ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपास रोडवर सोमवारी पहाटे स्वयंपाकाच्या तेलाची वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. ट्रँकरमधील तेल रोडवर सांडल्याने वाहतुक सेवेवर परिणाम झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
टँकर ३३ टन कच्च्या तेलाने भरलेला होता आणि गुजरातमधील वालियाकडे निघाला होता. प्रथमदर्शनी,…
View On WordPress
0 notes
Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीचे 25 हॉटस्पॉट
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस, पिंपरी चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीचे 25 हॉटस्पॉट निदर्शनास आले आहेत. वाहतूक कोंडी होणाऱ्या 25 ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत.
औद्योगिक वसाहतींमुळे वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवड…
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समाजमाध्यमावरील संदेशात फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्यानव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त खेल उत्सव 2024 चं आयोजन केलं होतं. यात विविध मंत्रालयातील दोनशेपेक्षा अ��िक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.
****
भारत आणि जपान यांच्यातल्या डिजीटल संबंधाना बळकट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जपानचे मंत्री तारो कोनो यांच्यासोबत बैठक घेतली. भविष्यात होऊ घातलेल्या तांत्रिक विकासाच्या मुद्यावर डिजीटल क्षेत्रात उभय राष्ट्रात मदत कशी होईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, या दौऱ्यात वैष्णव यांनी जपानच्या रेल्वे तसंच दळणवळण मंत्र्यांशी चर्चा करत रेल्वे, पर्यटन आणि परिवहन क्षेत्रातल्या मुद्यांवर भर दिला आहे.
****
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता लष्कर तैनात करण्यात आलं आहे. राज्य सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. शहरातल्या गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री महाजन यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. पूर परिस्थिती नंतर प्रशासनाकडून कोणती तत्कालिक व्यवस्था करण्यात आली, याबाबतची माहिती महाजन यांनी घेतली.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणा-या मार्गावर वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. ते मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीनं या ठिकाणी पर्यायी मार्गांचं काम करण्यात आलं आहे, जेणेकरुन पर्यायी मार्गावरुन ही वाढीव वाहतूक सहजतेने ये जा करु शकेल, असं चव्हाण म्हणाले. कोकणात जाणा-या गाड्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त १९ सप्टेंबर पर्यंत टोलमाफी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, रायगड- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर आज वाहतूक कोंडी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थीनिमित्त अनेक चाकरमानी आपल्या गावाकडं जात आहेत. मुंबई- कोकण महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक जण पुणे- मुंबई महामार्गावरून कोकणात जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, असं प्रतिपादन साहित्यिक तथा मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राम वाघमारे यांनी केलं आहे. नांदेड इथल्या श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयात काल शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल काढून पुस्तकांकडे वळवण्याचं आव्हानात्मक कार्य शिक्षकांसमोर असल्याचही वाघमारे म्हणाले.
****
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव - २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळांसाठीच्या पारितोषिकांचं काल वितरण करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जिल्ह्यातल्या छत्तीस उत्कृष्ट आणि वीस उत्तेजनार्थ गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात आलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत ज भारतीय खेळाडू ऍथलेटीक्समध्ये पदकांसाठी खेळणार आहेत. पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दीपेश कुमार खेळणार आहे. तर, उंच उडी स्पर्धेत प्रवीण कुमार, भारोत्तोलन स्पर्धेत कस्तुरी राजामनी, महिला भालाफेक स्पर्धेत भावनाबेन चौधरी आणि शॉट पूट एफ-५७ प्रकारात सोमन राणा आणि होकातो सेमा पदकासाठी ��ैदानात उतरतील.
****
0 notes
एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता आलेलं नाही. सत्ताधारी युती आणि विरोधातील आघाडी, दोन्हीकडे जागावाटपाचा तिढा कायम आहे.
महायुतीचं जागावाटप पुढच्या २४ तासांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…
View On WordPress
0 notes
Bageshwar Dham: उदयपुर मे भड़काऊ ब्यान देने के संज्ञान मे बागेश्वर धाम के पिठाधिश्वर पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री पर हुयी FIR दर्ज, पढ़िए क्या है पूरी न्यूज़
Bageshwar Dham: उदयपुर मे भड़काऊ ब्यान देने के संज्ञान मे बागेश्वर धाम के पिठाधिश्वर पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री पर हुयी FIR दर्ज, 5 की गिरफ़्तारी भी हुयी, पढ़िए क्या है पूरी न्यूज़
देश को हिन्दू राष्ट्र बनाने के उदेश्य से कार्य करने वाले पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री लगातार कोई ना कोई ब्यान देते रहते है उनके द्वारा दिए गए हर एक ब्यान पर अब कानून की नज़र रहने लगी है अब उन्ही बयानों को लेकर धीरेन्द्र कृष्ण शास्त्री कानूनी गिरफ्त मे फँसते नज़र आ रहे है, हालही मे उन्होंने राजस्थान के उदयपुर मे धर्म सभा का आयोजन करवाया था जहाँ उन्होंने हिन्दू राष्ट्र और धर्म के प्रति लोगो को जागरूक किया अपने भाषण के दौरान उन्होंने कुछ ऐसी बाते कही है जिससे धार्मिक वैमन्यस्ता फ़ैल रही है जिसको लेकर पुलिस ने उनके ऊपर केस दर्ज किया है।
Bageshwar Dham: क्या था विवादित ब्यान
पुलिस की माने तो पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री ने अपने भाषण के दौरान बोलते हुए कहा था की हम पाकिस्तान को तो हिन्दू राष्ट्र चलकर बना ही लेंगे लेकिन पहले जो ये कुम्भलगढ़ मे जो ये 100 हरे झंडे है उनको भगवामय बनाना है इसी ब्यान को लेकर पुलिस ने उनके ऊपर धारा 153 - A के तहत FIR हाथीपोर थाने मे दर्ज की है, पुलिस माँ मानना है की उनके इस ब्यान के बाद 5 युवकों ने कुम्भलगढ़ के दुर्ग पर हंगामा करने की कोशिस की अब उन्हें गिरफ्तार कर लिया गया है।
उनके इस ब्यान से धार्मिक भावना आहत हुयी है और सामाजिक वैमनस्यता भी फैलती है जिस वजह से उनके ऊपर केस दर्ज किया गया है।
Bageshwar Dham: सनातन के लिए ही प्राणो को त्यागेंगे - धीरेन्द्र कृष्ण शास्त्री
पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री ने हिन्दू राष्ट्र की पुरजोर मांग उठाते हुए कहा है की हम यहाँ कोई भाषणबाजी करने या राजनीती करने राजस्थान नहीं आये है हम दो कोंडी की राजनीती के लिए करोडो का सनातन बर्बाद नहीं करते है इसलिए यह विचार मत रखना की हम चुनाव के लिए आये है सनातन के लिए जन्मदिन लिया है और सनातन के लिए ही अपने प्राण त्यागेंगे ऐसा पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री कहा।
जो हिन्दू राष्ट्र वही गद्दी पर लौटकर आएगा
उदयपुर राजस्थान मे देश के अनेक प्रसिद्ध संत और पंडित सनातन के समर्थन मे आये जिसमे से देवकीनंदन ठाकुर प्रमुख थे उन्होंने अपने ब्यान मे तो ये तक कह दिया की जो भी हिन्दू राष्ट्र बनाएगा वही सत्ता मे लौटकर आएगा, हालाकी शास्त्री जी हमेशा से ये बोलते आ रहे है की हमारा राजनीती से कोई जुड़ाव नहीं कल भी उन्होंने यही कहा था की हम यहाँ राजनैतिक उदेश्य से बिलकुल भी नहीं आये है हम दो कोंडी की राजनीती के लिये करोडो का सनातन थोड़ी बर्बाद कर सकते है।
Bageshwar Dham: क्या धीरेन्द्र कृष्ण शास्त्री के जैसे पर्चा बनाना अब बन गया है एक ट्रेंड, धीरेन्द्र कृष्ण शास्त्री के शिष्य ने भी लगाया दिव्य दरबार
Bageshwar Dham: जब बागेश्वर के दरबार मे आया एक वैज्ञानिक, जानिए क्या कहा उसने धीरेन्द्र शास्त्री जी से
Read the full article
0 notes
*Mpsc विषयी बोलू काही...*
वास्तविकता आहे ही..
या वर्षभरात बऱ्याच जणांनी MPSC चा अभ्यास सोडून दिला... अनेक मुलांनी कुठेतरी काम करणे वा शेती सांभाळणे सुरु केले, मुलींची लग्न झाली, काही मुलींचा अभ्यास तर सुरु आहे पण आता घरचे अभ्यासासाठी पुण्याला वगैरे पाठवायला तयार नाहीयेत... अनेक विद्यार्थी जे मागच्या 5-6 वर्षांपासून अभ्यास करत आहेत, ते द्विधा मनःस्थितीत अडकले आहेत...अभ्यास पुढे सुरु ठेवणं जिकीरीचं बनलं आहे...चार पैसे कमव, आता वय झालय, आम्हाला लग्नाचं पण बघायचय...असा किती दिवस MPSC चा जुगार खेळत बसणार आहे? अशा पद्धतीचे प्रश्न जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना घरुन विचारले जात आहेत आणि त्याला उत्तर देता देता पोरं कंटाळली आहेत...
