Rohit Sharma: रितिका पुन्हा रोहितच्या प्रेमात पडली, दाखवलेल्या शौर्याबद्दल भावूक होत म्हणाली...
Rohit Sharma: रितिका पुन्हा रोहितच्या प्रेमात पडली, दाखवलेल्या शौर्याबद्दल भावूक होत म्हणाली…
Rohit Sharma: रितिका पुन्हा रोहितच्या प्रेमात पडली, दाखवलेल्या शौर्याबद्दल भावूक होत म्हणाली…
Rohit sharma wife Ritika Sajdeh Reaction, India Vs Bangladesh: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीनंतरही कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी केली. रोहितच्या या शौर्यावर त्याची पत्नी रितिका सजदेहनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने रोहितवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Rohit sharma wife Ritika Sajdeh…
View On WordPress
0 notes
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ नोव्हेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
अहोम राज्याच्या सेनेचे थोर सेनापती लचित बारफुकन यांच्या चारशेव्या जयंती महोत्सवाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. आसाम सरकारनं लचित बारफुकन यांच्या शौर्याबद्दल आणि देशभक्तीबद्दल लोकांना अधिक माहिती देण्यासाठी दिल्लीत तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता. लचित बारफुकन हे आसामच्या अहोम राज्याचे सेनापती होते. औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघलांनी केलेल्या चढायांना निर्धारानं तोंड दिलं.
****
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागानं काल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे २० कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त केलं. लागोस इथून मुंबईत आलेल्या या संशयितानं मद्याच्या दोन बाटल्यांमध्ये हा अमली पदार्थ दडवला होता. आंतरराष्ट्रीय तस्करीच्या या कटाबद्दल अधिक तपास सुरू आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात पंधराशे कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांचा शुभारंभ पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आला. जिल्ह्यातल्या एकूण एक हजार ३४ पाणी पुरवठा योजनांच ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन झालं. प्रत्येक जिल्ह्यात जे सरपंच पाणीपुरवठ्याचं चांगलं काम करतील त्यांना जलदु्त पुरस्कार देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
****
स्पेनमध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या सात खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली आहे. पुरूषांच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यांमध्ये वंशज, विश्वनाथ सुरेश आणि आशिष मार्केड यांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर महिलांच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यांमध्ये ८१ किलो वजनी गटात कीर्ती, ४८ किलो वजनी गटात भावना शर्मा, ५२ किलो वजनी गटात देविका घोरपडे तर ६३ किलो वजनी गटात रविनानं बाजी मारली.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ऑकलंड इथं सुरु असून, भारतानं न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतानं निर्धारित षटकात सात बाद ३०६ धावा केल्या. शिखर धवननं ७२, श्रेयस अय्यर ८०, शुभमन गिलनं ५०, वॉशिंग्टन सुंदर ३७, संजु सॅमसन ३६, तर ॠषभ पंतनं १५ धावा केल्या.
//**********//
0 notes
कारगिल युद्धातील परमवीर चक्र प्राप्त शूर सैनिकांची थरारक कहाणी
कारगिल युद्धातील परमवीर चक्र प्राप्त शूर सैनिकांची थरारक कहाणी
मुंबई : भारतीय सेनेतील युवा अधिकारी आणि सैनिकांनी कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली. भारतीय जवानांचे शौर्य, धैर्य और दृढ़ संकल्पाचे दर्शन कारगिल युद्धात झाले. सैनिकांनी देशासाठी जीवन अर्पण करत पाकिस्तानचा पराभव केला.कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारणाऱ्या जवान, अधिकारी आणि विविध रँकवरील सैनिक यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. या सर्वांच्या शौर्याबद्दल भारत सरकारने परमवीर च्रक देऊन गौरव केला…
View On WordPress
0 notes
अरमान सय्यद यांच्या शौर्याचे आणि प्रसंगावधान दाखवल्या बद्दल त्यांचे कौतुक !! मुरूड तालुक्यातील काशीद येथे असलेला एक जुना पुल आज रात्री ८ वाजता कोसळला या दुर्घटनेत एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन पुलावरून खाली पडली. यावेळी यात अलिबाग मांडवी मोहल्ला येथे राहणारा अरमान शेहनवाज सय्यद हा युवक वाहून गेला होता. मात्र त्याला पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला व त्याने पाण्यात अडकलेल्या गाडीची प्रसंगावधान राखुन अल्टो कारची काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून समयसूचकता दाखवुन जीवदान दिले. अरमानचे या शौर्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन (at Kashid) https://www.instagram.com/p/CRNsjPFHSU2/?utm_medium=tumblr
0 notes
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील जवानांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर gallantryawards.gov.in या सरकारी वेबसाईटला वीर जवानांच्या शौर्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट देण्याचे आवाहनही केले.
मोदी म्हणाले, gallantryawards.gov.inया वेबसाईटला तुम्ही जरुर भेट द्या, असा मी तुम्हाला आग्रह करतो.…
View On WordPress
0 notes
स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार चेन्नई : जम्मू काश्मिरमध्ये शहिद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आज लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे. सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीयांसह स्वाती यांच्या घरचेही चेन्नईत दाखल झाली आहे. शहीद कर्नल संतोष यांच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान स्वाती महाडिक यांनी आपण देशसेवेत रुजू होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करणार असल्याची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये कुपवाडा येथे ४१ राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही दिला गेला.
