गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन 13 वर्षाचा मुलगा जखमी
गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन 13 वर्षाचा मुलगा जखमी
गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन 13 वर्षाचा मुलगा जखमी
बहुतेक प्रकरणांमध्ये, मोबाईल फोनच्या स्फोटाचे कारण बॅटरी असते. अनेक वेळा फोन पडल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे बॅटरी लीक होऊ शकते, जी नंतर फोन चार्ज होत असताना आग लागू शकते.बॅटरी फुगून देखील त्यात स्फोट होऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथून नुकतीच एक घटना समोर आली आहे, ज्यात गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट झाल्याने एक 13 वर्षाचा मुलगा…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
तरंग शक्ती २४ या युद्धाभ्यासासह भारत रक्षा विमानन प्रदर्शनाला राजस्थानात जोधपूर इथं आजपासून प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. आयोजनाबद्दल वायूसेनेचं कौतुक करत, राजनाथसिंह यांनी वायूसेनेने सदैव संपूर्ण जगभरात देशाचा मान वाढवला असल्याचं नमूद केलं. परवा १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध उत्पादनं आणि उद्योगांसह संरक्षण क्षेत्रात कार्यरत उद्योगांचा सहभाग आहे. सार्वजनिक क्षेत्रांचे संरक्षण उपक्रम, विविध श्रेणीतले खाजगी उद्योग तसंच नवीन उद्योगांसह भारतीय विमान उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींना भेटण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी या आयोजनातून मिळणार आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, स्फोटकं, आणि हत्यारं जप्त करत, घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. सैन्यदल तसंच जम्मू काश्मीर पोलिसांनी कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये राबवलेल्या या संयुक्त कारवाईत एके ४७ ची तसंच इतर काडतुसं, हातगोळे, आईईडी, आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दल कटिबद्ध असल्याचं, संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय तसंच राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. येत्या रविवारी १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे उपराष्ट्रपती या संविधान मंदिराचं लोकार्पण करणार आहेत.
****
तीन दिवसीय महालक्ष्मी उत्सवाचा आज समारोप होत आहे. काल पूजन झालेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आज सायंकाळी विसर्जन होईल, यानिमित्तानं घरोघरी महिला वर्गाकडून विविध पारंपरिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत काल श्री गणेशाची आरती झाली. या परदेशी पाहुण्यांना उकडीच्या मोदकांसह खास पारंपारिक मराठमोळी मेजवानी देण्यात आली.
****
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात ‘आपदा मित्र’ही योजना राबवण्यात येत आहे. यासाठी धुळे जिल्ह्यातून ३०० आपदा मित्र प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. आपदा मित्र प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक युवतींनी संबंधित यंत्रणेच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केलं आहे.
****
नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली आहे. लवकरच या कार्यालयाचे कार्यक्षेत्र तसंच पद निर्मितीचा शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर तथा अणदूर, जळकोट, नंदगाव आणि शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची अनेक दशकांपासूनची स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी आहे. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.
****
४५व्या फिडे शतरंज ओलिंपियाड स्पर्धेत भारतानं मोरोक्को चा ४-० असा पराभव केला तर महिलाच्या गटात जमैका वर साडे तीन गुणांनी विजय मिळवला. भारताच्या आर. प्रज्ञानानंद ने मोरक्कोच्या तिसिर मोहम्मद ला पराभूत केलं तर विदित गुजराती ने औआखिर मेहदी पियरे ला तसंच हरिकृष्णा ने मोयाद अनस चा पराभव केला. महिलांच्या स्पर्धेत भाताच्या वैशालीने अदानी क्लार्क ला हरवत अव्वल स्थान पटकावलं, तानिया सचदेव ने गैब्रिएला वॉटसन चा तर दिव्या देशमुख ने राचेल मिलर चा पराभव केला. बुडापेस्ट इथे १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १ हजार ८०० हून अधिक खेळाडू सहभागी आहेत, यात १९३ संघ खुल्या प्रवर्गात खेळत आहेत.
