सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार
पिंपरी -पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. शाई फेकणाऱ्यांवर राजकीय दबावातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून असा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सत्ता आहे म्हणून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असा शब्दात विधानसभेचे विरोधी…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
क्वाड समुहाच्या शिखर परिषदेसाठी अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि जपानचे संबंध अधिक मजबुत करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये हिंद-प्रशांत परिसरात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याविषयी चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेली चर्चा ही दोन्ही देशांसाठी उपयोगी ठरली आहे.
****
श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पदासाठी काल झालेल्या मतदानानंतर लागलीच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये नॅशनल पिपल्स पॉवर म्हणजेच एनपीपी पक्षाचे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके यांनी मोठी आघाडी घेतल्याचं वृत्त आहे. आज सकाळपर्यंत झालेल्या मतमोजणीत त्यांना ५६ टक्के मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि साजिथ प्रेमदासा यांना प्रत्येकी १९ टक्के मते मिळाली आहेत. दरम्यान, देशात ��तमोजणी होईपर्यंत संचरबंदी लागू करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना, परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं अवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, कालही धाराशिव आणि बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. तर उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदच अवाहन करण्यात आलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात नाशिक इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे सदस्य नसतांनाही विद्यमान आमदार असल्याचं पत्र शासकीय कार्यालयांना दिले, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबादास खैरे यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. घड्याळ हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आहे. पण आता पक्ष कोणाचा हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळी आम्हाला तुतारी हे नवीन चिन्ह दिलं त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी या याचिकेत केल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यापूर्वीही अनेकदा ही मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावर सुमारे ४२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. काल पुणे इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाट -हडपसर मार्गाचं चौपदरीकरण आणि विविध विकास कामांच्या भुमीपुजन गडकरी त्यावेळी बोलत होते.
****
राज्यातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची काल भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
****
रेल्वे रूळांच्या पाहणी आणि दुरूस्तीसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे दौंड निजामाबाद ही गाडी उद्या मुदखेड ते निजामाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर परवा निजामाबाद इथून निघणारी निजामाबाद पंढरपूर ही गाडी निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या कांद्याची आता पुन्हा नाशिक रोड आणि लासलगाव इंथल्या रेल्वेस्थानकातून निर्यात होणार आहे. त्यासाठी रेल्वे मालवाहु डब्बे उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद मलखेडे आणि भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलं आहे. या संदर्भात काल नाशिक इथं जिल्ह्यातल्या कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी त्यांनी बैठक घेतली. दरम्यान, मालखेडे यांनी नाशिक, लासलगाव आणि कसबेसुकेणे इथं रेल्वे स्थानकाची पाहणी करून निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
****
चेन्नई इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवशी बांगलादेश संघाने आपल्या दुसऱ्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा ६ बाद २०५ धावा केल्या आहेत. त्याआधी भारतानं आपला दुसरा डाव चार बाद २८७ धावांवर घोषित करत बांदलादेशाला ५१५ धावाचं लक्ष दिलं होतं.
****
0 notes
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर डागली तोफ..
0 notes
दोघेही तातडीनं मुंबईला या! उद्धव ठाकरेंचं फर्मान; तणातणी वाढली, दिलजमाई होणार?
मुंबई/छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसमोर जागावाटपाचं आव्हान आहे. याशिवाय पक्षांतर्गत नाराजीमुळेही सत्ताधारी आणि विरोधक अडचणीत आहेत. आधीच पक्षफुटीमुळे बॅकफूटवर गेलेल्या उद्धव ठाकरेंसमोर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नवी समस्या निर्माण झाली आहे. माजी खासदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात संघर्ष पेटला…
View On WordPress
0 notes
सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान मोलाचे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
नागपूर, दि. 15 : जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता संविधानाने सर्व अधिकार लोकांना दिले आहेत. त्यामुळे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडवण्यात तरुणांनी पुढाकार घेऊन याकामी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात ‘संसदीय लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि…
View On WordPress
0 notes
'गरजू आणि गरिबांना वेळेवर लाभ देण्याची घाई सरकारने दाखवावी'
मडगाव :
भाजप सरकार नेहमीच गरजू आणि गरीबांना त्रास देणारे प्रस्ताव घेऊन येत असते. सरकारने गरजू आणि गरीबांना वेळेवर लाभ देण्याची घाई करावी व समाज कल्याण खात्याच्या लाभार्थ्यांना वेळेत अर्थसहाय्य द्यावे असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
समाज कल्याण खात्याच्या दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड तीन महिन्यांच्या आत बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य…
View On WordPress
0 notes
"राज्यात सत्ताबदल होणार हे मी ठासून सांगतो"
मुंबई | सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. राज्यात काहीच अलबेल नाहीये. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल, असं वडेट्टीवार म्हणालेत.
तिन्ही पक्षाच्या महत्त्वकांक्षा आहे. प्रत्येकजण जेवढा हात मारता येईल तेवढा हात मारला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची त्यांना पर्वा नाहीये. राज्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार चालवायचं म्हणून चालवलं जात आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. याचा अर्थ अलबेल नाहीये. महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
Read the full article
0 notes
“जनतेतील संभ्रम…”; अजित पवार-शरद पवार यांच्या गुप्त बैठकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
“जनतेतील संभ्रम…”; अजित पवार-शरद पवार यांच्या......
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत, यावरून ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय…
View On WordPress
0 notes
..तर मला पण टायरमध्ये टाका , भरसभेत अजितदादांनी पोलिसांना फटकारले
आपल्या रोखठोक वक्तव्यावरून परिचित असलेले अजितदादा पवार यांनी अवैध दारू धंदे बंद होत नसल्याने ‘ माझी जरी दारूची भट्टी असली तर मला पण टायरमध्ये टाका ‘ अशा शब्दात पोलिस अधिकाऱ्यांना फटकारलेले आहे सोबतच पुन्हा दारूधंदे सुरू झाले तर ग्रामस्थांनी मला सांगावे मी एकदाच कायमचा बंदोबस्त करतो , असे देखील ते म्हणाले.
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे एका खाजगी कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार…
View On WordPress
0 notes
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याविरोधी काँग्रेसचा मोर्चा
https://bharatlive.news/?p=175865
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात वन्य प्राण्यांच्या ...
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं.
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच निलंबन..
0 notes
मनोज जरांगेंच ऐकून निर्णय घ्याल, तर फार मोठं नुकसान होईल; वडेट्टीवारांचा मराठा तरुणांना इशारा
मुंबई: मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचे ऐकून निर्णय घेतला तर भविष्यात त्यांचे फार मोठे नुकसान होईल, असा धोक्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. मराठा तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यावर सर्वकाही ठरवू नये. अन्यथा त्यांचं फार मोठं नुकसान होईल. त्यामुळे मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला विजय…
View On WordPress
0 notes
सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 25 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाबरोबच पोलीस दलाला लोकाभिमुख करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, राज्य शासन सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याबरोबरच मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते…
View On WordPress
0 notes