Tumgik
#दिलं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Shreyas Iyer: श्रेयस अय्यर बोल्ड झाला, पण पंचांनी बाद दिलं नाही; असं का?
Shreyas Iyer: श्रेयस अय्यर बोल्ड झाला, पण पंचांनी बाद दिलं नाही; असं का?
Shreyas Iyer: श्रेयस अय्यर बोल्ड झाला, पण पंचांनी बाद दिलं नाही; असं का? shreyas iyer bowled, India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी भारताने ६ गडी गमावून २७८ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर दिवसअखेर ८२ धावा करून नाबाद आहे. अय्यर बोल्ड झाला होता, पण बेल्स न पडल्याने त्याला जीवदान मिळाले. या…
View On WordPress
0 notes
alkabirislamic · 6 months
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
मांस खाणे पाप आहे!
पवित्र कुराण मध्ये लिखित आहे की "खुदा की इबादत पाक दिलं से करणी चाहिए." परंतु मांस खानाऱ्यांचे हृदय कधीच साफ असू शकत नाही.
Tumblr media
25 notes · View notes
stargazer3700 · 3 months
Text
I would feel as if the sky were collapsing if you weren't here. खरंच, माझं आभाळ कोसळलं असतं आणि गम्मत तर ही आहे की कदाचित मीच त्याला कोसळू दिलं असतं.
12 notes · View notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्य��ंना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
airnews-arngbad · 13 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
****
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टिमुळं जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांच्या वर पोहोचला असून, धरणातून होणार्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा, हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातारा तसंच धुळे जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात काल वीजांसह मुसळधार पाऊस पडला.
****
उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात काल मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. दावोसमध्ये झालेली गुंतवणूक, सौरऊर्जा, सेमीकंडक्टर इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढत असल्याचं ते म्हणाले.
****
���ाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कोल्हापूर इथं पक्षातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.  विधानसभेच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ५८ जागांपैकी अवघ्या १७ जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे हे अंतर भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना शाह यांनी यावेळी केली.
****
देशातल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संवाद असण्याची गरज, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री जाधव यांनी नॅशनल हेल्थ मिशनची बैठक दिल्लीत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नॅशनल हेल्थ मिशनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिश्रम घेण्याचं आवाहन जाधव यांनी यावेळी केलं. 
****
देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ लाख मेट्रिक टनांनी वाढून तीन हजार ३२२ लाख मेट्रिक टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२३-२४ साठी विविध महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनाचे अंतिम अंदाज जाहीर केले आहेत. सरत्या वर्षात भात, गहू आणि श्री अन्न यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी झाल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्राथमिक अंदाज करण्यात आल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
माथाडी कामगारांचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर सरकारनं कारवाई केली असून, यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, माथाडींसाठीचा कायदा आणखी बळकट करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्काराचा वितरण समारंभ नवी मुंबईत काल झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महाअभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड्स आणि स्नूकर महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कमल चावला यानं अजिंक्यपद मिळवलं आहे. मंगोलियात उलानबातर इथं झालेल्या या स्पर्धेत कमलनं पाकिस्तानच्या खेळाडुचा सहा - दोन असा पराभव केला.
****
कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडुंमध्ये स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे.
****
0 notes
Text
Tumblr media
Bishan Singh Bedi Birthday : Wishes from Pradip Madgaonkar
बिशनसिंह बेदी कोण होते? भारतीय क्रिकेटला त्यांनी काय दिलं? वाचा
0 notes
bandya-mama · 2 days
Text
Tumblr media
Bishan Singh Bedi Birthday : Wishes from Bandya Mama
बिशनसिंह बेदी कोण होते? भारतीय क्रिकेटला त्यांनी काय दिलं? वाचा
0 notes
Video
youtube
फडणवीस तुम्ही नाही दिलं मग तुम्हाला सुट्टी नाही.. #latestnews #indianpol...
0 notes
steadykingchaos · 2 months
Text
600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वतः येऊन तत्वज्ञान दिलं | Sant Rampal ...
youtube
0 notes
pandurangkoli · 2 months
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चर्चा तर होणारंच! 'ठरलं तर मग'च्या दिग्दर्शकाला जुई गडकरीनं दिलं भन्नाट गिफ्ट
चर्चा तर होणारंच! ‘ठरलं तर मग’च्या दिग्दर्शकाला जुई गडकरीनं दिलं भन्नाट गिफ्ट
चर्चा तर होणारंच! ‘ठरलं तर मग’च्या दिग्दर्शकाला जुई गडकरीनं दिलं भन्नाट गिफ्ट अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिनं ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असं जुई सांगते. अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिनं ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असं जुई सांगते. Go to Source
View On WordPress
0 notes
vishnulonare · 2 months
Text
600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वतः येऊन तत्वज्ञान दिलं | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग - 600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वत: येऊन तत्वज्ञान दिलं?| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
shobha12sblog · 2 months
Text
600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वतः येऊन तत्वज्ञान दिलं | Sant Rampal ...
youtube
0 notes
airnews-arngbad · 16 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024   रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर; विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त
आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे
आणि
मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याहस्ते देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेचा प्रारंभ, तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची पायाभरणी आणि भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स तसंच २० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी सांगितलं.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण, मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत हे मत व्यक्त केलं. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं.
दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण काल स्थगित झालं. जालना इथल्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून सोळा बचतगटांची निवड करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
****
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे शहात्तर आदिवासी गावांचा कायापालट होणार असून, राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यांमधल्या सुमारे तेरा लाख आदिवासींचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. यात हिंगोली जिल्ह्यातल्या एक्क्याऐंशी तर नांदेड जिल्ह्यातल्या एकशे एकोणसत्तर गावांचा समावेश आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. काल रात्री धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फूटावारुन एक फूट, तर दोन दरवाजे दीड फूट उंचीवर उघडून एकूण १८ दरवाजातून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल दूरद���श्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या भागात संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काल शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक संघटनांकडून निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
“स्वछता ही सेवा” पंधरवड्या निमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत काल रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ३२ स्पर्धकांनी यात सहभाग घेत, स्वच्छता ही सेवा, प्लास्टिक मुक्त हिंगोली शहर, स्वच्छ सुंदर आणि हरित हिंगोली, ईत्यादी विषयांवर रांगोळ्या काढल्या.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता उद्या सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
pradip-madgaonkar · 14 days
Text
वडील : pradip ! आम्ही तुझं लग्न करून दिलं. घरात सून आली,
तरीसुद्धा तुच तुझ्या जीन्सला बटण लावत बसला आहेस.
Pradip: बाब! तुमचा काही तरी गैरसमज होतोय.
ही जीन्स तिचीच आहे.
😀😀😀😍😍😍😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 13 days
Text
वडील : Bandya ! आम्ही तुझं लग्न करून दिलं. घरात सून आली,
तरीसुद्धा तुच तुझ्या जीन्सला बटण लावत बसला आहेस.
Bandya : बाब! तुमचा काही तरी गैरसमज होतोय.
ही जीन्स तिचीच आहे.
😀😀😀😍😍😍😂😂😂🤣🤣🤣
1 note · View note