शाई कुठं वापरायचं याचं भान ठेवलं पाहिजे, सुषमा अंधारे यांनी सांगितलं
शाई कुठं वापरायचं याचं भान ठेवलं पाहिजे, सुषमा अंधारे यांनी सांगितलं
शाई कुठं वापरायचं याचं भान ठेवलं पाहिजे, सुषमा अंधारे यांनी सांगितलं
मुंबई : आमच्या घामाच्या पैसातून योजना निर्माण होतात. या योजनांवर तुम्ही श्रेयवादाच राजकारण करण्याची काही गरज नाही. हे लोकांचे पैसे लोकांच्या सोयीसाठीचे आहेत. लोकांसाठी वापरले गेले आहेत. तुम्ही कर्म धर्म संयोगानं त्या खुर्चीवर आहात. याचा अर्थ तुम्ही भाग्यविधाता असल्याचं थाटात वावरायचं काही कारण नाही, असं सुषमा अंधारे यांनी…
View On WordPress
0 notes
🤍❤️🩹❤️🩹❤️🩹 I'd love to have one or this one day
2 notes
·
View notes
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes
·
View notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
हरियाणातील नारनौर जिल्ह्यातील कनिना इंथल्या जीएलपी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्यामुळं पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. रमजान ईदनिमित्त शासकीय सुटी असतानाही खाजगी शाळा सुरु ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाताना हा अपघात झाला. दरम्यान, हरियाणाच्या शिक्षणमंत्र्यांनी जिल्हा उपायुक्तांकडून अहवाल मागविला आहे.
****
काश्मीर घाटीत पुलवामा जिल्ह्यात स्थानिक पोलीस, लष्करासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर घेराव बंदी आणि शोधमोहीम आज सकाळी सुरु केली. संशयित ठिकाणी हे पथक पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत गोळीबार केला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून, सुरक्षा पथकानं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
****
परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली, सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह इतर उमेदवारांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी इंथल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी महाविकास आघडीचे उमेदवार चंद्राकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान, शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माजी मुख्यमंत्री तथा ���ासदार अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर आदींनी अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातल्या माथेरान मध्ये गेल्या २६ डिसेंबर पासून इ-रिक्षा सेवा पुन्हा सुरू झाली, मात्र या रिक्षांमध्ये सातत्यानं बिघाड होत असल्यानं सध्या ७ पैकी केवळ ३ ई-रिक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग तसंच पर्यटकांची गैरसोय होत आहे. सनियंत्रण समितीने रिक्षांची संख्या वाढवावी, त्या ठेकेदारास चालवायला न देता पुर्वी जे लोक हात रिक्षा चालवत होते त्यांनाच चालवायला द्याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
****
मतदार यादीत नाव शोधणं, किंवा मतदान केंद्र कुठं आहे याबद्दलची माहिती भारत निवडणूक आयोगानं तयार केलेल्या व्होटर ॲपवर उपलब्ध आहे. या ॲपचा वापर करून मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा ३ गडी राखून पराभव केला.
****
जर्मनी इथे सुरु असलेल्या डबल्यूटीटी फीडर डसलडर्फ टेबल टेनिस स्पर्धेत भारताची यशस्विनी घोरपडेनं काल स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या जी युनचेई चा ३-२ असा पराभव केला.
****
0 notes
आपलं 'भाग्य' नेमकं कुठं रहात असतं बरं....?
Even five-six years ago, when you set foot in any shop, you would see a slogan on the facade,’Nobody gets anything better than time and luck’. Ofcource, since it is a common belief that the shopkeeper makes a lot of money by robbing us, it seemed that the shopkeeper must be presenting his side from that good idea. Now recently these ‘knowledge’ boards have disappeared from shops. But there is no…
View On WordPress
0 notes
आभाळंच फाटलं कुठं कुठं शिवणार ? सासू सासरे दिंडीला गेले अन..
