालनाची जबाबदारी एकाच कंपनीच्या हाती राहणार आहे. ही कंपनी…
View On WordPress
0 notes
#PetrolDieselPrice: देशात पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, लोकांनी मीम्स शेअर करून व्यक्त केला आनंद
#PetrolDieselPrice: देशात पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, लोकांनी मीम्स शेअर करून व्यक्त केला आनंद
पेट्रोल आणि डिझेल मेम्स
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे हैराण झालेल्या लोकांसाठी खूशखबर आहे. सरकार पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 7 रुपयांनी कपात करणार आहे. ही बातमी येताच युजर्स ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
पेट्रोल आणि डिझेल (पेट्रोल आणि डिझेलचे दर) च्या वाढत्या किमतींचा सामना करणाऱ्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने…
View On WordPress
0 notes
GOOD BREAKING NEWS: पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार....
GOOD BREAKING NEWS: पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार….
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात आज मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क तब्बल ८ रुपये तर डिझेलचे उत्पादन शुल्क तब्बल ६ रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत.
याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक…
View On WordPress
0 notes
दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात 10 टक्के वाढ
https://bharatlive.news/?p=163477
दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात 10 टक्के वाढ
पुणे : महाराष्ट्र राज्य ...
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठी वाढ झालेल्या महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची
पहिल्या टप्प्यात प्रचाराला वेग;दुसऱ्या टप्प्यात अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस
लोकसभा निवडणुकीत महायुतीचं काम न करता तटस्थ राहण्याचा आरपीआयचा निर्णय
आणि
धाराशिव जिल्ह्यात जमिनीच्या खोट्या नोंदी प्रकरणी २४ सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल
****
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचं भवितव्य ठरवण्यात यंदा महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची असेल. २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. महिला मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृतीसाठी निवडणूक आयोगाकडून, “स्वीप” कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिला मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, तसंच अशासकीय संस्थांचं सहकार्य घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातल्या अग्रणी महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला वेग आला आहे. मोठ्या राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा ठिकठिकाणी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी उत्तरप्रदेशातल्या सहारनपूर इथं, तर दुपारी राजस्थानमध्ये पुष्कर इथं सभा घेतली. त्यानंतर उत्तरप्रदेशात गाझियाबाद इथं रोड शो मध्ये मोदी सहभागी झाले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेस पक्षाच्या वतीने काल राजस्थानात जयपूर इथं पक्षाच्या जाह���रनाम्याच्या अनुषंगानं मोठी प्रचार सभा घेण्यात आली. त्यामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते.
दरम्यान, काँग्रेस पक्षानं काल आणखी सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये मध्य प्रदेशातल्या तीन, गोव्यातल्या दोन, तर दादरा आणि नगर हवेली इथल्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या आठ तारखेला संपत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात मोहनराव वाघमारे या उमेदवाराने काल अर्ज मागे घेतला. त्यामुळे पात्र ६६ उमेदवारांपैकी आता ६५ उमेदवार उरले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महायुतीचं काम न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर इथं काल झालेल्या निर्धार मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची मागणी केली होती, ती मान्य होत नसल्या कारणाने पक्ष तटस्थ राहणार असल्याचं याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य आणि माजी मंत्री बबनराव घोलप तसंच माजी आमदार संजय पवार यांनी कार्यकर्त्यांसह काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
****
वंचित बहुजन आघाडीनं शिरुरमधून मंगलदास बांदल यांना दिलेली उमेदवारी मागे घेतली आहे. बांदल यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं पक्षानं ही कारवाई केली.
