Relationship: वयापेक्षा मोठ्या मुलींसोबत प्रेमसंबंध करणे चुकीचं आहे का? बॉलिवूडमधल्या या जोड्या ठरल्या आदर्श
Relationship: वयापेक्षा मोठ्या मुलींसोबत प्रेमसंबंध करणे चुकीचं आहे का? बॉलिवूडमधल्या या जोड्या ठरल्या आदर्श
Relationship: वयापेक्षा मोठ्या मुलींसोबत प्रेमसंबंध करणे चुकीचं आहे का? बॉलिवूडमधल्या या जोड्या ठरल्या आदर्श
Relationship Tips: लग्न करताना वय या गोष्टीचा विचार केला जातो. नाते संबंधात मुलाचे वय मोठे असावे असे मानले जाते पण बदत्या काळानुसार यात बदल झालेला पाहायला मिळत आहे. सध्या अनेक जण वयापेक्षा मोठ्या मुलीच्या प्रेमात पडल्याची गोष्टी सहज कानावर येतात. पण वयाने मोठ्या असणाऱ्या मुली प्रेम करणे…
View On WordPress
0 notes
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
नागरी सेवा दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नागरी सेवेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक प्रशासनाच्या सर्वोच्च मूल्यांचं पालन केलं असून, सुशासनासाठी एक मापदंड निश्चित केला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नागरी सेवकांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांमुळे देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाचे फायदे पोहोचत असल्याचं उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटलं आहे. यानिमित्त लोक प्रशासनातल्या सर्वोत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानित केलं जाणार आहे. यामध्ये राज्यातल्या लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
***
जम्मू काश्मीरमधल्या पूँछ इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बाटा डोरिया परिसरातल्या जंगलात सुरक्षा दलांनी शोधमोहिम सुरु केली आहे. राजौरी आणि पूँछ इथल्या सीमारेषेजवळ सैनिकांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
***
विंग कमांडर दिपिका मिश्रा यांना काल भारतीय हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांच्या हस्ते वायू सेवा पदक प्रदान करण्यात आलं. २०२१ मध्ये मध्य प्रदेशात आलेल्या पुराच्या संकटकाळात दिपिका मिश्रा यांनी ४७ लोकांचे प्राण वाचवण्यात मोलाची मदत केली होती. हे शौर्य पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी ठरल्या आहेत.
***
मोदी सरकारच्या काळात भारताचं दरडोई उत्पन्न दुप्पट झालं असून देश आर्थिक प्रगतीकडे झेपावत असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. काल नंदुरबारमध्ये वंजारी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. आर्थिक प्रगतीमध्ये भारत हा जगात अकराव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचला असल्याचं कराड यांनी सांगितलं.
***
राज्यात काल एक हजार ११३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार ८३ रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या सहा हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
//***********//
0 notes
देशातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था पुण्यात असून जगभरातील अनेक विद्यार्थी त्यांत शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच पूर्वेकडील ऑक्सफर्ड किंवा विद्येचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. आज, पुण्यामध्ये जगातील नामांकित आई.टी. कंपन्याही आहेत; त्यामुळे या शहराला आई.टी. हब म्हणूनही ओळखले जाते. पुणे हे बुद्धिजीवींचे श���र आहे. पुण्यात वर्षभर संगीत, कला, साहित्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. ‘पुणे तेथे काय उणे’ अशी उक्तीही प्रसिद्ध आहे.याच पुण्यात कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथून भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी १८८३मध्ये सिव्हील इंजिनिअर पुर्ण केले. पुण्याला ते खडकवासला धरणावर असताना १९०३मध्ये त्यांनी पावसाळ्यात धरणामध्ये जास्त पाणी आल्याने धरण असुरक्षित होऊ नये म्हणून निर्माण केलेल्या स्वयंचलित स्लुईस गेट्स अद्वितीय ठरल्या व त्यानंतर ग्वाल्हेरच्या तिग्रा आणि म्हैसूरच्या कृष्णराज सागर धरणावर त्या वापरल्या गेल्या. #pune #coep #engineer #incredibleindia #punestreetart #artforall #publicart #openart #engineersday #maharashtra_ig #mumbaiartfestival #streetartindia #streetarteverywhere #smartcity #punecity #nileshartist (at Coep Pune) https://www.instagram.com/p/CpH_fsZsLX4/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
'मला तू खूप आवडतोस पण...,' तेजस्विनीच्या 'त्या' पोस्टमुळं चर्चांणा उधाण
नवी दिल्ली | मराठी सिनेसृष्टीतील(Marathi Movie) अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं(Tejswini Pandit) आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट, मालिका सुपरहिट ठरल्या आहेत.