****
0 notes
https://marmikmaharashtra.com/why-do-you-take-our-children-in-schools/
0 notes
राष्ट्रपती पदकाचे मानकरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे जसे दिसले तसे.
लातूरला मिशन आयएएसच्या कार्यक्रमासाठी आलो होतो . १५ ऑगस्टला सकाळी सकाळी वर्तमानपत्र हाती आले आणि त्यात अतिशय आनंदाची बातमी वाचली .ती म्हणजे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याची .खरोखरच खूप आनंद झाला. तो यासाठी की जयंत नाईकनवरेसाहेब हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते एक कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महा निरीक्षक आहेत. एक संवेदनशील मनाचा कर्तव्य तत्पर आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा परोपकाराची भावना मनामध्ये बाळगणारा आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे हे विसरून लोकांमध्ये मिसळणारा पोलीस अधिकारी म्हणून मी जयंत नाईक नवरे साहेबांचा उल्लेख करेन.
सर अमरावतीला रुजू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मध्यंतरी श्री संत गाडगेबाबा यांचे वाहन चालक श्री भाऊराव काळे पाटील माझ्याकडे आले .मी साहेबांना सूचना दिली. साहेब म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे .त्याप्रमाणे आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी हृदयापासून त्यांचे स्वागत केले . संत गाडगे महाराज यांच्या आठवणी त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष गाडगे महाराजांना आपण जरी भेटू शकलो नाही तरी त्यांचे चालक म्हणून काम करणारे श्री भाऊराव काळे यांना भेटू शकलो त्याबद्दल श्री नाईकनवरे साहेबांनी खूप आनंद व्यक्त केला .
दरवर्षी आमचे मे जून महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर असते. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून मुले येतात. मी सरांना शिबिराचे निमंत्रण दिले .सरांनी ते स्वीकारले. मी म्हटलं सर मी कोणाला तरी घ्यायला पाठवतो. ते म्हणाले त्याची गरज नाही. मी बरोबर वेळेवर येईल. सरांनी शिबिरासाठी वेळ दिली ती देखील सायंकाळी सहानंतर . म्हणजे आपले कार्यालयीन कामकाज ऑटोपल्यानंतर. साहेब आमच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये आले आणि मुलांमध्ये इतकी मिसळून गेले आणि पोरांनाही त्यांचे भाषण त्यांचे अनुभव इतके जवळचे वाटले की दोन तास कसे निघून गेले ते कळले नाही..
आम्ही अमरावतीच्या शारदा विद्यालयांमध्ये व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिशन आयएएस अंतर्गत अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात अधिकारी त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्या अंतर्गत मी साहेबांना निमंत्रण दिले. साहेबांनी ते हसतमुखाने स्वीकारले. आणि येण्याचे मान्य केले .मी परत सरांना म्हटलं की तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवतो. सरांनी स्पष्टपणे नकार दिला .ते म्हणाले आम्ही शोधून घेऊ .सर त्याप्रमाणे आले .शारदा विद्यालयातील व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मुलांना इतके प्रेरित केले की जवळपास 20 मुलांनी सरांना प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाला सरांनी हसत खेळत उत्तर दिले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलांनी सरांची गाडी पाहिली. सायरन कसा वाजतो ते प्रात्यक्षिक करून पाहिले .पोरांना खूप कुतुहूल असते. पोलिसांबद्दल भीती असते .पण नाईकनवरेसरांनी पोरांमध्ये मिसळून आपल्या गाडीची तोंड ओळख त्यांना करून देऊन पोलिसांचा सायरन कसा वाजते त्याचे प्रॅक्टिकल करून मुलांची मने जिंकली .
अशाच एक वेळ मला सरांचा फोन आला. ते म्हणाले काठोळे सर तुम्ही घरी आहात काय ? ते म्हणाले मला तुम्हाला काही पुस्तके भेट द्यावयाची आहेत. त्यांनी दोन बॉक्स भरून पुस्तके मला सप्रेम भेट दिली. त्यानंतरही परत त्यांचा फोन आला. सर अजून काही पुस्तके शिल्लक आहेत. ती देखील मला तुम्हाला द्यावयाची आहेत. मित्रांनो पुस्तकाचे दान हे सगळ्यात महत्त्वाचे दान असते. आणि जयंत नाईकनवरे सरांनी पुस्तक लिहून नुसतं ते थांबले नाहीत .तर प्रत्यक्षात कृतीतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती व्यक्त केलेली आहे .ही एक परोपकाराची प्रवृत्ती दर्शवून आपली भारतीय संस्कृती आपलीसी केलेली आहे.