****
शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त नागपुरात झालेल्या कार्यक्रमानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
श्रोतेहो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण हिंगोली लोकसभा मतदार संघाचा घेतलेला आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
परभणी जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परभणी शाखेच्या वतीने मतदान केलेल्या नागरिकांना तपासणी शुल्कात ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. मतदानाच्या तारखेसह दोन दिवस ही सवलत लागू असेल. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ राजगोपाल कालानी यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं, आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सामाजिक संघटना आणि संस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
‘‘स्वीपच्या अंतर्गत आपण वेगवगळ्या संस्था, संघटना, सामाजिक संस्था यांना बोलवून आवाहन केलं होतं की, २६ तारखेला मतदाना टक्का वाढवण्यासाठी आपणही आपल्या ज्या दैनंदिन सेवा आहेत, त्यामध्ये काहीतरी सूट जाहीर करावी. तात्काळ इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याला चांगला प्रतिसाद दिला. आणि त्या माध्यमातून त्यांनी असं एक निवेदन आमच्याकडे दिलं की, दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी जे कोणी नागरिक मतदान केल्याची बोटाची शाई दाखवून आमच्याकडे उपचारासाठी येतील त्यांना तपासणी शुल्कमध्ये ३० टक्के अशी भरघोस सूट देणार आहेत. आणि अजून काही संघटनांनी पुढं येऊन नागरिकांसाठी मतदानासाठी सूट द्यावी, असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो. धन्यवाद.’’
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड, कन्नड, गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय प्रशिक्षण काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडलं. निवडणूक कामकाजाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
****
नांदेड जिल्ह्यात समाज माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी एकाविरुद गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना नोटीस बजावण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या १३ जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
****
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी लातूर जिल्ह्यात उद्या सोमवारी सकाळी आठ वाजता गाव ते जिल्हास्तरावर मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या सुमारे दोन हजार ९९४ पूर्णांक ५४ हेक्टर शासकीय जमिनीची शेतकऱ्यांच्या नावावर खोटी नोंद करत, ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासनाची आणि विमा कंपन्यांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी २४ सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्यातले १६, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले दोन, परभणी दोन, नांदेड एक, तसंच सोलापूर एक आणि धाराशिव जिल्ह्यातल्या एका सेवा केंद्राचा समावेश आहे. शासकीय जमिनीचे कोणतेही भाडेकरार किंवा संमतीपत्र नसतांना सुमारे एक हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या नोंदी दाखवत हा पीक विमा या केंद्र चालकांनी भरला होता, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुलामुलींना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणल्यास समृद्ध राष्ट्र निर्माण होईल, असं बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. जी. सोनी यांनी म्हटलं आहे. बालविवाह जनजागृती अभियान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि विवेकानंद विद्यामंदिर, यांच्या संयुक्त विद्यमाने काल घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
****
नांदेड इथल्या कवयित्री मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांच्या 'इटुकली पिटुकली' बाल कवितासंग्रहाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिशुसाहित्य या विभागात उत्कृष्ट प्रकाशनासाठीचा प्रथम पुरस्कार, तर या संग्रहाचे मुखपृष्ठ करणारे चित्रकार संतोष घोंगडे यांनाही उत्कृष्ट मुखपृष्ठासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २८ एप्रिल रोजी पुणे इथं या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याची माहिती, इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी दिली.
****
आंतरराष्ट्रीय जागतिक क्रीडा विकास आणि शांती दिनानिमित्त काल परभणी इथल्या क्रीडा संकुलात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. जिल्ह्यातील्या खेळ संघटना, क्रीडा प्रेमी नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक या मोहिमेत सहभागी झाले होते.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या वीज वितरण कंपनीतले वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन सीतापे आणि किशोर हंगरगेकर यांना पाच हजार रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं. हंगरगा इथं वीज वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
लातूर इथं काल जिल्हा बाल विकास आणि उपचार केंद्र आणि उमंग संस्थेच्या वतीनं जागतिक स्वमग्नता दिननिमित्त विशेष शिबिर आणि कार्यशाळा घेण्यात आली. एकूण ४२ बाल रुग्णांची यावेळी तपासणी करुन योग्य उपचार करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात कुस्तीच्या राज्यस्तरीय वरीष्ठ महिला अजिंक्यपद स्पर्धा आणि महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उद्घाटन काल झालं. को��्हापूर, सातारा, अहमदनगरसह पिंपरीचंचवड इथल्या महिला मल्लांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन, ऑल इंडिया डॉक्टर्स फॉर ईक्वॉलिटी अँड एजिटेशन, इंजिनियर्स असोसीएशन पी.ई.एस आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १४ एप्रिल रोजी 'रन फॉर इक्वालिटी' मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शहरातल्या नागसेनवन परिसरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानापासून सकाळी पाच वाजून ५० मिनिटांनी ही स्पर्धा सुरु होईल.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया हॉकी संघादरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या काल पर्थ इथं झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पाच - एक असा पराभव केला. मालिकेतला दुसरा सामना आज होणार आहे.