तेजस्विनी नेहमीच तिच्या वैयक्तिक किंवा खासगी आयुष्यामुळं चर्चेत येत असते. तसेच तिचे चाहतेही तिच्याविषयी जाणून घेण्यास उस्तुक असतात.
नुकतीच तेजस्विनीनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलयं की, ‘तू मला खूप आवडतोस पण…’ सध्या तिच्या या पोस्टमुळं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
परंतु तिनं ही पोस्ट कोणत्या मुलासाठी नव्हे तर तिच्या आगामी ‘बांबू'(Bambu) या चित्रपटाबद्दल केली आहे. तिनं या चित्रपटातील काही व्हिडीओ क्लिप शेअर करून कॅप्शन दिलं आहे की, मला खूप आवडतोस पण…, आणि मग लागतात बांबू, बांबू चा टीझर पाहिला का?, सध्या या बांबूच्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या चित्रपटात तेजस्विनीसोबत अभिनय बेर्डेही(Abhinay Berde) झळकणार आहे. त्यामुळं हा चित्रपट पाहण्यास त्यांचे चाहते उस्तुक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Read the full article
0 notes
*अदिती आणि आस्तादला परदेशातून चर्चेचं आवताण*
राजकीय आणि सामाजिक वक्तव्यावरून घडणाऱ्या चर्चा याचे उलट सुलट प्रतिबिंब समाजात उमटत असते. कित्येकदा या चर्चा उलथापालथ करणाऱ्या ठरल्या आहेत. वेगवेगळ्या चर्चांनी सध्या देशातील वातावरण चांगलंच गढुळलेलं आहे. त्यात आता 'पठाण' मधील गाण्यावरून 'रंगासंगे युद्ध आमचे सुरु' हा चर्चेचा नवा अंक रंगत असताना मराठी रंगभूमीवरील एका चर्चेने प्रेक्षकांना खडबडून जागं केलं आहे. अगदी परदेशातही या चर्चेची दखल घेतली आहे. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर या त्रयीचं चर्चा तर होणारच या नाटकाच्या प्रयोगांना परदेशातील नाट्य रसिकांकडून नाटकाच्या प्रयोगासाठी खास आवताण देण्यात आलं आहे. अमेरिका, सिंगापूर, दुबई येथील महाराष्ट्र मंडळाकडून हे आमंत्रण देण्यात आलं आहे.
नाटकाचे अधिकाधिक प्रयोग परदेशात व्हावे अशी इच्छा परदेशातील नाट्यरसिक व्यक्त करत आहेत.
परस्पर विचारसरणीच्या विरोधात दंड थोपटून उभ्या असलेल्या दोन कार्यकर्त्यांची गोष्ट या नाटकात आहे . एका सामाजिक पुरस्काराच्या निमित्ताने मुद्दाम झडविल्या गेलेल्या वैचारिक जुगलबंदीत कोण, कसे डावपेच खेळतात याची रंगतदार मांडणी केलेलं नाटकं म्हणजे ‘चर्चा तर होणारच!’
लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकाद्वारे सद्य: परिस्थितीवर भाष्य करत घडवून आणलेली चर्चा विचारमंथन करायला भाग पाडते. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर यांनी आपल्या सशक्त अभिनयाने या नाटकाला चारचाँद लावले आहेत.
रंगनील व वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत हे नाटक सध्या तुफान गाजतंय. मुंबई पुण्यातल्या प्रयोगांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच कोकण दौरा आयोजित केला जाणार आहे. कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या नाटकाचे निर्माते आहेत
0 notes
यंगस्टार मित्रमंडळाचे कणकवली शहराच्या वाटचालीत मोठे योगदान !
यंगस्टार मित्रमंडळाचे कणकवली शहराच्या वाटचालीत मोठे योगदान !
नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे गौरवोद्गारहोम मिनिस्टर स्पर्धेत ऋचा वाळके ठरल्या पैठणीच्या मानकरी
कणकवली : राज्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंगस्टार कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्रमंडळाचा नावलौकिक आहे. गेल्या ४० वर्षांत या मंडळाने विविध सामाजिक, क्रीडा विषयक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कणकवली शहराच्या वाटचालीत या मित्रमंडळाचे मोठे योगदान आहे. यापुढील काळात मंडळाने महिलांनाही विविध उपक्रम…
View On WordPress
0 notes
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
अकोला,१० दि.(जिमाका)- बालन्याय अधिनियम : मुलांची काळजी आणि संरक्षण २०१५ ह्या कायद्यात सन २०२१ ला सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार, अनाथालयातील बालकांना दत्तक देण्याची प्रक्रिया, जी न्यायालयातून होत असे त्याऐवजी ती जिल्हादंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकरवी करण्यात येते. या बदलानंतर दत्तक हस्तांतरण आदेश देणाऱ्या पहिल्या जिल्हाधिकारी अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा ठरल्या आहेत. उत्कर्ष…
View On WordPress
0 notes
काशीच्या नजमा परवीन यांनी पीएम मोदींवर पीएचडी केली, असं करणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या!
https://bharatlive.news/?p=187622
काशीच्या नजमा परवीन यांनी पीएम मोदींवर पीएचडी केली, असं करणाऱ्या पहिल्या ...
0 notes
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
अकोला,१० दि.(जिमाका)- बालन्याय अधिनियम : मुलांची काळजी आणि संरक्षण २०१५ ह्या कायद्यात सन २०२१ ला सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार, अनाथालयातील बालकांना दत्तक देण्याची प्रक्रिया, जी न्यायालयातून होत असे त्याऐवजी ती जिल्हादंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकरवी करण्यात येते. या बदलानंतर दत्तक हस्तांतरण आदेश देणाऱ्या पहिल्या जिल्हाधिकारी अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा ठरल्या आहेत. उत्कर्ष…
View On WordPress
0 notes
टिव्ही...
आमच्या अगदी लहानपणी रेडीओ पहिल्यांदा घरी आला त्यावेळी ‘कुठल्या कुठे लांब असलेल्या लोकांचा आवाज घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळतोय बघा आप्पाराव, उद्या ती लोकं दिसूही लागतील!’ असे तात्या आणि आप्पा (आजोबा आणि चुलत आजोबा) यांचे संभाषण आम्ही ऐकले होते. पहिल्यांदा टेलिफोन आला त्यावेळीही ‘पुढे लोकं फोनवर दिसूही लागतील’ असेच वक्तव्य ऐकले होते. दोन्ही गोष्टी कालांतराने खर्या ठरल्या.
टेलिव्हिजनचे अजून सर्वत्र प्रचलन झाले नव्हते, पण वर्तमानपत्रात त्याबद्दल बातम्या यायच्या. अशा बातम्या वाचून खूप आश्चर्य वाटायचे. घरी बसून बातम्या ‘दिसतात’, सिनेमा पहाता येतो हे ऐकुन ते कसे असते हे पहायची खूप उत्सुकता निर्माण झाली होती. मुंबईला बहिणीकडे टिव्ही घेतला होता. ती कधी आली की त्यावर काय काय दिसते ते सांगायची. त्यामुळे कधी एकदा मुंबईला जातो आणि टिव्ही पहातो असे झाले होते. तो योग 1980 साली अकरावीत असतांना आला!
आईसोबत मुंबईला पहिल्यांदाच गेलो होतो. बहिणीच्या घरी गेल्याबरोबर हॉलमध्ये नजर फिरवली. कोपर्यात टिपॉयवर समोर काच असलेला एक लाकडी डबा दिसला. तोच ‘टिव्ही’ हे लक्षात आले. आयुष्यात पहिल्यांदाच तो डबा पाहिला होता. भाऊजींनी सांगितलं की संध्याकाळी पाच वाजता टिव्ही सुरु होतो. वेळ जाता जात नव्हता. टिव्ही सुरु होतो म्हणजे नेमके काय होते, त्यात लोकं कसे दिसतात, थिएटरमध्ये दिसतो तसाच सिनेमा दिसतो का, असे अनेक प्रश्न मनात येत होते.
संध्याकाळी साडेचारपसूनच टिव्हीसमोर बसलो. भाऊजींनी टिव्ही चालू केला. काही वेळ फक्त मधमाशाच दिसल्या. नंतर काळ्या पांढर्या उभ्या पट्ट्या व त्याबरोबर टुं....असा अवाज! बरोबर पाच वाजता दूरदर्शन असे लिहीलेला एक गोळा फिरायला लागला. संगीतही ऐकायला येऊ लागले. अन काय कमाल! तो गोळा थांबल्यावर एक बाई प्रकटली, अन चक्क बोलायला लागली! माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी मन लावून पहात होतो. आजचे कार्यक्रम तिने सांगितले. काही वेळाने ‘संत तुकाराम’ चित्रपट सुरु झाला. मी तो पूर्ण पाहिला. आयुष्यात पहिल्यांदाच टिव्ही पाहिला अन ते पहायची सरुवातही संत तुकारामने झाली! त्याकाळी टिव्ही ब्लॅक अँड व्हाईट असायचे. दिल्लीला काही ठिकाणी रंगीत टिव्ही सुरु झाले होते असे भाऊजींनी सांगितले. अजूनच आश्चर्य वाटले.
दूरदर्शनचे कार्यक्रम संध्याकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत असायचे. जे असेल ते पहायचे, नो चॉईस! तिथल्या वास्तव्यात दिवसा जरी बाहेर फिरलो तरी संध्याकाळी टिव्ही पहायचा भरपूर आनंद लुटला.
1983-84 साली उमरग्यालाही घरी टिव्ही आला. दादांनी सोलापूरहुन ओरीऑन कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही आणला होता. त्याला समोर लाकडी स्लायडिंग शटर होते. पाहणे झाले की ते शटर बंद करुन ठेवायचे. रेडीओच्या माडीत ते एका टेबलावर स्थानापन्न झाले. तिसर्या माडीत (गच्चीवर) अँटेना लावला. त्याचे अँगल अॅड्जस्ट केले की चित्र दिसायचे. रोज संध्याकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत कार्यक्रम असाय��े. मुंबईला मराठीतून कार्यक्रम असायचे, पण इथे फक्त दिल्ली दूरदर्शनचे हिंदीतले कार्यक्रमच दिसायचे. रविवारी मात्र सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत कार्यक्रम असायचे. दुपारी सगळ्यात बोअरिंग युजीसी चा कार्यक्रम लागायचा. त्या वेळात आम्ही जेवून घ्यायचो. पुन्हा टिव्हीसमोर हजर!
टिव्ही आल्यापासून रेडीओ मागे पडले. रात्रीची आपली आवड, विविध भारती, भुले बिसरे गीत, बिनाका गीतमाला ऐकणे कमी झाले. त्याजागी नुक्कड, हम लोग, बुनियाद, ये जो है जिंदगी, रजनी, डिस्कवरी ऑफ इंडीया, अशा सिरियल्स पाहणे सुरु झाले. अगदी सुरुवातीला तर रात्रीचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमपण आम्ही बघायचो. मुंग्या दिसायला लागल्यावरच टिव्ही बंद व्हायचा!
याच काळात पंतप्राधान इंदिरा गांधींची हत्या झाली होती. बारा तेरा दिवस टिव्हीवर फक्त दुखवट्याचे सांगितिक कार्यक्रमच दाखवले जात होते. त्यांची अंत्ययात्रा लाईव्ह दाखवणार होते. गावात मोजकेच टिव्ही त्यावेळी होते. ज्यांना आमच्याकडे टिव्ही आहे हे माहित होते असे एकेकजण त्या दिवशी यायला लागले. रेडीओच्या माडीतील पलंग, सोफे काढून जास्त लोकांना बसता यावे यासाठी सतरंज्या टाकल्या. हळुहळू गर्दी वाढायला लागली. हॉल संपूर्ण भरला. काही जण उभे राहिले. नंतर तर गर्दी एवढी वाढली की समोरच्या दारापासून, अंगणातून वर जाणार्या पायर्यावर लांबलचक लाईनच लागली. रेडीओ ठेवला होता त्या खालची खिडकी उघडी करुन ठेवली. अलिकडच्या खोलीतून त्या खिडकीत उभे राह���न काहीजण टिव्ही पाहू लागले. अंत्ययात्रा पाहून काही बायका तर पदर डोळ्याला लावून हमसुन हमसुन रडायला लागल्या होत्या. त्यांना आवरणे कठिण जात होते.