सरांचे माझे फोनवर अधून मधून बोलले होते. आमचा दर रविवारचा जो साहित्य परिवाराचा गेट-टु -गेदर कार्यक्रम होतो. त्याबद्दल ही सरांनी आनंद व्यक्त केला आणि त्या कार्यक्रमातही मला यायचे आहे. साहित्यिक लोकांचा परिचय करून घ्यायचा आहे .असाही मनोदय व्यक्त केला. मी सतत प्रवासात असतो. परंतु आमचे अधून मधून सरांशी संपर्क सुरूच असतात. एक चांगला विशेष पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे सरांच्या रूपाने अमरावतीला मिळाला आहे .सरांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून हा महत्त्वाचा पल्ला गाठलेला आहे .आपल्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. लेखनाचा छंद असलेला आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने चालणाऱ्या या माणसाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला .खरोखरच हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे झालेले मूल्यांकन आहे .मी अमरावतीकर नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो .आणि त्यांना शुभेच्छा देतो.
- प्रा. डॅा.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस अमरावती.
0 notes
आयपीएल सट्टय़ावर धाड; दोघांना अटक; ७.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली : आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी धाड टाकून घटनास्थळावरून ७ लाख ११ हजार ६३0 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कमलेश मुरलीधर कुमरे, (२८) रा. शिवाजी वार्ड देसाईगंज, अक्षय रमेश मेर्शाम, (२७) रा. गांधी वार्ड देसाईगंज या ऑनलाईन सट्टा चालविणार्या आरोपींना अटक करण्यात आली. तर दोनजण फरार होण्यास यशस्वी झाले. सदर कारवाई १0 मे रोजी करण्यात…
View On WordPress
0 notes
*Mpsc विषयी बोलू काही...*
वास्तविकता आहे ही..
या वर्षभरात बऱ्याच जणांनी MPSC चा अभ्यास सोडून दिला... अनेक मुलांनी कुठेतरी काम करणे वा शेती सांभाळणे सुरु केले, मुलींची लग्न झाली, काही मुलींचा अभ्यास तर सुरु आहे पण आता घरचे अभ्यासासाठी पुण्याला वगैरे पाठवायला तयार नाहीयेत... अनेक विद्यार्थी जे मागच्या 5-6 वर्षांपासून अभ्यास करत आहेत, ते द्विधा मनःस्थितीत अडकले आहेत...अभ्यास पुढे सुरु ठेवणं जिकीरीचं बनलं आहे...चार पैसे कमव, आता वय झालय, आम्हाला लग्नाचं पण बघायचय...असा किती दिवस MPSC चा जुगार खेळत बसणार आहे? अशा पद्धतीचे प्रश्न जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना घरुन विचारले जात आहेत आणि त्याला उत्तर देता देता पोरं कंटाळली आहेत...
नातेवाईक आणि समाजातील इतरही अनेक जणांना नेहमी तोंड द्यावं लागतं...खरं म्हणजे आजकाल गावाकडे MPSC म्हणजे हसण्याचा आणि चेष्टेचा विषय झालाय...MPSC करतोय म्हटलं की आधी मागच्या 4 5 वर्षात मान सन्मान मिळायचा पण आता लोक चक्क हसतात .परिस्थिती किती वेगाने फासे ओलांडते आणि आपण कुठपासुन कुठपर्यंत ढकललो जातो, याचा अंदाज लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच पानीपत झालेल आसत. बर किमान लढायची संधी तरी मिळायला हवी ना, ती सुद्धा मिळत नाहीये. पुस्तक समोर घेऊन बसलेल्या मुला मुलींच्या नजरा मात्र शुन्यात हरवलेल्या दिसतायेत . लढण्यासाठी समोर शत्रू असावा लागतो पण तोच नेमका दिसत नाहीये, मग नक्की लढायच कुनासोबत. व्यथा मोठ्या आहेत, एखाद्या चित्रपटात शोभतील इतक्या दर्दभर्या कथा घडतायेत mpsc करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात.