****
हवामान
राज्यात येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
****
0 notes
वैद्यकीय शिक्षण होणार स्वस्त, विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची गरज नाही
वैद्यकीय शिक्षण होणार स्वस्त, विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची गरज नाही
भारतातील वैद्यकीय शिक्षण (India Medical Education) परवडू न शकल्याने विद्यार्थी परदेशाचा (foregn Education) मार्ग स्वीकारतात. युक्रेन युद्धाच (Ukrain war) भारतीय विद्यार्थी अडकल्यानंतर (indian Student in Ukrain) या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, देशामध्येच विद्यार्थ्यांना परवडेल अशा शुल्कात ���ैद्यकीय शिक्षण पूर्ण करता आल्यास ते देशाबाहेर जाणार नाहीत असा निष्कर्ष यातून काढण्यात आला.…
View On WordPress
0 notes
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा; भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांची प्रतिक्रिया
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा; भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांची प्रतिक्रिया
गोंदिया : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर यांनी स्वागत केले आहे.
एका प्रसिद्धी पत्रकात मानकर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्तेत असलेल्या…
View On WordPress
0 notes
मराठवाड्यातील तालुकास्तरावरील सर्व रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा-सुविधा देणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे
मराठवाड्यातील तालुकास्तरावरील सर्व रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा-सुविधा देणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे
परभणी, दि.05 (जिमाका) :- जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील तसेच येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्याला प्राधान्य देवून सर्व सुविधा देण्यात येतील. सामान्य माणसाला शुन्य शुल्कात अत्याधुनिक आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आरोग्य सुविधांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे होते तरी कोरोनाने माणसाला जीवनाचे महत्व कळाले आहे. नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन हा तेवढा…
View On WordPress
0 notes
टेस्ला सरकार तुम्हाला व्यवसायासाठी भारतीय बाजारपेठ हवी असल्यास प्रथम येथे प्लांट लावा आणि रोजगार निर्माण करा
टेस्ला सरकार तुम्हाला व्यवसायासाठी भारतीय बाजारपेठ हवी असल्यास प्रथम येथे प्लांट लावा आणि रोजगार निर्माण करा
नवी दिल्ली. अमेरिकन ई-कार निर्माता टेस्ला भारत सरकारकडून आयात शुल्कात कपात करण्याची सातत्याने मागणी करत आहे, परंतु सरकारनेही त्याला साफ नकार दिला आहे आणि प्रथम उत्पादन कारखाना सुरू करण्याची अट घातली आहे.
सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की टेस्लाला कोणतीही कर सूट मिळविण्यापूर्वी भारतात उत्पादन सुरू करावे लागेल. केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर म्हणाले, टेस्ला आपल्या बाजारपेठेसाठी…
View On WordPress
0 notes
सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात आता दारू स्वस्त...
सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात आता दारू स्वस्त…
नवी दिल्ली l महाराष्ट्रातील तळीरामांसाठी खुशखबर म्हणावी लागेल. महाराष्ट्रात दारू स्वस्त मिळणार आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
त्यामुळे बनावट दारु विक्री करणारे तसेच अवैध मार्गाने दारूची ने आण करणा-या…
View On WordPress
0 notes