शिरीनचा रोल माझा होता, पण अचानक सईला कास्ट केलं गेलं, 'दुनियादारी'वेळी नेमंक काय घडलं ?
शिरीनचा रोल माझा होता, पण अचानक सईला कास्ट केलं गेलं, ‘दुनियादारी’वेळी नेमंक काय घडलं ?
शिरीनचा रोल माझा होता, पण अचानक सईला कास्ट केलं गेलं, ‘दुनियादारी’वेळी नेमंक काय घडलं ?
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या चर्चेत आली आहे. तिनं निर्मिती केलेली अथांग ही वेब सीरिज सध्या गाजतेय. तेजस्विनीच्या कामाची चर्चा होत असताना तिच्या खासगी आयुष्याचीही चर्चा होते.
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या चर्चेत आली आहे. तिनं निर्मिती केलेली अथांग ही वेब सीरिज सध्या…
View On WordPress
0 notes
मनातलं प्रेम
पहिल्याच त्या भेटीतझालं कसं ते प्रेम ।हृदयावर झाला घावअचूक होता नेम ।
रोजच्याच मग भेटीबोलायचा पण एम ।वाढत गेलं सारच नीसजला प्रेमाचा गेम ।
कुठे काय बिघडलंरुसली एकदा मेम ।तू कुठे मी कुठे आतास्वतःशीच वाटतं शेम ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल -परंडा इथं महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थांमधल्या संविधान मंदिराचं आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन-राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची येत्या शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते स्थापना
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची 'सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागाची' घोषणा
आणि
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी मोहीम कायम
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान न होता चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियानात ते काल ���ोलत होते. देशभरातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असून, जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले..
आज एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर एकला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे, तुमच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एकला आलं. आज जीडीपी असेल, परदेशी गुंतवणूक असेल, उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे.
महिलांनी शक्ती दिल्यास, या योजनेतल्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी जमलेल्या भगिनींचा उत्साह पाहून, आपण घेतलेला निर्णय सार्थकी लागल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, काल त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं, तसंच नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरच त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ तारखेपासून साजरा होत असलेल्या संविधान महोत्सवाचा आज समारोप करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र शासनाच्या 'पीएम विश्वकर्मा' योजनेतून कुशल कारागिरांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून, या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा येत्या २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अमरावती इथल्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही यावेळी आभासी पद्धतीनं होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल नियोजित सभास्थळाची पाहणी करून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात राज्यातल्या एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ३३ महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी ही माहिती दिली.
****
खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर आयात शुल्क साडे बारा टक्क्यांवरून साडे ३२ टक्के करण्याच्या निर्णयाचंही पटेल यांनी स्वागत केलं.
****
कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात काल कांद्याचे दर प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी वधारले. लासलगाव बाजारात चांगल्या प्रतिच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन शासनानं केलं आहे.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत आपण दररोज माहिती घेत आहोत. स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत अनुजा कुलकर्णी यांनी माहिती दिली..
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पौरोहित्य येणारे मराठी किंवा अमराठी भारतीय करतात. तर पूजा साहित्य तसंच प्रसाद हे सगळं विकणारी काही कुटुंबे या गोष्टींचा पुरवठा करतात. यानिमित्ताने भारतीय बांधवांनी सुरू केलेल्या छोट्या छोट्या व्यवसायांनाही मदत केली जाते. हिंदू स्वयंसेवक संघातर्फे २०१७ सालापासून गणेश मूर्ती घडवण्याची मोफत कार्यशाळा आयोजित केली जाते. २० सभासदांपासून सुरू झालेली ही कार्यशाळा आता सहाशेच्या घरात गेली असून आता गॉथनबर्गमध्येही सुरू झाली आहे. या मूर्ती साध्या मातीच्या असल्यामुळे त्यांचं विसर्जन घरच्या घरी अगदी सहज करता येतं. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती भारतातून मागवलेल्या असल्यामुळे त्यांचे प्रतिकात्मक विसर्जन करून त्या पुढच्या वर्षासाठी सांभाळून ठेवल्या जातात. महाराष्ट्र मंडळाच्या विसर्जनाच्या वेळी इथल्या हॉलमध्येच ढोल वाजवून छोटीशी मिरवणूक काढली जाते.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या कवडी इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव उत्सव साजरा केला. फुले, शंख- शिंपले, वेगवेगळ्या झाडांची पाने, रंगीत दगड, शेंगांची टरफले अशा मोफत आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांचा वापर करून गणेशाचे विविध भाव दर्शवणारं कोलाज साकारण्यात आलं आहे.
****
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फी अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागाची' घोषणा केली आहे. तरुण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील दृष्टी आणि अनोखा कथा मांडणी दाखवणारे कमाल पाच चित्रपट या विभागात दाखवले जातील. या व्यतिरिक्त, सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार देखील यावेळी प्रदान केला जाईल. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे.