HR मधील 'महिला विकास वाचताना तो किती पुस्तकी व थोतांड आहे, हे त्या मुलीला विचारा जिला या वर्षी सगळं सोडून लग्न करुन सासरी जावं लागलं आणि तिला MPSC कायमची विसरावी लागते .HR मधील 'युवक विकास' वाचता वाचता चार पैशासाठी कशी सगळी स्वप्न सोडून, चांगली शैक्षणिक पात्रता असतानाही कुठतरी
10 - 12 हजारांवर काम कराव लागणाऱ्या पोरांना हा बदल इतक्या झटक्यात घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.सिस्टिम वाईट असते हे मान्य पण किती ? आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असणाऱ्या परीक्षांबाबत कुणीच बोलायला तयार नाही , हि खरं तर राज्यातील सर्व युवा नेत्यांच्या शरमेची गोष्ट आहे. कोरोना आहे मान्य पण म्हणून किमान तारखा तरी द्यायला हव्या होत्या. 2020 च्या परीक्षा 2021 अर्धे संपले तरी होत नसतील तर आयोग करतय काय? चला मान्य करु की सध्या परीक्षा घेणे शक्य नाही पण किमान तारखा तरी द्या. UPSC ने ज्या दिवशी परिक्षा पुढे ढकलली त्याच दिवशी पुढील तारखा
जाहिर केल्या , मग MPSC च घोड कुठ आडलय ? तुम्हाला सप्टेंबर मध्ये परिक्षा घ्यायच्यात घ्या काही हरकत नाही पण किमान तारखा तरी द्या . पुढच्या वर्षात काय होणार यांच्याबद्दल आयोग चकार शब्द काढायलाही तयार नाही. इतकी चालढकल आयोगासारख्या संस्थेकडून अपेक्षित नाही. हा फक्त परीक्षांचा प्रश्न नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे , आता अभ्यास सोडला तर परत फिरणे अवघड आहे आणि अभ्यास सुरु ठेवायचा तर परीक्षांच्या तारखाच नाही...! बहुतेक विद्यार्थी गावी आहेत आणि गावी राहून अभ्यास करणे किती जिकिरीचं असतं हे ज्याचं त्याला माहीत त्यातच सगळ्यांची आर्थिक स्थिती ठीक नसते . त्यामुळे कधी नव्हे इतके प्रश्न सगळ्यांच्या समोर उभे राहिलेत. हे सगळे प्रश्न घेऊन प्रत्येकाने जमेल त्या माध्यमातून विविध नेत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. दबाव तयार झाला तरच ही कोंडी फुटेल...त्यात विविध कोचिंग क्लासेस ने हि योग्य भूमिका घ्यायला हवी. अगोदर पोस्ट मिळवलेले किंवा सध्या कार्यरत असणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यात दबावगट म्हणून काम केले पाहिजे. हि वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे... हे सगळे झाले तरच पुढे काहीतरी मार्ग निघेल , नाहितर परिक्षांचा घोळ असाच महिनो महिने कायम राहील. आणि मग कधीतरी स्वतःला पुरेशी संधी न देताच mpsc सोडुन द्यावी लागेल .पोटेंशिअल वाया घालवन पोटेंशिअल नसण्यापेक्षा लय वाईट आहे...
कॉपी पेस्ट आहे ..कुनी लिहीलय माहिती नाही पण वास्तविक स्थिती आहे हि 🙏
-वैभव वैद्य....
