सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार
पिंपरी -पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. शाई फेकणाऱ्यांवर राजकीय दबावातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून असा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सत्ता आहे म्हणून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असा शब्दात विधानसभेचे विरोधी…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 14 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्तदेशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत अभिवादन केलं. मुंबई इथंदादरच्या चैत्यभूमी या डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणासह, 'राजगृह' इथल्या निवासस्थानी नागरीक मोठ्या संख्येनं अभिवादनासाठी दाखल होत आहेत. चैत्यभूमी इथं डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. हेलिकॉप्टर मधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात करण्यात आली आहे. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या इथल्या भडकल गेट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध सामाजिक राजकीय, शैक्षणिक संघटनेच्यावतीनं अभिवादन करण्यात येत आहे. शहरातील महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीज या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रात अधिकारी-कर्मचा-यांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळी नागरीकांनी मोठी रांग दिसून आली. या ठिकाणी भिखू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली. पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं तसंच समता दलानं फेरी काढून अभिवादन केलं. पुस्तक प्रदर्शनाचं आयोजनही यावेळी करण्यात आलं. बीड इथं शहरातल्या बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येत आहे. अकोल्याच्या अशोक वाटिका इथं भारतीय बौद्ध महासभेतर्फे अभिवादन करण्यात आलं. समता सैनिक दलातर्फे बोधिसत्व भीमराव आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांची यावेळी उपस्थित होते. सातारा, सोलापूर इथंही विविध उपक्रमांद्वारे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे.
****
भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणूक जाहिरनामा- संकल्पपत्र आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. रोजगारासह उद्योजकतेवर भर, मोफत शिधा योजनेला मुदतवाढ , गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधण्यासह परवडणारं पौष्टिक अन्न तसंच त्यांचा वीज देयकाचा भार कमी करून शून्य करण्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे. पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, ७० वर्षांवरचे ज्येष्ठ तसंच तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ देणं, नलिकांच्या वाहिन्यांद्वारे स्वस्त गॅस घरात पोहोचवणं, लखपती दीदी सारख्या योजनांसह महिला सक्षमीकरण, मुद्रा योजना लाभ वाढवणं, ‘पीएम किसान’ योजना कायम ठेवणं आदी मुद्दे भाजपच्या जाहिरनाम्यात आहेत.
****
सोलापूर जिल्ह्याच्या अकलुज इथं आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात महाअघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर शिवराज सिंह मोहिते पाटील यांसह निवडणूक उमेदवार धैर्यशील मोहीते पाटील यावेळी उपस्थित आहेत.
****
हिंदी सिनेअभिनेता सलमान खान याची मुंबईत सदनिका असलेल्या वांद्रे परिसरात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे या प्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सलमानला याआधी अनेकवेळा जिवाला धोका असण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं ३२ गावातल्या ८११ हेक्टर वरील फळबागा आणि पीकं उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागानं शासनाकडे पाठवला आहे. या बाधित झालेल्या गावांतल्या फळबागा आणि पिक नुकसान, पशूधन हानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल प्रशासनानं पाठवलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातल्या तीस गावातलं २१८ हेक्टर जिरायत क्षेत्रातलं पिक तसंच ४० हेक्टर बागायत क्षेत्रातलं पिक आणि ५० हेक्टर वरच्या फळबागांचं या अवकाळीमुळं नुकसान झाल्याचं या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. या सोबतच तेरा जनावरं यात दगावली आहेत आणि एका गोठ्याचं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्यामध्ये टरबुजाच्या तसंच, आंबा, द्राक्ष या फळबागांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान उमरगा तालुक्यातल्या त्रिकोळी नारंगवाडी या भागात असल्याचं या अहवालात नमुद आहे.
****
मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Urmila Matondkar Birthday: Wishes from Pradip Madgaonkar
कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या उर्मिला मातोंडकरचं करिअर ‘या’मुळे झालं उद्ध्वस्त!
1 note
·
View note
Urmila Matondkar Birthday: Wishes from Bandya Mama
कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या उर्मिला मातोंडकरचं करिअर ‘या’मुळे झालं उद्ध्वस्त!