****
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर २-१ अशी मात करत, या स्पर्धेतलं आपलं विजयी अभियान अबाधित ठेवलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रितसिंहने दोन्ही गोल केले. यंदाच्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला भारत याआधीच उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे. उद्या १६ सप्टेंबरला उपांत्य सामने होणार आहेत.
****
तापमान वाढ रोखण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजना प्रभवी ठरेल, असं माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याला सातत्यानं निसर्गाच्या अ��मतोलतेचा अधिक फटका बसला आहे, या परिषदेच्या माध्यमातून निसर्ग आणि पायाभूत सुविधेचा समतोल राखण्यास सहाय्य होईल, अशी अपेक्षा कराड यांनी याप्रसंगी व्यक्त केली. शाश्वत विकास, पर्यावरण आणि समाज कल्याणासंबिधत प्रश्न आणि आव्हाने या विषयावरील या दोन दिवसीय परिषदेमध्ये ६० हूनअधिक संशोधक उपस्थित आहेत.
****
कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन च्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सचिन सुप्रिया यांनी दिलखुलास उत्तरं दिली. सचिन यांच्या गाण्यानं कार्यक्रमाचा समारोप झाला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार १६ सप्टेंबर रोजी ईद -ए -मिलाद निमित्तची सुटी कायम करण्यात आली आहे. ही सुटी १६ किंवा १८ तारखेला घेण्याबाबत स्थानिक पातळीपर निर्णय घेण्यास सांगगण्यात आलं होतं, त्यानुसार काल जिल्हाधिकारी तसंच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी, महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करुन अहवाल द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
****
नांदेड पोलिसांनी काल नवीन नांदेड भागात दोघा जणांकडून तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केली. या कारवाईत ६४ हजाराचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
****
0 notes
दोन Mitra झाडाखाली आरामात बसले होते.
समोरून एक ससा जोरात पळून गेला.
पहिला Mitra : काय गेलं रे?
Bandya : काही नाही रे, फास्ट फूड होत.
🤣🤣🤣😂😂😂😅😅😅😁😁😁
0 notes
दोन Mitra झाडाखाली आरामात बसले होते.
समोरून एक ससा जोरात पळून गेला.
पहिला Mitra : काय गेलं रे?
Pradip : काही नाही रे, फास्ट फूड होत.
🤣🤣🤣😂😂😂😅😅😅😁😁😁
0 notes
पदर फाटला आणि पांघरून उडून गेलं..
0 notes
'स्मरण' शोधायला गेलं की 'विस्मरण' हाती लागते...!
When you go to search for ‘memory’, ‘forgetting’ comes to hand…!
When you start searching the house for something specific, instead of finding what you were looking for, you often come across a forgotten ‘treasure’. This treasure instantly brings a flood of mixed emotions and takes you to the village of forgotten memories. If these memories are of your beloved but deceased ones, then…! This…
View On WordPress
0 notes
आत्म्याचा आवाज
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर���न त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्प��्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळ�� विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note
·
View note
प्रेम आणि क्षमा सर्वांवर विजय मिळवतं.
वयानुसार शहाणपण येतं. जसजसं वय वाढत जातं,तसतसं हे शहाणपण काय आहे ते अनुभव घेत घेत शिकावं लागतं.शिकलं गेलं नाही तर जीवन समजू शकत नाही.हळू हळू पण निश्चितपणे,येणाऱ्य शहाणपणाकडे विश्वासाने पाहिलं पाहिजे.जीवन कठीण आहे. आपलं जीवन सोपं व्हावं अशी आपली कितीही इच्छा असली तरी काही वेळा ते अपरिहार्यपणे कठीण असतं.
मला असं वाटतं की जीवन कठीण आहे म्हणून आपण शिकू शकतो आणि वाढू शकतो आणि कदाचित आपण जे शिकलो ते…
View On WordPress
0 notes
कृष्णाला बर्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने.ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा,आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे..पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे..!
"सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
N_D_PATIL_22
0 notes
मला बॉलिवुडमध्ये काळी मांजर, डस्की म्हणून हिणवलं गेलं : प्रियंका चोप्रा
मला बॉलिवुडमध्ये काळी मांजर, डस्की म्हणून हिणवलं गेलं : प्रियंका चोप्रा
मला बॉलिवुडमध्ये काळी मांजर, डस्की म्हणून हिणवलं गेलं : प्रियंका चोप्रा
– योगिता लिमये
अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने बीबीसी 100 Women ला सांगितलं की तिला 22 वर्षांत पहिल्यांदा तिच्याबरोबर असलेल्या पुरुष सहकलाकारांइतकं मानधन मिळालं आहे. अमेरिकन सिरीज सीटाडेल या सीरिजमध्ये तिला हे मानधन मिळाल्याचं सांगितलं.
प्रियंका अतिशय यशस्वी अभिनेत्री आहे. तिने 60 पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटात काम केलं…
View On WordPress
0 notes
'म्हणून' जात आहेत सहकारी संस्था रसातळाला...