0 notes
मृत्यू समोर असतानाही घाबरले नाही हरीण. कारण वाचून व्हाल चकित
मृत्यू समोर असतानाही घाबरले नाही हरीण. कारण वाचून व्हाल चकित
सदर फोटो दुर्मीळ आणि सर्वोत्तम फोटो म्हणून जिओ चॅनेल ने निवडला आहे. कारणही तसेच आहे. हा फोटो घेताना फोटोग्राफर च्या देखिल डोळ्यात पाणी आल्या वाचून राहिले नाही. फोटो मध्ये एक हरीण आणि दोन बिबट्या दिसत आहेत. यातील ते हरीण आपल्या दोन पिल्लांसोबत खेळत होते.
असे असताना जेव्हा दोन बिबटे अचानक समोर येतात तेव्हा पळून जाण्याशिवाय हरणाकडे कोणताही पर्याय नसतो. या हरिनापुढेही हाच पर्याय ह���ता. परंतू…
View On WordPress
0 notes
मी संघासाठी खेळत नाही तर... टीम बाहेर गेल्यावर रोहित शर्माचं ट्विट झालं जगभरात व्हायरल
मी संघासाठी खेळत नाही तर… टीम बाहेर गेल्यावर रोहित शर्माचं ट्विट झालं जगभरात व्हायरल
मी संघासाठी खेळत नाही तर… टीम बाहेर गेल्यावर रोहित शर्माचं ट्विट झालं जगभरात व्हायरल
Rohit Sharma : रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे रोहित आता वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण रोहितला यावेळी दुखापत झाली असली तरी त्याचे एक ट्विच सध्याच्या घडीला जगभरात व्हायरल झाले आहे आणि त्याचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. रोहितच्या या ट्विटमध्ये असं नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या…
Rohit…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
दक्षिण अफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत जगज्जेता-विराट कोहली आणि रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ
आणि
बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर मात्र सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत भारत जगज्जेता ठरला आहे. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने विराट कोहलीच्या ७६ आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या जोरावर सात बाद १७६ धावा केल्या. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात आपला पहिलाच अंतिम सामना खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र, निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच करू शकला. अखेरच्या षटकापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवनं डेव्हीड मिलरला सीमारेषेवर झेलबाद करत भारताचा विजय निश्चित केला. हार्दिकनं तीन, जसप्रीत बुमराह तसंच अर्शदीपसिंगने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी घेतला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शहा यांच्या उपस्थितीत भारतीय संघाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. विराट कोहली सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी कारवाई सुरु असून, जो पर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, अर्थसंकल्पात विविध निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी काल विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधत, आभार मानले.
****
विरोधकांनी मात्र हा शासन निर्णय म्हणजे सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पाला प्रथम विधीमंडळाची आणि त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. परंतु ही प्रक्रिया डावलून सदरील शासन निर्णय काढत, सरकारने महिलांची फसवणूक केली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश देण्याच्या परंपरेला छेद गेल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. काल विधान परिषदेत याविषयावर बोलतांना दानवे यांनी, शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावरही सुमारे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित असल्याकडे लक्ष वेधलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, अशी माहिती शासनाने दिल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
विशेष सहाय्य योजनांचा निधी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. राष्ट्रीय-तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पात्र खेळाडू शासकीय नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
दरम्यान, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल, असं पवार यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी राज्यात काही ठिकाणी सेवा केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाहून अधिक रक्कम अवैधरित्या वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास, कठोर कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. याबाबत कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 98-22-44-66-55 यावर थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक अलकापुरीत दाखल झाले आहेत. काल रात्री पालखीचा मुक्काम आळंदीतच माऊलीच्या आजोळघरी होता. आज सकाळी हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आपेगाव इथूनही संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल देहूतल्या इनामदार वाड्यातून पुण्याकडे मार्गस्थ झाला.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार इथून श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं, या दिंडीला तीन शतकांची परंपरा आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर शहरात काल बंद पाळण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची वादग्रतस्त ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, दरम्यान, पक्षविरोधी कार्य केल्यामुळे शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशिकांत पाटील, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी गुरुकुलात प्रातिग्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या ख्याल गायक पद्मा तळवलकर, ओडिशी नृत्यांगना पद्मश्री कुमकुम मोहंती, तसंच उत्तराखंडच्या लोककलाकार पद्मश्री बसंती बिष्ट यांनी आपापल्या सादरीकरणातून या कलाप्रकारांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.