सर्वांना जागा करुन देण्यात आमची एवढी दमछाक होत होती की कुणाला बसू द्यावे अन कुणाला जायला सांगावे हे कळेना. काही जणांना थोडे पाहून जायला सांगितले की त्यांना राग यायचा. बाहेरच्यांना आत येऊ नाही दिले तर त्यांनाही राग यायचा. या सगळ्या द्रवेडी प्राणायामात आम्हालाच ते प्रसारण संपूर्ण पाहता आले नाही! अंत्यविधी पार पडुन लोकं परततांना दिसायला लागले तेव्हाच इकडची गर्दी हळुहळू ओसरली!
असाच प्रकार महाभारत सिरीयलच्या वेळेसही यायचा. त्यावेळपर्यंत गावातली टिव्हींची संख्या वाढली होती. तरी वाड्यातले व गल्लीतले मिळून पंचेवीस-तीसजण ही सिरीयल पहायला असायचे! श्रीकृष्ण दिसला की बायका टिव्हीला नमस्कार करायच्या. गनीमत! कुणी हळद कुंकू वाहिले नाही! या महाभारत सिरियलचे वैशिष्ट्य असे होते, की त्याच्या प्रसारणाच्या वेळी रस्त्यावर अक्षरश: कर्फ्यु असायचा. कुठे चिटपाखरु दिसायचे नाही. दुकाने ओस पडायची. तरी कुठे चोरी झालेली ऐकले नाही. बहुतेक चोरही ही सिरियल पहात असावेत!
टिव्हीचा सर्वात जास्त फायदा तर आमचे अत्यंत आवडते क्रिकेट पहाण्यासाठी व्हायचा. पूर्वी रेडीओवर कॉमेंट्री ऐकून स्टेडियमवरील खेळाचा कल्पनेप्रमाणे अंदाज करावा लागायचा. आता ते प्रत्यक्ष दिसत होते. टिव्हीवर अनेक क्रिकेट मॅचेस पाहिल्या. मी शिकायला लातूरला असतांना 1985 साली ऑस्ट्रेलियात बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशीप क्रिकेट टुर्नामेंट होती. मी थोडा आजारी पडलो होतो. ती संधी साधून उमरग्याला आलो. टिव्हीसमोरच्या पलंगावर ठिय्या मांडला. बसल्या जागेवर आई खायला आणून द्यायची. आजारी होतो ना! पंधरा दिवस थांबून सगळ्या मॅचेस पाहिल्या. रवी शास्त्रीला ऑडी देऊनच लातूरला परतलो!
पुढे काही वर्षांनी घरी रंगीत टिव्ही आला आणि हा कृष्णधवल टिव्ही दादांनी हमीदला देऊन टाकला!
आता काळ बदललाय. केबल, सॅटेलाईट, इंटरनेट या माध्यमातून असंख्य चॅनल्सवर अनेक प्रकारचे कार्यक्रम, घरी बसूनच काय, चालता फिरतासुद्धा पहाता येत आहेत. आम्ही चौदा पंधरा वर्षाचे असतांना पहिल्यांदा टिव्ही पाहिला! पण आता जन्मत:च सर्व उपलब्ध आहे. लहान मुलांना ‘चिऊ ताई ये काऊ ताई ये...’ असे म्हणून घास भरवणे बंद होऊन टिव्ही किंवा मोबाईलवरचे कार्टुन दाखवत खाऊ घालणे सुरु झाले आहे. मुलांचे मैदानावर जाऊन खेळणे तर जवळपास बंदच झाले आहे.
आमची पिढी मात्र याबाबतीत नशीबवान आहे. आम्ही मैदानी खेळही भरपूर खेळलो, विहीरीत पोहण्याचा आनंदही लुटला, खूप मस्ती केली, त्याबरोबरच आता कॉम्प्युटर युगाचाही आनंद लुटत आहोत...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note
·
View note
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ मार्च २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ मार्च २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
जी-20 च्या पर्यावरण आणि शाश्वत हवामान विषयक कार्यगटाची दुसरी बैठक आजपासून गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जैवविविधता, जमिनीचा ऱ्हास, चक्रीय अर्थव्यवस्थेत साधनसंपत्तीच्या कार्यक्षम वापराला प्रोत्साहन तसंच बदलत्या हवामानाला लवचिकतेनं तोंड देण्यास सक्षम नील अर्थव्यवस्थेला चालना अशा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
***
श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रांतून काल एल वी एम- 3 एम 3 उपग्रहासह वेब इंडिया-2 योजनेच्या ३६ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहांचं नियंत्रण तिरूवनंतपुरम, लखनऊ आणि बंगळुरू इथल्या केंद्रांच्या साथीनं अंटार्टिका इथल्या केंद्रावरुन केलं जाणार आहे.