0 notes
"राज्यात सत्ताबदल होणार हे मी ठासून सांगतो"
मुंबई | सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. राज्यात काहीच अलबेल नाहीये. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल, असं वडेट्टीवार म्हणालेत.
तिन्ही पक्षाच्या महत्त्वकांक्षा आहे. प्रत्येकजण जेवढा हात मारता येईल तेवढा हात मारला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची त्यांना पर्वा नाहीये. राज्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार चालवायचं म्हणून चालवलं जात आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. याचा अर्थ अलबेल नाहीये. महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
Read the full article
0 notes
पोलिसांनी कॅम्प केला उद्ध्वस्त; नक्षल्याची मोठी योजना फसली
गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात विशेषत: भामरागड व एटापल्ली तालुक्यात मागील काही दिवसांपासून नक्षल्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाने या भागावर अधिक लक्ष ठेवले होते. अशातच नक्षली मोठा घातपाताचा डाव आखित असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर जवानांचे विशेष पथक गस्तीवर होते. दरम्यान उपविभागी हेडरी अंतर्गत येत असलेल्या गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर…
View On WordPress
0 notes
बाया काळीज काढून फेकतात तेव्हा......
अलंकार नाकारून बाया अलंकार होतात तेव्हा...बाया बाया रहात नाहीत त्या फुत्कार होतात...बाया बहिर्या काळाचा चित्कार होतात...
काळजात काळजी वाहणार्या बाया..
काळीज काढून फेकलेल्या बाया,... ह्या बाया फार मोठी क्रांतीची व्याख्या असतात.. ह्याच बाया संघर्ष जगतात... त्याच बाया चमकतात... त्या ज्यालाज्याला स्पर्शून जातात ते चकाकतात....बायाच एकमेव सूर्यावर संस्कृतीची बिजलेणी कोरणार्या..उजेडाचं पिक घेणार्या महाधाडसी निवृत्त्या होतात...बाया ल��ाऊ वृत्त्या होतात..
बाया वरच्या आवाजात बोलतात, तेव्हा पुरूषाची पुरूष पेशी हादरते,बाया हस्तक्षेप करतात तेव्हा, मनूव्यवस्थेने त्यांची निश्चित केलेली वचकाची जागा खिळखिळी होते..बाया सदेह लढतात तेव्हा दास्यत्व गुंफण्यात मश्गूल झालेले हे मनूचे हमाल ठेचण्यासाठी पुढे सरसावतात...ते नको तिथे चावततात...तरी
बाया प्रत्येक गोष्टीचा बिमोड करून तडजोडीला जेव्हा थारा देत नाहीत तेव्हा हे जनावर बळजबरीने हल्ला करते...
बाया गुलामी तोडत चाकोरी मोडून चालतात, म्हणजे पाय वाकडा टाकताच.. यांच्या व्यवस्थेचा डोलारा वाकतो, झुकतो तुटतो कोलमडतो...
बाया बिनतोड पुढे पुढे न विचारता विचार करुन जातात तेव्हा यांची स्पर्धा मरणखाईला लागते...शह मागते..
बाया चुल्ह मुल संभोग बिगूल नाकारतात धिक्कारतात.. जेव्हा रात्री नाकारून बाया दिवसाला कुरवाळतात, तेव्हा परंपरागत पात्र शेवाळतात... त्या तरीही कोसळत नाहीत..
तेव्हा त्या विद्रोही होतात..त्या समाजदोषी होतात?
बाया पती परमेश्र्वराची खरडपट्टी काढतात तेव्हा, देव देव्हारा आणि सात जन्माचा तोच नवरा पतिव्रतेचा पुण्य फेरा बंद पाडतात... तेव्हा पुरुष मक्तेदारी शिरजोरी, दिवाळखोरी प्रथा अघोरी पंरंपररेची पिढीजात श्रृंखला कायमची उद्ध्वस्त होते... म्हणून बाया जाळल्या जातात,बुडवल्या जातात,तुडवल्या जातात.भोगल्या जातात, विटंबवल्या जातात.. त्या देवदासी होतात, त्या सती जातात, त्या वेश्या होतात... त्या दास होतात..तरीही बाया जेव्हा जेव्हा काळीजातली काळजी अन् काजळी फेकून संघर्ष करतात तेव्हा त्या विजा होतात त्या चकाकतात... त्या लखाकतात...
