आज 'स्पीक यॉर लैंगुएज' दिवसाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा टम्बलर वर मराठीत पोस्ट लिहिणार आहे. थोडेफार विचित्र तर वाटतंय, पण तशीच उत्सुकता पण वाटतेय. मला माहित नाही की कोणी माझा हा प्रयोग वाचेल तरी का. तरी. माणसाने प्रयत्न करत जावे, फळ मिळो न मिळो.
पहिले तर मी शाळेत (किंवा इतर कुठेही) जास्त कधी मराठीत लिहीले नाही. त्यामुळे माझे लेखन येवढं चांगलं नाही. त्यावर हे किचकट मराठी कीबोर्ड! खरंतर, वाक्य आकलनीय आहेत तेवढेच पुष्कळ. व्याकरण तरी ठीक वाटतंय, शब्दलेखनात बर्याच चुका असतील. पण हा '[ते] दिसतं' की '[ते] दिसते' लिहायचं (की लिहायचे? हाश!) हा प्रकार काही मला समजला नाही. मी मला योग्य वाटतय तसं लिहित आहे पण ते बरोबर की नाही ते ठाऊक नाही.
दुसरं म्हणजे मी स्वतःसाठी लिंग काय वापरायचा हा एक प्रश्णच आहे. सध्या तर मी प्रयत्न करत आहे की वाक्यच असे रचायचे की याच्यावर विचार करायची वेळच येणार नाही. जसं 'करतो आहे' किंवा 'करते आहे' ऐवजी 'करत आहे' लिहायचं. मराठीत तिसरा लिंग तर आहे, पण त्या लिंगाला स्वायत्तता - ज्याला इंग्रजीत आपण 'एजन्सी' असे म्हणतो - मात्र नाही. तर मग आपल्यालाच आपले नविन व्याकरण बनवावे लागणार.
आत्ता साठी तरी येवढंच. आजुन काही विचार आहेत पण ते मी पुढच्या टिप्पणीत कळवेल.
10 notes
·
View notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आरक्षण व्यवस्थेला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही-केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही.
फ्लोरेन्स नाईटिंगल राष्ट्रीय परिचर्या पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून अयोध्येसाठी नांदेडहून पहिली रेल्वे.
चंद्रपूर जिल्ह्यात आज चार शेतकऱ्यांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू.
आणि
भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल.
****
देशातल्या आरक्षण व्यवस्थेला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीदरम्यान, आरक्षण संपवण्याबाबत विधान केलं होतं, त्या अनुषंगाने शाह यांनी, भारतीय जनता पक्ष असेपर्यंत आरक्षणाला कोणी धक्का लावू शकणार नाही, असं म्हटलं आहे. ट्विटरवरच्या एका संदेशातून शाह यांनी, आरक्षणविरोधी भूमिकेवरून राहुल गांधी तसंच काँग्रेस पक्षावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या विधानामार्फत काँग्रेस पक्षाचेच आरक्षणविरोधी विचार व्यक्त होत असल्याचं शाह यांनी नमूद केलं.
भारतीय जनता पक्षाच्या देशभरातल्या विविध नेत्यांनी गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं पत्रकारांशी बोलतांना, काँग्रेस पक्ष हा मतांसाठी खोटं नरेटिव तयार करतात, हेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं स्पष्ट झाल्याची टीका केली. ते म्हणाले..
भारताच्या संविधानाचा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही. केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटीव्ह करतात, हे आता राहूल गांधीच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाची भूमीका स्पष्ट आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. हे आरक्षण बंद केले जाऊ देणार नाही.
****
जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत पाटील बोलत होते. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुलं तसंच शौचालयांची कामं जलद पूर्ण करावीत, तसंच जल जीवन मिशनच्या सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं
****
सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागानं ही माहिती दिली. गेल्या पंधरवड्यात साडेतीन लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून ५० संस्थांना काळ्या यादीत टाकल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासंदर्भात नीती आयोगानं दिलेल्या शिफार��ीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन १४० अब्ज डॉलर इतकं असून २०३० पर्यंत हे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट या समितीपुढे ठेवलं आहे. थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणं, ती टिकवून ठेवणं, स्टार्टअप आणि रोजगार क्षमतेला चालना देणं आदी जबाबदाऱ्या या समितीकडे सोपवण्यात आल्या आहेत.