****
चेन्नईच्या एम ए चिदंबरम् मैदानावर सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकन महिला संघाच्या चार बाद २३६ धावा झाल्या आहेत. भारताच्या स्नेह राणानं सर्वाधिक तीन खेळाडू बाद केले. त्याआधी सकाळी भारतीय महिला संघानं सहा बाद ६०३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६९ आणि ऋचा घोषनं ८६ धावा केल्या.
****
ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत या जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा ११-४, ११-२, ११-२ असा पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे दौंड निजामबाद, निजामाबाद पुणे, आणि नांदेड पुणे गाड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, हा लाईन ब्लॉक काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याने या गाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत.
****
0 notes
लोभ
आयुष्यभर सोबतीला दुःखमधे मधे मिळते मात्र सुख ।हसत खेळत जगतो जीवनतरी पैशाची थोडी असतेच भूक ।
पैसा पैसा सांगा पुरतो कुठेलोभा मागे मग लोभ सुटे …।नसेल जवळ जर पैसानाती गोती सारेच सुटे ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
नेत्रदानाचा संकल्प करुया; अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणूया - महासंवाद
नेत्रदानाचा संकल्प करुया; अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणूया – महासंवाद
‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरीततृणांच्या मखमलाची, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती’ बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता लहानपणी आपण वाचली अथवा ऐकली असेलच. पावसाने न्हावून निघालेली हिरवीगार सृष्टी तुम्ही पाहिली असेल. तुफान पाऊस अंगावर खेळवत गावामध्ये, रानावनात खेळत, सप्तरंगी इंद्रधनुष्यही पाहिले असालच. हे सर्व आपण बघू शकतो कारण आपल्याकडे दृष्टी आहे. परंतु जरा विचार करा…
View On WordPress
0 notes
आयपीएल क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कारवाई
चंद्रपूर : शिवाजीनगर राधाकृष्ण शाळेच्यामागे तुकूम चंद्रपूर येथे राहणारा देविदास पडगीलवार हा इंडियन प्रिमीयर लीग २0२३ (आयपीएल २0२३) केकेआरविरुद्ध आरसीबी या क्रिकेटच्या मॅचवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत होता. ही बाब स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम लाईव्ह मॅचवर टीव्ही, मोबाईलवर आयपीएल क्रिकेट सट्टा चालविताना मिळून आला.…
View On WordPress
0 notes
फतेहपूरमध्ये भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू
फतेहपूरमध्ये भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू
फतेहपुर (यूपी) : मुसळधार पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून ( wall Collapse In UP Fatehpur ) दोन मुलींचा मृत्यू झाला ( Two Minor Girls Die ) आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास लालौली पोलीस स्टेशन हद्दीतील करैहा गावातील मजरे सलोना डेरा येथे घडली आहे.
नयना (६) आणि प्राणी (५) या दोन मुली शेजारच्या घराबाहेर खेळत असताना भिंत कोसळली तेव्हा ही घटना घडली आहे. ( Two minor girls died due…
View On WordPress
0 notes
पावसाळी अधिवेशन सुरु असताना भाजपचे आमदार काय करतात : पहा व्हिडीओ
पावसाळी अधिवेशन सुरु असताना भाजपचे आमदार काय करतात : पहा व्हिडीओ
प्रत्येक वेळी निवडणूक आल्यानंतर नागरिक मोठ्या उत्साहाने निवडणूकीत भाग घेतात आणि आपले लोकप्रतिनिधी निवडून देतात मात्र हे लोकप्रतिनिधी विधानसभेत पोहोचल्यानंतर कितपत गांभीर्याने काम करतात हा एक संशोधनाचा विषय आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून पावसाळी अधिवेशन सुरू असताना आमदार महाशय चक्क तीन पत्ती खेळण्यात व्यस्त होते तर इतरही आमदार मोबाईलवर गेम खेळत असताना दिसून आलेले आहेत . सत्ताधारी…
View On WordPress
0 notes