बाया जेव्हा गर्भ टाळतात तेव्हा त्या फार भयंकर स्त्रीवादी वाटतात,कारण त्या संग संभोग टाळतात, त्या व्यंग टाळतात, त्या निर्भय होतात... आणि या व्यवस्थेला निर्भय बायांच्या संखेची भयंकर भिती वाटते...या व्यवस्थेची गांड फाटते....
म्हणून बाया योनीसुचीतेत कोंडलेल्या असतात... त्यांचे अगं प्रत्यांगावर ताबा मिळवणे, त्यावर अत्याचार करणे, त्याचीच विटंबना करणे.. त्यांतूनच आनंदाचे घृणास्पद फवारे काढणे.. त्याला कुरतडणे, त्याला ओरबाडून काढणे,बाया दबत नसतील,ऐकत नसतील जुमानत नसतील..तर बलात्कार करणे, मारुन टाकणे, पुरुन टाकणे..फासावर लटकवणे,अविरत भटकवणे हा पुरुषार्थ आहे...हाच प्रेमाचा आडून केला जाणारा सर्वार्थ स्वार्थ आहे..... बायांच्या उंबरा ओलांडण्याच्या पाऊलखुणात वेदनेचा भावार्थ आहे...बाया जात्याभोवती भणभणत राहतात...बाया आतल्या आत किणकिणत राहतात... मिणमिणत राहतात... उरात निखारा घेऊन फणफणत राहतात...बाया बोलताच आग निघते..बाया चालताच आग लागते...
कारण बाया,एकदा का चारित्र्याचे निकष मोडून पुढे सरसावल्या तर कसोशीने तुटून पडतात.. त्या विकृतीचे लचके तोडतात...
त्या व्यवस्था पाडतात,रूढी गाडतात, त्या परंपरागत गुलामी जाळतात.. त्या स्वायत्त स्वतंत्र होऊन वेगळा पायंडा पाडतात..हे पुरुष आणि त्यांची व्यवस्था श्रेष्ठ कनिष्ठ निर्णय घेणारी देणारी अन्याय यंत्रणा जाणते....
म्हणून बाया दैवी देव्या, देवराया भोवती भक्तीनी जोग्तीनी म्हणून भक्त केल्या जातात.. त्या पाप पुण्य यांच्या मधे खोळंबतात... त्या परंपरागत पद्धतीने मानसिक गुलाम केल्या जातात.. बाया दैववादाची देवसाखळी तोडून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्या फार बंडखोर होतात... त्या सत्ता धर्म अर्थ हातात घेतात...हे ते जाणतात...बायांच्या काळजाचा व्यापार करून त्यात प्रेमाच्या ढोंगाने गुलामिची बिज पेरता येतात हे ते चांगले समजतात... म्हणून ते बायांना करूणेचा झरा भक्कम चिरा.. मुलाबाळांचा पाझर,कमरेवर घागर पावित्र्याची झालर, समर्पणाचा पदर... मातृत्वाचे शिखर, संस्कृतीचे मखर बाया...बाया असंख्य नात्याच्या जाळीने व्यापलेल्या असतात...फार थकलेल्या असतात बाया...बाया आई बहीण भावजया लेकीबाळी,माम्या सुना,आत्या मावश्या सासा, अक्का, अम्मी अम्मा,खाला, आजी अन् सुनवायर्या असतात बायका... आईची घडी उकलुन पाहीलु की नात्यांच्या गुंत्यात गुंफलेल्या असतात बायका...बायका सर्व व्यापी असतात...बायका कोणत्याही धर्मापेक्षा सुंदर असतात.. तरीही बायकांना अशा अनेक खोट्या प्रतिकरुपालंकारात गुंडाळून मऊ पण जखड प्रेतासारखं न लक्षात येऊ देताही नियंत्रणात ठेवलेल्या असू शकतात बायका.....बायांचा काळीज कब्जा हा गुलामी वाढवण्याचं गर्भाकार आहे हे ते फार चाणाक्षपणे वापरतात.. त्यावर प्रेमाची मखमली चादर ओढून सजवतात...ते बाया घरातल्या घरात कुजवतात.....पण बाया फार सुक्ष्म वेदणेच्या वाहक आहेत... त्या डोळ्यातून फूटून वाहतात, त्या नद्या होतात,
त्या लेखणीतून उतरतात त्या विश्वभर पसरतात... त्या कलेच्या आदीनिर्मात्या आहेत.. त्या अकलेच्या जन्मदात्या आहेत.. त्या ज्ञात्या आहेत.. त्याच बी शोधतात... त्याच पेरतात त्याच उगवतात, त्याच अंकुरतात.. त्याच गगणाला भिडतात... त्या आभाळाला डिवचतात, त्याच विजा होऊन कडकडतात.. त्या ढग होऊन गडगडतात..