***
राज्यातल्या वनेत्तर क्षेत्रातल्या वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं. या पुरस्कारांमुळे इतर नागरीकांमध्ये वृक्ष लावण्याची ���र्जा प्राप्त होईल आणि कर्तव्याची जाण होईल, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ गावांनी महावितरणची थकीत वीज देयकं भरुन थकबाकीमुक्ती मिळवली आहे. वीज देयकं वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलात महावितरणकडून प्रभावी प्रयत्न करण्यात येत असून, वीज ग्राहकांचाही महावितरणला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं महावितरणतर्फे कळवण्यात आलं आहे.
***
नांदेड - अमृतसर - नांदेड या अमृतसर एक्सप्रेस आणि नांदेड - जम्मू तावी - नांदेड हमसफर एक्सप्रेसला सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या दोन्ही गाड्या नांदेड, पूर्णा, हिंगोली, अकोला मार्गे जाणाऱ्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली.
***
पुण्यात सुरू असलेल्या 33 व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत काल भारताची आघाडीची तलवारबाज सी ए भवानी देवी यांनी महिला सॅबर वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. तर महिला वैयक्तिक फॉइल प्रकारात केरळच्या राधिका अवटी सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या.
//**********//
0 notes
सांगली : राज्य गुप्तचर विभागाच्या उपअधीक्षक आरिफा मुल्ला ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या
सांगली : राज्य गुप्तचर विभागाच्या उपअधीक्षक आरिफा मुल्ला ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या
थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये राज्य गुप्तचर विभागामध्ये सांगली कार्यालयामध्ये उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आरिफा मुल्ला ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या ठरल्या. याशिवाय त्या स्पर्धेतील उत्कृष्ट व्यक्तिमत्व गटामध्येही उपविजेत्या ठरल्या.थायलंड मधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ४२ स्पर्धकांची फुकेट येथील…
View On WordPress
0 notes
लातूरच्या पोरी हुश्शार!; बारावीत मुलांपेक्षा उत्तीर्णांची टक्केवारी अधिक!
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घ��ण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचा निकाल बुधवार, दि. ८ जून रोजी जाहीर ��रण्यात आला. या परीक्षेचा लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९५.२५ टक्के लागला.
विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५९ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२१ टक्के आहे. यंदाच्या निकालातही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत.
लातूर, उस्मानाबाद व नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर विभागीय मंडळातून ९० हजार २२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेस ८८ हजार ८३० विद्यार्थ्यी प्रविष्ट झाले होते.
त्यापैकी ८४ हजार ६१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४९,९०५ मुले तर ३८,९२५ मुली परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४७,०१६ मुले तर ३७,५९९ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.२१ तर मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.५९ आहे. लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९५.२५ टक्के लागला आहे.
लातूर विभागीय मंडळात १२ वीच्या परीक्षेसाठी शाळा तिथे उपकेंद्र होते. विभागात मुळ केंद्र २१२ तर उपकेंद्र ६५३ असे एकूण ७६५ केंद्र होते. जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वाखालील दक्षता पथकाने परीक्षेदरम्यान चांगली दक्षता घेतली. त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडली होती.
परीक्षेदरम्यान केंद्रावर कॉपीचे २५ व इतर १३ असे एकूण ३८ गैरप्रकार घडले. या सर्वच प्रकरणात त्या त्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली, अशी माहिती लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली.
Read the full article
0 notes
अली गोनी जस्मिन भसीनने विवाह योजना उघड केली चाहत्यांचे म्हणणे आहे की ही प्रमोशन आहे दुसरे काही नाही
अली गोनी जस्मिन भसीनने विवाह योजना उघड केली चाहत्यांचे म्हणणे आहे की ही प्रमोशन आहे दुसरे काही नाही
टीव्हीवरील सर्वात लाडक्या जोडप्यांपैकी एक, अली गोनी आणि जस्मिन भसीन यांनी प्रत्येक वेळी त्यांच्या लवी-डवीच्या क्षणांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान अली गोनी आणि जास्मिन भसीन यांच्या ब्रेकअपच्या अफवाही पसरल्या होत्या, मात्र त्या खोट्या ठरल्या. पण याशिवाय जास्मिन भसीन आणि अली गोनी यांनी त्यांच्या चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. अली गोनीने त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की, तो आणि…
View On WordPress
0 notes