नातेवाईक आणि समाजातील इतरही अनेक जणांना नेहमी तोंड द्यावं लागतं...खरं म्हणजे आजकाल गावाकडे MPSC म्हणजे हसण्याचा आणि चेष्टेचा विषय झालाय...MPSC करतोय म्हटलं की आधी मागच्या 4 5 वर्षात मान सन्मान मिळायचा पण आता लोक चक्क हसतात .परिस्थिती किती वेगाने फासे ओलांडते आणि आपण कुठपासुन कुठपर्यंत ढकललो जातो, याचा अंदाज लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच पानीपत झालेल आसत. बर किमान लढायची संधी तरी मिळायला हवी ना, ती सुद्धा मिळत नाहीये. पुस्तक समोर घेऊन बसलेल्या मुला मुलींच्या नजरा मात्र शुन्यात हरवलेल्या दिसतायेत . लढण्यासाठी समोर शत्रू असावा लागतो पण तोच नेमका दिसत नाहीये, मग नक्की लढायच कुनासोबत. व्यथा मोठ्या आहेत, एखाद्या चित्रपटात शोभतील इतक्या दर्दभर्या कथा घडतायेत mpsc करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात.
HR मधील 'महिला विकास वाचताना तो किती पुस्तकी व थोतांड आहे, हे त्या मुलीला विचारा जिला या वर्षी सगळं सोडून लग्न करुन सासरी जावं लागलं आणि तिला MPSC कायमची विसरावी लागते .HR मधील 'युवक विकास' वाचता वाचता चार पैशासाठी कशी सगळी स्वप्न सोडून, चांगली शैक्षणिक पात्रता असतानाही कुठतरी
10 - 12 हजारांवर काम कराव लागणाऱ्या पोरांना हा बदल इतक्या झटक्यात घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.सिस्टिम वाईट असते हे मान्य पण किती ? आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असणाऱ्या परीक्षांबाबत कुणीच बोलायला तयार नाही , हि खरं तर राज्यातील सर्व युवा नेत्यांच्या शरमेची गोष्ट आहे. कोरोना आहे मान्य पण म्हणून किमान तारखा तरी द्यायला हव्या होत्या. 2020 च्या परीक्षा 2021 अर्धे संपले तरी होत नसतील तर आयोग करतय काय? चला मान्य करु की सध्या परीक्षा घेणे शक्य नाही पण किमान तारखा तरी द्या. UPSC ने ज्या दिवशी परिक्षा पुढे ढकलली त्याच दिवशी पुढील तारखा
जाहिर केल्या , मग MPSC च घोड कुठ आडलय ? तुम्हाला सप्टेंबर मध्ये परिक्षा घ्यायच्यात घ्या काही हरकत नाही पण किमान तारखा तरी द्या . पुढच्या वर्षात काय होणार यांच्याबद्दल आयोग चकार शब्द काढायलाही तयार नाही. इतकी चालढकल आयोगासारख्या संस्थेकडून अपेक्षित नाही. हा फक्त परीक्षांचा प्रश्न नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे , आता अभ्यास सोडला तर परत फिरणे अवघड आहे आणि अभ्यास सुरु ठेवायचा तर परीक्षांच्या तारखाच नाही...! बहुतेक विद्यार्थी गावी आहेत आणि गावी राहून अभ्यास करणे किती जिकिरीचं असतं हे ज्याचं त्याला माहीत त्यातच सगळ्यांची आर्थिक स्थिती ठीक नसते . त्यामुळे कधी नव्हे इतके प्रश्न सगळ्यांच्या समोर उभे राहिलेत. हे सगळे प्रश्न घेऊन प्रत्येकाने जमेल त्या माध्यमातून विविध नेत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. दबाव तयार झाला तरच ही कोंडी फुटेल...त्यात विविध कोचिंग क्लासेस ने हि योग्य भूमिका घ्यायला हवी. अगोदर पोस्ट मिळवलेले किंवा सध्या कार्यरत असणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यात दबावगट म्हणून काम केले पाहिजे. हि वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे... हे सगळे झाले तरच पुढे काहीतरी मार्ग निघेल , नाहितर परिक्षांचा घोळ असाच महिनो महिने कायम राहील. आणि मग कधीतरी स्वतःला पुरेशी संधी न देताच mpsc सोडुन द्यावी लागेल .पोटेंशिअल वाया घालवन पोटेंशिअल नसण्यापेक्षा लय वाईट आहे...
कॉपी पेस्ट आहे ..कुनी लिहीलय माहिती नाही पण वास्तविक स्थिती आहे हि 🙏
-वैभव वैद्य....
0 notes
नगर शहरात हायवेवरील ' पिकअप पॉईंट ' ठरताहेत जीवघेणे
नगर शहरातून दररोज शेकडो बस इतर शहरात जात असतात. शहराला सध्या माळीवाडा बस स्थानक, पुणे बस स्थानक आणि तारकपूर बस स्थानक अशी तीन स्थानके आहेत मात्र खाजगी बसेसला असे कुठलेही थांबे नसल्याने अनेक बस शहरात वेगवेगळ्या ठिकाणी थांबत असतात. नगर शहरातील औरंगाबाद रोडवरील कोठला चौक येथे अशाच प्रकारे अनेक बस दिवसभर थांबत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
को��ला परिसरात होत असलेल्या या…
View On WordPress
0 notes
‘सागरमाला’अंतर्गत राज्यातील चार नवीन प्रकल्पांना मंजुरी - बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
‘सागरमाला’अंतर्गत राज्यातील चार नवीन प्रकल्पांना मंजुरी – बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 17 : केंद्र सरकारने सागरमाला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील चार नवीन जेट्टी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब अपोलो बंदर, जंजीरा बंदर, पद्मदुर्ग बंदर व सुवर्णदुर्ग येथील बंदरांचा समावेश आहे. राज्यातील जलवाहतूक वाढणार असून याचा लाभ प्रवासी, मालवाहतूक आणि पर्यटकांना होणार आहे. जलवाहतूक सुरू होणार असल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार…
View On WordPress
0 notes
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
पुणे : विमानतळाकडे जाताना व येताना विमान प्रवाशांसह, वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. आता याच विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने बनविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आमदार सुनील टिंगरे (…
View On WordPress
0 notes
Pimple saudagar : शिवार चौकातील वाहतूक कोंडी सुटणार - नाना काटे
एमपीसी न्यूज – पिंपळेसौदागर येथील शिवार चौकातील सर्कल काढण्यात आला आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी ( Pimple saudagar) सुटणार आहे.
Pimpri : उपायुक्त रविकिरण घोडके यांची बदली
शिवार चौक हा नाशिक फाटा ते हिंजवडी बीआरटीएस रस्त्यावरील मुख्य चौक असून शहरातील व परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास हा रस्ता सोयीस्कर आहे. नागरिक या रस्त्याचा वापर जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे शिवार चौक येथे नेहमीच वाहनांची…
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे, वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: अल्पवयीन मुलांनी वाहने चालविणे धोकादायक असून, तो गंभीर गुन्हा आहे. मात्र, गरजेसाठी विद्यार्थांना वाहने चालवायचीच असतील, तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकी हा पर्याय आहे. शून्य अपघात आणि त्यापलीकडे जाऊन अपघात पूर्ण रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पार्किंगच्या जागेवरच पार्क करावीत यांसारख्या सूचना प्रादेशिक परिवहन…
View On WordPress
0 notes
वाहतूक कोंडीने वाहनधारकांना होत आहे मनस्ताप
करमाड: ग्रामपंचायतीला दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या करमाडचा आठवडे बाजार केवळ जागेअभावी अडचणीत सापडला आहे . येथील सोमवारचा आठवडे बाजार मोठा भरत असल्याने जागा कमी पडते . दुकाने चक्क औरंगाबाद – जालना या मुख्य महामार्गावर थाटली गेल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी होते . वाहतुकीची कोंडी सोडवण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांत प्रवाशांत नाराजी आहे .…
View On WordPress
0 notes
पुण्यात अचानक बंद केला उड्डाणपूल; वाहनांच्या तब्बल ५ किमीपर्यंत लागल्या रांगा!
पुण्यात अचानक बंद केला उड्डाणपूल; वाहनांच्या तब्बल ५ किमीपर्यंत लागल्या रांगा!
पुण्यात : तज्ञांनी आज दुपारी हडपसर उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर महापालिकेने अचानक दोन्ही बाजूचा उड्डाणपूल सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला. याबाबत वाहतूक विभागाला कसलीही माहिती देण्यात आली नव्हती. परिणामी पुणे-सोलापूर रोड आणि सोलापूर-पुणे रोड (Pune Solapur Highway) या दोन्ही दिशेच्या मार्गाला वाहनांच्या तब्बल पाच ते सात किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत. (Pune Traffic Jam)अचानक…
View On WordPress
0 notes
pune trafic पुण्यात लॉकडाऊन झाले तरीही अगणित वाहने रस्त्यावर चेक पॉईंटने उडवला सोशल डिस्टंसीग चा फज्जा पुणे (प्रतिनिधी):
0 notes