त्याच पाउस होऊन पडतात....बाया जोवर काळजाच्या बाजूने आहेत तोवर
काळजी करतात ममतेचा विस्तार करतात.. निर्माण परिवार करतात.....पण बाया जेव्हा किळीज काढून फेकतात, तेव्हा त्या त्यांना परावलंबी करणार्या परंपरेच्या नरडीचा घोट घेतात...
बाया जातवर्णवर्ग स्र्तीदास्यत्वाच्या साखळीला नष्ट करतात...बाया स्वताच स्वताचे पंख होऊन भरार्या घेतात..बाया अटकेपार स्वतंत्र मुक्त अस्तित्वाचा हुंकार पेरतात...बाया प्रत्येक लढाई जिंकतात... म्हणून ते पुरूषप्रधानतेचा दगड कायम देहांवर ढकलून देतात.... हातात बांगड्या भरतात...ते हात मोकळे ठेवतात...बाया हे नक्कीच एक दिवस हेरतील... असत्याला बेजार करतील.....बाया निर्भय होतील.. तेव्हा भयाची झोप उडालेली असेल......
- वैभव वैद्य....
0 notes
शालेय विद्यार्थी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान - पालकमंत्री दीपक केसरकर
शालेय विद्यार्थी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 05 : शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कडक उपाययोजनांची गरज असून मुंबई शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करा आणि असे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आगामी काळात मुंबई…
View On WordPress
0 notes
शालेय विद्यार्थी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान - पालकमंत्री दीपक केसरकर
शालेय विद्यार्थी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 05 : शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कडक उपाययोजनांची गरज असून मुंबई शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करा आणि असे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आगामी काळात मुंबई…
View On WordPress
0 notes
इस्रायलने कशी केली इराकची अणुभट्टी उद्ध्वस्त? - ऑपरेशन ऑपेरा
इस्रायलने कशी केली इराकची अणुभट्टी उद्ध्वस्त? – ऑपरेशन ऑपेरा
ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असलेल्या इस्रायलचे आपल्या शेजारी अरब राष्ट्रांशी कट्टर वैर होते. सर्व अरब राष्ट्रे एकत्र येऊनही इस्रायलचा पराभव करू शकले नव्हते. अशा परिस्थितीत एखादे अरब राष्ट्र अण्वस्त्रसज्ज होणे इस्रायलला अजिबात परवडणारे नव्हते. इस्रायल आकारमानाने इतके छोटे राष्ट्र होते की केवळ एक अणुबॉम्ब सुद्धा इस्रायलला उद्ध्वस्त करण्यास पुरेसा होता. त्यामुळेच इराकने ज्यावेळी अण्वस्त्रे निर्माण…
View On WordPress
0 notes
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका – अजित पवार
पिंपरी, दि. 11 – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. शाई फेकणाऱ्यांवर राजकीय दबावातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून असा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सत्ता आहे म्हणून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते…
View On WordPress
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१४ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. मुंबईतल्या चैत्यभूमी इथं बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या भडकल गेट इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी शहरवासी मोठ्या संख्येनं एकत्र येत आहेत. एमजीएम विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीज या केंद्राचं लोकार्पण करण्यात येत आहे.
****
भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा - संकल्प पत्र आज प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं याची घोषणा केली तेंव्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
****
दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते काल दृष्टिबाधित व्यक्तींना स्पर्शानं समजण्याजोग्या नकाशांच्या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन करण्यात आलं, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
****
धाराशिव जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं ३२ गावातल्या ८११ हेक्टर वरील फळबागा आणि पीकं उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागानं शासनाकडे पाठवला आहे. या बाधित झालेल्या गावांतल्या फळबागा आणि पिक नुकसान, पशूधन हानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
****
0 notes
नाशिक आगीत उद्ध्वस्त नागरिकांना नवीन घरांचे हस्तांतरण : हाजी मुजाहिद..
0 notes
तेजस्वी प्रकाश व्हिडिओ व्हायरल क्रो बीट ऑन नागिन 6 अभिनेत्रीच्या डोक्यावर
तेजस्वी प्रकाश व्हिडिओ व्हायरल क्रो बीट ऑन नागिन 6 अभिनेत्रीच्या डोक्यावर
तेजस्वी प्रकाश व्हिडिओ: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने ‘नागिन 6’ द्वारे लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तेजस्वी प्रकाश तिच्या कामाव्यतिरिक्त करण कुंद्रासोबतच्या नात्याबद्दलही खूप चर्चेत आहे. कधी करण कुंद्रा तेजस्वी प्रकाशला भेटण्यासाठी ‘नागिन 6’ च्या सेटवर पोहोचतो, तर कधी तेजस्वी प्रकाश त्याच्या प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या शोमध्ये जातो. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ…
View On WordPress
0 notes
कोट्यवधींच्या मुद्देमालासह १६ रेती तस्कर पोलिसांच्या ताब्यात
चंद्रपूर : खनिकर्म विभाग, पर्यावरण विभाग, महसूल विभाग त्याचप्रमाणे पोलिस विभागाला वेठीला धरून अथवा अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून मोठय़ा प्रमाणात सुरू असलेली अवैध रेती तस्करी करणारे तब्बल पाच जिल्ह्यातील १६ तस्करांचे सिंडिकेट स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त करून ३ कोटी ३0 लक्ष ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात…
View On WordPress
0 notes
प्रेम आणि प्रपोज यांचा फार जवळचा संबंध नाही तरीही आज तो जरा जास्तच येतो...!
चला हरकत नाही, नक्की प्रपोज करा पणं प्रपोज च्या पलीकडे असलेले जगणे सुंदर कसा करता येईल याचाही विचार नक्की करा...
या सात दिवसांचा आठवडा विलक्षण आकर्षण असतो प्रेमी युगलासाठी नक्की तो असावाही...! पण एक सांगेल माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सातव्या अस्मनात वावरत असताना वास्तवात नात कुठ पर्यंत पोहचले याची काळजी नक्की घ्या..!
प्रेम करा प्रपोज करा पणं एक हात जोडून विनंती असेल बाळांनो...
तुम्हाला कोणी प्रपोज केला असेल किंवा तुम्ही कुणाला केला असेल उत्तर होकार असो की नकार असो स्टेबल रहा..! सुखात शांत आणि दुःखात ही शांत रहा... कुठलाही नकार हा कायम नकार नसतो म्हणून संयम बाळगा...! तुम्ही असाल नसेल योग्य तर स्वतः मधे असलेल्या उणिवा शोधा कारण तसा नकार मिळतच नाही... किंवा या उलट तिला नाते नको असेल तिला तीच त्याच आयुष्य जगायचे असेल तर ते आनंदाने तो निर्णय स्वीकार करा...
तुम्ही प्रेम घेऊन प्रपोज केला असेल, करणार असेल तर एक नक्की, नकार आला असेल तर तुमच्या त्या प्रेमाची भावना द्वेष होणार नाही तिरस्कार होणार नाही याची काळजी घ्या..! कारण होकार देण्यासाठी जेवढी हिम्मत लागत नाही तेव्हढी नकार देण्यासाठी लागते म्हणून नकार सुद्धा पचवता आले पाहिजे...
प्रेम अलवार पवित्र भावना आहे ती नक्की जपा पणं त्यातून तुमच्या आई वडिलांच्या तुमच्या आयुष्यावर डाग लागेल अस काही त्यातून निष्पन्न करू नका..! प्रेम करा तो आपला अधिकार आहे पणं प्रेम कुणावर किती व कसे करावे हे फार समजून करा..
प्रेमाच्या तळ्यात जर उतरणार असाल तर तळाचा ठाव नक्की घ्या पणं काठावर उभा राहून प्रेम करू नका..! एकतर्फी असेल तर व्यक्त करा पणं अव्यक्त मनात ठेऊन आतल्या मनाला मारू नका...! कारण अव्यक्त मनातले प्रेम द्वेष होण्यास वेळ लागत नाही..!
पण तुम्ही प्रेम केले असेल आणि त्याने तिने त्याला नकार दिला असेल किंवा अर्ध्यावर थांबले असाल तरीही तुम्हाला तिरस्कार करण्याचा कुठलही अधिकार नाही कारण तुम्ही प्रेम केले होते हे विसरून चालणार नाही...!
याच प्रेमाची दुसरी बाजू जळ जळीत वास्तव आहे हे पणं समजून घ्या...!
प्रेम स्वस्त ही नाही आणि महाग ही नाही ! कारण तुम्ही स्वतःच अस्तित्व सिद्ध केले असेल या दुनियादारीत तर नक्कीच तुमच्या साठी स्वस्त असेल प्रेम भावनेने..! आणि तुम्ही फक्त सौंदर्याच्या बळावर मिळवण्याचा प्रयत्न करत असाल मग तुम्ही ती असो की तो नक्कीच चुकता आहे.. सौंदर्याला कोमजण्याचा शाप असतो आणि प्रेमाला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बहर येत असतो..! म्हणून मनातून जिंकता आले तर तुम्ही प्रेम यशस्वी करू शकता...! वर वर असणारा दिखावा प्रेमाला सुरावत लवकर करेलही आणि लवकर शेवटही ! पण आतून प्रेम येण्यास वेळ लागतोच तो वेळ आज उद्या किंवा कधी कोणी मागितला तर तो वेळ घेऊदा कारण उशिरा घेतलेला निर्णय कदाचित आयुष्यभर सोबत असेल..!
होकार असो की नकार तो समजून घ्या ! त्या मागच्या पवित्र भावनेला कायम न्याय द्या..! आयुष्य खूप सुंदर आहे ते सजवा..! होईल तेवढे नात्यात विश्वास प्रेम काळजी स्नेह स्वतंत्र स्वातंत्र्य द्या..! तुमचे नाते तुमचं आयुष्य सुंदर करेल..! तुमचे प्रेम तुम्ही आयुष्यभर काही कारणास्तव जपू शकत नसलं तर ते स्पष्टपणे सांगण्याचे धाडस ठेवा.! नंतर होणार त्रास कदाचित आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो..!
बाकी ब्रेकअप वैगरे याबद्दल मी बोलणार नाही तो आपणच आपल्यातलं अनेक छोट्या मोठ्या कारणातून मिळवलेला कलंक आहे...!
प्रेम करा ते जगा ते जपा आणि वाढवा..! तुम्हाला ते आयुष्यभर पुरेल एवढे सुंदर आहे..! बाकी प्रेम सात्विक असेल सुंदर असेल तर तुमच्या प्रेमाचा विजय नक्कीच होईल...!
बाकी काही करा पणं कधीच कुणाचा द्वेष करू नका मग तो किंवा ती सोबत असो या नसो कारण आपल्याला प्रेमानंतर द्वेष करण्याचा कुठलाच अधिकार नाही..! कारण आपण प्रेम केले होते व्यवहार नाही..! आणि जर प्रेमात असताना आणि नसतांना तुम्ही जर द्वेष करत असाल तर तुम्ही प्रेमच केले नाही मग त्या द्वेषाचे कारण काही असो चुकी कुणाचीही आणि कितीही टोकाची असो द्वेष करू नका.
करा फक्त प्रेम तुमचा द्वेष करणाऱ्या माणसाचाही आणि आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचाही...!
प्रेम कधी संपत नाही ते फक्त जागा बदलते ती जागा छेडू नका ती अबाधित रहुद्या तुम्ही जगा दुसऱ्याला ही जगू द्या..🤍❤️
-वैभव वैद्य....
0 notes