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नगर तालुक्यातील आठवड गावच्या शिवारात एका महिलेने मुलासोबत शेतात उडी घेत आत्महत्या केलेली आहे. 23 तारखेला शुक्रवारी दुपारी ही घटना घडलेली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कोमल राजेंद्र नवले ( वय 25 वर्ष ) आणि यश राजेंद्र नवले ( वय आठ दोघेही राहणार आठवड ) अशी त्यांची नावे असून कोमल यांच्या पतीचे…
View On WordPress
0 notes
भाजप आणि शिंदे गटात बॅनर्सवार : 50 कुठं आणि 105 कुठं?, देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है; कुठे लागले बॅनर्स?
0 notes
Weather Update: कुठं कडक उन्हाचा तर कुठं मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा इशारा https://yuvakisannews.com/?p=904
*हवामान विभागाचा आजचा अंदाज*
0 notes
चालानं येऊ फिरून
चालाना येऊ फिरूनजाऊ दूर मस्त ।हाफ तिकीट लागतेपडते ना हो स्वस्त ।
येसटी नच जा लागनमग कुठं बी उतरा ।यात्रा बरी घडन वोगाव फिरू ना सतरा ।
जाऊ जाऊ मुन तुमीनेलं च कुठं आतावरी ।चार धाम झाले असतेपर केलं तुम्ही म्हतारी ।
आता न्हाई नोका म्हनूयंदा जाचच आपल्याले ।पांडुरंगानं बलावलकाई कायते का तुमाले ।
रंग्या मंग्या ऱ्हाउ द्यादोघच आपून जाऊ ।पूना मुंबई बी तिकडडोये भरून पाहू ।
समुद्राच मले बी होहाय लयच…
View On WordPress
0 notes
Bandya : कुठं गेला होतास?
Pradip : फोटो काढायला!
Bandya : मग चेहरा असा पडलेला का?
Pradip : मी फोटोसाठी एकदम तयार होतो.मनात विचार आला…
आता फोटोग्राफर म्हणेल, “स्माइल प्लीज!”
पण…
तो म्हणाला, “पोट आत घ्या!”
😏😏😏🤣🤣🤣😛😛😛😃😃😃
0 notes
Gujarat Election 2022 Results: गेली कुठं? गेली कुठं? काँग्रेसची वोट बँक गेली कुठं? काय वाटतं?
Gujarat Election 2022 Results: गेली कुठं? गेली कुठं? काँग्रेसची वोट बँक गेली कुठं? काय वाटतं?
Gujarat Election 2022 Results: गेली कुठं? गेली कुठं? काँग्रेसची वोट बँक गेली कुठं? काय वाटतं?
गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून पक्ष 155 जागांवर आघाडीवर आहे. गुजरात निवडणुकीत आम आदमी पार्टीचा (आप) दारुण पराभव झाला असला तरी त्यांच्या मतांची टक्केवारी वाढली आहे.
गुजरात निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे, पण त्याचबरोबर आम आदमी…
View On WordPress
0 notes
Pradip : कुठं गेला होतास?
Bandya : फोटो काढायला!
Pradip : मग चेहरा असा पडलेला का?
Bandya : मी फोटोसाठी एकदम तयार होतो.मनात विचार आला…
आता फोटोग्राफर म्हणेल, “स्माइल प्लीज!”
पण…
तो म्हणाला, “पोट आत घ्या!”
😏😏😏🤣🤣🤣😛😛😛😃😃😃
0 notes
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
देशातील बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचं काम आजपासून सुरू झालं आहे. जमा होणाऱ्या या नोटांचा लेखाजोखा सर्व बँकांनी ठेवावा, असे निर्देश काल भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
देशभरातील बँकांच्या खात्यात दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. गेल्या १९ तारखेला रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबतची घोषणा केली होती.
***
जी - ट्वेंटी अंतर्गत पर्यावरण आणि जलवायू कार्यगटाची तिसरी बैठक आज मुंबईत होत आहे. तर आपत्ती काळातल्या जोखीमा कमी करण्यासाठी कार्यरत कार्यगटाची दुसरी बैठकही मुंबईत होत आहे तसंच पर्यटन कार्यसमुहाची तिसरी बैठक आज जम्मू काश्मिरच्या श्रीनगर इथं होत आहे.
***
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर काल रात्री एक ट्र्क आणि प्रवासी वाहनात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तर सात जण गंभीर जखमी झाले. यात एका लहान मुलाचा समावेश आहे.