****
पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी कुटुंबासाठी पोषण अभियान लाभदायक ठरत आहे. या अभियानाच्या माध्यमातून वळणपाडा अंगणवाडी भागातल्या बालकांना ताजा पोषण आहार मिळत आहे. तसचं गर्भवती मातांना देखील पौष्टिक आहार पुरवला जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
फ्लोरेन्स नाईटिंगल राष्ट्रीय परिचर्या पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. परिचर्या क्षेत्रातल्या असामान्य सेवेसाठी परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आज राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातल्या १५ परिचारिकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या चिपळूण इथल्या आशा बावणे यांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेड इथून २० ते २२ सप्टेंबर दरम्यान निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी केलं आहे...
अयोध्या येथे जाण्यासाठी जवळपास दोनशे लाभार्थ्यांची आम्हाला निवड करायची आहे. आमच्याकडे जवळपास तिर्थदर्शन योजनेमध्ये शंभरएक प्रस्ताव पात्र ठरले आहेत. असा दोनशे लाभार्थ्यांची पहिली ट्रेन आपल्या नांदेडमधून निघणार आहे. ती महाराष्ट्रातील पहिली ट्रेन असणार आहे. तर सर्व जेष्ठांना मी आवाहन करु इच्छितो की, आपण या योजनेचा लाभ घ्यावा. ३० सप्टेंबर पर्यंत आपल्याला नाव नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात आज चार शेतकऱ्यांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर इथं शेतामध्ये खतांची फवारणी करत असताना ही घटना घडली. सदर घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी ही वीजेची तार लावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुद्रांक शुल्क चुकवणाऱ्या तसंच मुद्रांक शुल्क वेळेवर न भरणाऱ्या नागरिकांसाठी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील एक हजार १४२ जणांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाचे थकीत असलेले पाच कोटी ६९ लाख १२ हजार ९८७ रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात या योजनेचा शंभर टक्के थकबाकीदारांनी लाभ घेतल्याची माहिती मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने बीड, नांदेड तसंच हिंगोलीसह अनेक ठिकाणी 'स्वच्छता ही सेवा ' ही मोहीम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत राबवल्या जाणाऱ्या विविध दैनंदिन उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
लातूर शहरातील विवेकानंद चौक परिसरात आज सकाळी भूगर्भातून आवाज झाला. त्यामुळे लातूर शहराला भूकंपाचा धक्का झाल्याची चर्चा होऊ लागली. मात्र भूकंप मापन केंद्रात भूकंपाची कसलीही नोंद झालेली नाही. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केलं आहे.
****
भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.
****
ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा आज घरोघरी साजरा झाला. काल घरोघरी स्थापन झालेल्या गौरींची आज पारंपरिक रितीरिवाजानुसार साग्रसंगीत पूजा करून, त्यांना पुरणपोळी, सोळा भाज्या आणि पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. दरम्यान, पाच दिवसांच्या गणपतींचं आज अनेक भागात विसर्जन होत आहे.
****
शेतमालाला योग्य भाव देण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आज ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी शेतकरी कुटुंबातल्या महिला वर्गानं या आंदोलनात सहभाग घेतला.
****
यशवंतराव चव्हाण केंद्र, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय आणि एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर इथं चित्रपट चावडी हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात आचार्य विनोबा भावे जयंतीनिमित्त 'दिशा स्वराज्याची' या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. वीरेंद्र वळसंगकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केलं आहे. एमजीएम परिसरातल्या चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृहात येत्या शनिवारी १४ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता या माहितीपटाचं प्रदर्शन केलं जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सध्या अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरीकाठच्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्या व्यतिरिक्त गेवराई आणि माजलगांव तालुक्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरामुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत पोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
0 notes
Alandi: तरुणाईने आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे
एमपीसी न्यूज -माणसाच्या आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या (Alandi)नाहीत असा कोणी नाही. चढ उतार हे आयुष्यामध्ये होत असतात. अशावेळी खंबीरपणे सामना करणे,हे योग्य ठरते. कोणत्याही परिस्थितीत मनामध्ये नकारात्मक विचार येता कामा नये.आयुष्य जगत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे.
तरूणाईच्या आयुष्यात सध्याच्या कालखंडात,करियर ,आर्थिक समस्या,तणावा मुळे तसेच वैयक्तिक नातेसंबंध, प्रेम /आकर्षण, ह्या मधील…
0 notes