महेश पवार :
महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं प्रस्थ मोठं आहे, पण या क्षेत्रावर पूर्वी काँग्रेस आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा वरचष्मा आहे. आजही ग्रामीण भागात सहकार क्षेत्र महत्त्वाचं मानलं जातं. ग्रामीण भागातील राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण सहकार क्षेत्राभोवतीच फिरताना दिसतं. पूर्वी सर्वोच्च शिखरावर असलेल्या सहकार क्षेत्राचं चित्र गेल्या 15-20 वर्षांत बदलून गेलं. यात अनेक गैरव्यवहार…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर-परंडा इथं महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थांमधल्या संविधान मंदिराचं उद्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन-राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची येत्या शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते स्थापना
कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावं-अभिनेते सचिन पिळगावकर यांचा सल्ला
आणि
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी मोहीम कायम
****
जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्री आज बोलत होते. देशभरातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आज एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर एकला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं राज्य तिसऱ्य�� नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे, तुमच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एकला आलं. आज जीडीपी असेल, परदेशी गुंतवणूक असेल, उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे.
महिलांनी शक्ती दिल्यास, या योजनेतल्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी जमलेल्या भगिनींचा उत्साह पाहून, आपण घेतलेला निर्णय सार्थकी लागल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
या कार्यक्रमापूर्वी धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ तसंच सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख यांच्या हस्ते पांडुरंगाची मूर्ती, वीणा आणि घोंगडी देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचं मुंबईहून विमानानं लातूर इथं आज सकाळी आगमन झालं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लातूरहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री परंडा इथं दाखल झाले. सायंकाळी मुख्यमंत्री लातूर मार्गे मुंबईकडे रवाना झाले.
****
युवकांच्या हाताला काम देऊन त्यांना प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त ठरणार असल्याचं, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज धरणगाव इथं ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत नियुक्ती पत्र वाटप आणि रोजगार मेळाव्यात बोलत होते. यावेळी २७४ प्रशिक्षणार्थीना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महायोजनादूत डॉट ओआरजी या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं केलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं उद्या धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचंही धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणीसह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र शासनाच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतून कुशल कारागिरांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा येत्या २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अमरावती इथल्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही यावेळी आभासी पद्धतीनं होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नियोजित सभास्थळाची पाहणी करून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात राज्यातल्या एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’ची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी ही माहिती दिली.
****
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. पारसी समुदायाची लोकसंख्या ५० हजाराच्या खाली येऊ नये, यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, ‘भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन’ या विषयावरच्या एक दिवसीय संमेलनाला रिजिजू यांनी संबोधित केलं. भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं तर जगाचं नेतृत्व करणं सोपं होईल, असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला.
****
कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन च्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सचिन सुप्रिया यांनी दिलखुलास उत्तरं दिली. सचिन यांच्या गाण्यानं कार्यक्रमाचा समारोप झाला.
****
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर २-१ अशी मात करत, या स्पर्धेतलं आपलं विजयी अभियान अबाधित ठेवलं. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज भारतीय संघाचे दोन्हीही गोल कर्णधार हरमनप्रितसिंहने केले. यंदाच्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला भारत याआधीच उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे. परवा १६ सप्टेंबरला उपांत्य सामने तर अंतिम सामना मंगळवारी १७ तारखेला होणार आहे. या स्पर्धेत यापूर्वी भारत चार वेळा अजिंक्य ठरला आहे.
****
खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल, असं पटेल यांनी म्हटलं आहे. रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर आयात शुल्क साडे बारा टक्क्यांवरून साडे ३२ टक्के करण्याच्या निर्णयाचंही पटेल यांनी स्वागत केलं आहे.
****
कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातील घाऊक बाजारात प्रति क्विंटलचे दर ४०० ते ५०० रुपयांनी वधारले. आज लासलगाव बाजारात चांगल्या प्रतिच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लोकशाही अधिक बळकट, सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करण्याचं आवाहन अहमदनगरचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केलं आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात बेलगाव इथं ‘युवा संवाद’ कार्यक्रमात बोलत होते.
****
नांदेड पोलिसांनी आज नवीन नांदेड भागात दोघा जणांकडून तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केले. या कारवाईत ६४ हजाराचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. या प्रकरणात बलबीरसिंघ प्रतापसिंघ जाधव आणि शेख आदिल शेख शकील या दोघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून येता २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्तानं येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा अभियान” राबवण्यात येणार असल्याची माहिती परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी दिली आहे. यावर्षीच्या अभियानासाठी “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा बीड इथं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
0 notes
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078
२०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले.
गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता.
मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती.
दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला …
दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता.
आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उ���योग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले.
मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत .
सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय.
– वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे)
९६१९२७७७३७
Source link
Read the full article
0 notes
Bandya रेल्वे लाइनवर झोपलेला असतो.
एक माणूस : अरे! उठ इथून! रेल्वे आली तर तुझा जीव जाईल.
Bandya : मला नको शिकवू! अत्ताच माझ्यावरून विमान गेलं, तरी मला काही नाही झालं.
😍😍😍😂😂😂😄😄😄😅😅😅
0 notes