***
बीड जिल्ह्यात आजपासून दोन जून या कालावधीत मोफत दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे, या शिबिरात तपासणीनंतर दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार सुमारे पाच हजार दिव्यांगाना कृत्रिम अवयव आणि साधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
***
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार हे आज रात्री दोन दिवसांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी ते सोनपेठ तालुक्यात भाऊचा तांडा इथं जाऊन मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांची भेट घेतील. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांबाबत ते प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
***
शासनानं दिलल्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात बांबूची लागवड करण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी काल बैठक घेतली. जिल्ह्यात बांबू लागवड कुठं - कुठं करता येईल, याचं नियोजन करण्यासाठी, संबंधित विभागांनी संयुक्तपणे संशोधन करावं, तसंच जिल्हा परिषदेच्या कोणकोणत्या शाळांना बांबूचं नैसर्गिक कुंपण करता येईल, याबाबतही जिल्हा परिषदेकडून आढावा घेतला जावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिले.
***
0 notes
आई कुठे काय करते मालिकेत नवीनच ट्विस्ट
गृहिणी असेल तर मलिका पाहिल्याशिवाय कोणी राहत नाही. गृहिणीच काय हल्ली नोकरी करणार्या महीला देखील सर्व मलिका पाहतात. अश्याच काही लोकांच्या आवडीच्या मालिकेतील सध्या आई कुठं काय करतेय हि मलिका चांगलीच गाजली असून लोकांना आवडत आहे. स्टार प्रवाह चॅनल वर लागणारी हि मालिका आता टीआरपी रँक मध्ये अव्वल स्थानावर आहे.
नुकतेच आशुतोष ने अरुंधती वरती प्रेम असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे काहीतरी नवीन ट्विस्ट…
View On WordPress
0 notes
श्वेतपत्रिका..महाराष्ट्राची.✍
महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरले जातेय. आज ईकडे शाखेतील कार्यकर्ते मुख्यमंत्री हा जनतेची कामं करतोय म्हणून सगळ्या मंडळात गेले १० दिवस ढाल तलवार मिरवतोय तिकडं त्याच्याच इंजिनियर भाऊ जाॅब शोधतोय कारण..... त्या कार्यकर्त्यांना गृहीत धरले जातेय. तिकडे भाजपायी मंडळी नवीन नवीन मुद्दे जनतेसमोर आणतेत कोणी कूठल्या कुठं गाळे घेऊन ठेवले हे माहीत आहे, कोणाची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि मीडीयाही टीरपी साठी तिखट मीठ लावून तेच बोंबलतेय पण ह्याना महाराष्ट्रातील जनतेशी काही घेणंदेणं नाही फक्त एअरबस चा पण प्रकल्प गुजरातने लुबाडला ही बातमी तुमच्यापर्यंत नीट पोहचली नाही पाहिजे कारण....... जनतेला फक्त गृहीत धरले जातेय. उद्योग मंत्री कोण आहे हेच जनतेला माहित नाही कारण सध्याचे ��द्योग मंत्री कोणी काय केलं आणि कोणी काय नाही क���लं ह्याच उद्योगात जास्त मग्न आहेत त्यांना तुमच्या रोजगारीशी काडीमात्र संबंध नाही .......कारण जनतेला फक्त गृहीत धरले जातेय. मूळशी पॅटर्न मधला डायलॉग पोलिसभरती वर एकदम जुळून येतय "पळा पळा नूस्त पळा "अन स्थगिती आली की गपगुमान रहा ..कारण तूम्हाला फक्त गृहीत धरले जातेय. आज न राहवून मराठी माणसाच्या मनाला नक्की वाटतय की महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर मान खाली घालून बसला आहे कारण... जनतेला फक्त गृहीत धरले जातेय. जोपर्यंत अशा ४० लबाडखोर आमदार सारखे विचार महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही तोपर्यंत सर्व जनता गृहीतच धरली जाणार आणि ज्यादिवशी हे असे दळभद्री विचार महाराष्ट्रातून संपतील तीच खरी श्वेतपत्रिका असेल महाराष्ट्राची.
N_D_PATIL_23
0 notes