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –17 October 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.०० **** भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा इथं भाजपच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते. भारतानं गेल्या पाच वर्षांत देशातील सैन्य दलाला जगातील सर्वाधिक सशक्त सैन्यांच्या रांगेत नेऊऩ उभं केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सैन्याच्या शौर्याबद्दल प्रश्र्न उपस्थित करतात, त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी याची शिक्षा मिळाली होती यावेळीही त्यांना राज्य तसंच हरयाणातील जनता कठीणात कठीण शिक्षा देईल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पेट्रोल, डिझेलमध्ये येणाऱ्या काळात किमान दहा टक्के इथेनॉलचा उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. एक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करण्याची शक्ती भाजपला शिवाजी महाराजांच्या संस्कारातून मिळाली असून भाजपकडे आजवर केवळ शिवाजी महाराजांचे संस्कार होते आता पक्षाकडे त्यांचा संपूर्ण परिवारही आला असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमुद केलं. **** काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थिती आणि राज्यातील मुद्दांवरून भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली आहे. राज्याला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी आज मुंबईत प्रमुख व्यावसायिक तसंच पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अऩेक अशा समस्या आहेत की ज्या कृत्रिम आहेत, असंही डॉ. मनमोहनसिंग यावेळी म्हणाले. **** शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यांनी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव इथं प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. भाजप- शिवसेनायुतीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार असून कांद्याची निर्यात बंद केल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. **** भाजप सरकारनं कृषी कर्ज माफी चुकीच्या पध्दतीनं केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं पक्षाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. गेल्या पाच वर्षांत राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं शेती उत्पादन घटल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमुद केलं. **** केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन मोहात पाडत आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जोतिरादित्य शिंदे यानी केली आहे. ते आज नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील बारड इथं भोकर विधानसभा मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभेत बोलत होते. कैलासवासी शंकरराव चव्हाण यांनी धरणं बांधून जमीनी सिंचनाखाली आणल्या तर अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात कारखाने सुरू केले यामुळे नांदेड जिल्ह्याचा कायापालट झाल्याचं ते यावेळी म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी लातूरमध्ये बार्षी रस्त्यावरही आज प्रचार सभा घेतली. राज्याच्या विविध भागात उद्योग बंद पडत असल्यानं राज्य बेरोजगाराचं केंद्र झालं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. **** भाजप सरकारच्या कार्यकाळातील महागाई, मंदीच्या लाटेमुळे बेरोजगारीचं संकट आलं असून हे सरकार सर्वसामान्य जनतेचे पैसे लुटत असल्याची खरमरित टीका काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केली आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्र्वर पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते. **** काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेत असताना पंधरा वर्ष राज्याचं मोठं नुकसान केलं असून ते भरून काढण्यासाठी पुन्हा शिवसेना, भाजपच्या महायुतीला विजयी करा, असं आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते आज धुळे इथं महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारसभेत बोलत होते. **** कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या पत्नीनं स्वाक्षऱ्या केलेल्या दस्तावेजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आढळल्यानं अंमलबजावणी संचालनालयानं त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. अंमलबजावणी संचालनालयानं पटेल यांना उद्या मिर्चीच्या अवैध मालमत���तेच्या तपास प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. मिर्ची हा फरार गुंड दाऊत इब्राहीमचा साथीदार आहे. ***** ***
0 notes
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ जुलै २०१९ सकाळी ११.०० वाजता
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ जुलै २०१९ सकाळी ११.०० वाजता **** कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. हा दिवस आपल्या सैनिकांचं साहस, आणि देशाप्रती समर्पण यांचं स्मरण करून देतो असं मोदी यांनी एका ट्वीट संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसंच संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी कारगील विजय दिना निमित्त कारगील युद्धातल्या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली, कारगिल पहाडांवरच्या सैनिकांच्या शौर्याबद्दल देश नेहमी कृतज्ञ राहील, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरातली जनता सुरक्षित राहावी, यासाठी कारगील युद्धात भारतीय जवानांनी अतूल्य धाडस आणि त्यागाचा प्रत्यय देत, भारतीय सेनेची प्रतिष्ठा कायम राखल्याचं, सेनाप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. द्रास इथं आयोजित कारगील विजय दिन समारंभात तीन ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी या युद्धातल्या हुतात्मा सैनिकांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. **** कनार्टकात आज भारतीय जनता पक्षाचे बी एस येडीयुरप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन, सरकार स्थापनेचा दावा केला. आज सायंकाळी सहा वाजेदरम्यान हा शपथग्रहण समारंभ होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या माजी सैनिक पाल्यांना २०१८- १९ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी आणि पदवी परीक्षांमधल्या गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. किमान ६० टक्के गुण असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी, १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत असं आवाहन औरंगाबादच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे. **** सांगली जिल्ह्यातल्या विटा इथं रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून २२ लाख रूपये किमतीची रेल्वे तिकीटं, जप्त करण्यात आली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं. रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. **** नाशिक जिल्ह्यातल्या गंगापुर धरण पाणलोट क्षेत्रात काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. धरणातला पाणीसाठा ६१ टक्यांवर पोहोचला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes